मुख्य सामग्रीवर वगळा

भोग कंत्राटी कामगारांचे..!

भोग कंत्राटी कामगारांचे..!

काल सहज पडत्या पाऊसाच्या धारा वाहून डबके साचलेल्या अन् गंध्या नाल्याचं, गटरातलं संडासाचे पाणी वाहणाऱ्या गल्ल्या फिरून झाल्या. अन् मग मी सहज प्रश्न करत फिरलो लोकांना की, मी लिहत असतो म्हणजे नेमकं काय करतो रे..!

तेव्हा लोकं बोलू लागले, आमच्या काळ्याकुट्ट पडलेल्या छात्या अन् पीळ पडलेल्या आतड्यांच्या पोटाचा प्रश्न तुझ्या लेखणीतून सुटला असावा. जेव्हा खळगीभर पोटासाठी आणि मिळणाऱ्या अन्नासाठी आमची माय, आमची इज्जत आम्ही भर आंदोलनात आम्हाला आमचा हक्क मिळावा म्हणून उघडी पाडली होती. तेव्हा दंगे झाले, आमच्या लोकांचे डोके फुटले. हापश्याखाली जेव्हा डोके धुवायला घेतले, तेव्हा पाणी नाही रक्त वहायला लागलं होतं.

मग सगळं शांततेत व्हावं म्हणून माझ्या वस्तीतून मला पुढं करण्यात आलं. मी चिटुरभर कागदावर काहीतरी चार-दोन अक्षरं आई बापाची भाड खाल्यागत लिहिली, खरडली. त्याला निवेदन असं नाव दिलं. दोन-चार दिवसात आमच्या अटी मंजूर झाल्या मोठ्या साहेबानं काही अर्ज फाट्यावर निवेदनं मंजूर झालं म्हणून माझ्या सह्या घेतल्या अन् आमचीच खोलून मारावी तसं आमच्या गावाला राशनचं दुकान उघडं झालं. अन् दोनात आठ किलो गहू, दोनात चार किलो तांदूळ आम्हाला फुक्कट मिळाला.

मग पुढे अश्याच समस्या निर्माण व्हायला लागल्या, कामधंदे मिळेनासे झाले. स्टोव्हचा भडका घेऊन जसं एखादी बाई जळून जाऊ लागली. अन् जसा तिचा जनाजा घेऊन लोकं शमशनात घेऊन गेले, तेव्हा जी पब्लिक उधळलीना तितकीच मग बेकारी वाढली. चौका-चौकात रोजंदारीचा,‌रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला.

कंत्राटी कामगार, रोजंदार कंपन्यात कमी अन् बाभळीच्या फसाटीत भर दुपारी दारू पिऊन पडून राहत असल्याचं एकाकी प्रमाण वाढलं. मग माझ्या बाहिणी त्यांच्या नागविलेल्या संसाराच्या गोष्टी, कथा घेऊन माझ्याकडे आल्या. तू जाणता आहे, चार लोकांत उठबस आहे, चार अक्षरं समजूतीची लिहतो मग तुझ्या या बेवड्या मेव्हन्यांना कामाला लाव, त्यांना न्याय मिळवून दे म्हणू लागल्या. मग मी पुन्हा औद्योगिक वसाहतीमध्ये माझी पोटाची खळगी भरण्यासाठी टीचभर पानावर लिहलेली पत्र फिरवली.

कामगारांना न्याय मिळाला असावा कदाचित असं वाटू लागलं. मला लोकांनी डोक्यावर घेतलं अन् मग पुन्हा गावात राशन, लोकांना कंत्राटी कामगार म्हणून का होईना माझ्या लेखणीतून रोजगार मिळाला.

 जेव्हा मी असं प्रश्न करत शांता अव्वाच्या अंडाभुर्जीच्या टपरीवर अव्वाला हा प्रश्न केला, तेव्हा अव्वानं उत्तर दिलं भाडखाऊ भाऊ आहेस तू माझ्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नकोस. मला काय तुझ्यासारखं दोन-चार अक्षरं वाचता-लिहता येत नाय, पण; तू या वसाहतीमधल्या बायकांना त्यांची झंपराची बटने अन् साड्या फेडण्यापासून वाचवलं रे..!
भूक वंगाळ अस्तीया, लई वंगाळ..! तुला वाटत असल माझ्याकडे दोन-चार गिऱ्हाईक माझ्या चवदार अंडाभुर्जीमुळे येत असतीला पण तसलं काय नाय रे..!

जिंदगी जगतांना माणसं पाहून म्या बी माझा पदर थोडा सैल केला, तुझ्यासारखी अव्वा म्हणणारी माझी माणसं जेव्हा आली तेव्हा तो सावरला. ती बोलत होती मी ऐकत होतो, सध्या जिंदगी झ्याट आहे पण तू असं दोन-चार ओळी लिहून गरिबांना न्याय देत राहशीला तर आंदोलनं उसळणार नाय. तुझी लेखणी आम्हा गोरगरिबांचा आवाज होईल. तेव्हा लेका तू लिहत रहा..!

कुंटणखान्यातील माय-लेक जसं लोकांच्या अन् त्यांच्या जगण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लोकं दिवसाढवळ्या उरावर घेतात. तसं तू घेत रहावं तुझ्याच मड्यावर आमच्या झ्याट जिंदगीचे प्रॉब्लेम अन् लिहत रहावं चिटुरभर कागदावर निवदनं तुझ्या लेखणीतून. आणि मग साडी न फेडण्याचं सोल्युशन आम्हाला भेटत राहील.

मी काय बोलू अव्वाने दिलेल्या अंडा भूर्जीतला कापलेला, चिरलेला कांदा उभ्याने माणसं चिरावा तसा मला वाटला. मी तो नालीत टाकत अंडाभुर्जी खात होतो, नालीत किडे वळवळ करत होते. अन् डोक्यात पार अंधार पडला होता, गरीबांचा वाली व्हायला हवं अन् त्यांचं प्रतिनिधित्व करणारी आपली लेखणी व्हावी म्हणून लिहायला हवं, लिहायला हवं.
असं वाटून गेलं..!

Written by,
Bharat sonawane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...