मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Aurangabad...

#Aurangabad... एकीकडे औरंगाबादमध्ये उज्ज्वल भविष्याचा विचार करून,नव्याने डीएमआयसी अंतर्गत निर्माण होणारे नवीन प्रकल्प,अलिकडेच पूर्णत्वाच्या टप्प्यावर असलेली ऑरिक औद्योगिक वसाहत आणि शहराला जोडुन असलेल्या चिकलठाणा एमआयडीसी,शेंद्रा एमआयडीसी,वाळूज एमआयडीसी,रेल्वे स्टेशन परिसरात असलेली जुनी एमआयडीसी यांच्या माध्यमातून औरंगाबाद शहराला ऑटोमोबाईल इंडस्ट्रीयल सिटी मिळालेली नवी ओळख... झालेला उपलब्ध रोजगार आणि एकीकडे कोरोनाच्या काळात उद्योग विश्वात झालेला बदल,नवीन रुजु झालेल्या संकल्पना हे सर्व औरंगाबाद शहर आशिया खंडात औद्योगिक क्षेत्रात किती उंचीवरील शहर आहे दाखवून देत आहे... औरंगाबाद हे ऐतिहासिक आणि औद्योगिक शहर म्हणून जगाच्या नकाशावर आधीपासून ओळखले जातेच,त्यामध्ये दिल्ली-मुबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरमुळे ऑरिकची नव्याने भर पडली आहे.त्यामुळे येथे उद्योग वाढीला एक मोठे व्यासपीठ उपलब्ध झालेले आहे अन् सोबतच अनेक नवीन प्रकल्प या ठिकाणी उभारल्या जात आहे जाणार आहे.इंडस्ट्रीयल कॉरिडॉर आल्याने औरंगाबादचा औद्योगिक विकासाचा आलेख हा पुढील पंधरा वर्षात कायम वाढत राहणारा असेल.ऑरिकमध्ये येत्या काळात ३,

नजर मी रोखुनी नभाशी...

नजर मी रोखुनी नभाशी, खेळ मी केला नयनांशी करार त्यांचा झाला बघण्याशी, हरल्या अपेक्षासाठी निमित्त ते ठरले अंधारल्या भूतकाळाशी..! नयनांनी नजरेत रोज सजावी पहाट अशी, खेळ मी केला बघण्याचा बुबळांशी जीवन माझे अव्यक्त पर्याय न उरला जगण्याशी, ढळावी रोज सांज नभा आड गेल्या त्या शिखराशी..! शोधला पर्याय केला खेळ तो आयुष्याशी, फासे फिरले अन् सोंगटी ने विश्वासघात केला पटाशी जुळून यावे आयुष्य केल्या कराराशी, पुन्हा खेळ न व्हावा अन् न व्हावा फसवाफसवीचा करार नियतीशी..! नजर होते बोलकी संवाद व्यक्त न होणाऱ्या डोळ्याशी, रोज नव्याने सजली जावी चादर खेळ तो रोज व्हावा  थडग्याशी..! अन् मग, व्हावा पुन्हा एकदा करार तो वाहणाऱ्या आसवांचा कोरड्या झालेल्या डोळ्यांशी, अन् अन् वाहन्या गुलाब तो रोजच चादरीवर त्या कबरीशी..! Written by, Bharat Sonwane .

मराठी भाषा दिवस...

