मुख्य सामग्रीवर वगळा

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग - १

 वडार वेदना..!
दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग - १ 

सूर्य अस्ताला गेला, पिवळी उन्हं तांबडं फुटल्यागत दिसू लागली होती. अस्ताला जाणाऱ्या सूर्याबरोबर झोपडीच्या चहूबाजूंनी पसरलेला दगडाला टाके द्यायला लागणारं साहित्य छनी, हातोड्याला अन् इतर वस्तू नागू जमवू लागला होता.

टाके द्यायची छनी, हातोडी त्यानं पाण्यात हीसळली अन् एक टोपल्यात टाकली. गणाबाईनं अंगणा मोहरच्या पडसावलीतल्या अंगणाला सगळं शेणानं सारून माखून घेतलं होतं. झोपडीच्या पुढे झोपडीला शोभेल अशी टिपक्याटीपक्याची रांगोळी तिने काढली होती. 

सांज जशी कलायला लागली तसं नागूनं सारा बाडबिस्तरा सावरत दगडात दिवसभर घडवलेली वऱ्हाटे, पाटे, उक्खळ, खलबत्ते, देउळमध्ये ठेवला जाणारा दगडी दिवा सगळं एक मोहरं लावले. अन् ; तो शेजारच्या झोपड्यात असलेल्या संतू घिसाड्याशी गप्पा मारायला गेला.

संतू घिसाडी पेताड असल्या कारणानं दिवसभर बायकोने डोक्यावर गाव गाव हिंडून वऱ्हाटे, पाटे विकून जमवलेला पैसा संतू त्याच्या बायकोला मागत होता. दोघात दुपारपासून कल्ला चालू होता, नागूला बघताच संतूची बाई नजर हिरमुसल्यासारखी करून झोपडीच्या असलेल्या पडद्याआड गेली अन् हमसून हमसून रडायला लागली. पण नशिबाला आलं त्याला कोण काय करणार.

नागूला बघून संतू स्वतःला सावरत चेहऱ्यावरील भाव बदलत चेहऱ्यावर बळजबरीचं हसण्याचा आव आणत संतू नागूकडे नजर चुकवत बघू लागला अन् जिभेला सावरत एक एक शब्द पुटपुट करू लागला.

अरे नागू कवशिक आलासा रं..!
नागू बोलता झाला,
हे काय येऊच रहायलो, तुझ्या बायकोचा अन् तुझा भांडण करण्याचा कल्ला ऐकून आलोसा म्हंटल संतूची बायको काहून केकलायली ..!

तितक्यात संतू बोलला : हम्म..!
नायतर काय रं, भाडीची वऱ्हाटे, पाटे विकून आलीय अन् पैका मागितला तर द्यायना झालीया मग दिलं मुस्कटात.
नागू त्यांच्याकडे बघत नजरेनं त्याला वरखाली न्याहाळू लागला बोलू लागला.
भाडीच्या ती नव्हं तू हायसा...
ती बिचारी अनवाणी पायांनी भर पहाटच्याला झोपडी सोडून डोईवर वऱ्हाटे, पाटे घेऊन गाव पालथं घालतिया. लोकांनी दिलेल्या भाकर तुकड्यावर दिवसभर गुजराण करतीया अन् तू काय आयतं बसून तिच्या जीवावर वरून तिला पैकं मागून रुबाब झाडतूया दळभद्रा कुठलासा...

संतू खरेपणाचा आव आणत बोलू लागला :
बारंग्या बारबाप्या तुला रं लई माझ्या बायकोची लागलीया बरं तू म्हणतू त्ये पण बरोबर हायसा पण मग मी दिवसभर उन्हातान्हाचं दिवसभर खदानीत मपली माय घालत दगड फोडतो ती खेचरावरून चढवून झोपडी लग आणतो.
त्याला टाके पाडून सोयीचं करतू आकार देतू त्याचं काय रं मर्दा , बोल की..!
अन् तू पण हेच करतुया की पण तुला प्यायला लागत नाय अन् मला पहाटच्या पहाट प्यायला लागतीया..!

नागू चेहऱ्यावर भोळा भाव आणत बोलू लागतो तुझं समदं खरं हायसा लेका पण; कसं अस्तया तिला वाटतंया पैकाला पैका लावावा भरपदरी पैसा जमल्यावर दोन डाग अंगावर घालण्यात म्हणून दिवसभर फिरत अस्ती ती अनवाणी.

संतू दात कोरत बोलू लागला:
हावरे नागू तुझं भी सबुत खरं हायसा पण पैका अन् सोन्याचांदीचे डाग काय मड्यावर न्यायची हायसा का..?

नागू बोलू लागला: नाय रं लेका मड्यावर कोण नेतूया जो तू मी नेतूया पण वाईट वखताला अडीअडचणीला डाग मोडतोड व्हत्यात बाकी म्या काय बोलावं तू लागून झालेला तरणा बांड हायसा संसार करायची रीत येईल तुझ्यापण अंग वळणीला.
संतू अण्णा नागूच्या गप्पा होऊस्तोवर दिवस अंधारून आला होता संतू - नागू आता झोपडी महोरं टाकलेल्या खाटेवर बसून गावा पहुतर असलेल्या खदानीबद्दल बोलू लागली होती खदानीचा दगड काम करण्यालायक हाय का नाय याची दोघांत विचारपूस सुरू झाली होती.

संतूच्या बायना चुल्हीवर भाजलेला कांदा,शेंगदाणे घेऊन ती डोक्यावर पदर सावरत बाहेर पाट्यावर वाटण वाटू लागली अन् तिनं वाटता वाटता रानुबाईंची विचारपूस नागूला केली.

क्रमशः
Bharat Sonawane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड