मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वाभळेवाडीचा तलाठी अण्णा..! भाग -४

वाभळेवाडीचा तलाठी अण्णा..! भाग -४ पहाटेच्या चारला रानातली लाईन येणार अन् रानात गव्हाला पाणी भरायला म्हणून गावातील लोकं उठून रानाच्या दिशेनं आपलं आवरून सावरून निघाली होती. गावाच्या जवळ असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणारे गावची तरुण पोरंही सहा वाजता गावच्या फाट्यावर येणारी बस अन् तिचा अंदाज घेत गावच्या सडकीनं निघाली होती. गावातली काही शेतकरी पहाटेच वावरातला अख्खर साफ करायला, दूध काढायला म्हणून जातांना सडकीने दिसत होती. कोंबड्याच्या बांगेसरशी सूर्योदय झाला अन् तांबडा पिवळसर सूर्याचा कोवळा प्रकाश साऱ्या पंचक्रोशीवर आला तसे गावाला सोनेरी लकेरीत मडवावे तसं गाव चमचम करू लागले होते. गावातली लगबग सुरू झाली तसं, गावातली म्हातारी माणसं आपलं सकाळचे अंघोळपाणी करून सावता माळ्याच्या देवळात दर्शन करायला म्हणून देवळाकडे निघाले होते. रामा कुंडूरसुद्धा कोंबड्याच्या बांगेसरशी उठला शिवनामायच्या पात्रात जाऊन अंघोळ करून देवपूजा करून तो लक्षी आईच्या पिंपळ पारावर येऊन बसला संतू अण्णा तलाठी अजून झोपलेले पाहून त्यांना उठवत रामा कुंडूर लक्षी आईच्या पिंपळ पार झाडून घेऊ लागला.  पस्तीशीत असलेला रामा

कंत्राटी कामगारांचं ओसाड वर्तमान ..!

कंत्राटी कामगारांचं ओसाड वर्तमान ..! भर दुपारची वेळ भर उन्हात दीड वाजता सेकंड शिफ्टसाठी जाण्याची तयारी करतोय. इतक्या कडक उन्हात पातळ, पतली भाजी खायला नको वाटते अन् कोरडी भाजी असली की जसं जोमाने दीड-दोन पोळ्या नरड्याच्या आत कोंबल्या जातात तसे काही करून जेवण आवरते घेऊन, मळकटलेल्या चादरीच्या कॉटवर पडून राहीलो आहे. कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांच्या आयुष्याचं गणित खूप सोप्पं असतं. कारण त्यांच्या आयुष्यात फार काही बदल होत नसतात. घड्याळीच्या काट्यावर फर्स्ट, सेकंड, थर्ड करत त्यांचं आयुष्य चालू असतं. सगळं व्यवस्थित चालू असलं की कसं बाईचं पाळी चक्र दर महिन्याला फिरत राहते अन् काही घडवून यायचं, आणायचं असलं की नऊ महिने नऊ दिवस एक जीव पोटात वाढवला जातो. तसंच काहीसं सगळं जुळून आलं की नऊ महिने कंत्राटी पद्धतीने ही कामगार माणसं एका कंपनीत काम करत राहतात. मग जसं बाई मोकळी होते, तसं पुन्हा मोकळं व्हायचं. दोन महिने परत याच्या खाली त्याच्या खाली करत काम मिळवायचं. दोन महिने झाले की पुन्हा नऊ महिने, सहा महिने हे चक्र चालू असतं. जोवर हातपाय काम करत असतात किंवा तसं सुपरवायझरला वाटत असतं

कंत्राटी कामगारांचा आयुष्य संघर्ष ..!

कंत्राटी कामगारांचा आयुष्य संघर्ष..! आजची सुट्टी होती, कालची थर्ड शिफ्ट करून आल्यामुळे आजचा अर्धा अधिक दिवस झोपेतच निघून गेला. दुपारची उन्हं खिडकीच्या तावदनातून आत डोळ्यावर आली तसं; झोप उघडली अन् मी अंथरुणावर उठून बसलो.  फ्लॅटमध्ये पाच कंपनीत कंत्राटी पद्धतीने काम करणारे आम्ही कामगार मित्र असल्यानं, आठवडाभर एका फ्लॅटमध्ये असूनही एकमेकांना भेटायला वेळ नसते. आज तिघे लोळत पडलो होतो अन् दोघे पहाटेच उठून टपरीवर चहा सिगरेट प्यायला म्हणून निघून गेली होती. कॉटवर पडल्या पडल्या मी शरीराला आळोखे-पिळोखे देत लोळत पडलो होतो, आज सगळेच रूमवर असल्यानं रूममध्ये दीड किलोचे पाच सेफ्टी शूजचे जोड होते. त्याचे आठवडाभर उन्हाळ्यात पायाला घाम येतो म्हणून साचलेले दहा सोक्सचे जोड मी झोपलो त्याच्या बाजूलाच पडले होते. वाऱ्याच्या झुळकेसरशी तो सोक्सचा आंबट वास माझ्यापर्यंत आला अन् मी ताडकन उठून माझ्या फ्लॅट पार्टनरच्या आई बहिणींचा उद्दार केला. भेंचोद आजची पहाट किरकिरीने सुरू झाली होती. उठलो तसा सॉक्स निरम्यात भीजू घातले अन् मी अंघोळीला निघून गेलो. पाच रुपयांची गरम पाण्याची बकेट परवडत नाही म्हणून हटकून जरा

