मुख्य सामग्रीवर वगळा

रेड लाईट डायरीज..!खुलूस..!

रेड लाईट डायरीज..!
खुलूस..!

लेखक "समीर गायकवाड" (बापू) यांचे "खुलूस" काल सायंकाळी हाती पडले अन् रात्री अकरा वाचता खुलूससोबत वाचनाचा सुरू झालेला प्रवास अखेर रात्री तीन वाजता संपला. 

"खुलूस" वाचून झालं तेव्हा झालेली अवस्था शब्दात व्यक्त करू शकणार नाही अशी झाली होती. लहानपणापासून परिस्थितीची झळ बसलेल्या माझ्यासारख्यांना "खुलूस" जवळची वाटते. सोबत तितकीच ती सांभाळून घेते, त्यामुळं हे सगळं जग थोड्याफार फरकाने ओळखीचं होतं.

काही दिवसांपूर्वी "वैशाली हळदणकर" यांचे "बारबाला" हे पुस्तक वाचून संपवलं. तेव्हाही अशीच काही अवस्था झाली होती.
बारबालामधील वैशालीचं आयुष्य काही वेगळं नाही, तिच्या आयुष्यातील संघर्ष तसाच आणि तितकाच वाईट्ट आहे, जितका खुलूसमधील प्रत्येक माझ्या त्या बहिणीचा आहे.
फरक इतकाच की आजही आयुष्याच्या या वळणावर वैशाली मला भेटत असते, तिच्याशी महीन-पंधरा दिवस झाले की बोलणं होतं. खंत एकच वाटते की, तिला अजून न्याय मिळाला नाहीये. अजूनही ती जगण्यासाठीचा संघर्ष करतेय.

बारबालामधील वैशाली असो किंवा रेड लाईट एरियातील हिराबाई, अमिना, जस्मिन यांच्या जगण्याच्या व्यथा काही किंवा त्यांच्या जगण्यातील संघर्ष काही वेगळा नाही.
याहीपुढे याचं आधुनिकीकरण होऊन सुरू झालेला व्यवसाय म्हणजे "एस्कॉर्ट सर्व्हीस" हे विश्व काही वेगळं नाही. फक्त इथे सगळं कसं चकचकीत अन् पॉलिश भासावं असं काही असतं.

गेले काही वर्ष "एस्कॉर्ट" अन् त्यांचं विश्व यावर लिखाणाचा विचार करतोय. त्या दिशेनं कधीच प्रयत्न सुरू झाले. कित्येकीं/कांच्या गुपित भेटी झाल्या. हे रंगीबेरंगी विश्व, रोजची होणारी लाखो, करोडोंची उलाढाल, ऑनलाईन माध्यमातून होणारी ओळख.
हे सगळं खूप म्हणजे ओशिएनमध्ये खूप डीपपर्यंत जाऊन उजेड शोधण्यासारखे आहे.

तूर्त इतकंच..!

हा सगळा संघर्ष अन् या व्यक्तींनी जे काही सोसलं आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी "खुलूस" वाचायला हवं. कारण हा प्रवास लिखाणात कैद होण्यासाठी कित्येक वर्ष समीर गायकवाड (बापू) यांनी हे जग समजून, जाणून घेतलं. अन्; पुढं आपलं उभं आयुष्य या व्यवसायात आलेल्या किंवा बळजबरी आणलेल्या व्यक्तींच्या आयुष्यातील जखमांवर फुंकर घालण्याचं काम लेखकांनी केलं आहे.
तेव्हा प्रत्येक त्या व्यक्तीनं "खुलूस" वाचायला हवं, ज्याच्या आत माणूसपणाची जाणीव जीवंत आहे.

रेडलाइट एरिया म्हटलं की अनेकांची नाकं मुरडत जातात...
कुलटा, कीटाळ, वेश्या, रंडी असे अनेक शब्द वापरून तिथल्या स्त्रियांना हिणवलं जातं.
पण व्यापकदृष्ट्या, समाजाच्या वासना शमवणाऱ्या या स्त्रियांच्या नशीबी काय येतं...
दुःख - दैन्य आणि नरकासम भोगवटा!

अशी अनेक आयुष्य जवळून बघितलेल्या समीर गायकवाड यांनी या स्त्रियांनाच या पुस्तकाच्या नायिका केलं आहे.
त्यांना या स्त्रियांची घुसमट,
त्यांच्या इच्छा - आकांक्षा,
त्यांची परिस्थिती - शरणता, हतबलता, त्यांचे हुंकार, त्यांच्या आर्त हाका, त्यांच्या भावभावना आणि त्यांची तगमग हे सारं या पुस्तकात संवेदनशीलरीत्या टिपलं आहे.
खुलूस म्हणजे निर्मळ सच्चेपण, आस्था आणि निष्ठा...
या स्त्रियांचं जगणं त्याच सच्चेपणाने
चितारणारं हे पुस्तक..!

रेड लाईट डायरीज..!
खुलूस..!

Written by,
Bharat Sonawane .

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...