#मराठी_भाषा_दिवस... #एका_भाषेचा_मृत्यु... माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा..! मराठी भाषा दिनानिमित्त आज अनेक लेख,कविता मराठी भाषेच्या सन्मानार्थ लिहल्या जावू लागले आहे.अनेक लेख वाचनातही येऊ लागले आहे पण... सर्व आजच्या दिवसासाठीच का..?                                             मराठी भाषा जगली जावी,रुजली जावी, सर्वदूर जगतात तिचा प्रचार व्हावा,प्रसार व्हावा यासाठी कुठवर प्रयत्न आपण करत आहोत..? मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी अनेकवेळा हालचाली करूनही किंवा काही अंशी तो दर्जा मिळवूनही मराठी भाषेला जागतिक स्तरावर का म्हणुन दुय्यम स्थान दिलं जातं..? विविध प्रकारच्या सोशल मीडियाच्या जगभराच्या प्लॅटफॉर्मवर का मराठीस टाळले जाते..? असे अन् अनेक प्रश्न मराठी भाषेचा विचार करतांना पडत असतात,जगाच्या पाठीवर सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषेमध्ये मराठी भाषेचा जगात पंधरावा क्रमांक लागतो तरीही वरील प्रश्न आपल्याला का पडावे..? याला नाही उत्तर देऊ शकत आपण कारण हेच की,काही दिवसांपूर्वी एका "ईयाक" या नावाच्या भाषेचा मृत्यू झाला

Wild Life

Wild Life... भर दुपारच्या उन्हात तो धरण पाळेचा आधार घेऊन सभोवतालच्या परिसरात नजर लावून बसलेला असायचा,नजर शून्यात असायची की,काहीतरी विचार करत काही शोधात असायची हे फार सहज कळायचे नाही... पण बर्याचवेळ उन्हात उभे राहून जेव्हा दूरवर उन्हाची झळई डोळ्यांना तुटतांना दिसायची त्यावेळी आपसुकच त्याच्या डोळ्यांतून पाण्याचे ओघळ वाहुन यायचे अन् तो या वाळलेल्या,बोडक्या रानात नजर लावुन काहीतरी शोधत आहे हे ज्ञात होत असायचं... उंचावर असलेल्या धरण पाळेवरून त्याला दूरवर पसरलेल्या रानाचा अंदाज घेता येत असायचा,चरायला म्हणुन सोडलेल्या बकऱ्यासुद्धा राखण करता यायच्या,न्याहाळता यायच्या. एखाद दुसरी बकरी वाट चुकली तर तोंडानं विशिष्ट शैलीने तो शिळ फुंकायचा अन् वाट चुकलेली ती बकरी पुन्हा आपल्या कळपात परतायची. वेगळं काही नसायचं रोजचं हेच..! पहाट झाली सुर्य किरणे अंगावर आली की,आवरुन महिन्यांनी बांधलेल्या बकऱ्या चरायला,वळायला म्हणुन रानात घेऊन यायच्या अन् सुर्य धरणपाळेच्या खाली कलला की बकऱ्या घेऊन परतीच्या वाटेवर मार्गानं लागायचं... रस्त्यावर असलेल्या झाडांच्या फांद्या उंच बांबूला बांधलेल्या विळ्याने तोडून डोईवर बांधुन

लुप्त होत चाललेला वारसा कलेचा..!

लुप्त होत चाललेला वारसा कलेचा..! रोजच्या जीवन जगण्याच्या पद्धती बदलत गेल्या तश्या वर्षानुवर्ष चालत आलेले रूढी,रिती,रिवाज,परंपरा यांच्यातही बदल होत गेले किंवा ते करावे लागले.काहींनी बदल स्वीकारून नवीन पिढीला नवीन अंदाजाचे व्यक्त होणं,सादरीकरण दिलं तर सोबतच काही परंपरा काळाच्या ओघात नष्ट होत गेल्या... यात वेगळं विशेष असं काही झालं नाही पण येणारी नवी पिढी या सर्व गोष्टींना मुकली,अनेकांचा वडीलोपार्जित व्यवसाय पिढ्यानपिढ्याचा रोजगार बुडाला,अनेकांनी रोजगार निर्मितीची नवी साधने शोधली पण पिढीजात चालत असलेल्या वारसारुपी व्यवसायास एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणारी कला काळानुसार होणा-या बदलांमुळे कायमची लोप पावली तिचं काय..? तर बदलणाय्रा रूढी,रिती,रिवाज,परंपरा या विषयावर लिहण्याचा प्रयत्न करत आहे... जागरण,गोंधळ,पोवाडा या कलांतून उपस्थित समुदायात कलाकाराने आपली कला सादरीकरण करणे हे काळाच्या ओघात लुप्त होताना अलीकडे भासू लागले,दिसु लागले आहे.समाजातील ज्येष्ठ व्यक्तींनी बऱ्यापैकी जागरण,गोंधळ,पोवाडा या कला,थोडक्यात उत्सवाला अनुभवले आहे,केव्हा याच पिढीने जागरण,गोंधळ,पोवाड्यास नवीन पिढीजा

मनाचे स्थित्यंतर..!

