मुख्य सामग्रीवर वगळा

पोटाला पडणारा पीळ..!

पोटाला पडणारा पीळ..!

हल्ली मनात असंख्य गोष्टींचा माजलेला कोलाहाल बघितला की, अस्वस्थ व्हायला होतं. मग नकळत कधीतरी वाटतं की माणसांच्या सहवासातून मुक्त होऊन, आपण आपल्याला पूर्णपणे निसर्गाच्या सान्निध्यात स्वतःला स्वाधीन करून द्यावं,झोकून द्यावं.

कारण आजवर निसर्गानं तगतं ठेवलं, जीवंत ठेवलं आहे. अन् त्याच्या सान्निध्यात असलं की मला माणसांचा सहवास नकोसा वाटतो.

कालची सायंकाळ क्लास सुटला अन् हॉस्टेलच्या दिशेनं निघालो. हल्ली एकटाच असतो, त्यामुळं स्वतःच्या विचारांशी प्रामाणिक राहता येऊ लागलं आहे. मनाचं मालक असावं तसं जगता येतय.

मनाचा मालक म्हणजे मला नेहमीच निसर्गाच्या सान्निध्यात एकाकी राहून, एकाकी निसर्ग अनुभवण्यास जवळचं वाटत आलं आहे. जे नॉर्मल माणसांना रुचणारं नाहीये. मग अश्यावेळी कुणी सोबत असलं की, माझं आयुष्य जगण्याचं मी आखलेले गणित चुकायला लागतं. त्यामुळं असं एकटं एकटं राहणं पसंद करतो.

निसर्ग असला की फारसं कुणी जवळ करायला आवडत नाही मला. अनेक मित्रांनी हे हेरलं आहे. त्यामुळं ते ही जाणूनबुजून दूरच राहता. कारण या जगण्यात या कैफात सुख आहे, याची अनुभूती त्यांना कित्येकदा माझ्या समवेत आली. पण; त्यांचं मन इथ फार रमलं नाही. त्यांना व्यवहारीक जग, माणसांचं पशू होऊन जगणं जवळचं वाटलं.
मग त्यांनी माझ्या या वाटेवर चालणं सोडून दिलं, जे योग्य झालं. कारण तारेवरची कसरत करणं तसं जगणं सहज, सोप्पं नाही.

सायंकाळी क्लास सुटला आभाळ गरजू लागलं, अंधारून आलं. या गरजत्या आभाळाखाली असलेल्या एका बोडख्या बाभळीखाली असलेल्या एका बँचवर किती वेळ बसून राहिलो भरकटत जाणाऱ्या ढगांकडे बघत.

माणसं निवाऱ्याला निघून गेली होती अन् आता तो बरसण्यास उत्सुक होता. सभोवताली असलेली तीन कुत्रे गरजत्या आभाळाखाली खेळत होती. त्यांनी माणसांसारखं जगणं स्वीकारलं असावं कारण त्यांच्या जगण्यात कुठं पशू होऊन जगण्याचा लवलेश दिसला नाही.

दूरवर पाऊस बरसू लागला, जसा तो जवळ येऊ लागला तसा मी माणसात आलो. ते तीन कुत्रे आसऱ्याला म्हणून एका कंपाऊंडमध्ये शिरली. मी एका अंधाऱ्या गल्लीत खूप आतवर गेलो. 
इंग्रजांच्या काळातील एक जुनाट, काळवंडलेलं हॉटेल दिसलं इथे येणं नेहमी होतं.

पण इथे आलं की मी भूतकाळाचा होतो म्हणून वर्तमानात या हॉटेलचं फारसं लक्ष नसतं. हॉटेलमध्ये आलो बॅसीनमध्ये आरशात बघत हात धुतले. रापलेल्या चेहऱ्याचा एक इसम बिडी फुंकत माझ्या जवळून निघून गेला.
डोक्यात गेला पण विचार केला त्याचीही जगण्याची स्वतंत्र रीत असावी म्हणून हसून जाऊ दिलं. क्षणीक वेळात हा विचार मनात येऊन जाणं म्हणजे मी अजून माणसात आहे याची मलाच पोचपावती मिळाली असं काहीसं होतं. अधूनमधून हे होतं जे आनंद देणारं आहे.

काळोखात टेबल सापडत एका खुर्चीवर विसावलो. लाकडी खुर्ची, तीन गिल्लास, एक मोठा पाच गल्लास भरेल एव्हढा जग अन् समोर लंडन मधल्या कुठल्या ब्रीजचे पोस्टर चीपकवलेले होते. ते बघून मी त्यात माणसं न्याहाळू लागलो.

पुन्हा एक इसम आला माझी दीड कप चहा अन् तीन बनमस्का पावची ऑर्डर घेऊन गेला. चहा उंचावत कपात वरून टाकली अन् माझ्यासमोर आदळून पाव ठेऊन पुढे असलेल्यांना दोन भज्याच्या प्लेट ठेऊन निघून गेला.

अंधारात काय खात असतील हा प्रश्न पडला पण; नंतर कळलं की औद्योगिक वसाहतीमध्ये एका मोठ्या कंपनीत काम करणारी कंत्राटी कर्मचारी इथे कंपनीचं जेवण पैश्यात परवडत नाही म्हणून इथल्या नाशत्यावर भागवता. पोटाला पिळ देऊन आठ तास काम केलं  की साडे-तीनशे रुपये रोज येतो असं भजे खाणाऱ्या इसमाकडून कळलं. 

मी चहात पाव बुडून आजचा दिवस उद्यावर ढकलत होतो. तितक्यात पाऊस गरजू लागला, पडू लागला. मी लंडनमधील तो ब्रीज बघत उद्याचं वर्तमान नसलेलं स्वप्न बघत चहा पाव माझ्या आत रिचवत राहीलो.

Written by
Bharat Sonawane

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड