मुख्य सामग्रीवर वगळा

मंदिराच्या सुद्धा मी अपूर्ण आहे

भर उन्हात सलम्या त्याच्या बकऱ्या घेऊन,धुळीनं माखलेल्या रस्त्यानी बकऱ्या हुडकत,हुडकत चालतोय....पुढं बकऱ्या,सलम्या मागे मी सलम्याच्या चायना मोबाईलचं गाणं चालू आहे,
"तुंम भी कभीं मेरी तंराह प्यार करके देखोना...."

मी पण चालत-चालत त्याच्या पुढे आलो,तितक्यात सलम्यानं मला आवाज दिला,ओ छोटे सरकार...इधर कहा घूम रहे हो...?
त्यानं माझ्या हातातली पिशवी,क्याटली पाहून ओळखले लक्ष्मी आईला चालला की काय नैवेद्य घेऊन छोटे सरकार,तो बोलता झाला...

मी बोलता झालो हानं यार सलम्या भाई,ते वावरातला नवीन गहू घरला आल्यात काल,मग सकाळच्याला मायना पुरणपोळी,गुळंणी केली सोबतीला भजे,वरन-भात पण केलंया....

का रं सलम्या तुला जीवावर नाही येत का फिरायचे... ?

छोटे सरकार आम्हाला कायकु येणार फिरायला जीवावर,या रांडा (बकऱ्या) आयुष्यात आल्या अन् आमचं फिरणं चालू झालं...ये सलम्या उनको कायकों रांडा बोलरारे येडे....

और बता क्या चल रहा है सलम्या तेरा ? लडके इस्कुल जाते हैं ना ? भाबी का क्या चल रहा है, परसो की दिन मिले थे राशन के दुकान पर में को....
और सूंन कुछ गेहूं,चावल होना होंगा तो घर से लेके जा,बहोत बुरे गत के दिन चालू हैं यार अभी सलम्या....

पुढे आम्ही सोबत चालू लागलो,त्याने माझ्या हातातली क्याटली त्याच्या खांद्यावर असलेल्या काठीला अटकवली व त्याने मला प्रश्न केला,जो सारं गाव हल्ली करते मला...

और क्या छोटे सरकार पैसा-बैसा कुछ कमा रहे हो क्या नहीं शहर में... ?
क्या अभीं भीं घरसे लेकर ही जी रहे हो...?.(खेड्यातील विचारदृष्टीने त्याचा हा प्रश्न)

सलम्या सध्यातरी नाही कमावत यार पण,लवकरच तेरा ये भाई ओ काच चमकते नहीं क्या बडे-बडे ओ हापीसमें काम करने को लगने वाला है...
का रे सलम्या तुला पायाला ऊन नाही लागत का,नुसता अनवाणी पायांनी फिरतोय तू.तोंडाला मास्क,रुमाल बांध साले कोरोना हो जाऐंगा ते को...

तो हसतच बोला कसले मास्क अन् कसली चप्पल,चप्पल घ्यायची होती पण साले या वर्षी लग्न नाही होऊन राहीले ना,नाहीतर तीन-चार जोड लग्नातून पसार केले की धकून जातं आपल वर्षभर...

जसे-जसे त्याचे हे विचार मी ऐकत होतो सुन्न होत होतो,चालत चालत आम्ही स्मशानाच्या ओट्यावर येऊन बसलो,तो बकऱ्यांना हुंडकत आवाज देत होता....

मी फक्त बघत होतो त्याच्या त्या अलवार नजरेकडे अन् त्याच्या त्या नजरेतून तुटणार्या उन्हाच्या तुटत्या झळईकडे...
कधीतरी त्याच्या शर्टाला मागून चिपकलेलं ते लांडुर दीसून जायचं,ते हाताने काढून फेकलं.

त्याला बोलो मोबाईल कब लिया सलम्या ?

तो बोलता झाला अरे ओ पांनसों में दीया हमारे बडे मेहुणे है उन्होंने,उसके साथ कोंणसी तो म्यामरी दिये है.उसमे गाणे है वहीं सून-सून के बेकार हो गया यार,बाजार में कल गाणे भरणे गया तो बोले पच्चास रुपये लगेंगे ज्यांदो फिर बोला....

अरे त्याला कश्याला देतो पैशे सांच्याला ये मी भरुन देतो फुकट गाणे,सध्या काही देतो मी त्याला काही गाणे दिले.
जेवण कधी करतो सलम्या तू ?
करेल आता,इथे हापश्यावरून पाणी आणतो थांब....तो पाणी घ्यायला गेला पाणी आणून त्या ओट्यावर तो बसला,मी पण बसलो...

डब्यातील माश्याचे कालवण आणि भात काढून तो खात होता,मला बोलला चल खाना खाले...
मी नकारार्थी मान हलवली अन् त्याला डब्ब्यातून आईने दिलेला नैवेद्य पुरणपोळी,गुळंणी,आणि वरण भात दिला.पोटभर जेऊन तो बोलला आता देवीला काय नैवेद्य देणार ?

मी बोलो डब्यात उरलेला दाखवेल,मग आम्ही दोघं गेलो देवीला नैवेद्य दिला,अगरबत्ती लावली बाहेर असलेल्या मुंज्याला शेंदूर फासला,अन् नारळ फोडून त्याला दाखवले,नैवेद्य ठेवले.

मंदिराची घंटी वाजून आम्ही बाहेर येऊन बसलो तो बोलला मी इथे रोज येतो या मंदिराच्या सावलीत आराम करतो,देवी,मुंज्या आहे छान वाटते,रोज भेट होती त्यांची...

तू कब आया था पिछले वक्त ?
मी बोलता झालो दो साल हो गये...
में रोज आता हू,तो भी देवी मुझे ऐसी गरीब रखीं यार और तु कभी कभी आता है,तो भी तू इतना बडा आदमी बन चुका है छोटे सरकार...
पुढे तो बोलला चल जाता हुं में,उधर मेरी बकऱ्या खा लेंगे कुत्ते...

तो गेला,मी मात्र बघत राहीलो त्याच्या पाठमोऱ्या आकृतीला अन् माझ्या वाईट परिस्थितीला,विचार करत राहिलो मृगजळ काय असते अन् त्याचे सुख कोणते...
एकटा होतो तिथं मी कसला भास नाही की नव्हती देवी,नव्हता मुंजा...

#मंदिराच्या_सावलीतहीं_मी_अपुर्ण_आहे...
Written by,
Bharat Sonwane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...