मुख्य सामग्रीवर वगळा

लुप्त होत चाललेला वारसा कलेचा..!

लुप्त होत चाललेला वारसा कलेचा..!


रोजच्या जीवन जगण्याच्या पद्धती बदलत गेल्या तश्या वर्षानुवर्ष चालत आलेले रूढी,रिती,रिवाज,परंपरा यांच्यातही बदल होत गेले किंवा ते करावे लागले.काहींनी बदल स्वीकारून नवीन पिढीला नवीन अंदाजाचे व्यक्त होणं,सादरीकरण दिलं तर सोबतच काही परंपरा काळाच्या ओघात नष्ट होत गेल्या...
यात वेगळं विशेष असं काही झालं नाही पण येणारी नवी पिढी या सर्व गोष्टींना मुकली,अनेकांचा वडीलोपार्जित व्यवसाय पिढ्यानपिढ्याचा रोजगार बुडाला,अनेकांनी रोजगार निर्मितीची नवी साधने शोधली पण पिढीजात चालत असलेल्या वारसारुपी व्यवसायास एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणारी कला काळानुसार होणा-या बदलांमुळे कायमची लोप पावली तिचं काय..?

तर बदलणाय्रा रूढी,रिती,रिवाज,परंपरा या विषयावर लिहण्याचा प्रयत्न करत आहे...
जागरण,गोंधळ,पोवाडा या कलांतून उपस्थित समुदायात कलाकाराने आपली कला सादरीकरण करणे हे काळाच्या ओघात लुप्त होताना अलीकडे भासू लागले,दिसु लागले आहे.समाजातील ज्येष्ठ व्यक्तींनी बऱ्यापैकी जागरण,गोंधळ,पोवाडा या कला,थोडक्यात उत्सवाला अनुभवले आहे,केव्हा याच पिढीने जागरण,गोंधळ,पोवाड्यास नवीन पिढीजात कलाकारही दिले होते...

या पिढीत अपेक्षित कलाकारांची निर्मिती झाली अन् त्यामुळेच आता सध्या तारुण्यात पदार्पण केलेली आपली ही पिढी या कलांना बघु शकली,अनुभवू शकली.परंतु आपल्या पिढीने या आपल्या पिढीदर पिढी चालत आलेल्या संस्कृतीला,कलेला,कुठेतरी नाकारले अन् त्यामुळे या गोष्टी, पिढीजात भेटणार्या विविध कला प्रकार काळाच्या ओघात नष्ट होतांना दिसु लागले...

अजुनही मोठ्या प्रमाणात जागरण,गोंधळ,पोवाडा यांचे सादरीकरण संपुर्ण महाराष्ट्रभर होत असते,पण याला बघण्या हेतू असो किंवा त्या कलेला आपल्या पुढील पिढीसाठी देण्यासाठी ती अवगत (शिकणे) करणे असो यासाठी होणारे प्रयत्न खूप कमी होताना दिसतात.यालाही भर म्हणावी की काय लॉकडाऊनचा काळ अन् मग अनुभवयाला आलेलं सर्व क्षेत्रातील कलाकारांचे जीवन,खूप वाईट परिस्थिती अनुभवयाला आलेली...

एक भीती सतत वाटत असते की,या कला काळाच्या ओघात म्हणजे पुढील वीस पंचवीस वर्षांत संपुष्टात येतात की काय... 
                                                                  मग या सोबतीने पडणारे प्रश्न नेहमीसारखेच असेल जसे आपण आपल्या वाड-वडिलांना,ज्येष्ठ व्यक्तींना काळाच्या ओघात नष्ट झालेल्या विविध कला,त्यांचं सादरीकरण असो त्यांच्या माध्यमातून ज्ञात होणारे समाजाला ज्ञान असो अन् मग त्या कला नष्ट झाल्यामुळे आपण ते सर्व बघु शकलो नाही अनुभवु शकलो नाही.
त्यामुळं आपल्याला पडलेले असंख्य प्रश्न त्या विविध कलांचे सादरीकरण कसे असते..?
हेतू काय असतो..?
असे अन् अनेक प्रश्न पडुन लागतात मग याला आपण फक्त चित्रात अनुभवू शकत होतो एकतर,नाहीतर फक्त कल्पनेत पण प्रत्यक्षात आपण या सर्व गोष्टींना,कलांना अनुभवू शकत नव्हतो हे खरंखुरं वास्तव मग सामोरे येऊ बघते अन् मग काळाच्या ओघात लुप्त चाललेल्या या कला, साहित्याला कुठेतरी जपायला हवं ही अनुभुती येऊ बघते....
क्रमशः
Written by,
Bharat Sonwane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...