मनाचे स्थित्यंतर..! सकाळचं उठणे अंगावर लेवून बळजबरीचं जागं होवुन कितीवेळ स्वतःला ब्लॅंकेटच्या आत गुंडाळून परत झोप घेणं होते,दुपारचे सुर्यकिरणे विंडोग्रीलच्या तावदानातून आत येत चेहऱ्यावर येऊ बघतात अन् मग अंथरुणातून डोळे चोळत स्वतःला सावरत,अंथरुणाला सावरत उठणे होते... मग कितीवेळ विंडोग्रीलच्या बाहेर असलेल्या जगाला न्याहाळत बसणे होते अन् आपल्या घराच्या आतल्या जगाशी तुलणाही,मग मनाचे असंख्य गोष्टींशी जुळवुन येणारं आपलेपण.चुकलेल्या अंदाजाला खरे ठरवत मनाशी आशेची रुंजी घालू बघणे अन् पुन्हा एकदा स्थित्यंतर होणे या वाक्प्रचाराचा अर्थ उलगडुन आयुष्यात त्याचा वाक्यात उपयोग करून घेणे... स्थित्यंतर,स्थित्यंतर या शब्दाशी फिरणारे मनाचे खेळ न पलटनारे,न पडणार्या सापशिडीचा खेळातील फाश्याप्रमाणे ठरत राहते... मग मनचेच स्वतःला कधीतरी आसमंतात पाहणे होते तर कधी शून्याच्या गर्तेत वाहून जाताना स्वतःला बघत राहणे,मनाशी नेहमीची विचार करण्याची सवय अन् मग नकळत ते सत्यात उतरण्यासाठी मनाशीच चाललेला शरीराचा स्वतःशी संवाद आपण मनाच्या एका लहरीपणाला किती भुललो आहे हे कळूनही ते स्वीकारणे भाग पाडले जाते... वेळेच्

Princess Diana..!

Princess Diana..! Princess Diana (1961-1997 ) UPDATED: JAN 28, 2021 | ORIGINAL: DEC 22, 2017 Princess Diana was Princess of Wales while married to Prince Charles. One of the most adored members of the British royal family, she died in a 1997 car crash. Who Was Princess Diana? Princess Diana became Lady Diana Spencer after her father inherited the title of Earl Spencer in 1975. She married the heir to the British throne, Prince Charles, on July 29, 1981. They had two sons and later divorced in 1996. Diana died on August 31, 1997, from injuries she sustained in a car crash in Paris. She is remembered as the "People's Princess" because of her widespread popularity and global humanitarian efforts.  Early Life and Family Diana was born on July 1, 1961, near Sandringham, England. Diana was the daughter of Edward John Spencer, Viscount Althorp, and Frances Ruth Burke Roche, Viscountess Althorp (later known as the Honorable Frances Shand Kydd). Her parents divo

After Morning..!

