मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अस्वस्थ मनाचे गुझ कविता....

अस्वस्थ मनाचे गुज...! अस्वस्थ मनाला घेऊन मी जगायचो, ओंजळीत सुखाचे सुटे दोन क्षण घेऊन त्यातच मी रमायचो...! त्या दोन क्षणांच्या जगण्यात रमने न जमले मला,धुसर झालेल्या जीवनात मी माझं आयुष्य शोधायचो...! बंदीस्त झालेल्या भावनांना     मुक्त करण्यासाठीचा प्रवास माझा,अव्यक्त विचारांना व्यक्त करण्यासाठी मी भटकायचो...! प्रवास माझ्या सोबतीने हरवलेल्या सुखाचा, दुःखात मात्र मी हल्ली खोटे सुख अनुभवत जगायचो...! डोळ्यात दिसे झळ पांघरलेल्या निराशेची, उसने आवसान आणत मात्र मी जगण्याच्या स्पर्धेत कीत्येकदा हरायचो...! तिमिरातुनी तेजाकडे रोजचा प्रवास माझा,जगण्यासाठी रोज थोडा थोडा मात्र मी मरायचो...! अस्वस्थ मनाला घेऊन मी जगायचो, ओंजळीत सुखाचे सुटे दोन क्षण घेऊन त्यातच मी रमायचो...! भारत लक्ष्मन सोनवणे, (सौमित्र).

अस्वस्थ मनाचे गुज....

कधीतरी अश्यावेळी त्या धरणाच्या पाळेवर जाऊन बसून राहावं वाटते एकटं..! एकटं..! काही करायचं नाहीये फक्त एकटक त्या नितळ पाण्यात,सोबत जगण्यासाठी दूरवर चालेली त्या नावड्याची अन् त्याच्या नावेची धडपड बघत बसायची आहे.... समोर पाणी असून सुद्धा शरीर घामाने ओल झालं आहे,पण तरीही पाण्यात पाय टाकून बसायचं नाहीये.मनातच मनातील असंख्य विचारांचा चालेला खेळ अनुभवत बसायचा आहे खुप वेळ... कित्येकदा रडू वाटत असते,अश्रू डोळ्यात येऊन पापण्याआड ते विस्फारलेले आहेत.कधीतरी त्या धरणातील पाण्याच्या येणाऱ्या संथ लाठेप्रमाणे गालाला स्पर्श करुन,ते जमिनीत विलीन होतील नाहीतर गालावरच सुखून जातील...सोबतीला थंडपणाची जाणीव शरीराला देऊन स्वतः सोखावतील की काय,काय माहीत.... दोन प्रश्नांची उत्तरे इथे भेटतील,राहीलेल्या प्रश्नांना सोबत घेऊन हा प्रवास धरण पाळेवरून,त्या धरणात जाणाऱ्या पुलाच्या दिशेनं करायचा आहे... इथे एक प्रश्न कायमचा सुटेल,मागे अनेक प्रश्न कायमची तशीच सोडून पुन्हा कधीच ज्यांची उत्तरे शोधली जाणार नाही.कींवा नाही होणार अट्टहास त्या प्रश्नांना सोडविण्यासाठीचा कधीच... कधीतरी असे वाटते की शरीरा बरोबर हे

माझे हळवे मन तुझ्यासाठी....

कधी कधी अनेक विचारांचे काहूर मनात येऊन जाते... मन जुळून येतं पण,बोलणं असह्य वाटू लागते.तुझ्याबद्दल मनात चांगले विचार आहे,पण त्या Positive Vibes दिसून येत नाही.मन कागदांवर चार गोष्टी व्यक्त करून मोकळं होतं,पण जेव्हा ते आत्मसात करायची वेळ येतेना ते करता येत नाही... रडू येतं पण आसवांच डोळ्यांतून येणं होत नाही,कधीतरी विचारांचा बांध फुटला अन डोळे अश्रूंपासून वेगळेही झाले,तरी उशी ओली होत नाही.तुझ्यासाठी मनातले विचार ओठांवर येणं,पण तिथंच त्यांचं घुटमळत सांजेच्या प्रहरी अस्ताला जाणाऱ्या सूर्यासोबत अस्ताला जाणं...किती अस्वस्थपणाचे बोलके मुखवटे घेऊन जगत असतो नाही का आपण..? कॉल आला आहे,रिसिव्ह करूनही फक्त बोलणं ऐकत राहणं.कधीतरी खूपच मनातील भावना हळव्या झाल्या तर,टेक्स्ट मॅसेज टाईप करणं,इथेही स्पॅस देतांनाची तडजोड बॅकस्पेसमध्ये बदलून जाणं.इतकी तडजोड सहन करून मॅसेज पाठवनं आणी तो, seen होऊनही प्रतिउत्तर न येणं... हे सगळ मनाला हळवे करून आशेवर जगते ठेवण्याचे खेळ आहे.... अलीकडे जसे बोटे मोबाईल स्क्रीनला स्क्रोल करत राहतात,तसेच आॅफीसमधल्या विंडोग्रिलची काच,त्या बर्फी कलरच्या पडद्या पलीकडचं नि

हळवे पुस्तक तुझ्या आतले....

हल्ली तू त्या चार-दोन कविता लिहून कवीपण मिरवतोस हे मला सहन नाही होत रे,म्हणजे कवीपण वाईट नाहीये रे... पण...कवी ग्रेस,कुसुमाग्रज,गालिब सारेच कवी/शायर यांच्यासारखा कणखर नाहीये रे तू मनाने, तू खूप हळवा आहेस.... मी कित्येकदा बघितलं आहे तुला,तुझ्या कविता तू व्यक्त करत असतोस त्यावेळी,तू कवितांचा न राहता आठवणींचा होऊन जातोस...आतल्या आत खचत,हळवा बनून पोखरत राहतो दुःखाला... तेव्हा तू नाहीये का कवी नाही होयचं,मलाही आवडेल तुझ्या हाताने शब्दांची झालर घालून,सजवून पानांवर माझ्या तुझं लेखकपण व्यक्त करणं.... तू हळवा आहेस तेच मनाचं हळवपण कागदात कैद करत चल,मला शब्दांच्या आधारे तुझ्या प्रेमात पडू देत चल...जेव्हा मी एक समग्र पुस्तक झालो असेलनं,तेव्हा तू त्या तुझ्या आतल्या हळव्या मनास हरवून एक कणखर लेखक झाला असशील.... त्यावेळी मात्र तुझे कवीपण तुला भेट देईल मी,कधीतरी तुझ्या त्याच चार-दोन कविता ऐकण्यासाठी.कारण कविच्या कणखर मनाची सुंदरता एक हळवा लेखक होण्यासाठी गरजेची असते... #एक_हळवं_मन_तुझ्या_आतलं_मी_पाहीलेलं... #पुस्तक_मन... Written by, Bharat Sonwane....

मी वाहत राहीलो वाहणाऱ्या दिशेला...

मी वाहत राहीलो वाहणाऱ्या दिशेला वाहनेच नशिबी माझ्या, दोन थडीवर मांडलेला डाव माझा मी त्यात मलाच शोधत राहिलो...! अस्वस्थ मनाच्या लहरी स्वप्नांना स्वस्थपणे वाहू देईनात, वाहण्यात माझ्या काय अर्थ तो मलाच का लहरीत त्या घेईनात... वाहताना शितल पाण्यात दुःख आसवांचे झरे माझ्या आहे, कधीतरी मीच जगण्याच्या इर्षने वाहण्याचा सराव त्यात करून पाहे...! वाहून जाणे अन वाहवून घेणे प्रवास मजला उमगला नाही निराशेच्या गर्तेत हरवून गेले जीवन, प्रवास दुःखाचा करता प्रवास सुखाचा तो कळला नाही...! मी वाहत राहिलो वाहण्याचाच प्रवास माझा मी करत राहिलो,दुःख अनावर झाली अन् अश्रूंना मोकळी वाट करून देत राहिलो...! दोन क्षणांची काय ती सुखाची जिंदगी सारेच आयुष्य तिला मी शोधत राहिलो,दुःखात बुडाला सारा सागर मी मात्र नदीतच वाहत राहिलो...! उमगला ना प्रवास सूखाचा,दुखास मी कवटाळत राहिलो सोबतीला,नावेत सुखाच्या मी दुःखाच्या सागरात अनादीत वाहत राहिलो...! मी वाहत राहीलो वाहणाऱ्या दिशेला वाहनेच नशिबी माझ्या, दोन थडीवर मांडलेला डाव माझा मी त्यात मलाच शोधत राहिलो...!   -भारत लक्ष्मन सोनवणे.

