मुख्य सामग्रीवर वगळा

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग - ८

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग - ८

सूर्य दुपारच्या पाराकडे कलता झाला होता. उन्हं मी म्हणू लागले होते आणि या उन्हाच्या तिरीपेत संतू अन् गोंडाजीचं दांडगे शरीर दगडावर घाव घालीत होतं. प्रत्येक घावासरशी दगडाच्या ठिकऱ्या उडु लागल्या होत्या, पाथरवट जसा छनीच्या सहाय्याने दगडाला आकार देतो तसा ओबडधोबड दगुड फुटून आकार घेऊ लागला होता.

कालपर्वाच खदानीत बार उडवला असल्यानं आज वऱ्हाटे, पाटे करायला म्हणून मोप दगुड उपलब्ध होता. वेळीच त्याला आकार देऊन शिंगरावर लादून फक्त त्याला झोपडीपर्यंत न्यायचं होतं, हे जितकं सोप्पं वाटत होतं तितकंही सोप्पं काम नव्हतं.
घटकाभर संतू अन् गोंडाजी काही आकार मिळालेला दगड घेऊन सावलीला आले. कॅनीत असलेलं पाणी गिल्लासात घेऊन दोघेही पित होते अन् घोटासरशी नरड्याच्या खाली उतरणारे पाणी सहज नकळत डोळ्यांना दिसून जात होते. पाणी पिऊन काही पाच दहा मिनिटांची विश्रांती म्हणून दोघे सावलीला खदानीच्या भिंतीला पाठ लाऊन आराम करत बसले.

इकडे रानूबाई, सुमनबाई अन् संतूची बाई तालुक्याच्या गावाला आपली वऱ्हाटे,पाटे डोईवर घेऊन गल्लोगल्ली विकत फिरत होत्या. इळाचे दोन सट जरी विकले तर दिवसभराची मजुरी हाताला लागल इतका पैका त्यांना भेटत होता. पण; हल्ली शहरात असो की खेड्यात परिस्थिती सगळीकडेच सारखी झाली होती.
प्रत्येक घरात वऱ्हाटे, पाटे, दिवे, उखळ काळाच्या ओघात लुप्त झालेल्या होत्या. हल्ली त्यांची जागा मिक्सरसारख्या इलेक्ट्रिक साधनांनी घेतलेली होती.

पहाटेच आठला निघालेल्या या तिघी बायका दुपारभरली तेव्हा एका शहराच्या कोपऱ्याला असलेल्या पडक्या घराच्या आसऱ्याला थांबल्या. कुठून बाटलीभर पाणी घेऊन दुपारच्या जेवणाला म्हणून बसून जेवण करू लागल्या होत्या. दोघींचा दुपारपर्यंत एक सट विकून झाला होता. तेवढ्यासाठी त्यांना अख्खं अर्ध शहर पायाखाली घालावे लागले होते. आता इतक्या थकल्या नंतर भाकरी खायची इच्छा नसूनही पोटाला भूक लागली म्हणून बळच त्या भाकरी गिळत होत्या. 

सोबतीने गप्पांचा फडही रंगला होता. आयुष्यात इतकी कष्ट असूनही जेव्हा अश्या घटकाभर गप्पांचा फड रंगायचा तेव्हा तितकाच त्यांच्या जीवाला विसावा मिळायचा. मग माहेरच्या आठवणी, बालपणाच्या आठवणी यांनी डोळ्यातून आसवांना मोकळी वाट करून दिली जायची. अश्या वेळी मग तिघीमध्ये अजून जवळीक निर्माण व्हायची अन् एकमेकींचे दुःख रिते करत त्या गप्पा मारत दुपारची भाकर खात बसल्या होत्या.

इकडे आज तिघांच्या झोपड्या असलेल्या त्यांच्या या वस्तीला फक्त नागूचा अन् त्यानं पाळलेल्या दोन कुत्र्यांचा आसरा होता. कंबरा इतके उंच भुरे दोन झिपरे कुत्रे अन् त्यांच्या दातांना बघितलं तर कुणी त्यांच्या झोपडीच्या जवळपास भटकणार नाही, अशी ती कुत्रे होते. कोणी खोडीला गेलं म्हणजे कुत्र्यांनी लचका तोडला समजा अशी एकूण अवस्था होती.

इकडे नागू पहाटेच पोरांना कामाला वाटी लावून देत न्याहारी करून बसल्याजागी छनी अन् हतोड्याची घाव दगडांवर घालीत दगडांना टाके देत त्यांना आकार देत होता. जसं मूर्ती तयार व्हावी तसे वऱ्हाटे, पाटे, दिवे, उखळे तयार होऊ लागले होते. हे काम जरी बैठकीचं होतं पण खरा कस या कामात लागत होता. एखादा चुकीचा टोला दगडाला लागला तर सगळा दगुड फुटून जाईल अन् सगळी मेहनत पाण्यात जाईल ही जोखीम असायची. पण; इतक्या वर्षांच्या कामानंतर आता हे कामाचं कसब नागूला उमगले होते अन् खूप सफाईने तो हे सर्व काम करत होता. तो पोरांच्या अश्या कामाशी काम वागण्याने खुश होता, पोरं अन् त्यांच्या बायका पण कामाशी काम करत असल्यानं नागुचा संसार अन् नागुच्या मित्राचा संसार फुलत असल्याचं त्याला जाणवत होतं. जरी गरिबीची झळ त्याच्या संसाराला कायम होती पण दोन्ही झोपड्यात नागूच्या शब्दाला मान 
क्रमशः 
भारत लक्ष्मण सोनवणे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...