मुख्य सामग्रीवर वगळा

अव्यक्त दोघंही क्षणांचा शेवट....

आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत असताना जेव्हा समोरच्या व्यक्तीवर प्रेम होते,ते व्यक्त करायची वेळ येतेना करून टाकावं ते व्यक्त...‌.

आता हे काय नवीन तुझं.... तुझे काहीतरी वेगळंच चालू असत तिनं संवाद चालू असतांना मला हाताने खुणावले....

पण हो आयुष्यभर एखाद्या व्यक्तीशी अव्यक्त नाते निभावत राहणे हवे तितके सोपे नसते,मग असं शेवटच्या क्षणाला व्यक्त होऊन जायचं...

दोघांपैकी कोणीतरी एक काहीतरी या सुखात तरी सोडून जाईल की,आपल्यावरही कुणीतरी होते जे आपला विचार आपल्यापेक्षा जास्तच करायचं....

तू वेडा आहेस का रे ? शब्दांच्या दुनियेत काय चार शब्दांची ओळख झाली म्हणून काही वेड्यागत बोलत असतोस...वेळ काय...?
बोलतो काय...?
अन् हो हे शब्दचांदणे बोलण्यासाठीच छान वाटतात डिअर.... निभावणे खूप कठीण असते हेअव्यक्त राहुण हे नाते जपणे...

असं काही नाहीये हा मी नाही का निभावत आहे.... म्हणजे मला समजले नाही.... काही नाही अन् तू समजुन पण घेऊ नकोस,
कारण मी फक्त शब्द चांदण्यामध्ये विहार करत असतो,खुल्या आकाशात मुक्त विहार करायला. मला नाही जमत सोबत व्यावहारिक गणितं अन् त्यामध्ये जगायला ही नाही जमत.

माझं आयुष्य सोहळा आहे हे खरे आहे,पण त्याला पांथस्थ म्हणून जगायचं मी नेहमीसाठी ठरवलं आहे....
काहीतरी जगायचं वेगळं म्हणुन हे अव्यक्तपण घेऊन मिरवत असतो मी स्वताला आनंदी भासत या जगात,खोट्या चेहऱ्याची साथ असते नेहमीच यात....
पण त्या खोट्या चेहर्यामागची अस्वस्थता अन् न उमगलेले अनुत्तरित प्रश्न तुला माहीत आहे,त्याची उत्तरेही तू देत असतेस....

तसं काही नाही रे पण तू हे शब्दात हरतो अन् शब्दांचा होऊन जातोस ते मला भावतं,मग नकळत मी लट्टू होत जाते तुझ्यावर...
पण हे बाकी काही अर्थात प्रेम अन्....

बस्स स्टॉप please.... यापुढे एकही शब्द नकोय मला तुझा,इथवरच बोलायचं तू फक्त कारण पुढे बोलणे खूप काही महत्त्वाचे आहे.कधीतरी तो टर्निंग पॉईंट असेल,नाहीतर शेवट असेल आयुष्याचा....

म्हणून या क्षणांना आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत असतांना,शिफा भरवत असतांना थिजलेल्या डोळ्यात सांगायचे आहे.कींवा थिजलेल्या डोळ्यांना सोबत घेऊन सांगायचे आहे....पण सांगायचे आहे.....

हा विषय थांबवणार अशील तर बोल...
इथे भावनांच्या गुंत्यात माझा तोल गेला तर तुला सावरायला नाही जमायचं सांगते आहे हं....कारण तुझं ते अव्यक्त आहे.पण मला नाही जमत फार काळ अव्यक्त रहायला....

जी हुकुम सुनों भी अभीं.... "हमने सूना था कोई तो हैं इंन्सान,जो कब्र पे जाकर "प्यार" का इजहार कर बैठे.... हम तो सिर्फ आपको मृत़शया पर बता देंगे जो जिंन्दगी में पहले जायेंगा...."

#अव्यक्त_दोघंही_क्षणांचा_शेवट...

Written by,
Bharat Sonwane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...