मुख्य सामग्रीवर वगळा

रेड लाईट डायरीज..!खुलूस..!

रेड लाईट डायरीज..!
खुलूस..!

लेखक "समीर गायकवाड" (बापू) यांचे "खुलूस" काल सायंकाळी हाती पडले अन् रात्री अकरा वाचता खुलूससोबत वाचनाचा सुरू झालेला प्रवास अखेर रात्री तीन वाजता संपला. 

"खुलूस" वाचून झालं तेव्हा झालेली अवस्था शब्दात व्यक्त करू शकणार नाही अशी झाली होती. लहानपणापासून परिस्थितीची झळ बसलेल्या माझ्यासारख्यांना "खुलूस" जवळची वाटते. सोबत तितकीच ती सांभाळून घेते, त्यामुळं हे सगळं जग थोड्याफार फरकाने ओळखीचं होतं.

काही दिवसांपूर्वी "वैशाली हळदणकर" यांचे "बारबाला" हे पुस्तक वाचून संपवलं. तेव्हाही अशीच काही अवस्था झाली होती.
बारबालामधील वैशालीचं आयुष्य काही वेगळं नाही, तिच्या आयुष्यातील संघर्ष तसाच आणि तितकाच वाईट्ट आहे, जितका खुलूसमधील प्रत्येक माझ्या त्या बहिणीचा आहे.
फरक इतकाच की आजही आयुष्याच्या या वळणावर वैशाली मला भेटत असते, तिच्याशी महीन-पंधरा दिवस झाले की बोलणं होतं. खंत एकच वाटते की, तिला अजून न्याय मिळाला नाहीये. अजूनही ती जगण्यासाठीचा संघर्ष करतेय.

बारबालामधील वैशाली असो किंवा रेड लाईट एरियातील हिराबाई, अमिना, जस्मिन यांच्या जगण्याच्या व्यथा काही किंवा त्यांच्या जगण्यातील संघर्ष काही वेगळा नाही.
याहीपुढे याचं आधुनिकीकरण होऊन सुरू झालेला व्यवसाय म्हणजे "एस्कॉर्ट सर्व्हीस" हे विश्व काही वेगळं नाही. फक्त इथे सगळं कसं चकचकीत अन् पॉलिश भासावं असं काही असतं.

गेले काही वर्ष "एस्कॉर्ट" अन् त्यांचं विश्व यावर लिखाणाचा विचार करतोय. त्या दिशेनं कधीच प्रयत्न सुरू झाले. कित्येकीं/कांच्या गुपित भेटी झाल्या. हे रंगीबेरंगी विश्व, रोजची होणारी लाखो, करोडोंची उलाढाल, ऑनलाईन माध्यमातून होणारी ओळख.
हे सगळं खूप म्हणजे ओशिएनमध्ये खूप डीपपर्यंत जाऊन उजेड शोधण्यासारखे आहे.

तूर्त इतकंच..!

हा सगळा संघर्ष अन् या व्यक्तींनी जे काही सोसलं आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी "खुलूस" वाचायला हवं. कारण हा प्रवास लिखाणात कैद होण्यासाठी कित्येक वर्ष समीर गायकवाड (बापू) यांनी हे जग समजून, जाणून घेतलं. अन्; पुढं आपलं उभं आयुष्य या व्यवसायात आलेल्या किंवा बळजबरी आणलेल्या व्यक्तींच्या आयुष्यातील जखमांवर फुंकर घालण्याचं काम लेखकांनी केलं आहे.
तेव्हा प्रत्येक त्या व्यक्तीनं "खुलूस" वाचायला हवं, ज्याच्या आत माणूसपणाची जाणीव जीवंत आहे.

रेडलाइट एरिया म्हटलं की अनेकांची नाकं मुरडत जातात...
कुलटा, कीटाळ, वेश्या, रंडी असे अनेक शब्द वापरून तिथल्या स्त्रियांना हिणवलं जातं.
पण व्यापकदृष्ट्या, समाजाच्या वासना शमवणाऱ्या या स्त्रियांच्या नशीबी काय येतं...
दुःख - दैन्य आणि नरकासम भोगवटा!

अशी अनेक आयुष्य जवळून बघितलेल्या समीर गायकवाड यांनी या स्त्रियांनाच या पुस्तकाच्या नायिका केलं आहे.
त्यांना या स्त्रियांची घुसमट,
त्यांच्या इच्छा - आकांक्षा,
त्यांची परिस्थिती - शरणता, हतबलता, त्यांचे हुंकार, त्यांच्या आर्त हाका, त्यांच्या भावभावना आणि त्यांची तगमग हे सारं या पुस्तकात संवेदनशीलरीत्या टिपलं आहे.
खुलूस म्हणजे निर्मळ सच्चेपण, आस्था आणि निष्ठा...
या स्त्रियांचं जगणं त्याच सच्चेपणाने
चितारणारं हे पुस्तक..!

रेड लाईट डायरीज..!
खुलूस..!

Written by,
Bharat Sonawane .

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...