मुख्य सामग्रीवर वगळा

"एक उलट... एक सुलट"

"एक उलट... एक सुलट"

काल उसवत्या सांजवेळेला "अमृता सुभाष" यांचं "एक उलट... एक सुलट" हे ललित लेखन अन खऱ्या अर्थानं त्यांच्या मनातल्या विचारवादळाची, समरसून जगलेल्या, अनुभवलेल्या क्षणांची, आयुष्यातल्या अनामिक क्षणांची, अनुभवसरिंची ही अक्षरांनींच घडवलेली, त्यांनी घातलेली वीण वाचून संपवली.
 
खरंतर कुठल्याही अभिनेता किंवा अभिनेत्रीचं पडद्यावरील, रंगमंचावरील आयुष्य हे आपण नेहमीच बघत असतो. पण; मला या कलाकारांच्या बाबतीत एक अनामिक कुतूहल नेहमीच आहे. ते हे की, या अभिनेता किंवा अभिनेत्रीचं पडद्यामागील खरंखुरं आयुष्य कसं असेल..?
पडद्यावर कधीतरी खोटं हसू घेऊन जगणारे किंवा खरं हसू घेऊन जगणारी ही कलाकार त्यांच्या खऱ्या आयुष्यात कशी असतील..? त्यांचा स्वभाव कसा असेल..? हे सर्व जाणून घेण्याचं मला अनामिक कुतूहल आहे.

यासाठी मग मी कित्येकदा त्यांच्या आयुष्यावर लिखित पुस्तकं वाचत राहिलो. पडद्यावर भेटणाऱ्या या कलाकारांना त्यांच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यातील कलाकारांशी जुळवून बघत राहिलो. सुशांत सिंग राजपूत याने जेव्हा अवेळी एक्झिट घेतली तेव्हा मात्र माझं हे कुतूहल अजूनच चाळवल्या गेलं अन् मग अश्या पुस्तकांची संख्या वाचनात अजूनच वाढत राहिली.

काही दिवसांपूर्वी असंच आवडत्या अभिनेत्री, लेखिका "अमृता सुभाष" यांचं हे त्यांच्या सहीसोबत असलेलं पुस्तक हातात पडलं. आज या उसवत्या सांजवेळी तीन तासांत ते वाचून संपवलं. पुस्तक संपलं तसं बुकशेल्फमध्ये ठेवलं, काही दिवसांनी ते पुन्हा परत करायचं आहे. खूप वाटलं हे पुस्तक संग्रही हवं, विकतही घेता येईल, पण "अमृता सुभाष" यांची सही असलेलं ते पुस्तक आहे. प्रत्येकाला त्याचं पुस्तक जीव की प्राण असतं त्यामुळं कितीही नकोसं वाटलं तरी ते पुस्तक परत करायलाच हवं. असो पुस्तक बुकशेल्फमध्ये ठेवलं, हातात कॉफीचा मग घेऊन सोनेरी पडद्याच्या विंडोग्रील आडून पाऊस बघत बसलो आहे.

पुस्तक वाचायला घेतलं एका बैठकीत वाचून संपवलं. पुस्तक खूप सुंदर अन् सहज अलवार असं आहे. कुठेही लेखनात फार अलंकारिक शब्दरचना या पुस्तकात आढळत नाही. त्यामुळं पुस्तक वाचतांना हे सर्व खूप सहज, सोप्पं वाटतं.
अमृता यांच्या आयुष्यातील आठवणींचा काळ, फिरस्ते, देश-विदेशात त्यांनी केलेली सफर त्यांच्या आयुष्यात असलेली माणसं, त्यांच्या शालेय जीवनातील प्रसंग ते कॉलेज लाईफ ते त्यांचा सिनेविश्वातील प्रवास, सोबतच त्यांचं अफाट वाचन या त्यांच्या आयुष्यातील सर्व घडामोडींची ओळख आपल्याला हे पुस्तक करून देतं

अन् या पुस्तकातून मग आपल्याला वडीलांसाठी हळवी अमृता भेटत असते. वडीलांसाठी हळवी होणारी अमृता काळजाचा ठाव घेणारी अन् खुप जवळची मला वाटली. कारण वडीलांचा खूप कमी वाट्याला आलेला लाड,सहवास आणि वडीलांचं आजारपण आज यशस्वीतेच्या शिखरावर असूनही वडील सोबत नसल्यानं आयुष्यात आलेलं अधुरेपण, अपूर्णत्व. हे सगळं जवळून अनुभवलं असल्यानं गलबलून यायला होत.
मग पुस्तकांत त्यांनी वडीलांच्या समवेत घालवलेले क्षण,या सगळ्या कैद केलेल्या त्यांच्या आठवणी आपलाच आयुष्यातील मागे सुटून गेलेला काळ आठवून द्यायला भाग पाडतात.

ह्या पुस्तकात असणाऱ्या संपूर्ण लेखांमधून माझा अतिशय आवडता लेख म्हणजे टोकियो स्टोरी - मुंबई स्टोरी हा शेवटचा लेख. टोकियो स्टोरी नावाच्या चित्रपटाचं अमृताच्या नजरेतून उलगडत गेलेलं भावविश्व आहे, ते वाचून हा चित्रपट बघायला हवा असं वाटून गेलं

खरंतर बराच वेळ पुस्तक वाचून झाला. पण; मन अजूनही त्यांच्या लेखणीने घातलेल्या "एक उलट एक सुलट" वीणेत अडकून पडलंय. त्यासाठी व तुमच्या या लिखाणासाठी अन् या पुस्तकातून तुम्ही ज्या कळल्या त्यासाठी,
"इश लीब दी" 💙

 "इर्ली बीड..! असू दे, राहू दे..!

अक्षरांशी ओळख
अक्षरांशी मैत्री, अक्षरांशी गप्पा
आणि अक्षरांसोबतीनं धरलेला फेर...

ती गाते सुरेख,
अभिनय तर तिच्या आवडीचा,
पण तिला व्यक्त व्हायला या अक्षरांनीच हात दिला...

तिच्या मनातल्या विचारवादळाची
अन् आयुष्यातल्या अनुभवसरिंची
अक्षरांनीच घडवली वीण...
एक उलट.. .एक सुलट 

Written by,
Bharat Sonawane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड