मुख्य सामग्रीवर वगळा

राशनच्या_दुकानातली_खजिल_झालेली_मही_माय...

सकाळचे नऊ वाजले होते,काही कामधंदे नसल्यानं झोपलो होतो अजुन,तितक्यात मायना हाक दिली.
"अंय लेका उठ की...आज गावात राशन आलंया...."

अन् या यळेला म्हणे,
गहू,साखर,राकेल,पामतेलाचं पाकीट,तांदुळ, तुरीची दाळ भेटणार हाय म्हणे राशनमध्ये.तेव्हा चल की लेका माझ्यासोबत गोणीचं ओझं आनाया आई मला बोलती झाली...

मी ऐकत होतो तश्शेच डोळे चोळत उठलो,अंथरुणाची घडी घालत घालत मायला बोलो,
आये पण इतके पैशे कुठून भेटल राशन आणायला ?

माय बोलती झाली आरे लेका दोन-तीन बाजार पासून साचवुन ठेवले हायसा,कमी कमी कीरानावर घर धकीत होते... म्हणलं एकदाचकां राशन आलं की,माझ्या लेकराला घेऊन जाईल आणाया राशन,मग जमा करून ठेवली पैशे खूप सारे ...

मी अंघुळ केली अन् चड्डी कर्धोड्यात आटकवून तीन गोण्या ओसरीतून काढल्या एकित गहू,एकीत तांदूळ बाकी सगळं एकीत.असं घेतलं तितक्यात मायना हाक दिली....

मी नाचत नाचत माय जवळ गेलो,मायना तांब्याच्या डब्यातून दहा-विसच्या नोटेचे बंडल दिले,मला बोलली मोज रे पोरा... किती हायसा... मी मोजले चारशे तीस रुपये होते ते.मी आईला बोलो आये आपून किती श्रीमंत झालो नाय का इतके पैशे....

आई हसत हसत बोली आवर बिगी-बिगी राशन बंद होईल मग भेटणार नाय,मी दाराची कडी लावली अन् माय पदर डोक्यावर सावरत व मी उड्या मारीत-मारीत राशन दुकान जवळ आलो....

आम्ही खूप खुश होतो आज इतका पैका अन् कमी पैशात इतकं राशन भेटणार होतं आज.खूप नंबरं होती,आईच्या बाकी जोडीदारनी पण आल्या होत्या...

मायचा नंबर आला मायना गोनी,कार्ड दिलं अन् गहू,तांदूळ त्या राशनवाल्या बाबाने मायला दिले. मी गोनीला सुतळी बांधत होतो,
माय त्याला बोली का हो मामा इतकंच राशन आलं का....?

तो नजर खाली करून बोलता झाला,हो गं माय काय करू सरकार नुस्त सांगत,पर इथवर फक्सत गहू अन् तांदूळ येऊन राहिल्यात मी तरी काय करू....

काही क्षणांपूर्वी जी माय जगातील सर्वात श्रीमंत माय म्हणुन मी बघत होतो,ती पोठापुरते पैशै कमवुनही खजिल झाली होती.अंन म्या मायकडं बघितलं...

मायना नजर झुकवित पाच कीलोचं तांदुळाचं गाठुडं माझ्या खांद्यावर दिलं,तिनं लाल गव्हाचं पंधरा किलोचं ओझं घेऊन पदर डोक्यावर सावरत,आलेलं संकट बघत जगण्यासाठी हाताश होतांना मी मायला टिपलं....ते डोळ्यात अन मनात कायमचं आयुष्यभरासाठी....

#राशनच्या_दुकानातली_खजिल_झालेली_मही_माय...

Written by,

Bharat Sonwane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...