मुख्य सामग्रीवर वगळा

प्रवासवर्णने आयुष्यातून सुटलेल्या क्षणांची..!

प्रवासवर्णने आयुष्यातून सुटलेल्या क्षणांची..!

रात्रीच्या साडे दहाच्या परतीच्या ट्रेनमध्ये बसलो. ट्रेन पुणे स्टेशनवर आली तस्सं ट्रेनच्या दिशेनं ट्रेनची वाट बघणारे सर्व प्रवासी ट्रेनमध्ये एक एक बोगी करून आत घुसू लागले. हळू हळू सर्व ट्रेन फुल झाली अन् माझी स्लीपरची तिकीट असूनही मला नाईलाजास्तव जनरलच्या डब्ब्यात बसावं लागलं.

पर्यायही नव्हता, रात्रभर येणारी दुसरी ट्रेनही नव्हती. मनाची समजूत घातली अन् आज जनरल डब्ब्याचा प्रवास अनुभवू म्हणून मी ही मग जनरल डब्ब्यात घुसलो. डब्ब्यात घुसलो तसे युपी बिहारचे काही माणसं बाथरूमच्या दाराजवळ बसून प्रवास करत होते. आत पूर्ण डब्बा प्रवाश्यानी भरलेला असल्यानं मध्येही जागा नव्हती. 

युपी बिहारच्या त्या सात-आठ मित्रांशी गप्पा करत मी उभाच प्रवास करू लागलो, तेही अडचणीत दाटीवाटी करून बसलेले होते. थंडी, वाऱ्यापासून अडोसा असं काहीही नव्हतं अन् अश्या वातावरणात ते मागील सहा तासांपासून प्रवास करत होते.

त्या एकमेव जनरल डब्ब्यात एकमेव बाथरूम असल्यानं बाथरूमला येणारी जाणारी स्त्री पुरुष सर्व तिथून जात. त्या बाथरूमच्या ओल्या चपला त्यांना ओलांडून पुन्हा डब्यात येणं पण कुठलाही वादविवाद न करता डब्याच्या आतील आणि बाहेरील सर्वांचा प्रवास चालू होता.

दौंड आलं तसं काही प्रवाशी उतरले आणि मी त्या युपी बिहारच्या मित्रांपासून जरा आत डब्ब्यात आलो. आता जरा थंडी वारा लागत नव्हता पण; अजूनही सत्तर-ऐंशी प्रवाशांच्या या डब्ब्यात आम्ही पाच-सहा तरुण मुलं उभे राहून प्रवास करत होतो. पाच-पन्नास किमी पुढे आलो असेल तशी सर्वांची ओळख असल्यासारखे मी सगळ्यांच्यामध्ये मिक्स झालो.

ट्रेन थांबली अन् पुन्हा पाच-सहा जण प्रवाशी डब्ब्यात बसले माझं बोलणं, ऑफिशियल राहणीमान, भाषेचा टोन बघून डब्ब्यातील तिशी-पस्तीशितील दोघी स्त्रिया आणि एका म्हाताऱ्या आज्जीने मला त्यांच्या सीटवर जागा करून दिली.

त्यातील आजी झोप येतेय असं कारण सांगून माझ्या सिटाच्या खाली जाऊन झोपल्या. हे सगळं विचित्र वाटत होतं पण असेच दोन तीन पुरुष,काही स्त्रिया,काही तरुण मुलं सिटाच्या खालच्या,वरच्या जागेत झोपले होते.

काही वरती असलेल्या सीटवर प्रवास करत होते, बारा-एकच्या दरम्यान डब्ब्यातील बरेच प्रवासी उतरले आणि आता बऱ्यापैकी मोकळी जागा म्हणजे व्यवस्थित बसता येईल अशी जागा झाली.

