मुख्य सामग्रीवर वगळा

प्रवासवर्णने आयुष्यातून सुटलेल्या क्षणांची..!

प्रवासवर्णने आयुष्यातून सुटलेल्या क्षणांची..!

रात्रीच्या साडे दहाच्या परतीच्या ट्रेनमध्ये बसलो. ट्रेन पुणे स्टेशनवर आली तस्सं ट्रेनच्या दिशेनं ट्रेनची वाट बघणारे सर्व प्रवासी ट्रेनमध्ये एक एक बोगी करून आत घुसू लागले. हळू हळू सर्व ट्रेन फुल झाली अन् माझी स्लीपरची तिकीट असूनही मला नाईलाजास्तव जनरलच्या डब्ब्यात बसावं लागलं.

पर्यायही नव्हता, रात्रभर येणारी दुसरी ट्रेनही नव्हती. मनाची समजूत घातली अन् आज जनरल डब्ब्याचा प्रवास अनुभवू म्हणून मी ही मग जनरल डब्ब्यात घुसलो. डब्ब्यात घुसलो तसे युपी बिहारचे काही माणसं बाथरूमच्या दाराजवळ बसून प्रवास करत होते. आत पूर्ण डब्बा प्रवाश्यानी भरलेला असल्यानं मध्येही जागा नव्हती. 

युपी बिहारच्या त्या सात-आठ मित्रांशी गप्पा करत मी उभाच प्रवास करू लागलो, तेही अडचणीत दाटीवाटी करून बसलेले होते. थंडी, वाऱ्यापासून अडोसा असं काहीही नव्हतं अन् अश्या वातावरणात ते मागील सहा तासांपासून प्रवास करत होते.

त्या एकमेव जनरल डब्ब्यात एकमेव बाथरूम असल्यानं बाथरूमला येणारी जाणारी स्त्री पुरुष सर्व तिथून जात. त्या बाथरूमच्या ओल्या चपला त्यांना ओलांडून पुन्हा डब्यात येणं पण कुठलाही वादविवाद न करता डब्याच्या आतील आणि बाहेरील सर्वांचा प्रवास चालू होता.

दौंड आलं तसं काही प्रवाशी उतरले आणि मी त्या युपी बिहारच्या मित्रांपासून जरा आत डब्ब्यात आलो. आता जरा थंडी वारा लागत नव्हता पण; अजूनही सत्तर-ऐंशी प्रवाशांच्या या डब्ब्यात आम्ही पाच-सहा तरुण मुलं उभे राहून प्रवास करत होतो. पाच-पन्नास किमी पुढे आलो असेल तशी सर्वांची ओळख असल्यासारखे मी सगळ्यांच्यामध्ये मिक्स झालो.

ट्रेन थांबली अन् पुन्हा पाच-सहा जण प्रवाशी डब्ब्यात बसले माझं बोलणं, ऑफिशियल राहणीमान, भाषेचा टोन बघून डब्ब्यातील तिशी-पस्तीशितील दोघी स्त्रिया आणि एका म्हाताऱ्या आज्जीने मला त्यांच्या सीटवर जागा करून दिली.

त्यातील आजी झोप येतेय असं कारण सांगून माझ्या सिटाच्या खाली जाऊन झोपल्या. हे सगळं विचित्र वाटत होतं पण असेच दोन तीन पुरुष,काही स्त्रिया,काही तरुण मुलं सिटाच्या खालच्या,वरच्या जागेत झोपले होते.

काही वरती असलेल्या सीटवर प्रवास करत होते, बारा-एकच्या दरम्यान डब्ब्यातील बरेच प्रवासी उतरले आणि आता बऱ्यापैकी मोकळी जागा म्हणजे व्यवस्थित बसता येईल अशी जागा झाली.

