मुख्य सामग्रीवर वगळा

#औरंगाबाद शहर आणि औद्योगिक वसाहतीची बदलणारी समीकरणे...

#औरंगाबाद_शहर_आणि_औद्योगिक_वसाहतीची_बदलणारी_समीकरणे.
औरंगाबाद शहर आॅरीक सिटीच्या माध्यमातून एकीकडे देश-जगतातील उद्योगविश्वात महत्त्वाचे शहर म्हणून नावारूपास येण्याचा प्रयत्न करत आहे.आॅरीक सिटीच्या माध्यमातून मोठया प्रमाणावर तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे,औरंगाबाद शहराच्या भूमीवर येणारे विविध मोठाले देश विदेशातील प्रकल्प यामुळे भविष्यात औरंगाबाद शहराचे नाव उद्योग विश्वात देशातीलच नव्हे तर जगातील महत्वाचे शहर म्हणून नावारूपास येणारे शहर ठरणार आहे... 

औरंगाबाद शहराला लागून असलेल्या औद्योगिक वसाहतीत एमआयडीसी व तेथील कंपन्यांचा विचार केला असता...
औरंगाबाद परिसरात रेल्वे स्टेशन एमआयडीसी ही सर्वाधिक पहिली औद्योगिक वसाहत,त्यानंतर चिकलठाणा एमआयडीसी,पैठण रोड एमआयडीसी,वाळूज एमआयडीसी आणि आशिया खंडातील प्रमुख एमआयडीसी विश्वात ज्या एमआयडीसीचे नाव प्रामुख्याने उच्च स्थानावर घेतले जाते,ज्या ठिकाणी देश विदेशातील विविध नामांकित कंपन्याचे प्रॉजेक्ट उभारले गेले आहेत अशी शेंद्रा एमआयडीसी तसेच सोबतच आता नव्याने स्थापन झालेली ऑरीक आधुनिक औद्योगिक वसाहत अशा पाच औद्योगिक वसाहती निर्माण झाल्या आहे...
महाराष्ट्राची "ऐतिहासिक राजधानी" म्हणून ओळख असलेल्या औरंगाबाद शहराची आता नवी ओळख "ऑटोमोबाईल इंडस्ट्रियल सिटी" म्हणुन हे शहर नव्याने नावारूपाला येत आहे...

याच वेळी शहराचा इतर बाबतीत विचार केला तर समोर येणारा चेहराही विचार करण्यासारखा आहे,एकीकडे औरंगाबाद शहरातील एमआयडीसी भागात कोरोना सदृश्य काळ असो किंवा त्यामुळे उद्योग जगतात मंदावलेली अर्थव्यवस्था,ढासळलेली परिस्थिती,नियोजनाचा असलेला अभाव यामुळे निर्माण झालेली समस्या.शहराचे गलिच्छ राजकारण,देश विदेशातील नामांकित कंपन्या जेव्हा प्रोजेक्ट आखण्या हेतुस्पर बोलण्या करता येतात त्यावेळी दिली जाणारी वागणूक,त्यामुळे औरंगाबाद शहरात उद्योग विश्वात येणारे नवीन-नवीन प्रोजेक्ट दुसऱ्या राज्यात जात आहेत.

औरंगाबाद सोबतच शेजारचे परभणी,बीड,जालना,या आसपासच्या जिल्ह्यातील बरेच तरुणांना रोजगार निर्माण झाला आहे.ऐतिहासिक औरंगाबाद शहराच्यालगत शेंद्रा-बिडकीन येथे आशिया खंडातील बऱ्यापैकी मोठा प्रोजेक्ट असलेली ऑरीक ही आधुनिक औद्योगिक वसाहत निर्मानाचे कार्य अंतिम टप्प्यात आहे,परंतु यात नियमित वेळोवेळी येणाऱ्या अडचणी ही खूप मोठी बाब या प्रकल्पाच्या कामाची गती कमी होण्यास कारणी ठरत आहे...
ज्या कंपन्या सध्या औरंगाबाद लगत असलेल्या औद्योगिक वसाहतीत आहे त्यांना निर्माण होणाऱ्या इतर अनेक समस्या हे शहराच्या विकासात अडथळा आणणारे ठरत आहे.कोरोनाच्या या अतिशय वाईट काळात इंडस्ट्रियल विश्वातील हालचाल बघितली तर समोर येणारी अवस्था ही अत्यंत वाईट आहे...
या काळात मजूर वर्ग आप-आपल्या गावी स्थलांतरित झाला पुढे जेव्हा लॉकडाऊन शिथिल करून काही धोरणे आखून देत कंपन्यांना चालू करण्यात आले त्याच वेळी वेळीत मजूर न भेटल्यामुळे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान असो,ज्या ठिकाणी आठ तासांच्या कामाच्या तीन शिफ्ट कंपनी मध्ये चालत होत्या त्याच ठिकाणी बारा तासांच्या  दोन शिफ्ट कराव्या लागल्या त्यामुळं मजूर वर्गाच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या,कच्चा माल वेळेत न मिळाल्यामुळे,कामात येणाऱ्या असंख्य अडचणी यामुळे या काळात इंडस्ट्रियल विश्वात खूप नुकसान झाले आहे...

पुढेही जोवर परिस्थितीती नियंत्रणात येत नाही तोवर हे संकट कायम असणार आहे,या संकटातून बाहेर पडण्यासाठी लागणारा बराच कालावधी सर्वच कंपन्यांना द्यावा लागणार आहे.त्यामुळे पुढील काही काळ औरंगाबाद येथील औद्योगिक वसाहतीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे...
औरंगाबाद शहरात ज्याप्रमाणात ऑटोमोबाईलशी निगडित कंपन्यांना येण्यास प्राधान्य देण्यात आले दिले जात आहे त्याच,तेव्हढ्या प्रमाणात कुठेतरी आयटी क्षेत्रात असणाय्रा कंपन्यांना,प्रकल्पांना प्राधान्य दिलेले दिसत नाही ही एक खंत कायम वाटते.या क्षेत्रातील कंपन्यांना जर औरंगाबाद शहरात स्थान दिले किंवा ते आणण्यासाठी प्रयत्न केले तर बराच सुशिक्षित बेरोजगार तरुण आपले कौशल्य दाखवून रोजगार मिळवू शकतो असे वाटते...

Written by,
Bharat Sonwane.
(MBA-Production & Operation Management).

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