Repost poem...

मी वाहत राहीलो वाहणाऱ्या दिशेला वाहनेच नशिबी माझ्या, दोन थडीवर मांडलेला डाव माझा मी त्यात मलाच शोधत राहिलो...! अस्वस्थ मनाच्या लहरी स्वप्नांना स्वस्थपणे वाहू देईनात, वाहण्यात माझ्या काय अर्थ तो मलाच का लहरीत त्या घेईनात... वाहताना शितल पाण्यात दुःख आसवांचे झरे माझ्या आहे, कधीतरी मीच जगण्याच्या इर्षने वाहण्याचा सराव त्यात करून पाहे...! वाहून जाणे अन वाहवून घेणे प्रवास मजला उमगला नाही निराशेच्या गर्तेत हरवून गेले जीवन, प्रवास दुःखाचा करता प्रवास सुखाचा तो कळला नाही...! मी वाहत राहिलो वाहण्याचाच प्रवास माझा मी करत राहिलो,दुःख अनावर झाली अन् अश्रूंना मोकळी वाट करून देत राहिलो...! दोन क्षणांची काय ती सुखाची जिंदगी सारेच आयुष्य तिला मी शोधत राहिलो,दुःखात बुडाला सारा सागर मी मात्र नदीतच वाहत राहिलो...! उमगला ना प्रवास सूखाचा,दुखास मी कवटाळत राहिलो सोबतीला,नावेत सुखाच्या मी दुःखाच्या सागरात अनादीत वाहत राहिलो...! मी वाहत राहीलो वाहणाऱ्या दिशेला वाहनेच नशिबी माझ्या, दोन थडीवर मांडलेला डाव माझा मी त्यात मलाच शोधत राहिलो...!   -भारत लक्ष्मन सोनवणे.

दोन क्षण....

उरल्या दोन घटकांच्या सुखाचा हिशेब आहे तो, मी मांडत नाही हल्ली दोन सुखाच्या घटकांचा हिशोब तो..! कधीतरी भर उन्हात पाय भाजून निघायचे पण,बकरीच्या पिलाला पाणी पाजण्याचा दोन आनंदी घटकांचा हिसेब आहे तो..! कधीतरी अनवाणी चालणाऱ्या म्हातारीला वाट सरुस्तोवर दिलेल्या,वाहनांचा दोन घटकांचा हीशेब आहे तो..! कधीतरी भरल्या देवळात माझ्या रिकाम्या झोळीला घेऊन,देवासमोर भिक मांगतांनाचा दोन घटकांचा हिशेब आहे तो..! कधीतरी सांजवेळी देव्हाऱ्यात दिवा लावताना, वातीच्या जळण्याचा दोन घटकांचा हीशेब आहे तो..! रितेपणाच्या ओंजळीत कल्पनेतील पडणाय्रा गुलमोहरांच्या फुलांच्या,आनंदी क्षणांचा दोन घटकांचा हिशेब आहे तो..! कधीतरी आईच्या पायाशी वंदन करण्या झुकता, तेहतीस कोटी देव दिसतात, तेव्हा त्या दोन घटकांचा हिशेब आहे तो..! अन् अन् शेवट आठवणीत बापाच्या आसवांच्या फुटलेल्या बांधास सावरतांनाचा त्या दोन घटकांचा हिशेब आहे तो..! उरल्या दोन घटकांच्या सुखाचा हिशेब आहे तो, मी मांडत नाही हल्ली दोन सुखाच्या घटकांचा हिशोब तो..! नांव:भारत लक्ष्मन सोनवणे,(सौमित्र). Email:bs7880544@gmail.com मु.पो:कन्नड जि:औरंगाबाद.