तिशीतील दोघी स्त्रिया अन् त्यातील एकीचे दोन्ही भाऊ आमच्यात छान गप्पा रंगल्या. कोण, कुठले, काय करता असं सगळं आम्ही एकमेकांना विचारून घेतलं. दोघीतील एका स्त्रीचे एक आठ वर्षांची मुलगी अन् एक अकरा वर्षांचा मुलगा दोघे माझ्याजवळ येऊन बसले आणि गप्पा करत बसले.

पुण्यात शिक्षणासाठी त्यांचे आईवडील त्यांना घेऊन आलेले होते अन् छान पुणेरी टोनमध्ये ती मुलं माझ्याशी गप्पा करत होती. काही दिवस सलग सुट्ट्या असल्यानं ती मुलं त्यांच्या आई समवेत त्यांच्या आजोळी गडचिरोलीला निघाले होते. 

आमच्या गप्पा चालू होत्या या गप्पांच्या दरम्यान ती तिशीतली दुसरी स्त्री अन् तिचे दोन्ही भाऊ झोपी गेले. तेही मी जिथे उतरणार होतो तिथे उतरणार होते, त्यामुळं मी त्यांना निवांत झोपा सांगून गप्पा मारत बसलो. जराशी गर्दी कमी झाली तसे त्या मुलांच्या आईला मी आमच्या सीटवर बोलवून घेतलं अन् आम्ही चौघे एका सीटवर बसून गप्पा करत राहिलो.

तेही सात ते आठ तासांचा प्रवास करत असल्यानं थकले होते पण मुलं मात्र गप्पा मारत होते. मलाही झोप येत नव्हती. हळू हळू डब्यातील सर्व प्रवासी झोपले, कुण्या स्टेशनवर अजून काही स्त्रिया अन् त्यांच्या समवेत काही माणसं डब्ब्यात चढली. त्यांना खूप वेळाने जागा भेटली मग त्यांच्याशी गप्पा मारत बसलो.

मुलांची आई प्रवासाने थकली असल्यानं केव्हाच माझ्या खांद्यावर डोकं ठेऊन झोपी गेली होती,उठावे तर तिला योग्य वाटणार नाही, म्हणून मी ही नवीन आलेल्या प्रवाश्यांशी,तिच्या मुलामुलीशी गप्पा मारत बसलो. दोनेक तासांनी तिला जागा आली तिचं माझ्या खांद्यावरील डोकं बघून ती लाजल्यागत झाली. तिची मुलंही तिला हसायला लागली,तिनं मला चोरट्या नजरेने बघत हळूच सॉरी म्हंटले.

मी ही काय म्हणणार होतो हसलो अन् इट्स ओके म्हणून त्यांना निवांत झोपायला इशारा केला. मुलांच्या आमच्या बऱ्याच गप्पा चालू होत्या. पहाटेचे सहा वाजले तसं माझ्यासोबत उतरणारे ते दोघे तरुण मुलं ती स्त्री उठले.
पंधरा-वीस मिनिटांत आमचं स्टेशन आलं, आम्ही चौघे उतरलो. ती लहानगी मुलं मला डब्ब्यातून बाहेर सोडायला आली, त्यांना दोन बिस्कीट पुडे घेऊन दिली अन् ट्रेन निघायला लागली तेव्हा आमच्या गप्पा आवरत्या घेत बाय केलं.

ट्रेन निघाली तेव्हा ती दोन्ही लहानगे, त्यांची आई डोक्यावरचा पदर सावरत मला दूरवर जास्तोवर बाय करत राहिली. मी ही त्यांना बाय करत राहिलो, त्या दिवशी दुपारी चार वाजता ते त्यांच्या आजोळी पोहचणार होते.
माझ्या सहवासात खुश होते ते सर्व अन् मी ही त्यांच्या.

आम्ही चौघांनी चहा घेतला अन् तेही पुढच्या प्रवासाला निघून गेली. आता मात्र हातातून बरच काही सुटून गेल्याची जाणीव होत होती.
पुढे दोन तास बसमध्ये मी प्रवास करत होतो, एकटा होतो सर्व प्रवाशी असूनही...!

Written by,
Bharat Sonawane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...