मुख्य सामग्रीवर वगळा

विचारांचे काहूर..!



तब्बल चार वर्षांपूर्वी पाठवलेला मॅसेज काही दिवसांपूर्वी seen झालेला होता,मॅसेज पाठवणं व मेसेज बघणं यातला वेळ बघितला तर खरच सांगु अलीकडे खूप गोष्टी बदलल्या आहे....

तेव्हा फक्त मर्यादित विचार होते,अलीकडच्या काळात त्यांना भविष्यातील स्वप्नांचे डोहाळे लागले आहे....

माझं अन् भविष्य...काय भविष्य आहे ?
सारा अंधारच तर दिसतो भिंतीवर तुझ्या.तू ना...हो मीच हरवला आहे चिंतेच्या काळोखात तुझ्या मनात मोजकेच विचार आहे फक्त....

करियर,लेखन,वाचन,कधीतरी मुड बदलेला असला की मग ती आठवते तुला,ऐकल होतं मन बोलतं ते खरे असते....
होनं तर ऐक मग,मी खरच बोलतो आहे या पलिकडे नाहीये ओळख तुला जगाची....

ती नाही आवरत तुला,मी तिला दिलेल्या बर्थडेच्या शुभेच्या तिने पाळल्या आहे.
यशाची उत्कर्षाची,शिखरे ती सर करत आहे,तुला कसला इतका आव तिने तुझा मॅसेज बघावा,इतकं होऊनही तिने तुझी विचारपूस करावी,तुझा Attitude इथेही आड यावा इतकेच सांगेल,सावर स्वत:ला मी मन आहे तुझं फक्त....

अरे हो खरे आहे,पण माणूस कसा असतो नाही का मॅसेज seen होऊनही बोलत नाही.
एकतर असे आहे की,सध्या मी विचारांमध्ये दिवसाची रात्र करतो,रात्रीचा दिवस करतो....
हो असंच जे तू ऐकलंय तेच ....

रात्र रात्र जेव्हा मोबाईल स्क्रीन फक्त स्क्रोल होत असते,माझ्यासारखे आयुष्यातून उजाड हरवलेले बरेच व्यक्त होतात इथं त्यांना वाचत बसतो,अंधारात मार्ग शोधत चाचपडत चालणारे सुद्धा इथे खूप आहे त्यांनाही भेटत असतो.कधीतरी तुझा seen झालेला मॅसेज बघून घेत,पुन्हा तुझी भिंत स्क्रोल करत असतो....

अलीकडे काल परवा डोक्यात येऊन गेलं होत की,ती स्लीपर नसते का दोन बेल्टची निळ्या कलरची ती घालून,मोकळी प्यांड घालून शहरात पायी चक्कर मारून यायचाय मध्यरात्री...

सोबतीला दोन-तीन पेपर पण ठेवायचे आहे, कालपरवा ज्या उड्डाणपुलावरून भविष्याचा वेध घेणारी स्वप्न बघत होतो,त्याला खोक पडली आहे. तीपण बघून घेऊ पुला खालून जाऊन,रात्री त्या रस्त्याला खेटून असलेल्या कोर्ट समोरील बाकावर पेपर अंथरूण  झोपून घ्यायचं मनात येऊन गेलं आहे ते ही मी करणार आहेच...

मध्यरात्रीच्या शहरात फिरतांना जे सूनपन मनावर स्वार होते ना तेच खरे सुख आहे,मग मलाच कधीतरी त्या ज्युलियस सीझर,अथ्थेलोच्या स्वतंत्रपणाच्या गोष्टी पटून येतात....

स्ट्रीट लाईटच्या खाली खायला शोधणार ते कुत्रे इथेच का शोधत असेल ? दूरवर कोणीतरी जागते रहो...! ची घोषाबाजीही करत आहे.
पण जगायला आम्ही झोपलोच कुठे आहे...

त्यालाही जाऊन सांगावंस वाटत आहे,या वेड्या मनाच्या दोन गोष्टी,फक्त माझ्या या स्लीपरने मला साथ द्यावी कारण ती पण मॅसेज सारखी seen झाली आहे काही दिवसांपूर्वी.... 


#मनात_चाललेलं_विचारांच_काहुर...


Written by,

Bharat Sonwane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