मुख्य सामग्रीवर वगळा

After Morning..!

After Morning..!
सकाळ सरल्या दुपार ढळावी अन् मग दुपारच्या उदासवाण्या वेळेनं मनावर असंख्य न घडणाऱ्या गोष्टींनी ताबा घ्यावा,अस्वस्थाच्या जाणीवा मग घटके घटकेला मनाशी घडत रहाव्या.तरीही काही घडतच नाहीये,असा खोटा आव चेहऱ्यावर आणुन बदल स्वीकारत दाराच्या उंबरठ्यावर येणाऱ्या जाणाऱ्या ईस्मास न्याहाळत राहावं...

येणारा कोण,कुठला,काय करतो,अनोळखी आहे का..?
अश्या गोष्टींची मनाशी मनाची समजूत घालुन उत्तरे शोधत रहायची,मनाला क्षणिक समाधान म्हणून ती उत्तरे योग्यच असावी.जरी गेला काही काळ आसपास काही घडत नाहीये तरी मनाला क्षणभर विचारांतून सुटका मिळावी म्हणुन ही खरीखुरी उत्तरे अन् मनाचा समतोल राखून ठेवण्यासाठी गुंतागुंतीचा पर्याय...

तरुणपणात सुकलेल्या डोळ्यांच्या कडांना आसवांचा थंडावा अनुभवयाला म्हणुन उंबरठ्यावर बसून सैरावरा वाऱ्यासारख्या  भटकणाऱ्या मनाच्या गुजगोष्टी,मनाने डोळ्यांना सांगाव्या अन् मग नकळत डोळ्यांनी आपलं इतक्या वेळ सावरणं अवघडून आसवांना मोकळ्या वाटा करून द्याव्यात...

क्षणाच सुख काय ते अनुभवयाला यावं अन् नकळत मग ........... 

स्थित्यंतर या शब्दावर मग भरोसा बसावा कारण,हे आजवर अनुभवलं नसणे अन् एकाकी ते अनुभवयाला येणं खूप वाईट्ट आहे.एकांताला सोबतीला घेऊन मग मनाने आशेच्या हिंदोळे घेत खूप खूप दूरवर भटकुन येणं,जिथवर फक्त खोटा आभास सोबतीला बुडत्याला काडीचा आधार ठरावा...

आहे त्या गोष्टीला स्वीकारणं मनाला नकोसे वाटते कारण त्याला ते सवयीचं नाही,त्याला नेहमीच क्षितिजा पल्याडचं अनुभवयला आवडतं म्हणुन का कुणास ठावूक हे अंगवळणी पडणे काही दिवस अवघड आहे....

Written by,
Bharat Sonwane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