मुख्य सामग्रीवर वगळा

"एक उलट... एक सुलट"

"एक उलट... एक सुलट"

काल उसवत्या सांजवेळेला "अमृता सुभाष" यांचं "एक उलट... एक सुलट" हे ललित लेखन अन खऱ्या अर्थानं त्यांच्या मनातल्या विचारवादळाची, समरसून जगलेल्या, अनुभवलेल्या क्षणांची, आयुष्यातल्या अनामिक क्षणांची, अनुभवसरिंची ही अक्षरांनींच घडवलेली, त्यांनी घातलेली वीण वाचून संपवली.
 
खरंतर कुठल्याही अभिनेता किंवा अभिनेत्रीचं पडद्यावरील, रंगमंचावरील आयुष्य हे आपण नेहमीच बघत असतो. पण; मला या कलाकारांच्या बाबतीत एक अनामिक कुतूहल नेहमीच आहे. ते हे की, या अभिनेता किंवा अभिनेत्रीचं पडद्यामागील खरंखुरं आयुष्य कसं असेल..?
पडद्यावर कधीतरी खोटं हसू घेऊन जगणारे किंवा खरं हसू घेऊन जगणारी ही कलाकार त्यांच्या खऱ्या आयुष्यात कशी असतील..? त्यांचा स्वभाव कसा असेल..? हे सर्व जाणून घेण्याचं मला अनामिक कुतूहल आहे.

यासाठी मग मी कित्येकदा त्यांच्या आयुष्यावर लिखित पुस्तकं वाचत राहिलो. पडद्यावर भेटणाऱ्या या कलाकारांना त्यांच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यातील कलाकारांशी जुळवून बघत राहिलो. सुशांत सिंग राजपूत याने जेव्हा अवेळी एक्झिट घेतली तेव्हा मात्र माझं हे कुतूहल अजूनच चाळवल्या गेलं अन् मग अश्या पुस्तकांची संख्या वाचनात अजूनच वाढत राहिली.

काही दिवसांपूर्वी असंच आवडत्या अभिनेत्री, लेखिका "अमृता सुभाष" यांचं हे त्यांच्या सहीसोबत असलेलं पुस्तक हातात पडलं. आज या उसवत्या सांजवेळी तीन तासांत ते वाचून संपवलं. पुस्तक संपलं तसं बुकशेल्फमध्ये ठेवलं, काही दिवसांनी ते पुन्हा परत करायचं आहे. खूप वाटलं हे पुस्तक संग्रही हवं, विकतही घेता येईल, पण "अमृता सुभाष" यांची सही असलेलं ते पुस्तक आहे. प्रत्येकाला त्याचं पुस्तक जीव की प्राण असतं त्यामुळं कितीही नकोसं वाटलं तरी ते पुस्तक परत करायलाच हवं. असो पुस्तक बुकशेल्फमध्ये ठेवलं, हातात कॉफीचा मग घेऊन सोनेरी पडद्याच्या विंडोग्रील आडून पाऊस बघत बसलो आहे.

पुस्तक वाचायला घेतलं एका बैठकीत वाचून संपवलं. पुस्तक खूप सुंदर अन् सहज अलवार असं आहे. कुठेही लेखनात फार अलंकारिक शब्दरचना या पुस्तकात आढळत नाही. त्यामुळं पुस्तक वाचतांना हे सर्व खूप सहज, सोप्पं वाटतं.
अमृता यांच्या आयुष्यातील आठवणींचा काळ, फिरस्ते, देश-विदेशात त्यांनी केलेली सफर त्यांच्या आयुष्यात असलेली माणसं, त्यांच्या शालेय जीवनातील प्रसंग ते कॉलेज लाईफ ते त्यांचा सिनेविश्वातील प्रवास, सोबतच त्यांचं अफाट वाचन या त्यांच्या आयुष्यातील सर्व घडामोडींची ओळख आपल्याला हे पुस्तक करून देतं

अन् या पुस्तकातून मग आपल्याला वडीलांसाठी हळवी अमृता भेटत असते. वडीलांसाठी हळवी होणारी अमृता काळजाचा ठाव घेणारी अन् खुप जवळची मला वाटली. कारण वडीलांचा खूप कमी वाट्याला आलेला लाड,सहवास आणि वडीलांचं आजारपण आज यशस्वीतेच्या शिखरावर असूनही वडील सोबत नसल्यानं आयुष्यात आलेलं अधुरेपण, अपूर्णत्व. हे सगळं जवळून अनुभवलं असल्यानं गलबलून यायला होत.
मग पुस्तकांत त्यांनी वडीलांच्या समवेत घालवलेले क्षण,या सगळ्या कैद केलेल्या त्यांच्या आठवणी आपलाच आयुष्यातील मागे सुटून गेलेला काळ आठवून द्यायला भाग पाडतात.

ह्या पुस्तकात असणाऱ्या संपूर्ण लेखांमधून माझा अतिशय आवडता लेख म्हणजे टोकियो स्टोरी - मुंबई स्टोरी हा शेवटचा लेख. टोकियो स्टोरी नावाच्या चित्रपटाचं अमृताच्या नजरेतून उलगडत गेलेलं भावविश्व आहे, ते वाचून हा चित्रपट बघायला हवा असं वाटून गेलं

खरंतर बराच वेळ पुस्तक वाचून झाला. पण; मन अजूनही त्यांच्या लेखणीने घातलेल्या "एक उलट एक सुलट" वीणेत अडकून पडलंय. त्यासाठी व तुमच्या या लिखाणासाठी अन् या पुस्तकातून तुम्ही ज्या कळल्या त्यासाठी,
"इश लीब दी" 💙

 "इर्ली बीड..! असू दे, राहू दे..!

अक्षरांशी ओळख
अक्षरांशी मैत्री, अक्षरांशी गप्पा
आणि अक्षरांसोबतीनं धरलेला फेर...

ती गाते सुरेख,
अभिनय तर तिच्या आवडीचा,
पण तिला व्यक्त व्हायला या अक्षरांनीच हात दिला...

तिच्या मनातल्या विचारवादळाची
अन् आयुष्यातल्या अनुभवसरिंची
अक्षरांनीच घडवली वीण...
एक उलट.. .एक सुलट 

Written by,
Bharat Sonawane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...