मुख्य सामग्रीवर वगळा

अस्वस्थ मनाचे गुज....

कधीतरी अश्यावेळी त्या धरणाच्या पाळेवर जाऊन बसून राहावं वाटते एकटं..! एकटं..!


काही करायचं नाहीये फक्त एकटक त्या नितळ पाण्यात,सोबत जगण्यासाठी दूरवर चालेली त्या नावड्याची अन् त्याच्या नावेची धडपड बघत बसायची आहे....

समोर पाणी असून सुद्धा शरीर घामाने ओल झालं आहे,पण तरीही पाण्यात पाय टाकून बसायचं नाहीये.मनातच मनातील असंख्य विचारांचा चालेला खेळ अनुभवत बसायचा आहे खुप वेळ...

कित्येकदा रडू वाटत असते,अश्रू डोळ्यात येऊन पापण्याआड ते विस्फारलेले आहेत.कधीतरी त्या धरणातील पाण्याच्या येणाऱ्या संथ लाठेप्रमाणे गालाला स्पर्श करुन,ते जमिनीत विलीन होतील नाहीतर गालावरच सुखून जातील...सोबतीला थंडपणाची जाणीव शरीराला देऊन स्वतः सोखावतील की काय,काय माहीत....

दोन प्रश्नांची उत्तरे इथे भेटतील,राहीलेल्या प्रश्नांना सोबत घेऊन हा प्रवास धरण पाळेवरून,त्या धरणात जाणाऱ्या पुलाच्या दिशेनं करायचा आहे...
इथे एक प्रश्न कायमचा सुटेल,मागे अनेक प्रश्न कायमची तशीच सोडून पुन्हा कधीच ज्यांची उत्तरे शोधली जाणार नाही.कींवा नाही होणार अट्टहास त्या प्रश्नांना सोडविण्यासाठीचा कधीच...

कधीतरी असे वाटते की शरीरा बरोबर हे मन का दिले असेल,कारण ते करत तर काहीच नाही.सतत द्विधा मनस्थितीत पाडत असते आपल्याला,हे करू की ते करू काही करायला गेलं की ते चुकते इथे दोष कुणाला द्यायचा तर आपल्यालाच....

हा सगळा प्रवास आहे ज्यामध्ये सोबत कोणाचीच नसते,अगदी सगळेच खायला उटलेले असतात.आपली माणसे नावालाच आहे येथे आपले शरीर सुद्धा आपलीच खिल्ली उडवत असते...
या सर्वात आयुष्यभर फक्त एकच जण साथ देत असते ते म्हणजे डोळ्यांतील अश्रु त्यांचं वाहनं कधी थांबत नाही,आपलाही रडगाण्याचा प्रवास कधीच संपुष्टात येत नाही....

शेवट काय हवे असते आपल्याला व काय अपेक्षा असतात ?
अपेक्षा वगैरे या गोष्टी फक्त शब्दात छान वाटतात, माझ्यासाठी नाहीये ते बनलेले...
Even मी हे सर्व मानतच नाही...

अपेक्षा,स्वप्न,नाते,पैसा,सुख,दुःख हे सर्व माझ्यासाठी फक्त शब्द आहे.कारण काय होत की,यातील एक शब्दाचासुद्धा मी विचार केला की उभे आयुष्य डोळ्यासमोर दिसते...

तो आशेचा उंचावलेला आलेख,हो तो कल्पनेत उंचावलेलाच असतो,तो कधी प्रत्यक्षात कधी नसतोच.ही इतकी सर्व तडजोड मला सहन नाही होत,म्हणुन कधीतरी हे असे येऊन दोन सुखाच्या गोष्टी ज्या फक्त नावाला घडत आहे त्या तुला देऊन जातो.कारण तू पण काही घेतल्याशिवाय काही देत नाही हो नं...

तुझं अस्तित्व जपविण्यासाठी तू माझ्यासारख्या मन थकलेल्यांचा आधार घेत असतो,तु तुझं सूनपन आमच्या पदरात टाकून संथपणे लाठ होऊन आमच्यावर उधळत असतो...

शेवटी काय तर तू पण या व्यवहारी जगात व्यवहार शिकला आहे तर....

#व्यवहारी_जगात_धरण_पाळेवर_धरणाशी_केलेल्या_गप्पा....


Written by,

Bharat Sonwane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...