मुख्य सामग्रीवर वगळा

मी अन् तो ग्लेशियर....


कधी कधी मी पण त्या शुन्यासारखाच होऊन जातो इतरांच्या आयुष्यात.

ज्याप्रमाणे शुन्याला कुठलेही महत्त्व नाहीये,तसेच मलाही नाहीये कुठलेच महत्त्व,त्यामुळे असे वाटते की एकांत व आयुष्यातील सरत जाणारा प्रत्येक एक एक क्षण माझ्या स्वतःसाठी मी जगावा....


कधीतरी अश्या ठीकाणी निघून जावे विचारांनी,हो फक्त विचारांनीच कारण काय होत,मी शरीराने गेलो की शब्दांचा कींवा त्या स्थळाचा न राहता आठवणींचा व कल्पनेतील त्या आठवण येणाऱ्या व्यक्तीचा होऊन जातो...

हल्ली हे मन अन् मी विचाराने भटकत असतो कधीतरी त्या खदानीच्या कपारीत,शोधत असतो कोरदार ती काळे दगडं जी माझीच आकृती त्या खदानीच्य सरळ सुट दगडावर कोरण्यासाठी कामं येतात....

अलीकडे त्या खदानीतील डबक्यात साचलेल्या पाण्यात राहणारे ते बेडूक माझ्यापेक्षा किती सुखी आहे,हे मला मी तिथे शरीराने बसलेलो असलो की टून-टुन पाण्यात उड्या मारत ते बेडूक दाखवत असतात.मला याचा खूप त्रास होतो म्हणजे हे सगळं कसं आहेना की,लोक बोलतात की मानव जन्म सुखाचा आहे पण इथं सारीच प्रश्न आहे ज्याला आपल्याला उत्तर शोधत राहायचे आहे आयुष्याच्या शेवटपर्यंत....

असेच कधीतरी माझे मन मला त्या घळघळ करणाऱ्या ग्लेशियर जवळ घेऊन जाते कधीतरी. मलाही वाटते की या ग्लेशियरमध्ये उतरून घ्यावं कायमच....
पांढरा शांतीचा रंग तो इथे चहुपार आहे,मग आत मध्येपण तेच असेल पण नकळत जेव्हा मनाला शरीराची आठवण येते ते डोळ्यातून टिपूस गाळायला लागतं....

जेव्हा-जेव्हा हे अश्रू त्या बर्फाळ जमिनीवर पडत राहतात,तेव्हा ते उडणारे शिंतोडे जमिनीवरून घरंगळत त्या ग्लेशियरवर वाहत जातात मग तेव्हा ते अश्रू न राहता ते ड्रिपस्टोन होऊन जातात....

तेच चक-चक चमकणारे ड्रिपस्टोन जेव्हा मी बघतो,तेव्हा तिथं माझं आयुष्य मला समजत जातं...
कारण तो ड्रिपस्टोन वर्षानुवर्ष एकटा माझ्या सारखाच निराशेच्या गर्तेत,त्या ग्लेशियर सोबत दुःखद आयुष्य जगत कडक धारदार होत राहतो, कणखर होत राहतो....

पण ते कोणासाठी ? कारण पाणी सुद्धा ड्रिपस्टोनच्या आसपास जाऊन त्याचे मार्ग बदलत राहते,पण...

या पुढेही जाऊन जर विचार केला तर,तो ड्रिपस्टोन माझ्या मनाचं दुखः व माझ्या मनातील एकांतपणा,जो त्याने वर्षानुवर्ष अनुभवलेला असतो तो त्या ड्रिपस्टोनला मला भेट द्यायचा नाहीये परतीच्या वाटेवर.....

त्यामुळे तो स्फटीक बनून माझ्या निराशेच्या गर्तेत हरवलेल्या मनाला वाट दाखवून जातो,या भयावह ग्लेशियर असलेल्या त्याच्या दु:खद आयुष्यात मला उजेड देऊन,पुन्हा एकदा माझ्या मनाला शरीरात आणून सोडवून जातो त्याच्या एकांतवासात...

कारण त्याला तो चुकत नाही,पण माझे हे हळवे मन आहेना जे सतत इतरांचा विचार करत असते. मग त्याचा का नाही करणार..?

तो ड्रिपस्टोन कसा जगतो याबद्दल मला त्याचे प्रेम वाटते,यातून त्याचीही माझ्यासारखी सुटका करावीशी वाटते.या भव्य अश्या ग्लेशियर मध्ये तो ड्रिपस्टोन त्याचे ते रोज थोडे-थोडे मरणारे हृदय
मी पाहत असतो....

थेंब-थेंब करीत ते स्वत:ला संपवत असते अलवारपणे,अन् एकदाचं ते ड्रिपस्टोन तुटून खाली पडते अन... त्या खोल घळईत कायमचं अदृश्य होते काळाच्या आड होऊन जाते,त्याच स्फटीकपण कायमचं इथंच सोडवुन....

मग मी,माझं मन बसतो तिथं सुद्धा पुन्हा एक नवीन ड्रिपस्टोन तयार करण्यासाठी,आसवे गाळत सोडुन गेलेल्या त्या ड्रिपस्टोनच्या आठवणीत....


Written by,

Bharat Sonwane...


#ड्रिपस्टोन_ग्लेशियर_व_त्यांच_झालेलं_माझं_हळव_मन....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