मंदिराच्या सुद्धा मी अपूर्ण आहे

भर उन्हात सलम्या त्याच्या बकऱ्या घेऊन,धुळीनं माखलेल्या रस्त्यानी बकऱ्या हुडकत,हुडकत चालतोय....पुढं बकऱ्या,सलम्या मागे मी सलम्याच्या चायना मोबाईलचं गाणं चालू आहे, "तुंम भी कभीं मेरी तंराह प्यार करके देखोना...." मी पण चालत-चालत त्याच्या पुढे आलो,तितक्यात सलम्यानं मला आवाज दिला,ओ छोटे सरकार...इधर कहा घूम रहे हो...? त्यानं माझ्या हातातली पिशवी,क्याटली पाहून ओळखले लक्ष्मी आईला चालला की काय नैवेद्य घेऊन छोटे सरकार,तो बोलता झाला... मी बोलता झालो हानं यार सलम्या भाई,ते वावरातला नवीन गहू घरला आल्यात काल,मग सकाळच्याला मायना पुरणपोळी,गुळंणी केली सोबतीला भजे,वरन-भात पण केलंया.... का रं सलम्या तुला जीवावर नाही येत का फिरायचे... ? छोटे सरकार आम्हाला कायकु येणार फिरायला जीवावर,या रांडा (बकऱ्या) आयुष्यात आल्या अन् आमचं फिरणं चालू झालं...ये सलम्या उनको कायकों रांडा बोलरारे येडे.... और बता क्या चल रहा है सलम्या तेरा ? लडके इस्कुल जाते हैं ना ? भाबी का क्या चल रहा है, परसो की दिन मिले थे राशन के दुकान पर में को.... और सूंन कुछ गेहूं,चावल होना होंगा तो घर से लेके जा,बहोत बुरे गत के दिन च

कविता...

दोन ओळी मी लिहून पुन्हा खोडल्या आहे, बाकी तू समजून घे काय ते लिहले आहे..! बंद खिडकीच्या पल्ल्याड छटा तुझी मी मलाच सावरत आहे, इश्यारे खुले पापण्यांचे तू या नयनांना आता करू नकोस..! ऐकनं मी एकदाचा पडदाच आता खिडकीचा ओढत आहे, तू मात्र सावरतांना बट तुझी आता ओढणी मात्र झुकवु नकोस..! बंद खिडकीच्या आत अस्वस्थ मी आता होत आहे, तू मात्र आता भेटाया कवितांचे बहाणे करून आसवांचे शब्द करू नकोस..! तुझा स्वप्नातल्या हळुवार क्षणांना आता मी घातला आवर आहे, तू घे बांधिस्त करण्या क्षणांना,तुझ्यात गुंतण्यापासून हळू-हळू मी मलाच आता सावरत आहे..! Bharat Sonwane

मी अन् तो ग्लेशियर....

कधी कधी मी पण त्या शुन्यासारखाच होऊन जातो इतरांच्या आयुष्यात. ज्याप्रमाणे शुन्याला कुठलेही महत्त्व नाहीये,तसेच मलाही नाहीये कुठलेच महत्त्व,त्यामुळे असे वाटते की एकांत व आयुष्यातील सरत जाणारा प्रत्येक एक एक क्षण माझ्या स्वतःसाठी मी जगावा.... कधीतरी अश्या ठीकाणी निघून जावे विचारांनी,हो फक्त विचारांनीच कारण काय होत,मी शरीराने गेलो की शब्दांचा कींवा त्या स्थळाचा न राहता आठवणींचा व कल्पनेतील त्या आठवण येणाऱ्या व्यक्तीचा होऊन जातो... हल्ली हे मन अन् मी विचाराने भटकत असतो कधीतरी त्या खदानीच्या कपारीत,शोधत असतो कोरदार ती काळे दगडं जी माझीच आकृती त्या खदानीच्य सरळ सुट दगडावर कोरण्यासाठी कामं येतात.... अलीकडे त्या खदानीतील डबक्यात साचलेल्या पाण्यात राहणारे ते बेडूक माझ्यापेक्षा किती सुखी आहे,हे मला मी तिथे शरीराने बसलेलो असलो की टून-टुन पाण्यात उड्या मारत ते बेडूक दाखवत असतात.मला याचा खूप त्रास होतो म्हणजे हे सगळं कसं आहेना की,लोक बोलतात की मानव जन्म सुखाचा आहे पण इथं सारीच प्रश्न आहे ज्याला आपल्याला उत्तर शोधत राहायचे आहे आयुष्याच्या शेवटपर्यंत.... असेच कधीतरी माझे मन मला त्या

