मुख्य सामग्रीवर वगळा

कन्नड शहर आणि निसर्ग सौंदर्य...

#कन्नड_शहर_आणि_निसर्ग_सौंदर्य...
कन्नड तालुका म्हंटले की आपल्याला सर्वप्रथम आठवते ती हिरवळ...निसर्गसौंदर्य हिरवळीची शाल पांघरलेला हा तालुका निसर्गसंपन्न,इतिहाससिक वास्तू लाभलेला,अभयारण्य असलेला आहे.

यापूर्वी मी माझ्या ब्लॉग,विविध दैनिक,साप्ताहिक यांच्या माध्यमातून, बरेच लेखन कन्नड तालुका अन् तालुक्याला लाभलेली नैसर्गिक देणगी,इतिहास याबद्दल केले आहे.ते वेळोवेळी आपल्याला विविध माध्यमांतून देण्याचा प्रयत्नही केला आहे.आज आपण जाणून घेऊया कन्नड शहरातील त्या छोट्याश्या निसर्ग ठिकाणाबद्दल...

जसे की आपल्याला औरंगाबाद शहरात असले की गोगा बाबा टेकडी,युनिव्हर्सिटी परिसर,सातारा परिसर आणि असे विविध ठिकाणे मनसोक्तपणे फीरण्यास भुरळ घालतात.अगदी त्याचप्रमाणे कन्नड शहरालाही अनेक टेकड्या,छोटी छोटी डोंगर नैसर्गिक देणगी म्हणुन लाभलेली आहे...
त्यातील काही ठिकाण राम मंदिर टेकडी,शिवाजी महाविद्यालय लगत असलेली टेकडी,कारखाना परिसरात असलेले छोटेखानी डोंगर आणि असे खूप खूप ठिकाणं...

नजरेला निसर्ग न्याहाळता आला की मग तो कुठेही भेटतो अन् आपण कुठेही त्याचा आनंद घेऊ शकतो,मग त्यासाठी आपल्याला फार फार दूर जाण्याची ही आवश्यकता नसते.प्रत्येक शहरालगत असे ठिकाणे हे आपल्याला नेहमीच भेटतात,बर्याच अंशी ते आपली ओळखीची असतात किंवा रोजच्या जीवनातील एक भाग ती बनलेली असतात...
अशीच आहे आजची ही मी भेट दिलेली टेकडी जी प्रत्येक कन्नड वासियांच्या रोजच्या जगण्यातली अविभाज्य घटक बनलेली आहे...
कन्नड शहरातील बऱ्याच नागरिकांची पहाटेची सुरुवात या टेकडीच्या सानिध्यात येऊन सूर्योदय अनुभवत होत असते.सकाळी मॉर्निंग वॉकला मोठ्या प्रमाणात कन्नड शहरातील नागरिक या टेकडीवर फिरण्यास येत असतात,सध्याची परिस्थिती बघता तो ओघ कमी झाला आहे पण सर्व सुरळीत झाले की पुन्हा नागरिक या टेकडीकडे वळतील हे नक्कीच...

टेकडीच्यावरती पूर्णपणे चढून आलेकी सकाळच्या प्रहरी होणारा सूर्योदय असो किंवा सांजेचा प्रहरी होणारा सुर्यास्त हे अनुभवणे खूप सुंदर आणि दिवसभराचा थकवा विसरायला लावणारे असते.टेकडीवरून होणारे भव्य कन्नड शहराचे दर्शन नव्याने वाढणारे कन्नड शहर,जुने कन्नड शहर आसपासची गावे,शहरातील उंच उंच टॉवर यांचे होणारे दर्शन काही औरच असते...
जे मनाला कुठेतरी शांतता देऊन जात असते...

एकीकडे दिसणारी सुरपाळा डोंगररांग तर दुसरीकडे अंबाडी प्रकल्पाचे होणारे दर्शन,मग दिसून जातो तो सर्व परिचित गौताळा अभयारण्य जे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे असते.एकाच ठिकाणी राहून आपल्याला हे सर्व मनोहरी दृश्य अनुभवता येते...
टेकडीवर नव्याने होणारी काळ्या खडकांची ओळख,विविध रंगांची छोटी छोटी दगडं,विविध छोटी छोटी झाडे,रानवेली,बारीक बारीक फुलं,खदानित असलेले काळेशार पाणी हे ही याठीकाणी आपल्याला बघायला भेटते...

शहराचा वाढणारा विस्तार,शहर आसपासच्या गावाला भिडत आहे हे जरी चांगले वाटत असले तरी यामुळे निसर्गाची खूप मोठ्या प्रमाणात होणारी हानी हे काळजीची बाब वाटते.शहरे निसर्गाच्या पायथ्याला जात आहे त्यामुळे वन्यजीव,वनस्पती,वनसंपदा,होणारे परिणाम,प्रदुषण हा विचार केला की कधी कधी अस्वस्थ होते...
परंतु बदल हा नियमित होत आला आहे त्याला पर्याय नाही ते स्विकारत आपण हे होणारे नुकसान टाळण्यासाठी खूप मार्ग अवलंबु शकतो जे सध्या गरजेचे वाटते...

Written by,
Bharat Sonwane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