तिशीतील दोघी स्त्रिया अन् त्यातील एकीचे दोन्ही भाऊ आमच्यात छान गप्पा रंगल्या. कोण, कुठले, काय करता असं सगळं आम्ही एकमेकांना विचारून घेतलं. दोघीतील एका स्त्रीचे एक आठ वर्षांची मुलगी अन् एक अकरा वर्षांचा मुलगा दोघे माझ्याजवळ येऊन बसले आणि गप्पा करत बसले.

पुण्यात शिक्षणासाठी त्यांचे आईवडील त्यांना घेऊन आलेले होते अन् छान पुणेरी टोनमध्ये ती मुलं माझ्याशी गप्पा करत होती. काही दिवस सलग सुट्ट्या असल्यानं ती मुलं त्यांच्या आई समवेत त्यांच्या आजोळी गडचिरोलीला निघाले होते. 

आमच्या गप्पा चालू होत्या या गप्पांच्या दरम्यान ती तिशीतली दुसरी स्त्री अन् तिचे दोन्ही भाऊ झोपी गेले. तेही मी जिथे उतरणार होतो तिथे उतरणार होते, त्यामुळं मी त्यांना निवांत झोपा सांगून गप्पा मारत बसलो. जराशी गर्दी कमी झाली तसे त्या मुलांच्या आईला मी आमच्या सीटवर बोलवून घेतलं अन् आम्ही चौघे एका सीटवर बसून गप्पा करत राहिलो.

तेही सात ते आठ तासांचा प्रवास करत असल्यानं थकले होते पण मुलं मात्र गप्पा मारत होते. मलाही झोप येत नव्हती. हळू हळू डब्यातील सर्व प्रवासी झोपले, कुण्या स्टेशनवर अजून काही स्त्रिया अन् त्यांच्या समवेत काही माणसं डब्ब्यात चढली. त्यांना खूप वेळाने जागा भेटली मग त्यांच्याशी गप्पा मारत बसलो.

मुलांची आई प्रवासाने थकली असल्यानं केव्हाच माझ्या खांद्यावर डोकं ठेऊन झोपी गेली होती,उठावे तर तिला योग्य वाटणार नाही, म्हणून मी ही नवीन आलेल्या प्रवाश्यांशी,तिच्या मुलामुलीशी गप्पा मारत बसलो. दोनेक तासांनी तिला जागा आली तिचं माझ्या खांद्यावरील डोकं बघून ती लाजल्यागत झाली. तिची मुलंही तिला हसायला लागली,तिनं मला चोरट्या नजरेने बघत हळूच सॉरी म्हंटले.

मी ही काय म्हणणार होतो हसलो अन् इट्स ओके म्हणून त्यांना निवांत झोपायला इशारा केला. मुलांच्या आमच्या बऱ्याच गप्पा चालू होत्या. पहाटेचे सहा वाजले तसं माझ्यासोबत उतरणारे ते दोघे तरुण मुलं ती स्त्री उठले.
पंधरा-वीस मिनिटांत आमचं स्टेशन आलं, आम्ही चौघे उतरलो. ती लहानगी मुलं मला डब्ब्यातून बाहेर सोडायला आली, त्यांना दोन बिस्कीट पुडे घेऊन दिली अन् ट्रेन निघायला लागली तेव्हा आमच्या गप्पा आवरत्या घेत बाय केलं.

ट्रेन निघाली तेव्हा ती दोन्ही लहानगे, त्यांची आई डोक्यावरचा पदर सावरत मला दूरवर जास्तोवर बाय करत राहिली. मी ही त्यांना बाय करत राहिलो, त्या दिवशी दुपारी चार वाजता ते त्यांच्या आजोळी पोहचणार होते.
माझ्या सहवासात खुश होते ते सर्व अन् मी ही त्यांच्या.

आम्ही चौघांनी चहा घेतला अन् तेही पुढच्या प्रवासाला निघून गेली. आता मात्र हातातून बरच काही सुटून गेल्याची जाणीव होत होती.
पुढे दोन तास बसमध्ये मी प्रवास करत होतो, एकटा होतो सर्व प्रवाशी असूनही...!

Written by,
Bharat Sonawane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड