मुख्य सामग्रीवर वगळा

अस्वस्थ मनाचे गुज....

कधीतरी अश्यावेळी त्या धरणाच्या पाळेवर जाऊन बसून राहावं वाटते एकटं..! एकटं..!


काही करायचं नाहीये फक्त एकटक त्या नितळ पाण्यात,सोबत जगण्यासाठी दूरवर चालेली त्या नावड्याची अन् त्याच्या नावेची धडपड बघत बसायची आहे....

समोर पाणी असून सुद्धा शरीर घामाने ओल झालं आहे,पण तरीही पाण्यात पाय टाकून बसायचं नाहीये.मनातच मनातील असंख्य विचारांचा चालेला खेळ अनुभवत बसायचा आहे खुप वेळ...

कित्येकदा रडू वाटत असते,अश्रू डोळ्यात येऊन पापण्याआड ते विस्फारलेले आहेत.कधीतरी त्या धरणातील पाण्याच्या येणाऱ्या संथ लाठेप्रमाणे गालाला स्पर्श करुन,ते जमिनीत विलीन होतील नाहीतर गालावरच सुखून जातील...सोबतीला थंडपणाची जाणीव शरीराला देऊन स्वतः सोखावतील की काय,काय माहीत....

दोन प्रश्नांची उत्तरे इथे भेटतील,राहीलेल्या प्रश्नांना सोबत घेऊन हा प्रवास धरण पाळेवरून,त्या धरणात जाणाऱ्या पुलाच्या दिशेनं करायचा आहे...
इथे एक प्रश्न कायमचा सुटेल,मागे अनेक प्रश्न कायमची तशीच सोडून पुन्हा कधीच ज्यांची उत्तरे शोधली जाणार नाही.कींवा नाही होणार अट्टहास त्या प्रश्नांना सोडविण्यासाठीचा कधीच...

कधीतरी असे वाटते की शरीरा बरोबर हे मन का दिले असेल,कारण ते करत तर काहीच नाही.सतत द्विधा मनस्थितीत पाडत असते आपल्याला,हे करू की ते करू काही करायला गेलं की ते चुकते इथे दोष कुणाला द्यायचा तर आपल्यालाच....

हा सगळा प्रवास आहे ज्यामध्ये सोबत कोणाचीच नसते,अगदी सगळेच खायला उटलेले असतात.आपली माणसे नावालाच आहे येथे आपले शरीर सुद्धा आपलीच खिल्ली उडवत असते...
या सर्वात आयुष्यभर फक्त एकच जण साथ देत असते ते म्हणजे डोळ्यांतील अश्रु त्यांचं वाहनं कधी थांबत नाही,आपलाही रडगाण्याचा प्रवास कधीच संपुष्टात येत नाही....

शेवट काय हवे असते आपल्याला व काय अपेक्षा असतात ?
अपेक्षा वगैरे या गोष्टी फक्त शब्दात छान वाटतात, माझ्यासाठी नाहीये ते बनलेले...
Even मी हे सर्व मानतच नाही...

अपेक्षा,स्वप्न,नाते,पैसा,सुख,दुःख हे सर्व माझ्यासाठी फक्त शब्द आहे.कारण काय होत की,यातील एक शब्दाचासुद्धा मी विचार केला की उभे आयुष्य डोळ्यासमोर दिसते...

तो आशेचा उंचावलेला आलेख,हो तो कल्पनेत उंचावलेलाच असतो,तो कधी प्रत्यक्षात कधी नसतोच.ही इतकी सर्व तडजोड मला सहन नाही होत,म्हणुन कधीतरी हे असे येऊन दोन सुखाच्या गोष्टी ज्या फक्त नावाला घडत आहे त्या तुला देऊन जातो.कारण तू पण काही घेतल्याशिवाय काही देत नाही हो नं...

तुझं अस्तित्व जपविण्यासाठी तू माझ्यासारख्या मन थकलेल्यांचा आधार घेत असतो,तु तुझं सूनपन आमच्या पदरात टाकून संथपणे लाठ होऊन आमच्यावर उधळत असतो...

शेवटी काय तर तू पण या व्यवहारी जगात व्यवहार शिकला आहे तर....

#व्यवहारी_जगात_धरण_पाळेवर_धरणाशी_केलेल्या_गप्पा....


Written by,

Bharat Sonwane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