मुख्य सामग्रीवर वगळा

लुप्त होत चाललेला वारसा कलेचा..!

लुप्त होत चाललेला वारसा कलेचा..!


रोजच्या जीवन जगण्याच्या पद्धती बदलत गेल्या तश्या वर्षानुवर्ष चालत आलेले रूढी,रिती,रिवाज,परंपरा यांच्यातही बदल होत गेले किंवा ते करावे लागले.काहींनी बदल स्वीकारून नवीन पिढीला नवीन अंदाजाचे व्यक्त होणं,सादरीकरण दिलं तर सोबतच काही परंपरा काळाच्या ओघात नष्ट होत गेल्या...
यात वेगळं विशेष असं काही झालं नाही पण येणारी नवी पिढी या सर्व गोष्टींना मुकली,अनेकांचा वडीलोपार्जित व्यवसाय पिढ्यानपिढ्याचा रोजगार बुडाला,अनेकांनी रोजगार निर्मितीची नवी साधने शोधली पण पिढीजात चालत असलेल्या वारसारुपी व्यवसायास एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणारी कला काळानुसार होणा-या बदलांमुळे कायमची लोप पावली तिचं काय..?

तर बदलणाय्रा रूढी,रिती,रिवाज,परंपरा या विषयावर लिहण्याचा प्रयत्न करत आहे...
जागरण,गोंधळ,पोवाडा या कलांतून उपस्थित समुदायात कलाकाराने आपली कला सादरीकरण करणे हे काळाच्या ओघात लुप्त होताना अलीकडे भासू लागले,दिसु लागले आहे.समाजातील ज्येष्ठ व्यक्तींनी बऱ्यापैकी जागरण,गोंधळ,पोवाडा या कला,थोडक्यात उत्सवाला अनुभवले आहे,केव्हा याच पिढीने जागरण,गोंधळ,पोवाड्यास नवीन पिढीजात कलाकारही दिले होते...

या पिढीत अपेक्षित कलाकारांची निर्मिती झाली अन् त्यामुळेच आता सध्या तारुण्यात पदार्पण केलेली आपली ही पिढी या कलांना बघु शकली,अनुभवू शकली.परंतु आपल्या पिढीने या आपल्या पिढीदर पिढी चालत आलेल्या संस्कृतीला,कलेला,कुठेतरी नाकारले अन् त्यामुळे या गोष्टी, पिढीजात भेटणार्या विविध कला प्रकार काळाच्या ओघात नष्ट होतांना दिसु लागले...

अजुनही मोठ्या प्रमाणात जागरण,गोंधळ,पोवाडा यांचे सादरीकरण संपुर्ण महाराष्ट्रभर होत असते,पण याला बघण्या हेतू असो किंवा त्या कलेला आपल्या पुढील पिढीसाठी देण्यासाठी ती अवगत (शिकणे) करणे असो यासाठी होणारे प्रयत्न खूप कमी होताना दिसतात.यालाही भर म्हणावी की काय लॉकडाऊनचा काळ अन् मग अनुभवयाला आलेलं सर्व क्षेत्रातील कलाकारांचे जीवन,खूप वाईट परिस्थिती अनुभवयाला आलेली...

एक भीती सतत वाटत असते की,या कला काळाच्या ओघात म्हणजे पुढील वीस पंचवीस वर्षांत संपुष्टात येतात की काय... 
                                                                  मग या सोबतीने पडणारे प्रश्न नेहमीसारखेच असेल जसे आपण आपल्या वाड-वडिलांना,ज्येष्ठ व्यक्तींना काळाच्या ओघात नष्ट झालेल्या विविध कला,त्यांचं सादरीकरण असो त्यांच्या माध्यमातून ज्ञात होणारे समाजाला ज्ञान असो अन् मग त्या कला नष्ट झाल्यामुळे आपण ते सर्व बघु शकलो नाही अनुभवु शकलो नाही.
त्यामुळं आपल्याला पडलेले असंख्य प्रश्न त्या विविध कलांचे सादरीकरण कसे असते..?
हेतू काय असतो..?
असे अन् अनेक प्रश्न पडुन लागतात मग याला आपण फक्त चित्रात अनुभवू शकत होतो एकतर,नाहीतर फक्त कल्पनेत पण प्रत्यक्षात आपण या सर्व गोष्टींना,कलांना अनुभवू शकत नव्हतो हे खरंखुरं वास्तव मग सामोरे येऊ बघते अन् मग काळाच्या ओघात लुप्त चाललेल्या या कला, साहित्याला कुठेतरी जपायला हवं ही अनुभुती येऊ बघते....
क्रमशः
Written by,
Bharat Sonwane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...