मुख्य सामग्रीवर वगळा

"एक उलट... एक सुलट"

"एक उलट... एक सुलट"

काल उसवत्या सांजवेळेला "अमृता सुभाष" यांचं "एक उलट... एक सुलट" हे ललित लेखन अन खऱ्या अर्थानं त्यांच्या मनातल्या विचारवादळाची, समरसून जगलेल्या, अनुभवलेल्या क्षणांची, आयुष्यातल्या अनामिक क्षणांची, अनुभवसरिंची ही अक्षरांनींच घडवलेली, त्यांनी घातलेली वीण वाचून संपवली.
 
खरंतर कुठल्याही अभिनेता किंवा अभिनेत्रीचं पडद्यावरील, रंगमंचावरील आयुष्य हे आपण नेहमीच बघत असतो. पण; मला या कलाकारांच्या बाबतीत एक अनामिक कुतूहल नेहमीच आहे. ते हे की, या अभिनेता किंवा अभिनेत्रीचं पडद्यामागील खरंखुरं आयुष्य कसं असेल..?
पडद्यावर कधीतरी खोटं हसू घेऊन जगणारे किंवा खरं हसू घेऊन जगणारी ही कलाकार त्यांच्या खऱ्या आयुष्यात कशी असतील..? त्यांचा स्वभाव कसा असेल..? हे सर्व जाणून घेण्याचं मला अनामिक कुतूहल आहे.

यासाठी मग मी कित्येकदा त्यांच्या आयुष्यावर लिखित पुस्तकं वाचत राहिलो. पडद्यावर भेटणाऱ्या या कलाकारांना त्यांच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यातील कलाकारांशी जुळवून बघत राहिलो. सुशांत सिंग राजपूत याने जेव्हा अवेळी एक्झिट घेतली तेव्हा मात्र माझं हे कुतूहल अजूनच चाळवल्या गेलं अन् मग अश्या पुस्तकांची संख्या वाचनात अजूनच वाढत राहिली.

काही दिवसांपूर्वी असंच आवडत्या अभिनेत्री, लेखिका "अमृता सुभाष" यांचं हे त्यांच्या सहीसोबत असलेलं पुस्तक हातात पडलं. आज या उसवत्या सांजवेळी तीन तासांत ते वाचून संपवलं. पुस्तक संपलं तसं बुकशेल्फमध्ये ठेवलं, काही दिवसांनी ते पुन्हा परत करायचं आहे. खूप वाटलं हे पुस्तक संग्रही हवं, विकतही घेता येईल, पण "अमृता सुभाष" यांची सही असलेलं ते पुस्तक आहे. प्रत्येकाला त्याचं पुस्तक जीव की प्राण असतं त्यामुळं कितीही नकोसं वाटलं तरी ते पुस्तक परत करायलाच हवं. असो पुस्तक बुकशेल्फमध्ये ठेवलं, हातात कॉफीचा मग घेऊन सोनेरी पडद्याच्या विंडोग्रील आडून पाऊस बघत बसलो आहे.

पुस्तक वाचायला घेतलं एका बैठकीत वाचून संपवलं. पुस्तक खूप सुंदर अन् सहज अलवार असं आहे. कुठेही लेखनात फार अलंकारिक शब्दरचना या पुस्तकात आढळत नाही. त्यामुळं पुस्तक वाचतांना हे सर्व खूप सहज, सोप्पं वाटतं.
अमृता यांच्या आयुष्यातील आठवणींचा काळ, फिरस्ते, देश-विदेशात त्यांनी केलेली सफर त्यांच्या आयुष्यात असलेली माणसं, त्यांच्या शालेय जीवनातील प्रसंग ते कॉलेज लाईफ ते त्यांचा सिनेविश्वातील प्रवास, सोबतच त्यांचं अफाट वाचन या त्यांच्या आयुष्यातील सर्व घडामोडींची ओळख आपल्याला हे पुस्तक करून देतं

अन् या पुस्तकातून मग आपल्याला वडीलांसाठी हळवी अमृता भेटत असते. वडीलांसाठी हळवी होणारी अमृता काळजाचा ठाव घेणारी अन् खुप जवळची मला वाटली. कारण वडीलांचा खूप कमी वाट्याला आलेला लाड,सहवास आणि वडीलांचं आजारपण आज यशस्वीतेच्या शिखरावर असूनही वडील सोबत नसल्यानं आयुष्यात आलेलं अधुरेपण, अपूर्णत्व. हे सगळं जवळून अनुभवलं असल्यानं गलबलून यायला होत.
मग पुस्तकांत त्यांनी वडीलांच्या समवेत घालवलेले क्षण,या सगळ्या कैद केलेल्या त्यांच्या आठवणी आपलाच आयुष्यातील मागे सुटून गेलेला काळ आठवून द्यायला भाग पाडतात.

ह्या पुस्तकात असणाऱ्या संपूर्ण लेखांमधून माझा अतिशय आवडता लेख म्हणजे टोकियो स्टोरी - मुंबई स्टोरी हा शेवटचा लेख. टोकियो स्टोरी नावाच्या चित्रपटाचं अमृताच्या नजरेतून उलगडत गेलेलं भावविश्व आहे, ते वाचून हा चित्रपट बघायला हवा असं वाटून गेलं

खरंतर बराच वेळ पुस्तक वाचून झाला. पण; मन अजूनही त्यांच्या लेखणीने घातलेल्या "एक उलट एक सुलट" वीणेत अडकून पडलंय. त्यासाठी व तुमच्या या लिखाणासाठी अन् या पुस्तकातून तुम्ही ज्या कळल्या त्यासाठी,
"इश लीब दी" 💙

 "इर्ली बीड..! असू दे, राहू दे..!

अक्षरांशी ओळख
अक्षरांशी मैत्री, अक्षरांशी गप्पा
आणि अक्षरांसोबतीनं धरलेला फेर...

ती गाते सुरेख,
अभिनय तर तिच्या आवडीचा,
पण तिला व्यक्त व्हायला या अक्षरांनीच हात दिला...

तिच्या मनातल्या विचारवादळाची
अन् आयुष्यातल्या अनुभवसरिंची
अक्षरांनीच घडवली वीण...
एक उलट.. .एक सुलट 

Written by,
Bharat Sonawane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...