मुख्य सामग्रीवर वगळा

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग - १२

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग - १२

पहाट झाली अन् कोंबड्याच्या बांगेसरशी नागू उठला. अंघोळपाणी करून गावातल्या खोकल्या आईच्या देउळमध्ये अगरबत्ती लाऊन, नारळ फोडून पाय पडून आला. आज शहर जवळ करायचं होतं. खोकल्या आईच्या पाया पडून नागू येओस्तोवर गोंडाजी उठला होता. अंघोळ-पाणी करून त्यानं वऱ्हाटे, पाटे, अन् इतर सर्व मालाची गिनती केली, तो सगळा माल एकासरशी लाऊन तो पारावर बसून गाड्या येण्याची वाट बघत बसला होता.

तितक्यात रखमाजी अन् त्याचा धाकला लेऊक दोन्ही टेम्पो घेऊन झोपड्या महोरे येऊन उभे राहिले. टेम्पो वेळीच आले बघून गोंडाजी अन् नागूच्या जीवात जीव आला. गोंडाजी अन् रखमाजीचा धाकला लेऊक वऱ्हाटे, पाटे, अन् इतर सगळा माल टेम्पोत भरू लागले होते. नागू रखमाजीला घेऊन पारावर बसला व सुमनबाईला चहाचं फर्मान सोडून गप्पा मारत बसले.

गप्पा तरी काय या गधड्या धंद्यात लाज राहिली नाही, यंत्र आलीया आता कोणती बाई वऱ्हाटे, पाटे,करत बसेल. इतका वखत कुणाला हाय म्हणून तो त्याच्या धंद्यात होत असलेली आबळ रखमाजीला सांगत होता. रखमाजी त्याच्या गाड्याच्या धंद्यात महागाई अन् वाढलेली स्पर्धा, घरोघर झालेल्या गाड्या यामुळे त्याच्या धंद्यात पण कशी हाल होत आहे हे सांगत होता.

त्यांच्या गप्पा चालू होत्या अन् एकीकडे रानुबाई चुल्हीवर भाकरी थापित होती. सगळ्यांची मालक लोकं आता काही दिवस शहराला राहतील म्हणून आज जरा नियोजन बिघडले होते. गप्पा चालू असताना सुमनबाई डोक्यावर पदर घेऊन चहा घेऊन आली अन् तिने दोघांना चहा देऊन दोघांचे पाय पडले. डोक्यावरचा पदर सावरत ती आल्या पावलांनी मागे गेली.

एकीकडे संतूपण केव्हाच उठून आवरून सावरून बसला होता. त्याचा झोपडीच्या संगतीने सारा संसार शहराला जायचा होता म्हणून तो लवकरच उठून आवरासावरी करू लागला होता. त्याची घरदनीन पण सगळं साहित्य एका अंगाला लाऊन गीनती घेऊन फोडायचा उरलेला दगुड एका अंगाला लाऊन दोन-चार महिन्याला येऊन पुन्हा दगुड फोडायचं काम सुरू झालं की तो कामे येईल म्हणून त्याला नीट रचून ठेवत होती.

गोंडाजीचा सारा माल टाकून झाला तशी गाडी संतूच्या झोपडी मोहरे आली. त्याचा माल अन् बाडबिस्तरा गाडीमध्ये टाकला अन् रानुबाई, सुमनबाई, संतूची बाई यांना त्या गाडीमध्ये बसवून गाडी शहराच्या गावाला ढळली.

नागू अन् रखमाजी यांनी गप्पा आवरत्या घेत तिन्ही शिगरं टेम्पोत टाकली, त्यांना खायला काही अमुकधमुक गाडीमध्ये टाकून. झोपड्या असलेल्या पारावर नारळ फोडून जागेला निरोप देण्यात आला. उद्यापासून तिथं फक्त नागू अन् रानुबाईच झोपडीमध्ये राहणार होती. त्यामुळं त्यांची झोपडी तशीच बंद करून ते शहराला निघाले होते.

गावात आले तसं पारावर बसलेल्या संतूक आबाने नागूला हात दिला अन् काम धंद्याची विचारपुस केली. टेम्पो थांबून पुन्हा दहा-पाच मिनिट गप्पा झाल्या, गावकऱ्यांचा काही दिवसांसाठी रामराम घेऊन संतु, नागू अन् गोंडाजी आता निघाले होते. नागू अण्णाला गावात असलेला मान बघून संतू हळहळला अन् त्याच्या डोळ्यांना आसवांच्या धारा लागल्या. आपण उगीच देव माणसावर चुकीचे आरोप करत होतो याची त्याला जाणीव झाली होती. गेले दोन तीन दिवस त्याच्या अन् त्याच्या बायकोमध्ये भांडण झाले नव्हते, त्याने दारूला शिवले नव्हते म्हणून नागूपण त्याच्यावर खुश होता.

टेम्पो गावाची सडक सोडून येशीला लागला होता. आता दोन-चार महिने गोंडाजी अन् संतूला गावाचं तोंड दिसणार नव्हतं म्हणून ते पुढे होत असणाऱ्या प्रवासाच्या संगतीने मागे धूसर होत जाणाऱ्या गावाला बघत बसले होते. हळू हळू गाव मागे पडत होता सावता महाराज यांच्या मंदिरावर असलेल्या झेंडा दूरवरून त्यांना दिसू लागला होता.

आषाढी एकादशीला जसं विठ्ठलाच्या दर्शनाची भक्तांना आस लागते अन् पंढरपुरात जाताच जसं विठ्ठल रखुमाई मंदिरावरील कळस हलू लागतो तसा झेंडा हलत होता. संतू, गोंडाजी त्याकडे बघत होते. गावाने अन् गावातील गावकऱ्यांनी त्यांचा स्वभाव, कामातील प्रामाणिकपणा यामुळे त्यांना जवळ केलं होतं,रोजीरोटी दिली होती. 

त्यामुळं गावाच्या जीवावर आठ महिने ही दोन्ही कुटुंब पोट भरत होती. बाकी इतर चार महिन्यात शहराला जाऊन आपला तयार माल शहरात विकत वणवण करत भटकत होती. 

दिवस निघून जात होते, नागूसारख्या माणसांचं आयुष्य निघून जात होतं पण उभे आयुष्य पोटासाठी सुरू असणारी ही त्यांची पायपीट काही थांबत नव्हती. आज पुन्हा एकदा पोटासाठी त्यांनी शहराला जवळ केलं होतं, आता इतकं मोठं शहर त्यांना त्याच्या पोटात सामावून घेतं का..? दोन वेळची भाकर देतं का..? ही प्रश्न अनुत्तरीत राहणार होती. त्यांचं भटकत राहणं सुरू असणार होतं आयुष्याच्या शेवटापर्यंत. 

समाप्त..!

Written by,
Bharat Sonawane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...