एका भाषेचा मृत्यू....

एक भाषा संपणे म्हणजे या जगातून एका मुळ संस्कृतीचा नामशेष होणे होय.हे खरच खूप वाईट आणखी यावर अभ्यास,विचार करण्यासारखे आहे..... काही दिवसांपूर्वी एका भाषेचा मृत्यू झाला म्हणजेच तीचं अस्तित्व या जगातून समुळ नष्ट झाले,या विषयवार एक लेख लिहला होता परंतु त्या लिखाणातून मला मनाला संतुष्टी वाटले नाही म्हणुन आज पुन्हा हा एक लेख.... कारण एक भाषा संपणे म्हणजे जगाच्या पाठीवर झालेली ही एक खूप मोठी हानी आहे,जी कधीही न भरून निघणारी असेल.जगाच्या या नकाशावर अनेक जवळ-जवळ तेवीसशे भाषा बोलल्या जातात,म्हणजे तेवीसशे प्रकारच्या विविध भाषा,संस्कृती या जगात वापरल्या जातात.... म्हणजेच एका शब्दाला पर्यायी तेवीसशे शब्द आपल्याला भेटतात,आज अनेक भाषा संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे...काही भाषा तर शेवटचा श्वास घेत आहेत,हो श्वासच कारण अजूनही या भाषांची या तंत्रज्ञानाच्या युगात कोठेही लिखित स्वरूपात जपवणूक केली गेली नाहीये,कदाचित त्याची दखलही घेतली गेली नाहीये.... एक भाषा संपते म्हणजे तिचा इतिहास पूर्णपणे संपला जातो,इतिहास संपणे म्हणजे आपल्या पुढील पिढीला आपण काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या फक्त त्या भाषेत

प्रवास सौख्याचा...!

प्रवास... अन् मग, छेडल्यातारा आठवणींच्या, झंकारलीत तालावरती ह्रदय स्पंदने... स्पर्श कल्पनेतला होताच ओठास,अलवार झाला प्रवास ह्रदयी स्पंदनांचा... पापण्यांचा झाला एकदा झुकण्याशी करार,नयनांनी कल्पनेत दृष्टी आड लपवत मिठीत येणे... स्विकार झाला अव्यक्त मिलनरूपी प्रेमाचा,वाढला श्र्वास ह्रदयाच्या व्यक्त समीप तु येता... मावळली सांज ढळता सुर्य अस्थाने प्रवास मिलनाचा संपला वास्तव होता जगण्याने... -भारत लक्ष्मन सोनवणे (सौमित्र).

विचारांचे काहूर..!

