मुख्य सामग्रीवर वगळा

मी अन् तो ग्लेशियर....


कधी कधी मी पण त्या शुन्यासारखाच होऊन जातो इतरांच्या आयुष्यात.

ज्याप्रमाणे शुन्याला कुठलेही महत्त्व नाहीये,तसेच मलाही नाहीये कुठलेच महत्त्व,त्यामुळे असे वाटते की एकांत व आयुष्यातील सरत जाणारा प्रत्येक एक एक क्षण माझ्या स्वतःसाठी मी जगावा....


कधीतरी अश्या ठीकाणी निघून जावे विचारांनी,हो फक्त विचारांनीच कारण काय होत,मी शरीराने गेलो की शब्दांचा कींवा त्या स्थळाचा न राहता आठवणींचा व कल्पनेतील त्या आठवण येणाऱ्या व्यक्तीचा होऊन जातो...

हल्ली हे मन अन् मी विचाराने भटकत असतो कधीतरी त्या खदानीच्या कपारीत,शोधत असतो कोरदार ती काळे दगडं जी माझीच आकृती त्या खदानीच्य सरळ सुट दगडावर कोरण्यासाठी कामं येतात....

अलीकडे त्या खदानीतील डबक्यात साचलेल्या पाण्यात राहणारे ते बेडूक माझ्यापेक्षा किती सुखी आहे,हे मला मी तिथे शरीराने बसलेलो असलो की टून-टुन पाण्यात उड्या मारत ते बेडूक दाखवत असतात.मला याचा खूप त्रास होतो म्हणजे हे सगळं कसं आहेना की,लोक बोलतात की मानव जन्म सुखाचा आहे पण इथं सारीच प्रश्न आहे ज्याला आपल्याला उत्तर शोधत राहायचे आहे आयुष्याच्या शेवटपर्यंत....

असेच कधीतरी माझे मन मला त्या घळघळ करणाऱ्या ग्लेशियर जवळ घेऊन जाते कधीतरी. मलाही वाटते की या ग्लेशियरमध्ये उतरून घ्यावं कायमच....
पांढरा शांतीचा रंग तो इथे चहुपार आहे,मग आत मध्येपण तेच असेल पण नकळत जेव्हा मनाला शरीराची आठवण येते ते डोळ्यातून टिपूस गाळायला लागतं....

जेव्हा-जेव्हा हे अश्रू त्या बर्फाळ जमिनीवर पडत राहतात,तेव्हा ते उडणारे शिंतोडे जमिनीवरून घरंगळत त्या ग्लेशियरवर वाहत जातात मग तेव्हा ते अश्रू न राहता ते ड्रिपस्टोन होऊन जातात....

तेच चक-चक चमकणारे ड्रिपस्टोन जेव्हा मी बघतो,तेव्हा तिथं माझं आयुष्य मला समजत जातं...
कारण तो ड्रिपस्टोन वर्षानुवर्ष एकटा माझ्या सारखाच निराशेच्या गर्तेत,त्या ग्लेशियर सोबत दुःखद आयुष्य जगत कडक धारदार होत राहतो, कणखर होत राहतो....

पण ते कोणासाठी ? कारण पाणी सुद्धा ड्रिपस्टोनच्या आसपास जाऊन त्याचे मार्ग बदलत राहते,पण...

या पुढेही जाऊन जर विचार केला तर,तो ड्रिपस्टोन माझ्या मनाचं दुखः व माझ्या मनातील एकांतपणा,जो त्याने वर्षानुवर्ष अनुभवलेला असतो तो त्या ड्रिपस्टोनला मला भेट द्यायचा नाहीये परतीच्या वाटेवर.....

त्यामुळे तो स्फटीक बनून माझ्या निराशेच्या गर्तेत हरवलेल्या मनाला वाट दाखवून जातो,या भयावह ग्लेशियर असलेल्या त्याच्या दु:खद आयुष्यात मला उजेड देऊन,पुन्हा एकदा माझ्या मनाला शरीरात आणून सोडवून जातो त्याच्या एकांतवासात...

कारण त्याला तो चुकत नाही,पण माझे हे हळवे मन आहेना जे सतत इतरांचा विचार करत असते. मग त्याचा का नाही करणार..?

तो ड्रिपस्टोन कसा जगतो याबद्दल मला त्याचे प्रेम वाटते,यातून त्याचीही माझ्यासारखी सुटका करावीशी वाटते.या भव्य अश्या ग्लेशियर मध्ये तो ड्रिपस्टोन त्याचे ते रोज थोडे-थोडे मरणारे हृदय
मी पाहत असतो....

थेंब-थेंब करीत ते स्वत:ला संपवत असते अलवारपणे,अन् एकदाचं ते ड्रिपस्टोन तुटून खाली पडते अन... त्या खोल घळईत कायमचं अदृश्य होते काळाच्या आड होऊन जाते,त्याच स्फटीकपण कायमचं इथंच सोडवुन....

मग मी,माझं मन बसतो तिथं सुद्धा पुन्हा एक नवीन ड्रिपस्टोन तयार करण्यासाठी,आसवे गाळत सोडुन गेलेल्या त्या ड्रिपस्टोनच्या आठवणीत....


Written by,

Bharat Sonwane...


#ड्रिपस्टोन_ग्लेशियर_व_त्यांच_झालेलं_माझं_हळव_मन....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...