मुख्य सामग्रीवर वगळा

लुप्त होत चाललेला वारसा कलेचा..!

लुप्त होत चाललेला वारसा कलेचा..!


रोजच्या जीवन जगण्याच्या पद्धती बदलत गेल्या तश्या वर्षानुवर्ष चालत आलेले रूढी,रिती,रिवाज,परंपरा यांच्यातही बदल होत गेले किंवा ते करावे लागले.काहींनी बदल स्वीकारून नवीन पिढीला नवीन अंदाजाचे व्यक्त होणं,सादरीकरण दिलं तर सोबतच काही परंपरा काळाच्या ओघात नष्ट होत गेल्या...
यात वेगळं विशेष असं काही झालं नाही पण येणारी नवी पिढी या सर्व गोष्टींना मुकली,अनेकांचा वडीलोपार्जित व्यवसाय पिढ्यानपिढ्याचा रोजगार बुडाला,अनेकांनी रोजगार निर्मितीची नवी साधने शोधली पण पिढीजात चालत असलेल्या वारसारुपी व्यवसायास एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणारी कला काळानुसार होणा-या बदलांमुळे कायमची लोप पावली तिचं काय..?

तर बदलणाय्रा रूढी,रिती,रिवाज,परंपरा या विषयावर लिहण्याचा प्रयत्न करत आहे...
जागरण,गोंधळ,पोवाडा या कलांतून उपस्थित समुदायात कलाकाराने आपली कला सादरीकरण करणे हे काळाच्या ओघात लुप्त होताना अलीकडे भासू लागले,दिसु लागले आहे.समाजातील ज्येष्ठ व्यक्तींनी बऱ्यापैकी जागरण,गोंधळ,पोवाडा या कला,थोडक्यात उत्सवाला अनुभवले आहे,केव्हा याच पिढीने जागरण,गोंधळ,पोवाड्यास नवीन पिढीजात कलाकारही दिले होते...

या पिढीत अपेक्षित कलाकारांची निर्मिती झाली अन् त्यामुळेच आता सध्या तारुण्यात पदार्पण केलेली आपली ही पिढी या कलांना बघु शकली,अनुभवू शकली.परंतु आपल्या पिढीने या आपल्या पिढीदर पिढी चालत आलेल्या संस्कृतीला,कलेला,कुठेतरी नाकारले अन् त्यामुळे या गोष्टी, पिढीजात भेटणार्या विविध कला प्रकार काळाच्या ओघात नष्ट होतांना दिसु लागले...

अजुनही मोठ्या प्रमाणात जागरण,गोंधळ,पोवाडा यांचे सादरीकरण संपुर्ण महाराष्ट्रभर होत असते,पण याला बघण्या हेतू असो किंवा त्या कलेला आपल्या पुढील पिढीसाठी देण्यासाठी ती अवगत (शिकणे) करणे असो यासाठी होणारे प्रयत्न खूप कमी होताना दिसतात.यालाही भर म्हणावी की काय लॉकडाऊनचा काळ अन् मग अनुभवयाला आलेलं सर्व क्षेत्रातील कलाकारांचे जीवन,खूप वाईट परिस्थिती अनुभवयाला आलेली...

एक भीती सतत वाटत असते की,या कला काळाच्या ओघात म्हणजे पुढील वीस पंचवीस वर्षांत संपुष्टात येतात की काय... 
                                                                  मग या सोबतीने पडणारे प्रश्न नेहमीसारखेच असेल जसे आपण आपल्या वाड-वडिलांना,ज्येष्ठ व्यक्तींना काळाच्या ओघात नष्ट झालेल्या विविध कला,त्यांचं सादरीकरण असो त्यांच्या माध्यमातून ज्ञात होणारे समाजाला ज्ञान असो अन् मग त्या कला नष्ट झाल्यामुळे आपण ते सर्व बघु शकलो नाही अनुभवु शकलो नाही.
त्यामुळं आपल्याला पडलेले असंख्य प्रश्न त्या विविध कलांचे सादरीकरण कसे असते..?
हेतू काय असतो..?
असे अन् अनेक प्रश्न पडुन लागतात मग याला आपण फक्त चित्रात अनुभवू शकत होतो एकतर,नाहीतर फक्त कल्पनेत पण प्रत्यक्षात आपण या सर्व गोष्टींना,कलांना अनुभवू शकत नव्हतो हे खरंखुरं वास्तव मग सामोरे येऊ बघते अन् मग काळाच्या ओघात लुप्त चाललेल्या या कला, साहित्याला कुठेतरी जपायला हवं ही अनुभुती येऊ बघते....
क्रमशः
Written by,
Bharat Sonwane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