तब्बल चार वर्षांपूर्वी पाठवलेला मॅसेज काही दिवसांपूर्वी seen झालेला होता,मॅसेज पाठवणं व मेसेज बघणं यातला वेळ बघितला तर खरच सांगु अलीकडे खूप गोष्टी बदलल्या आहे.... तेव्हा फक्त मर्यादित विचार होते,अलीकडच्या काळात त्यांना भविष्यातील स्वप्नांचे डोहाळे लागले आहे.... माझं अन् भविष्य...काय भविष्य आहे ? सारा अंधारच तर दिसतो भिंतीवर तुझ्या.तू ना...हो मीच हरवला आहे चिंतेच्या काळोखात तुझ्या मनात मोजकेच विचार आहे फक्त.... करियर,लेखन,वाचन,कधीतरी मुड बदलेला असला की मग ती आठवते तुला,ऐकल होतं मन बोलतं ते खरे असते.... होनं तर ऐक मग,मी खरच बोलतो आहे या पलिकडे नाहीये ओळख तुला जगाची.... ती नाही आवरत तुला,मी तिला दिलेल्या बर्थडेच्या शुभेच्या तिने पाळल्या आहे. यशाची उत्कर्षाची,शिखरे ती सर करत आहे,तुला कसला इतका आव तिने तुझा मॅसेज बघावा,इतकं होऊनही तिने तुझी विचारपूस करावी,तुझा Attitude इथेही आड यावा इतकेच सांगेल,सावर स्वत:ला मी मन आहे तुझं फक्त.... अरे हो खरे आहे,पण माणूस कसा असतो नाही का मॅसेज seen होऊनही बोलत नाही. एकतर असे आहे की,सध्या मी विचारांमध्ये दिवसाची रात्र करतो,रात्रीचा दिवस क

Dairy challenge

आयुष्यात सर्वाधिक गोष्टी कोणाशी शेअर केल्या असतील तर त्या फक्त माझ्या डायरीशी.म्हणजे डायरीने मला जगायला शिकवलं,लिहायला शिकवलं अन सर्वात महत्त्वाचं डायरीने एकांतावर प्रेम करायलाही मला शिकवलं.... डायरी लिखाण हे मी नियमित करतो,जसे सुचेल तसे व्यक्त होत असतो माझ्या तोडक्या मोडक्या  लिखाणातून मी डायरीवर.हो तोडक्या मोडक्याच कारण इथं नसतं कुठलं बंधन,आणी नसतं कुणी त्या लिखित स्वरूपात व्यक्त केलेल्या सुख दुःखाच्या भावनांना,क्षणांना बघणारं.... डायरी अन् कॉफी यांचा मिलाफ म्हणजे सुख असते,व हे सुख मी रोज घेत असतो....रोज रात्री फावल्या वेळेत या माझ्या (मैत्रिणीशी) डायरीशी माझी भेट होते,यावेळी खिडकीतून आत येणारा वारा माझ्या शरीराशी हितगुज घालत असतो,सोबतीला गुलजारांची गाणी या क्षणांना चार चांद लाऊन जातात...मग प्रत्येक जगलेला क्षण काॅफीला साक्षी होत,लिखित स्वरुपात एक एक शब्द सुटसुटीत मोती होत डायरीवर कैद होत जातो तो कायमसाठी.... डायरीच्या आतील सफेद पानांवर कधीतरी माझ्याशीच स्वगत घालणारं हे मन,जे कधीच थाय्रावर राहात नाही.त्याला लिखाणातुन व्यक्त करत  मी डायरीत कैद करून ठेवत असतो.... कधीतरी लेखन करत अस

अव्यक्त दोघंही क्षणांचा शेवट....

आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत असताना जेव्हा समोरच्या व्यक्तीवर प्रेम होते,ते व्यक्त करायची वेळ येतेना करून टाकावं ते व्यक्त...‌. आता हे काय नवीन तुझं.... तुझे काहीतरी वेगळंच चालू असत तिनं संवाद चालू असतांना मला हाताने खुणावले.... पण हो आयुष्यभर एखाद्या व्यक्तीशी अव्यक्त नाते निभावत राहणे हवे तितके सोपे नसते,मग असं शेवटच्या क्षणाला व्यक्त होऊन जायचं... दोघांपैकी कोणीतरी एक काहीतरी या सुखात तरी सोडून जाईल की,आपल्यावरही कुणीतरी होते जे आपला विचार आपल्यापेक्षा जास्तच करायचं.... तू वेडा आहेस का रे ? शब्दांच्या दुनियेत काय चार शब्दांची ओळख झाली म्हणून काही वेड्यागत बोलत असतोस...वेळ काय...? बोलतो काय...? अन् हो हे शब्दचांदणे बोलण्यासाठीच छान वाटतात डिअर.... निभावणे खूप कठीण असते हेअव्यक्त राहुण हे नाते जपणे... असं काही नाहीये हा मी नाही का निभावत आहे.... म्हणजे मला समजले नाही.... काही नाही अन् तू समजुन पण घेऊ नकोस, कारण मी फक्त शब्द चांदण्यामध्ये विहार करत असतो,खुल्या आकाशात मुक्त विहार करायला. मला नाही जमत सोबत व्यावहारिक गणितं अन् त्यामध्ये जगायला ही नाही जमत. माझं आयुष्य सोहळा आह

गाव हरवलेली माणसं....