दरवळ..!

दरवळ..! हल्ली रोजची सायंकाळ अन् कधी मनाला वाटलं तर भर दुपारही अश्या धावण्याने होत आहे. का धावतो ? कश्यासाठी ? धावून काय भेटते ? या प्रश्नांना उत्तरं नाहीये. पण; एकदा धावायला लागलो की आठ-दहा किमी फक्त धावतच राहतो. हल्ली धावण्यात एक अनामिक सूख वाटायला लागलं आहे, धावणे माझ्यासाठी एक व्यसन झालं आहे. जेव्हा मनाचा आदेश येतो की आता धावायचं चल तेव्हा मी धावायला सुरुवात करतो. अन् ; जोवर मनाला वाटत नाही की, आता थांबायला हवं तोपर्यंत मी धावतच राहतो. धावण्यासाठी काही ठराविक मार्ग करून घेतले आहे. मग वेळेनुसार तर कधी मनाला योग्य वाटेल त्या मार्गानं धावतो.  काल असच पाच वाजता धावायला सुरुवात केली. गौताळा अभयारण्याचा परिसर मी राहतो त्या शहराला लागून असल्यानं नेहमी या अभयारण्याच्या हद्दीत मी धावत असतो. कधीतरी डोंगरदऱ्या असलेल्या रस्त्याला तर कधी अभयारण्याच्या आतून जाणाऱ्या डांबरी रस्त्याला. काल पहिला साडेचार किमीचा टप्पा पार झाला अन्  अभयारण्याच्या गेटवर थांबलो. कितीही धावलो किंवा नाही धावलो तरी इथे मी नकळत थांबून घेतो. कारण इथे मला माझ्या भविष्यातील हालचाली खुणावतात, सगळं सोयीस्कर झालं तर म

पदव्युत्तर शिक्षणासाठी तरुणांचा ओघ व्यवसाय प्रशासन, व्यवस्थापन (M.B.A) या शाखेशाखेकडे ..!

पदव्युत्तर शिक्षणासाठी तरुणांचा ओघ व्यवसाय प्रशासन, व्यवस्थापन (M.B.A) या शाखेकडे..! २०२० नंतर सुरू झालेल्या दशकात शिक्षण क्षेत्राचा विचार केला असता बहुतेक पदवी प्राप्त तरुणांचा कल किंवा पदव्युत्तर शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात तरुणांची पसंती ही व्यवसाय प्रशासन, व्यवस्थापन (एम.बी.ए) या शाखेला मिळताना दिसत आहे. बहुतेक तरुण आपल्या आवडत्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी व्यवस्थापन शाखेत आपल्याला योग्य तो अभ्यासक्रम घेऊन आपल्या भविष्यासाठी बघितलेली स्वप्ने, करिअर दृष्टिकोनातून लवकर यशस्वी, सेटल्ड होण्यासाठी तरुण पिढी इकडे वळतांना दिसत आहेत. तरुण या शिक्षणाकडे वळण्यासाठी अनेक कारणे आहेत. जसे की, पदवीपर्यंत शिक्षण घेतलं की अनेक तरुणांना आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे. कुणाला आपल्या आवडीनुसार प्रायव्हेट क्षेत्रात आपलं नशीब आजमावायचे आहे. ज्यामध्ये मोठ मोठाल्या कंपन्यांसाठी, फर्मसाठी त्या तरुणांना नोकरीत स्थिर व्हायचं आहे. आजच्या काळात सर्वांना उच्चस्तरीय कंपन्यामध्ये म्हणजेच मल्टिनॅशनल कंपनी देशांतर्गत कंपनीमध्ये एमबीए प्रोफेशनल ची खूप मागणी आहे. एमबीए शाखेचे पदव्युत्तर शिक्षण घे

प्रवासवर्णने आयुष्यातून सुटलेल्या क्षणांची..!

प्रवासवर्णने आयुष्यातून सुटलेल्या क्षणांची..! रात्रीच्या साडे दहाच्या परतीच्या ट्रेनमध्ये बसलो. ट्रेन पुणे स्टेशनवर आली तस्सं ट्रेनच्या दिशेनं ट्रेनची वाट बघणारे सर्व प्रवासी ट्रेनमध्ये एक एक बोगी करून आत घुसू लागले. हळू हळू सर्व ट्रेन फुल झाली अन् माझी स्लीपरची तिकीट असूनही मला नाईलाजास्तव जनरलच्या डब्ब्यात बसावं लागलं. पर्यायही नव्हता, रात्रभर येणारी दुसरी ट्रेनही नव्हती. मनाची समजूत घातली अन् आज जनरल डब्ब्याचा प्रवास अनुभवू म्हणून मी ही मग जनरल डब्ब्यात घुसलो. डब्ब्यात घुसलो तसे युपी बिहारचे काही माणसं बाथरूमच्या दाराजवळ बसून प्रवास करत होते. आत पूर्ण डब्बा प्रवाश्यानी भरलेला असल्यानं मध्येही जागा नव्हती.  युपी बिहारच्या त्या सात-आठ मित्रांशी गप्पा करत मी उभाच प्रवास करू लागलो, तेही अडचणीत दाटीवाटी करून बसलेले होते. थंडी, वाऱ्यापासून अडोसा असं काहीही नव्हतं अन् अश्या वातावरणात ते मागील सहा तासांपासून प्रवास करत होते. त्या एकमेव जनरल डब्ब्यात एकमेव बाथरूम असल्यानं बाथरूमला येणारी जाणारी स्त्री पुरुष सर्व तिथून जात. त्या बाथरूमच्या ओल्या चपला त्यांना ओलांडून पुन्हा डब्यात

पुस्तक: बारबाला. लेखिका वैशाली हळदणकर.

पुस्तक:बारबाला. लेखिका: वैशाली हळदणकर. 

गॉईंग ग्लोकल..! लेखक: दत्ता जोशी.

गॉईंग ग्लोकल..! लेखक: दत्ता जोशी. "लोकल" उद्यमींच्या "ग्लोबल" गुणवत्तेच्या यशोकथा सांगणारं हे पुस्तक. साधारण दोन महिन्यांपूर्वी पुस्तकाचे लेखक व मुक्त पत्रकार श्री. दत्त जोशी सर यांच्याकडून छ.संभाजी नगर येथे त्यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीत भेट मिळाले. या पुस्तकाबद्दल लिहण्यापूर्वी सरांशी झालेली ओळख कशी झाली हे सांगायला आवडेल. दोन-अडीच महिन्यांपूर्वी सर आमच्या कन्नड येथील व मराठवाड्यातील सर्वाधिक मोठ्या वाचनालयात म्हणजेच " विकास महर्षी बाळासाहेब पवार वाचनालय,कन्नड " येथे व्याख्यानास आले होते. तरुण युवक, युवतींसाठी हे व्याख्यान खूप महत्वपूर्ण होते. नव्यानं उभारणारे उद्योग, त्या उद्योग उभारणीसाठी येणाऱ्या असंख्य अडचणी अन् या सगळ्या गोष्टींना तोंड देऊन शून्यातून आपलं विश्व निर्माण करत कित्येकांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या उद्योजकाचा हा सर्व प्रवास. आजची तरुण पिढी उद्योगधंदा, नोकरी या गोष्टींकडे कोणत्या नजरेतून बघते, त्यांचे मते काय. अश्या अनेक विषयांवर हे व्याख्यान होतं. व्याख्यानाचा हा सर्व विषय माझा आवडतीचा अन् जवळचा असल्यानं व औद्योगिक वस

पोटाला पडणारा पीळ..!

पोटाला पडणारा पीळ..! हल्ली मनात असंख्य गोष्टींचा माजलेला कोलाहाल बघितला की, अस्वस्थ व्हायला होतं. मग नकळत कधीतरी वाटतं की माणसांच्या सहवासातून मुक्त होऊन, आपण आपल्याला पूर्णपणे निसर्गाच्या सान्निध्यात स्वतःला स्वाधीन करून द्यावं,झोकून द्यावं. कारण आजवर निसर्गानं तगतं ठेवलं, जीवंत ठेवलं आहे. अन् त्याच्या सान्निध्यात असलं की मला माणसांचा सहवास नकोसा वाटतो. कालची सायंकाळ क्लास सुटला अन् हॉस्टेलच्या दिशेनं निघालो. हल्ली एकटाच असतो, त्यामुळं स्वतःच्या विचारांशी प्रामाणिक राहता येऊ लागलं आहे. मनाचं मालक असावं तसं जगता येतय. मनाचा मालक म्हणजे मला नेहमीच निसर्गाच्या सान्निध्यात एकाकी राहून, एकाकी निसर्ग अनुभवण्यास जवळचं वाटत आलं आहे. जे नॉर्मल माणसांना रुचणारं नाहीये. मग अश्यावेळी कुणी सोबत असलं की, माझं आयुष्य जगण्याचं मी आखलेले गणित चुकायला लागतं. त्यामुळं असं एकटं एकटं राहणं पसंद करतो. निसर्ग असला की फारसं कुणी जवळ करायला आवडत नाही मला. अनेक मित्रांनी हे हेरलं आहे. त्यामुळं ते ही जाणूनबुजून दूरच राहता. कारण या जगण्यात या कैफात सुख आहे, याची अनुभूती त्यांना कित्येकदा माझ्या समवेत

उसवत्या सांजवेळी भेटलेला "बाप"

उसवत्या सांजवेळी भेटलेला "बाप" काही व्यक्तींशी आपले जन्मोजन्मीचे नाते जोडलेले असावे असं काहीसं असावं म्हणून मला हे पेंटींग बघितलं की मला माझा बाप आठवून जातो. बाप वारला तेव्हा त्याच्या दहाव्याला अन् पुढे त्याचा एक फोटो घरात असावा म्हणून एक फोटो फ्रेम करून घ्यावा म्हणून बापाचा घरात फोटो सापडू लागलो. एरव्ही बापाला फोटो काढायची भयंकर हौस पण तो वारल्यावर त्याचा एकही फोटो घरात नव्हता. अखेर बापाच्या टू-व्हीलरच्या लायसनवर असलेला फोटो कसातरी मोठा करून त्याची एक फ्रेम करून घेतली. सर्व विधी पार पडले अन् तो फोटो घरात एकाकी पडून राहीला. कारणे दोन होती त्या फोटोत असणारा बाप मला कधी रुचला नाही. कारण शेवटच्या घटका मोजताना आजारपणामुळे तो शरीरातून पार खंगून गेला होता त्यामुळं त्याचा तो ताजातवान फोटो मला किंवा घरातल्या कुणालाही कधी बापाचा असेल वाटला नाही. कारण आमच्या लक्षात तोच बाप राहिला जो शेवटच्या घटका मोजतांना आम्ही बघितला होता. खूप त्रास होत असतांना माझ्यानंतर मुलांचं काय अन् या विचारांनी कळवळणारा बाप जेव्हा आठवतो, तेव्हा फोटोतील बाप आपला नाहीच असं वाटून जातं. असो तर काही दिवसा

रेड लाईट डायरीज..!खुलूस..!

रेड लाईट डायरीज..! खुलूस..! लेखक "समीर गायकवाड" (बापू) यांचे "खुलूस" काल सायंकाळी हाती पडले अन् रात्री अकरा वाचता खुलूससोबत वाचनाचा सुरू झालेला प्रवास अखेर रात्री तीन वाजता संपला.  "खुलूस" वाचून झालं तेव्हा झालेली अवस्था शब्दात व्यक्त करू शकणार नाही अशी झाली होती. लहानपणापासून परिस्थितीची झळ बसलेल्या माझ्यासारख्यांना "खुलूस" जवळची वाटते. सोबत तितकीच ती सांभाळून घेते, त्यामुळं हे सगळं जग थोड्याफार फरकाने ओळखीचं होतं. काही दिवसांपूर्वी "वैशाली हळदणकर" यांचे "बारबाला" हे पुस्तक वाचून संपवलं. तेव्हाही अशीच काही अवस्था झाली होती. बारबालामधील वैशालीचं आयुष्य काही वेगळं नाही, तिच्या आयुष्यातील संघर्ष तसाच आणि तितकाच वाईट्ट आहे, जितका खुलूसमधील प्रत्येक माझ्या त्या बहिणीचा आहे. फरक इतकाच की आजही आयुष्याच्या या वळणावर वैशाली मला भेटत असते, तिच्याशी महीन-पंधरा दिवस झाले की बोलणं होतं. खंत एकच वाटते की, तिला अजून न्याय मिळाला नाहीये. अजूनही ती जगण्यासाठीचा संघर्ष करतेय. बारबालामधील वैशाली असो किंवा रेड लाईट एरियातील हिराबाई,