मुख्य सामग्रीवर वगळा

एका भाषेचा मृत्यू....


एक भाषा संपणे म्हणजे या जगातून एका मुळ संस्कृतीचा नामशेष होणे होय.हे खरच खूप वाईट आणखी यावर अभ्यास,विचार करण्यासारखे आहे.....


काही दिवसांपूर्वी एका भाषेचा मृत्यू झाला म्हणजेच तीचं अस्तित्व या जगातून समुळ नष्ट झाले,या विषयवार एक लेख लिहला होता परंतु त्या लिखाणातून मला मनाला संतुष्टी वाटले नाही म्हणुन आज पुन्हा हा एक लेख....

कारण एक भाषा संपणे म्हणजे जगाच्या पाठीवर झालेली ही एक खूप मोठी हानी आहे,जी कधीही न भरून निघणारी असेल.जगाच्या या नकाशावर अनेक जवळ-जवळ तेवीसशे भाषा बोलल्या जातात,म्हणजे तेवीसशे प्रकारच्या विविध भाषा,संस्कृती या जगात वापरल्या जातात....

म्हणजेच एका शब्दाला पर्यायी तेवीसशे शब्द आपल्याला भेटतात,आज अनेक भाषा संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे...काही भाषा तर शेवटचा श्वास घेत आहेत,हो श्वासच कारण अजूनही या भाषांची या तंत्रज्ञानाच्या युगात कोठेही लिखित स्वरूपात जपवणूक केली गेली नाहीये,कदाचित त्याची दखलही घेतली गेली नाहीये....

एक भाषा संपते म्हणजे तिचा इतिहास पूर्णपणे संपला जातो,इतिहास संपणे म्हणजे आपल्या पुढील पिढीला आपण काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या फक्त त्या भाषेतच उपलब्ध होत्या,त्या देण्यापासून कायमचे वंचित गमावतो....

पुन्हा एकदा जर तेवीसशे भाषांचा विचार केला जे खूप मोठे शब्द भांडार आहे,त्याचा विचार हा तंत्रज्ञानाच्या या युगाच्याही खूप पुढे आहे...विविध देशात तर ती भाषा संपुष्टात येणार आहे म्हणुन ती फायद्याची नाही,म्हणून तिच्यावरचं होणारा अभ्यास ही थांबवला आहे....

हे किती वाईट अन् भयावह आहे,कारण एक भाषा संपणार म्हणजे त्या भाषेत केलेले संस्कृतीचे निसर्गाचे,मानवी जीवन,जतन त्यावर केलेलं,भारत
हे संपून जाईल....

एक आदिवासी बाई होती गरीब
अमेरिकेच्या अलास्का प्रदेशात राहायची
नव्वदीची...

तिचं नाव मेरी स्मिथ जॉन्स
तिला तर काहीच माहीत नव्हतं,
तिला येत नव्हती जादू
तिला ठाऊक नव्हती हातचलाखी...

तिला भेटला नाही कोणताच पुरस्कार
तिला ओळखायचे नाहीत
तिच्या देशातील लोकसुद्धा
ती मरुन गेली...

दोन हजार दहाच्या एकवीस जानेवारीला,
खरं तर यात काहीच विशेष नाही
या वयात मरुन जातात बहुतेक लोक...

पण सांगतो तुम्हाला,
ती मेली आणि तिची खबर,
दुरातून उडत पोहोचली माझ्यापर्यंत...

रेडिओवरुन, टीव्हीमधून,पेपरच्या पानांमधून
भाषा विज्ञानाच्या चर्चेत गाजत राहिलं तिचं नाव
नव्वदीची ती गरीब म्हातारी
शेवटची व्यक्ती होती,जिला माहीत होती
‘ईयाक’ नावाची भाषा...

"म्हातारी मेली आणि मरुन गेली एक भाषा
या जमिनीवरुन,अनंतकाळासाठी..."

कवी:यादुमनि बेसरा,(संथाली).
मराठी अनुवाद:पृथ्वीराज तौर.

जेव्हा एक भाषा इतक्या सहज संपुष्टात येते,तिच्यासोबत आपण खूप काही विसरून जातो कींवा ते आपल्याला विसरण्याला भाग पडते....

हजारो वर्षांच्या जगण्याचा सांस्कृतिक,भौगोलिक,मानवी उत्क्रांतीचा यावर त्या भाषेत झालेलं लिखाण नाहीये यांमुळे हे सर्व त्यांच रोजच्या जीवनात जगण्याची विशिष्ट पद्धत,दस्तावेज मरत असेल.या संबंधीचे शब्दांमध्ये दडलेले वेगवेगळे संकेतक मरत असेल....


पुढे जाऊन फक्त आपल्याच देशाचा विचार कधी केलाततर,आपला देश ओळखल्या जातो विविध भाषा,संस्कृती,वेशभूषा,जगण्याच्या वेग वेगळ्या पद्धती,राहणीमान,पाककला,सण,वार,शिक्षण यांमुळे....

आपल्या देशातही अनेक भाषा संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे,परंतु या भाषांवरही अजूनही कुठला अभ्यास,लिखित स्वरुपात केलेला अनुवाद,लेखन भेटत नाही ही शोकांतिका आहे...

भारत या देशाला सर्वदूर ओळख दिली जाते अन् मानाने सर्वदूर सर्वाधिक जुणी भाषा म्हणून आपण ज्या भाषेला मिरवतो ती "संस्कृत" भाषा कदाचित पुढील काही शतकात नामशेष होईल याची भीती वाटत आहे...कारण अलीकडेच्या काळात या भाषेबद्दल न झालेला अभ्यास....

नव्या पिढीला अजूनही बऱ्यापैकी ही भाषा शाळेत उपलब्ध नाही,अजूनही ती कोणाला येत नाही.ही भाषा संपली तर किती मोठा इतिहास,माहिती,संस्कृती,साहित्य हे कायमसाठी संपुष्टात येईल.या भाषेवर बऱ्यापैकी (अल्प प्रमाणात) लेखन झाले आहे परंतु,तिचे जतन,संवर्धन करण्यासाठी आपण कुठेतरी कमी पडत आहोत असेही वाटून जाते....

हे फक्त या भाषेसाठी नाहीतर भारतात,जगात अश्या अनेक भाषांसाठी आहे...तेव्हा एक भाषा संपणे हे खूप वाईट गोष्ट आहे,हे नुकसान कधीही न भरून निघण्यास सारखे आहे...

एका भाषेचं असा दुर्दैवी मृत्यू होऊ नये,इतकंच कारण एका भाषा,संस्कृतीला आपली पुढची पिढी कायमची मुकलेली असेल जे नको वाटते....

#एका_भाषेचा_मृत्यु...


Written by,

Bharat.L.Sonwane.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