After Morning..! सकाळ सरल्या दुपार ढळावी अन् मग दुपारच्या उदासवाण्या वेळेनं मनावर असंख्य न घडणाऱ्या गोष्टींनी ताबा घ्यावा,अस्वस्थाच्या जाणीवा मग घटके घटकेला मनाशी घडत रहाव्या.तरीही काही घडतच नाहीये,असा खोटा आव चेहऱ्यावर आणुन बदल स्वीकारत दाराच्या उंबरठ्यावर येणाऱ्या जाणाऱ्या ईस्मास न्याहाळत राहावं... येणारा कोण,कुठला,काय करतो,अनोळखी आहे का..? अश्या गोष्टींची मनाशी मनाची समजूत घालुन उत्तरे शोधत रहायची,मनाला क्षणिक समाधान म्हणून ती उत्तरे योग्यच असावी.जरी गेला काही काळ आसपास काही घडत नाहीये तरी मनाला क्षणभर विचारांतून सुटका मिळावी म्हणुन ही खरीखुरी उत्तरे अन् मनाचा समतोल राखून ठेवण्यासाठी गुंतागुंतीचा पर्याय... तरुणपणात सुकलेल्या डोळ्यांच्या कडांना आसवांचा थंडावा अनुभवयाला म्हणुन उंबरठ्यावर बसून सैरावरा वाऱ्यासारख्या  भटकणाऱ्या मनाच्या गुजगोष्टी,मनाने डोळ्यांना सांगाव्या अन् मग नकळत डोळ्यांनी आपलं इतक्या वेळ सावरणं अवघडून आसवांना मोकळ्या वाटा करून द्याव्यात... क्षणाच सुख काय ते अनुभवयाला यावं अन् नकळत मग ...........  स्थित्यंतर या शब्दावर मग भरोसा बसावा कारण,हे आजवर अनुभवलं न

मालगुडी डेज..!

मालगुडी डेज..! "मालगुडी डेज" आर.के.नारायण लिखित ही कथामालिका माझी बालपणापासून ते आजतागायत नेहमी आवडती मालिका आहे.अलिकडच्या काळात टीव्हीवर ती प्रसारित होत नसली तरीही फावल्या वेळात इतर प्रसार माध्यमातून मी नेहमीच ती बघत असतो... मालगुडी डेज चे पूर्ण भाग मी बघितले,कित्येकदा ते पुन्हा पुन्हा बघूनही एक नावीन्य त्या मालिकेला बघण्यातून मिळत असते.मालगुडी नावाच्या गावाभोवती घडणाऱ्या या कथा खुप रंजक पद्धतीने,एका विशेष धाटनितून लेखकाने त्या लिखित केल्या आहेत. याचा प्रत्यय प्रत्येक वेळा या मालिकेला बघतांना आपल्याला येत असतो,मालगुडी हे पूर्णपणे जरी काल्पनिक असले तरीही मालिकेमध्ये बघतांना या गावाचे केलेलं ते वर्णन,त्या ठराविक विशिष्ट जागा नेहमीच कुतूहल निर्माण करतात आणि कुठेतरी त्या गावात आपल्याला नेऊन सोडतात.... नक्कीच असे गाव बघायला आवडेल,लेखकाच्या लिखाणाचा बाज साध्या पद्धतीने,सहज समजेल अश्या भाष्या शैलीत केलेलं लेखन काळजात घर करून राहते.आणि मालिका बघताना आपण त्या गावात भटकंती करू लागतो,प्रत्येक कथा आपल्याला गावातील त्या विशिष्ट ठिकाणांवरून आठवायला लागते अन् आपसुकच मन त्या कथे

Morning Vibes..!

Morning   Vibes..! Morning   Time उठल्यावर बेडवरील ब्लँकेटची घडी घालतांना विस्कटलेल्या आयुष्याची रोज नव्याने ब्लँकेटच्या घडीप्रमाणे तीच आयुष्याची विस्कटलेली घडी बदलता येईल का..?                                                                 हा रोजचा विचार,प्रश्न मनात येऊन जातो,अलिकडच्या काही दिवसांतील मनाची मिळणारी उत्तरे फक्त "नाही" या एकाच शब्दात थोडक्या स्वरूपात मला भेटत असतात... घडी घातलेलं ब्लँकेट ठरलेल्या जागेवर ठेवून देणं होतं,नाहीतर मग पुन्हा आयुष्यात आलेल्या रिकामपणात एक प्रहर साखर झोप होते... पुन्हा मग तोच क्रम तीच विस्कटलेली ब्लँकेटची घडी सावरायची,करायची,ठेवून द्यायची. बेडवरील सांजेच्या प्रहरी व्यवस्थित अंथरूण ठेवलेलं बेडशीट कव्हर पूर्णपणे सकाळी उठल्यावर पुन्हा अस्तव्यस्त झालेलं बघून काहीवेळ आपल्याच झोपण्याचं हसु चेहऱ्यावर फुलून येणं अन् मग गालातल्या गालात आलेलं ते हसू ... मग तेच बेडशीट कव्हर बेडवर टाकायची कसरत ज्याप्रमाणे Daily Routine मध्ये छोट्या छोट्या गोष्टींसाठी होणारी कसरत या गोष्टींचा दिवसभराचा आलेख डोळ्यासमोर येऊन जात असतो.कित्येक वेळा बेडवर

What's on your mind..?

