मुख्य सामग्रीवर वगळा

After Morning..!

After Morning..!
सकाळ सरल्या दुपार ढळावी अन् मग दुपारच्या उदासवाण्या वेळेनं मनावर असंख्य न घडणाऱ्या गोष्टींनी ताबा घ्यावा,अस्वस्थाच्या जाणीवा मग घटके घटकेला मनाशी घडत रहाव्या.तरीही काही घडतच नाहीये,असा खोटा आव चेहऱ्यावर आणुन बदल स्वीकारत दाराच्या उंबरठ्यावर येणाऱ्या जाणाऱ्या ईस्मास न्याहाळत राहावं...

येणारा कोण,कुठला,काय करतो,अनोळखी आहे का..?
अश्या गोष्टींची मनाशी मनाची समजूत घालुन उत्तरे शोधत रहायची,मनाला क्षणिक समाधान म्हणून ती उत्तरे योग्यच असावी.जरी गेला काही काळ आसपास काही घडत नाहीये तरी मनाला क्षणभर विचारांतून सुटका मिळावी म्हणुन ही खरीखुरी उत्तरे अन् मनाचा समतोल राखून ठेवण्यासाठी गुंतागुंतीचा पर्याय...

तरुणपणात सुकलेल्या डोळ्यांच्या कडांना आसवांचा थंडावा अनुभवयाला म्हणुन उंबरठ्यावर बसून सैरावरा वाऱ्यासारख्या  भटकणाऱ्या मनाच्या गुजगोष्टी,मनाने डोळ्यांना सांगाव्या अन् मग नकळत डोळ्यांनी आपलं इतक्या वेळ सावरणं अवघडून आसवांना मोकळ्या वाटा करून द्याव्यात...

क्षणाच सुख काय ते अनुभवयाला यावं अन् नकळत मग ........... 

स्थित्यंतर या शब्दावर मग भरोसा बसावा कारण,हे आजवर अनुभवलं नसणे अन् एकाकी ते अनुभवयाला येणं खूप वाईट्ट आहे.एकांताला सोबतीला घेऊन मग मनाने आशेच्या हिंदोळे घेत खूप खूप दूरवर भटकुन येणं,जिथवर फक्त खोटा आभास सोबतीला बुडत्याला काडीचा आधार ठरावा...

आहे त्या गोष्टीला स्वीकारणं मनाला नकोसे वाटते कारण त्याला ते सवयीचं नाही,त्याला नेहमीच क्षितिजा पल्याडचं अनुभवयला आवडतं म्हणुन का कुणास ठावूक हे अंगवळणी पडणे काही दिवस अवघड आहे....

Written by,
Bharat Sonwane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...