#गाव_हरवलेली_माणसं... घ्या आवराया म्हणतो मी आता जगण्यासाठी इथे काही उरले नाही, झालाच जीव पुन्हा जीवावर उधार इथे आता, मयतावर जाळण्या लाकडेही इथे आता उरले नाही...! ठरलो आहे मी खरा परप्रांतीय बरका आता, कधीतरी सोवळे खोटेच माझी गायली जात होती, माझ्या स्तुतीचे मला आता कळले होते ओझे, चिपाड झालेल्या शरीराला आता इथे जागा नाही..! मी खोटे सोवळे कधी गात नाही माझे, मला माहितीच होते माणुसकी हरवलेल्या माणसात मी जन्मलो आहे, अन् बेवारशी आमच्या या तांड्यास किती ती किंमत आहे..! परप्रांतातून आपल्याच गडीला आणाया तुकोबाचे आधुनिक विमान आहे,आमच्यासाठी मात्र काळाने केलेला घात सहत फटके खात चालणारी ज्ञानीयाची भिंत आहे..! भंगली आमची दुनियाच सारी आता अन् सरला आहे संसार सारा, तसाही संसार काय आमचा दोन गाठुडे अन् एक अनवाणी लेकरू, घेऊन फिरतोय पाठीला बाकी सगळा तुमचाच आहे पसारा..! फासावर लटकण्या ही काय मुजोरी आमची, उघडा संसार घेऊन फिरण्या हल्ली सवयच झाली आहे, फासावर लटकण्या पेक्षा ही माझी बेवारशी दुनियाच आता मला सोपी झाली आहे..! Bharat Sonwane...

राशनच्या_दुकानातली_खजिल_झालेली_मही_माय...

सकाळचे नऊ वाजले होते,काही कामधंदे नसल्यानं झोपलो होतो अजुन,तितक्यात मायना हाक दिली. "अंय लेका उठ की...आज गावात राशन आलंया...." अन् या यळेला म्हणे, गहू,साखर,राकेल,पामतेलाचं पाकीट,तांदुळ, तुरीची दाळ भेटणार हाय म्हणे राशनमध्ये.तेव्हा चल की लेका माझ्यासोबत गोणीचं ओझं आनाया आई मला बोलती झाली... मी ऐकत होतो तश्शेच डोळे चोळत उठलो,अंथरुणाची घडी घालत घालत मायला बोलो, आये पण इतके पैशे कुठून भेटल राशन आणायला ? माय बोलती झाली आरे लेका दोन-तीन बाजार पासून साचवुन ठेवले हायसा,कमी कमी कीरानावर घर धकीत होते... म्हणलं एकदाचकां राशन आलं की,माझ्या लेकराला घेऊन जाईल आणाया राशन,मग जमा करून ठेवली पैशे खूप सारे ... मी अंघुळ केली अन् चड्डी कर्धोड्यात आटकवून तीन गोण्या ओसरीतून काढल्या एकित गहू,एकीत तांदूळ बाकी सगळं एकीत.असं घेतलं तितक्यात मायना हाक दिली.... मी नाचत नाचत माय जवळ गेलो,मायना तांब्याच्या डब्यातून दहा-विसच्या नोटेचे बंडल दिले,मला बोलली मोज रे पोरा... किती हायसा... मी मोजले चारशे तीस रुपये होते ते.मी आईला बोलो आये आपून किती श्रीमंत झालो नाय का इतके पैशे.... आई हसत हसत बोली आवर बिगी