What's on your mind..? तुझ्या रोज विचारल्या जाणाऱ्या...                 What's on your mind..? या प्रश्नाला अलीकडे  फार काही वेगळी उत्तरे नसतात रे,म्हणून हल्ली टाळत असतो इथे रोज तुझ्या प्रश्नाला उत्तर द्यायला,पण लिहत्या हाताला हे फार वेळ नाही जमत रे. मग कधीतरी असे काहीतरी लिहून मोकळं होवुन जातो की माझेही कुणी फार सोवळे गावू नये किंवा माझ्या लिखाणाचेही... तुझ्या What's on your mind..? या प्रश्नाला उत्तर द्यायचे ठरवले की,अलिकडच्या काळात पहील्या एका वाक्यासाठी पंधरा मिनटे मी विचार करत असतो की काय उत्तर द्यावं..? काय लिहावं..? कारण ते ही कुणीतरी वाचणार असतेचना. बऱ्याच वेळा काहीतरी लिहून पोस्ट करण्यापूर्वीच Discard करतो,परंतु तेच लिहलेल कॉपी करून ठेवायला मात्र कधीच विसरत नाही.कारण मनाच्या झालेल्या द्विधा मनःस्थितीत मग लिहलेलेच मला मार्ग दाखवू लागते अन् मनचेच मनाचे बोल खरे वाटू लागतात... कधीतर मग फक्त मनाचेच समाधान म्हणून जे लिहलंय ते स्वीकारणं येतं मग ते,साफ चुकीचं का असेना... मनाचे डोहाळे पुरवायचे म्हंटले की काय चूक अन् काय बरोबर हा विचार येतच नाही रे,अधुन मधून तुझ्

बोले ईतिहास मराठीचा..!

कवितेचे शीर्षक- बोले ईतिहास मराठीचा..! जात,धर्म या रीतिरिवाजा खाली भाषा माझी रोजची पिढली जात आहे..! नीच प्रवृत्तीच्या पिढी दर पिढी चालत असलेल्या प्रथाना, भविष्यात जगवते ठेवण्यासाठी श्वास माझ्या मराठीचा प्रत्येकदा नव्याने तो दाबला जात आहे!!१!! माझ्या मराठीचे मी काय सांगावी सांगू कौतुके, जे माझ्या माय माऊलीच्या भाळी असलेल्या चंद्र कोरीवर कोरले आहे..! महतीच काय सांगावी माझ्या मराठीची, जेव्हा तान्हुल्या बाळासाठी हिरकणी बुरूज सांजेला  माझी माय उतरत आहे,इथेही माय मराठी माझी  संस्कृतीला जागत आहे!!२!! अफसोस कधी न आम्हाला संस्कार जिजाऊचे  अन् राजे मराठीत गड किल्ल्यांचा ईतिहास सोनेरी  पानावर साकारत आहे, ईतिहास साक्षी आमुचा गरज आता मान मिळवा मराठीस आमुच्या आता, दिल्लीच्या तख्तावर मराठी वदली जावी पुन्हा एकदा आता!!३!! कौतुक होते चराचरामध्ये मराठीचे आमुच्या, दुर्दैव हेच आमुचे की पुन्हा एकदा मराठीस जगण्या हात  पसरावे आम्हा लागते आता... असो तरीही खंत ना आम्हा आता ईतिहास जेव्हा उलगडतो आमुचा, भविष्यास पुरून उरेल हे स्फुरण देते मराठी माझी आता!!४!! आपलेच ते परके झाले हा ईतिहासच आपुला,मराठीस फक्त राजभाषेचे