मुख्य सामग्रीवर वगळा

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग - ७


दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग - ७

गावची लोकं पण चांगली होती ,त्यांच्यात आपसात संतू अन् नागू मिसळून राहत म्हणून गावकऱ्यांना पण त्यांचा स्वभाव पटला होता. थोडाफार गावात होणारा विक्रा अन् मग तालुक्याचं शहर जवळ असल्यानं तालुक्याला माल विकायला जायचं सोयीचं होतं म्हणून त्यांची सोयच लागली होती. अन् दोनाची आता तीन संसार या दगड फोडण्याच्या कामावर गावच्या कृपेनं, गावच्या खदानीच्या कृपेनं पोट भरू लागली होती.

पहाटेचा दहाचा पार कलला तसं संतू अन् गोंडाजी आपली शिंगरं घेऊन खदानीच्या अंगाला आले. उन्हं लाहीलाही करत होते. खदानदाराने मागेच दोन दिवसाला खदानीत एक मोठा बार उडवला होता, दगडांची बरीच ठिकरं ठिकरं खदानीत चहूकडे पसरलेली होती.

खदानीच्या अंगाला मागील सालाचे अन् कालच्या पावासाचे असे पाणी तुंबलेले होते. काळ्याश्यार पाण्यात सर्वदूर हिरवे हिरवे शेवाळ नजरी पडत होते अन् काही शंभर मीटर अंतरावर असलेल्या खदानीच्या कपारीतून रीसनाऱ्या झऱ्यातून पाणी रिसत असल्याचं गोंडाजीच्या नजरीला पडलं.तो त्याच्या शिंगराच्या अंगावर असलेल्या झुलीतून कॅन घेऊन त्या रीसनाऱ्या झऱ्याच्या पायथ्याशी गेला अन् एका काटकीला कॅनीत लाऊन पाणी भरू लागला.

दहा पंधरा मिनिटांत त्याची पाचएक लिटर भराची कॅन भरली. त्यानं ती हातात धरली अन् खदानीच्या एकांगाला असलेल्या सावलीत येऊन बसला, तितक्यात संतू दोघांची शिंगरं त्यांना सावलीत चरायला म्हणून बांधून आला आणि दोघांच्या झुलीतून भाकरीचे पेंडकं घेऊन आला.

जरावेळ बसल्यावर दोघांनी पहाटेची न्याहारी करायला म्हणून फडक्यातून आपल्या भाकरी सोडल्या. संतूने कुर्डइचा भुगा,भाकर अन् गोंडाजीने भाकर अन् जाड बेसन आणि तोंडाला लावायला म्हणून लोणच्याची फोडी आणल्या होत्या. दोघांनी एकमेकांची कोड्यास घेतली अन् दोघे न्याहारी करत आज कामाला म्हणजे दगड फोडायला कुठून सुरुवात करायची हा विचार करू लागली.

वेळीच झालेला कामातील नियोजनाचा बदल म्हणून खदानीत आज दोघंच होती अन् सुमनबाई,रानुबाई अन् संतूची बाई शहराला पाटे विकायला म्हणून गेली होती. तसे खदानीत फार असा दगुड उरला नव्हता अन् बरसदीच्या दिवसात काही पैका हाताला म्हणून त्यांनी वेळीच नियोजन बदलून शहराला जाण्याचा ठरवलं होतं.

तिकडे नागू दोघांच्या झोपडीला राखण आणि उरलेल्या पाट्याला टाके देण्याचं काम तो करणार होता. शरीराने जाडजूड अन् ढेरी पुढे आल्यानं त्याला दगुड फोडायचं काम जमत नव्हतं म्हणून तो आपलं बसल्याबसल्या वऱ्हाटे, पाटे, दिवे करण्याचं काम करायचा. त्याच्या हातात ही चांगली कला होती म्हणून सभोवतालच्या चार गावातली लोकं वऱ्हाटे, पाटे, दिवे असं काही घ्यायचं म्हंटले की नागूच्या झोपडीला जवळ करायची.

नागूपण दोन-चार आणे कमी जास्त करून,आलेल्या गिऱ्हाईकचा मान ठेऊन मागेल ती जिन्नस त्याला द्यायचा.राम- श्याम करायचा जेणेकरून पुढे ते गिऱ्हाईक अजून दोन गिऱ्हाईक त्याच्या झोपडीला घेऊन येईल.

संतू अन् गोंडाजी यांनी न्याहारी झाली अन् दोघं खदानीच्या उंचउंच भिंतीला सावलीचा आडोसा धरून पाय लांबून काही अर्धा घंटा निवांत बसून बोलत राहीले. बोलण्यात विषय तरी काय दोघेही तरुण त्यामुळं दोघांना अजून हवी तेव्हढी संसाराची घडी बसवता आली नव्हती पण उद्याच्या भविष्यासाठी काय करायला हवं अन् आज इथे सगळं मोप ठीक आहे पण उद्या या खदानीला तालुक्याच्या तहसिलदार साहेबांनी सील ठोकले तर आपण कुठे जायचं ? दुसऱ्या शहरात पुन्हा हे सगळं बस्तान बसवायला होणारा त्रास, असं एकूण सगळं त्यांच्या गप्पात चालू होतं.

दोघांची शिंगर आता चरूनचरुन पार फुगून गेली होती. गोंडाजी अन् संतू आपल्या गप्पा आवरत्या घेत उठले अन् दोघांनी आपल्या शिंगरांना पाणी दाखवून आणले. पुन्हा बांधून दोघेही खदानीत ठरल्या जागी दगुड फोडायला म्हणून खांद्यावर घन घेऊन निघाले.

क्रमशः
भारत लक्ष्मण सोनवणे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड