मुख्य सामग्रीवर वगळा

कंत्राटी कामगारांचा आयुष्य संघर्ष ..!

कंत्राटी कामगारांचा आयुष्य संघर्ष..!

आजची सुट्टी होती, कालची थर्ड शिफ्ट करून आल्यामुळे आजचा अर्धा अधिक दिवस झोपेतच निघून गेला. दुपारची उन्हं खिडकीच्या तावदनातून आत डोळ्यावर आली तसं; झोप उघडली अन् मी अंथरुणावर उठून बसलो. 

फ्लॅटमध्ये पाच कंपनीत कंत्राटी पद्धतीने काम करणारे आम्ही कामगार मित्र असल्यानं, आठवडाभर एका फ्लॅटमध्ये असूनही एकमेकांना भेटायला वेळ नसते. आज तिघे लोळत पडलो होतो अन् दोघे पहाटेच उठून टपरीवर चहा सिगरेट प्यायला म्हणून निघून गेली होती.

कॉटवर पडल्या पडल्या मी शरीराला आळोखे-पिळोखे देत लोळत पडलो होतो, आज सगळेच रूमवर असल्यानं रूममध्ये दीड किलोचे पाच सेफ्टी शूजचे जोड होते. त्याचे आठवडाभर उन्हाळ्यात पायाला घाम येतो म्हणून साचलेले दहा सोक्सचे जोड मी झोपलो त्याच्या बाजूलाच पडले होते.

वाऱ्याच्या झुळकेसरशी तो सोक्सचा आंबट वास माझ्यापर्यंत आला अन् मी ताडकन उठून माझ्या फ्लॅट पार्टनरच्या आई बहिणींचा उद्दार केला. भेंचोद आजची पहाट किरकिरीने सुरू झाली होती.

उठलो तसा सॉक्स निरम्यात भीजू घातले अन् मी अंघोळीला निघून गेलो. पाच रुपयांची गरम पाण्याची बकेट परवडत नाही म्हणून हटकून जरा लेटच उठलो होतो. उन्हामुळे टाकीतले पाणी चांगलेच तापले होते, दोन बादल्या पाणी घेऊन घंटाभर अंघोळ केली. मस्त फ्रेश होऊन मित्राला घेऊन भटकायला म्हणून बाहेर पडलो.

सोबतीने कंपनीत कंत्राटी पद्धतीने काम करणारे काही मित्र कामगार चौकात भेटली. दहात पंधरा कटिंग चहा झाल्या. सिगरेट घेत नाही म्हणून त्याचा हिशोब नव्हता, दोघात एक पार्ले घेऊन चहा सोबत खात बसलो. सिगरेट घेत नाही म्हणून एक फायदा होतो, आमचे बील कधीतरी ही चैन करणारी पोरच भरून देतात. 

सहा घोटांचा चहा अर्धा घंटा कपात हलवून हलवून नरड्याच्या खाली ओतल्यावर जरासं बरं वाटलं. मुलांच्या कंपनीतल्या गप्पा चालू होत्या, कुणाच्या खूपच सिक्रेट अश्या असाव्या अश्या एका वेगळ्या ग्रुपमध्ये गप्पा चालू होत्या.

काही कॉलेजमधल्या टवाळक्या मारणाऱ्या पोरांचा ग्रुप आला. बापाच्या पैशावर मजा करणारी ही पोरं रोजच इथे पडीक असल्यानं चांगलीच ओळखीची झाली आहे. गौतमी पाटीलच्या कालच्या व्हायरल व्हिडिओच्या गप्पा रंगल्या होत्या त्यांच्या.

मला काही या फालतू गोष्टीत रस नसल्यानं मित्रांना "जय शरनाथ" करून आम्ही दोघे मित्र पैठण गेटचा चोर बाजार भटकून आलो. पन्नास रुपयाचे दोन-चार टी-शर्ट, पन्नास रुपयाच्या पाच सिल्पर अन् भंगाराच्या भावात भेटलेले एक कुलूप फ्लॅटला लावायला म्हणून घेऊन आलो. 

रद्दीच्या भावात दोन-चार कुठलेसे पुस्तकं ऐंशी रुपयाची चार घेऊन आलो. मुखपृष्ठ छान वाटलं अन् पसंत केलं इतकंच, पुस्तकांशी कुठं आपल्याला लग्न करायचं होतं. त्यांचं त्याच गोष्टीसारखं होतं एकदा वाचलं की अडगळीत पडलेलं राहतं कुठेतरी.

पण; अलीकडे त्यांच्यासाठी चोर बाजारात भंगाराच्या दुकानात एक रॅक सांगून ठेवलं आहे. स्वस्तात पन्नास शंभर रुपयांत बसलं तर घेऊन येईल फ्लॅटवर. पण; रात्रीचं चोरासारखं आणावा लागल फ्लॅट मालक लई बारबाप्या आहे, चोर बाजारातील वस्तू आणायला नाही म्हणतो.
आम्हाला कुठं परवडणार आहे मार्केटमधल्या महागाच्या वस्तू,मग आणत असतो.

खरेदी झाली, तिघात दोन भेळ खाल्या, तिघात दोन समोसा रगडा, तीन पाणीपुरी खाऊन आम्ही काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेऊन मेसवर गेलो. भूक नसल्यानं एकच डब्बा घेतला अन् रूमवर येऊन खाऊन घेतला. मित्राने सकाळी शिव्या ऐकल्या अन् त्यान रूम झाडून स्वच्छ करून सॉक्स धुऊन दोरीवर वाळत घालून दिले होते.

पुन्हा कामगार चौकात चक्कर मारून आलो. चणे फुटाणे, खारे शेंगदाणे खात गप्पा झोडीत बसलो. मगाशी येऊन सकाळी आणलेल्या पुस्तकांना न्याहाळत एक पुस्तक संपते त्या बाजूने उलटे वाचायला सुरू केलं. दोघे मित्र गर्लफ्रेंडशी गप्पा मारताय कॉलवर, एक घरच्यांशी बोलतोय, एक अभ्यास करतोय अन् एक झोपून गेला.
मी ही डोळे लागायला लागले तसं पुस्तक बाजूला ठेऊन कॉफी घेत हे टाईप करत बसलो आहे..!

क्रमशः
Written by,
Bharat Sonawane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड