मुख्य सामग्रीवर वगळा

राशनच्या_दुकानातली_खजिल_झालेली_मही_माय...

सकाळचे नऊ वाजले होते,काही कामधंदे नसल्यानं झोपलो होतो अजुन,तितक्यात मायना हाक दिली.
"अंय लेका उठ की...आज गावात राशन आलंया...."

अन् या यळेला म्हणे,
गहू,साखर,राकेल,पामतेलाचं पाकीट,तांदुळ, तुरीची दाळ भेटणार हाय म्हणे राशनमध्ये.तेव्हा चल की लेका माझ्यासोबत गोणीचं ओझं आनाया आई मला बोलती झाली...

मी ऐकत होतो तश्शेच डोळे चोळत उठलो,अंथरुणाची घडी घालत घालत मायला बोलो,
आये पण इतके पैशे कुठून भेटल राशन आणायला ?

माय बोलती झाली आरे लेका दोन-तीन बाजार पासून साचवुन ठेवले हायसा,कमी कमी कीरानावर घर धकीत होते... म्हणलं एकदाचकां राशन आलं की,माझ्या लेकराला घेऊन जाईल आणाया राशन,मग जमा करून ठेवली पैशे खूप सारे ...

मी अंघुळ केली अन् चड्डी कर्धोड्यात आटकवून तीन गोण्या ओसरीतून काढल्या एकित गहू,एकीत तांदूळ बाकी सगळं एकीत.असं घेतलं तितक्यात मायना हाक दिली....

मी नाचत नाचत माय जवळ गेलो,मायना तांब्याच्या डब्यातून दहा-विसच्या नोटेचे बंडल दिले,मला बोलली मोज रे पोरा... किती हायसा... मी मोजले चारशे तीस रुपये होते ते.मी आईला बोलो आये आपून किती श्रीमंत झालो नाय का इतके पैशे....

आई हसत हसत बोली आवर बिगी-बिगी राशन बंद होईल मग भेटणार नाय,मी दाराची कडी लावली अन् माय पदर डोक्यावर सावरत व मी उड्या मारीत-मारीत राशन दुकान जवळ आलो....

आम्ही खूप खुश होतो आज इतका पैका अन् कमी पैशात इतकं राशन भेटणार होतं आज.खूप नंबरं होती,आईच्या बाकी जोडीदारनी पण आल्या होत्या...

मायचा नंबर आला मायना गोनी,कार्ड दिलं अन् गहू,तांदूळ त्या राशनवाल्या बाबाने मायला दिले. मी गोनीला सुतळी बांधत होतो,
माय त्याला बोली का हो मामा इतकंच राशन आलं का....?

तो नजर खाली करून बोलता झाला,हो गं माय काय करू सरकार नुस्त सांगत,पर इथवर फक्सत गहू अन् तांदूळ येऊन राहिल्यात मी तरी काय करू....

काही क्षणांपूर्वी जी माय जगातील सर्वात श्रीमंत माय म्हणुन मी बघत होतो,ती पोठापुरते पैशै कमवुनही खजिल झाली होती.अंन म्या मायकडं बघितलं...

मायना नजर झुकवित पाच कीलोचं तांदुळाचं गाठुडं माझ्या खांद्यावर दिलं,तिनं लाल गव्हाचं पंधरा किलोचं ओझं घेऊन पदर डोक्यावर सावरत,आलेलं संकट बघत जगण्यासाठी हाताश होतांना मी मायला टिपलं....ते डोळ्यात अन मनात कायमचं आयुष्यभरासाठी....

#राशनच्या_दुकानातली_खजिल_झालेली_मही_माय...

Written by,

Bharat Sonwane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...