मुख्य सामग्रीवर वगळा

कन्नड शहर आणि निसर्ग सौंदर्य...

#कन्नड_शहर_आणि_निसर्ग_सौंदर्य...
कन्नड तालुका म्हंटले की आपल्याला सर्वप्रथम आठवते ती हिरवळ...निसर्गसौंदर्य हिरवळीची शाल पांघरलेला हा तालुका निसर्गसंपन्न,इतिहाससिक वास्तू लाभलेला,अभयारण्य असलेला आहे.

यापूर्वी मी माझ्या ब्लॉग,विविध दैनिक,साप्ताहिक यांच्या माध्यमातून, बरेच लेखन कन्नड तालुका अन् तालुक्याला लाभलेली नैसर्गिक देणगी,इतिहास याबद्दल केले आहे.ते वेळोवेळी आपल्याला विविध माध्यमांतून देण्याचा प्रयत्नही केला आहे.आज आपण जाणून घेऊया कन्नड शहरातील त्या छोट्याश्या निसर्ग ठिकाणाबद्दल...

जसे की आपल्याला औरंगाबाद शहरात असले की गोगा बाबा टेकडी,युनिव्हर्सिटी परिसर,सातारा परिसर आणि असे विविध ठिकाणे मनसोक्तपणे फीरण्यास भुरळ घालतात.अगदी त्याचप्रमाणे कन्नड शहरालाही अनेक टेकड्या,छोटी छोटी डोंगर नैसर्गिक देणगी म्हणुन लाभलेली आहे...
त्यातील काही ठिकाण राम मंदिर टेकडी,शिवाजी महाविद्यालय लगत असलेली टेकडी,कारखाना परिसरात असलेले छोटेखानी डोंगर आणि असे खूप खूप ठिकाणं...

नजरेला निसर्ग न्याहाळता आला की मग तो कुठेही भेटतो अन् आपण कुठेही त्याचा आनंद घेऊ शकतो,मग त्यासाठी आपल्याला फार फार दूर जाण्याची ही आवश्यकता नसते.प्रत्येक शहरालगत असे ठिकाणे हे आपल्याला नेहमीच भेटतात,बर्याच अंशी ते आपली ओळखीची असतात किंवा रोजच्या जीवनातील एक भाग ती बनलेली असतात...
अशीच आहे आजची ही मी भेट दिलेली टेकडी जी प्रत्येक कन्नड वासियांच्या रोजच्या जगण्यातली अविभाज्य घटक बनलेली आहे...
कन्नड शहरातील बऱ्याच नागरिकांची पहाटेची सुरुवात या टेकडीच्या सानिध्यात येऊन सूर्योदय अनुभवत होत असते.सकाळी मॉर्निंग वॉकला मोठ्या प्रमाणात कन्नड शहरातील नागरिक या टेकडीवर फिरण्यास येत असतात,सध्याची परिस्थिती बघता तो ओघ कमी झाला आहे पण सर्व सुरळीत झाले की पुन्हा नागरिक या टेकडीकडे वळतील हे नक्कीच...

टेकडीच्यावरती पूर्णपणे चढून आलेकी सकाळच्या प्रहरी होणारा सूर्योदय असो किंवा सांजेचा प्रहरी होणारा सुर्यास्त हे अनुभवणे खूप सुंदर आणि दिवसभराचा थकवा विसरायला लावणारे असते.टेकडीवरून होणारे भव्य कन्नड शहराचे दर्शन नव्याने वाढणारे कन्नड शहर,जुने कन्नड शहर आसपासची गावे,शहरातील उंच उंच टॉवर यांचे होणारे दर्शन काही औरच असते...
जे मनाला कुठेतरी शांतता देऊन जात असते...

एकीकडे दिसणारी सुरपाळा डोंगररांग तर दुसरीकडे अंबाडी प्रकल्पाचे होणारे दर्शन,मग दिसून जातो तो सर्व परिचित गौताळा अभयारण्य जे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे असते.एकाच ठिकाणी राहून आपल्याला हे सर्व मनोहरी दृश्य अनुभवता येते...
टेकडीवर नव्याने होणारी काळ्या खडकांची ओळख,विविध रंगांची छोटी छोटी दगडं,विविध छोटी छोटी झाडे,रानवेली,बारीक बारीक फुलं,खदानित असलेले काळेशार पाणी हे ही याठीकाणी आपल्याला बघायला भेटते...

शहराचा वाढणारा विस्तार,शहर आसपासच्या गावाला भिडत आहे हे जरी चांगले वाटत असले तरी यामुळे निसर्गाची खूप मोठ्या प्रमाणात होणारी हानी हे काळजीची बाब वाटते.शहरे निसर्गाच्या पायथ्याला जात आहे त्यामुळे वन्यजीव,वनस्पती,वनसंपदा,होणारे परिणाम,प्रदुषण हा विचार केला की कधी कधी अस्वस्थ होते...
परंतु बदल हा नियमित होत आला आहे त्याला पर्याय नाही ते स्विकारत आपण हे होणारे नुकसान टाळण्यासाठी खूप मार्ग अवलंबु शकतो जे सध्या गरजेचे वाटते...

Written by,
Bharat Sonwane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...