मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सप्टेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Daughter day...

#windowblinds.. #daughtersday...#special... सांजेचा पडता पाऊस त्याला खूप वेळ विंडोग्रील मधून आपले ते बघत राहणे,हे अनुभवणे गेले काही दिवस खूप खूप आवडायला लागले आहे...कितीवेळ मग खिडकीच्या काचेवर ओघळणाऱ्या थेंबांना टिपत बसायचं,कॉफी मग हातात घेऊन कल्पनेत कुठेतरी स्वार होऊन यायचं,डोळ्यांना मात्र समोर दिसणारं सुखच अनुभवायचं असते... ते टिपत राहतात पडणाऱ्या पावसाच्या सरींना तर कधी मग आपसुकच डोळ्यातून ओघळणाऱ्या आसवांना... पावसाच्या सरींना सोबत घेऊन दिवसाची होणारी सुरुवात,घरात एकाच वेळी वाढणाऱ्या आजी,आई,नात,यांची पिढी अन् सोबतीला संस्कारी आजोबा,अन् बाबा हे सर्व आहेच पण यांच्या सोयीने,सोयीचं,सवयीचं झालेलं ते घर..! घर घडवते आपल्याला आणि आपल्या सोबत आपल्याच पुढील पिढ्यांना.मग ते भिंतीवर रेघोट्या ओढत काढलेली पहिली बार्बी डॉल असो किंवा आई-बाबा हे सगळं त्या भिंतीवर उमटते,पुढे तारुण्यात मनाचे विस्तारलेले विचार हवीहवीशी ओढ अन् मग या सगळ्यात पावसाच्या साक्षीने आपण घरातील खिडकीच्या कधी प्रेमात पडतो समजत नाही.. कितीवेळ विंडोग्रील मधून तो पाऊस अनुभवणे,मग कधीतरी त्या आकाशी कलरच्या पडद्या आडून घरा

LABOR LAW...

#laborlaw. परवा संसदेत मंजूर झालेल्या कामगार विधेयकाने कित्येकांची औद्योगिक क्षेत्रात रोवलेली पावलं थरथरली असतील,त्यांची स्वप्ने,भविष्यात स्वतःचा आयुष्यासाठी केलेलं नियोजन हे सर्व कंपन्यांवर अवलंबून होते. कुठेतरी कोणी आत्ताच पर्मनंट झालेलं असेल,भविष्याचा विचार करून त्यांनी अनेक आर्थिक उलाढाली केलेल्या असतील,परंतु लाॅकडाऊनच्या काळात कंपन्यांवर आलेलं संकट यांमुळे आधीच बर्याच मजूर वर्गाला,कंत्राटी कामगारांना कंपन्यांतुन कमी करण्यात,बडतर्फ करण्यात आले होते. आता जेव्हा हा असा विधेयक संसदेत मंजूर होत आहे,त्याचा पुर्ण परीणाम हा औद्योगिक वसाहतीत असलेल्या कंपन्यांतील पर्मनंट,कंत्राटी कामगार मजुरांवर होणार आहे.सरकारचे कंपन्यांवर कुठलेही कंट्रोल कायद्यानुसार असणार नाही त्यामुळे बर्याच पर्मनंट मजुरांची,कंत्राटी कामगारांची गोची यामुळे होणार आहे... भविष्यात औद्योगिक क्षेत्र व त्याला जोडून असलेल्या विविध क्षेत्रांवर याचा खूप मोठा परिणाम होईल,बेरोजगारी वाढेल,भारतीय तरुणांची चालू पिढी यामुळे नैराश्याच्या गर्तेत गेलेली असेल... संसदेत मंजूर झालेल्या कामगार विधेयकाने एमआयडीसी विश्वात याचे पडसा

हरवलेला गाव..

हरवलेला गाव...  माझा तो गाव हरला आहे,भर उन्हात दुपारच्याला उंच-उंच दुमजली वाड्यांच्या दगडी भिंतीच्या आडोश्याला सावलीत चालताना भिंतीना गाल लावून जो थंडावा अनुभवला आहे तो हल्ली अनुभवास मिळत नाही. गाव बदलला,गावातल्या वाड्यांची जागा उंच इमारतींनी घेतली... भर दुपारी पारावर बसलेल्या म्हाताऱ्या,म्हातारे आता गावात उरलेच नाही जी उरली बिचारी अंथरुणाला खिळून आपला शेवटचा काळ मोजता आहेत.ओट्यावर,कट्ट्यावर बसायला गावातली सारखी-वारखी पोरंच गावात राहिली नाही,जी आहे ती घरात बसली आहे म्हणून गाव माणसावाचून पोरका झाला आहे. गावातली दुकान बदलली अन् दुकांदरही बदलला दुकानात आता दोंड रुपायची रांगोळी,तिंड रुपयाचं तूप कागदात गुंढळुन नाही भेटत.गावाची रविवारची बंद शाळा कायमची बंद झालेली दिसती,एरवी रोज बंद अवस्थेत असलेली सरकारी दप्तरं मात्र आता रविवारीसुद्धा त्यांच्या शिक्यांची ठाकठूक करत बसलेली असतात.दप्तरातून मोडकळीस आलेल्या खिडकीच्या पल्ल्याड दिसणाऱ्या नदीच्या दृश्याला नजरेत टिपणारा तो साहेब बदली झाला आहे जणू,म्हणून दप्तरात हल्ली जीव लागत नाही. एक ब्येस केलं आहे या काळात दप्तरातील लाकडी कपाट बदलून नवी

#औरंगाबाद शहर आणि औद्योगिक वसाहतीची बदलणारी समीकरणे...

