मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे स्थित्यंतर..!

मनाचे स्थित्यंतर..!


सकाळचं उठणे अंगावर लेवून बळजबरीचं जागं होवुन कितीवेळ स्वतःला ब्लॅंकेटच्या आत गुंडाळून परत झोप घेणं होते,दुपारचे सुर्यकिरणे विंडोग्रीलच्या तावदानातून आत येत चेहऱ्यावर येऊ बघतात अन् मग अंथरुणातून डोळे चोळत स्वतःला सावरत,अंथरुणाला सावरत उठणे होते...

मग कितीवेळ विंडोग्रीलच्या बाहेर असलेल्या जगाला न्याहाळत बसणे होते अन् आपल्या घराच्या आतल्या जगाशी तुलणाही,मग मनाचे असंख्य गोष्टींशी जुळवुन येणारं आपलेपण.चुकलेल्या अंदाजाला खरे ठरवत मनाशी आशेची रुंजी घालू बघणे अन् पुन्हा एकदा स्थित्यंतर होणे या वाक्प्रचाराचा अर्थ उलगडुन आयुष्यात त्याचा वाक्यात उपयोग करून घेणे...

स्थित्यंतर,स्थित्यंतर या शब्दाशी फिरणारे मनाचे खेळ न पलटनारे,न पडणार्या सापशिडीचा खेळातील फाश्याप्रमाणे ठरत राहते...
मग मनचेच स्वतःला कधीतरी आसमंतात पाहणे होते तर कधी शून्याच्या गर्तेत वाहून जाताना स्वतःला बघत राहणे,मनाशी नेहमीची विचार करण्याची सवय अन् मग नकळत ते सत्यात उतरण्यासाठी मनाशीच चाललेला शरीराचा स्वतःशी संवाद आपण मनाच्या एका लहरीपणाला किती भुललो आहे हे कळूनही ते स्वीकारणे भाग पाडले जाते...

वेळेच्या बाबतीत जगत्याला जिवंत ठेवण्यासाठी मनाचा आधार होतो तो मग असा ज्यात कुठलेही तथ्य नसल्याचे क्षणाक्षणाला कळत राहणे.पण ते कोडे उलगडले असुनही चेहऱ्यावर न उलगडण्याचा खोटा आव आणुन स्वतःला मिरवत राहणे,म्हणजे काय तर मनाच्या एका लहरीपणाला बळी पडून स्वतःची फसवणुक करणे होय...

Written by,
Bharat Sonwane ...

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...