मुख्य सामग्रीवर वगळा

विचारांचे काहूर..!



तब्बल चार वर्षांपूर्वी पाठवलेला मॅसेज काही दिवसांपूर्वी seen झालेला होता,मॅसेज पाठवणं व मेसेज बघणं यातला वेळ बघितला तर खरच सांगु अलीकडे खूप गोष्टी बदलल्या आहे....

तेव्हा फक्त मर्यादित विचार होते,अलीकडच्या काळात त्यांना भविष्यातील स्वप्नांचे डोहाळे लागले आहे....

माझं अन् भविष्य...काय भविष्य आहे ?
सारा अंधारच तर दिसतो भिंतीवर तुझ्या.तू ना...हो मीच हरवला आहे चिंतेच्या काळोखात तुझ्या मनात मोजकेच विचार आहे फक्त....

करियर,लेखन,वाचन,कधीतरी मुड बदलेला असला की मग ती आठवते तुला,ऐकल होतं मन बोलतं ते खरे असते....
होनं तर ऐक मग,मी खरच बोलतो आहे या पलिकडे नाहीये ओळख तुला जगाची....

ती नाही आवरत तुला,मी तिला दिलेल्या बर्थडेच्या शुभेच्या तिने पाळल्या आहे.
यशाची उत्कर्षाची,शिखरे ती सर करत आहे,तुला कसला इतका आव तिने तुझा मॅसेज बघावा,इतकं होऊनही तिने तुझी विचारपूस करावी,तुझा Attitude इथेही आड यावा इतकेच सांगेल,सावर स्वत:ला मी मन आहे तुझं फक्त....

अरे हो खरे आहे,पण माणूस कसा असतो नाही का मॅसेज seen होऊनही बोलत नाही.
एकतर असे आहे की,सध्या मी विचारांमध्ये दिवसाची रात्र करतो,रात्रीचा दिवस करतो....
हो असंच जे तू ऐकलंय तेच ....

रात्र रात्र जेव्हा मोबाईल स्क्रीन फक्त स्क्रोल होत असते,माझ्यासारखे आयुष्यातून उजाड हरवलेले बरेच व्यक्त होतात इथं त्यांना वाचत बसतो,अंधारात मार्ग शोधत चाचपडत चालणारे सुद्धा इथे खूप आहे त्यांनाही भेटत असतो.कधीतरी तुझा seen झालेला मॅसेज बघून घेत,पुन्हा तुझी भिंत स्क्रोल करत असतो....

अलीकडे काल परवा डोक्यात येऊन गेलं होत की,ती स्लीपर नसते का दोन बेल्टची निळ्या कलरची ती घालून,मोकळी प्यांड घालून शहरात पायी चक्कर मारून यायचाय मध्यरात्री...

सोबतीला दोन-तीन पेपर पण ठेवायचे आहे, कालपरवा ज्या उड्डाणपुलावरून भविष्याचा वेध घेणारी स्वप्न बघत होतो,त्याला खोक पडली आहे. तीपण बघून घेऊ पुला खालून जाऊन,रात्री त्या रस्त्याला खेटून असलेल्या कोर्ट समोरील बाकावर पेपर अंथरूण  झोपून घ्यायचं मनात येऊन गेलं आहे ते ही मी करणार आहेच...

मध्यरात्रीच्या शहरात फिरतांना जे सूनपन मनावर स्वार होते ना तेच खरे सुख आहे,मग मलाच कधीतरी त्या ज्युलियस सीझर,अथ्थेलोच्या स्वतंत्रपणाच्या गोष्टी पटून येतात....

स्ट्रीट लाईटच्या खाली खायला शोधणार ते कुत्रे इथेच का शोधत असेल ? दूरवर कोणीतरी जागते रहो...! ची घोषाबाजीही करत आहे.
पण जगायला आम्ही झोपलोच कुठे आहे...

त्यालाही जाऊन सांगावंस वाटत आहे,या वेड्या मनाच्या दोन गोष्टी,फक्त माझ्या या स्लीपरने मला साथ द्यावी कारण ती पण मॅसेज सारखी seen झाली आहे काही दिवसांपूर्वी.... 


#मनात_चाललेलं_विचारांच_काहुर...


Written by,

Bharat Sonwane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...