#औरंगाबाद_शहर_आणि_औद्योगिक_वसाहतीची_बदलणारी_समीकरणे. औरंगाबाद शहर आॅरीक सिटीच्या माध्यमातून एकीकडे देश-जगतातील उद्योगविश्वात महत्त्वाचे शहर म्हणून नावारूपास येण्याचा प्रयत्न करत आहे.आॅरीक सिटीच्या माध्यमातून मोठया प्रमाणावर तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे,औरंगाबाद शहराच्या भूमीवर येणारे विविध मोठाले देश विदेशातील प्रकल्प यामुळे भविष्यात औरंगाबाद शहराचे नाव उद्योग विश्वात देशातीलच नव्हे तर जगातील महत्वाचे शहर म्हणून नावारूपास येणारे शहर ठरणार आहे...  औरंगाबाद शहराला लागून असलेल्या औद्योगिक वसाहतीत एमआयडीसी व तेथील कंपन्यांचा विचार केला असता... औरंगाबाद परिसरात रेल्वे स्टेशन एमआयडीसी ही सर्वाधिक पहिली औद्योगिक वसाहत,त्यानंतर चिकलठाणा एमआयडीसी,पैठण रोड एमआयडीसी,वाळूज एमआयडीसी आणि आशिया खंडातील प्रमुख एमआयडीसी विश्वात ज्या एमआयडीसीचे नाव प्रामुख्याने उच्च स्थानावर घेतले जाते,ज्या ठिकाणी देश विदेशातील विविध नामांकित कंपन्याचे प्रॉजेक्ट उभारले गेले आहेत अशी शेंद्रा एमआयडीसी तसेच सोबतच आता नव्याने स्थापन झालेली ऑरीक आधुनिक औद्योगिक वसाहत अशा पाच औद्योगिक वसाहती निर्माण झ

धुक्यांच्या_सवे_Good_Morning...!

धुक्यांच्या_सवे_Good_Morning...! आठ-सव्वा आठ वाजून गेले आहे,एरवी नेहमीच मॉर्निंगवॉक वरून परत येण्याची वेळ पण अलीकडे सर्वच बंद आहे मग काय गेले काही दिवस खिडकीतून बाहेरचं जग अनुभवायला मिळत तितकेच काय बाहेरच्या जगाशी माझा संबंध येतो...  गेले काही दिवस सकाळी-सकाळी शहरात छान धुकं पडू लागली आहे,त्यामुळे वातावरणात एक वेगळीच हवीहवीशी शांतता पसरलेली असते.शहर पूर्ण शांत झालं आहे,रस्त्यावर म्हणजे तो फक्त रस्ता नाहीये महामार्ग आहे पण त्यावरही क्वचितच एखादी गाडी दिसते,दूरवरून येणारी ती गाडी पिवळ्या रंगाच्या तिच्या उजेडात धुक्यातून वाट काढत काढत तिचा मार्ग शोधत जातेय... काही दिवसांपासून सकाळी पाच वाजता ऐन साखर झोपेच्यावेळी वातावरणात थंडी वाढल्यामुळे गारवा निर्माण होतो,नेहमीची जाग येण्याची माझी ती वेळ असल्यामुळे जाग येऊन जाते...कितीवेळ काय करावे हा विचार करून खिडकीपाशी येऊन बसतो,विंडोग्रिल पूर्णपणे दवाने ओली झालेली असते तिलाच गाल लावून कितीवेळ अंगावर ब्लँकेट घेऊन येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना बघत बसतो... मूडमध्ये असलो तर कॉफी मग हातात घेऊन हा निसर्ग अन् ती शांतता अनुभवतो,कधीतरी नशीब जोरावर अस

कन्नड शहर आणि निसर्ग सौंदर्य...

#कन्नड_शहर_आणि_निसर्ग_सौंदर्य... कन्नड तालुका म्हंटले की आपल्याला सर्वप्रथम आठवते ती हिरवळ...निसर्गसौंदर्य हिरवळीची शाल पांघरलेला हा तालुका निसर्गसंपन्न,इतिहाससिक वास्तू लाभलेला,अभयारण्य असलेला आहे. यापूर्वी मी माझ्या ब्लॉग,विविध दैनिक,साप्ताहिक यांच्या माध्यमातून, बरेच लेखन कन्नड तालुका अन् तालुक्याला लाभलेली नैसर्गिक देणगी,इतिहास याबद्दल केले आहे.ते वेळोवेळी आपल्याला विविध माध्यमांतून देण्याचा प्रयत्नही केला आहे.आज आपण जाणून घेऊया कन्नड शहरातील त्या छोट्याश्या निसर्ग ठिकाणाबद्दल... जसे की आपल्याला औरंगाबाद शहरात असले की गोगा बाबा टेकडी,युनिव्हर्सिटी परिसर,सातारा परिसर आणि असे विविध ठिकाणे मनसोक्तपणे फीरण्यास भुरळ घालतात.अगदी त्याचप्रमाणे कन्नड शहरालाही अनेक टेकड्या,छोटी छोटी डोंगर नैसर्गिक देणगी म्हणुन लाभलेली आहे... त्यातील काही ठिकाण राम मंदिर टेकडी,शिवाजी महाविद्यालय लगत असलेली टेकडी,कारखाना परिसरात असलेले छोटेखानी डोंगर आणि असे खूप खूप ठिकाणं... नजरेला निसर्ग न्याहाळता आला की मग तो कुठेही भेटतो अन् आपण कुठेही त्याचा आनंद घेऊ शकतो,मग त्यासाठी आपल्याला फार फ