मुख्य सामग्रीवर वगळा

गॉईंग ग्लोकल..! लेखक: दत्ता जोशी.

गॉईंग ग्लोकल..!
लेखक: दत्ता जोशी.


"लोकल" उद्यमींच्या "ग्लोबल" गुणवत्तेच्या यशोकथा सांगणारं हे पुस्तक. साधारण दोन महिन्यांपूर्वी पुस्तकाचे लेखक व मुक्त पत्रकार श्री. दत्त जोशी सर यांच्याकडून छ.संभाजी नगर येथे त्यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीत भेट मिळाले.

या पुस्तकाबद्दल लिहण्यापूर्वी सरांशी झालेली ओळख कशी झाली हे सांगायला आवडेल. दोन-अडीच महिन्यांपूर्वी सर आमच्या कन्नड येथील व मराठवाड्यातील सर्वाधिक मोठ्या वाचनालयात म्हणजेच " विकास महर्षी बाळासाहेब पवार वाचनालय,कन्नड " येथे व्याख्यानास आले होते.

तरुण युवक, युवतींसाठी हे व्याख्यान खूप महत्वपूर्ण होते. नव्यानं उभारणारे उद्योग, त्या उद्योग उभारणीसाठी येणाऱ्या असंख्य अडचणी अन् या सगळ्या गोष्टींना तोंड देऊन शून्यातून आपलं विश्व निर्माण करत कित्येकांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या उद्योजकाचा हा सर्व प्रवास. आजची तरुण पिढी उद्योगधंदा, नोकरी या गोष्टींकडे कोणत्या नजरेतून बघते, त्यांचे मते काय.
अश्या अनेक विषयांवर हे व्याख्यान होतं.

व्याख्यानाचा हा सर्व विषय माझा आवडतीचा अन् जवळचा असल्यानं व औद्योगिक वसाहतीमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांवर मी नियमित लेखन करत असल्यानं हे सगळं मला ओळखीचं होतं. पण; मला या व्याख्यानातून ते अजून खोलात जाऊन जाणून घेता आलं, समजून घेता आलं. हे सगळं समजून घेण्यासाठी मी व्याख्यानाला गेलो अन् मलाही व्याख्यान आवडले.

सवयीप्रमाणे व्याख्यान आवडले म्हणून सरांना फेसबूकवर मॅसेज केला. पुढे सरांनी माझ्या ब्लॉगवर माझं काही लेखन वाचलं अन् भेटण्याची इच्छा दर्शविली. काही दिवसांनी माझ्या छ.संभाजी नगरच्या दौऱ्यात सरांची भेट झाली.

मग असंख्य विषय कंत्राटी कामगार, नव उद्योजक, नव्याने उभारणारे उद्योग, ऑरिक सिटी,शेंद्रा औद्योगिक वसाहत माध्यमातून शहरात येणारे नवीन प्रकल्प, माझ्या ओळखीत असलेले काही उद्योजक यांच्या यशकथा सरांना बोलण्यातून सांगण्यात आल्या. सरांचा पत्रकारितेचा अन् एकूण सर्व जीवन प्रवास सरांनी माझ्याशी शेअर केला अन् भरघोस गप्पा त्या भेटीत झाल्या. यावेळी सरांनी मला हे पुस्तक भेट दिलं.

थोडक्यात पुस्तकाबद्दल:
काही दिवसांच्या व्यस्थतेच्या दिनक्रमात पुस्तक वाचायचं राहून गेलं.बजे काल सायंकाळी हातात घेतलं अन् आज दुपारपर्यंत वाचून संपवलं. पुस्तकाबद्दल थोडक्यात सांगायचं तर नव उद्यमींच्या यशोकथा सांगणारं हे पुस्तक आहे. ज्या पुस्तकात लिखाणाच्या माध्यमातून सरांनी २७ नव उद्योजकांच्या यशकथा सांगितल्या आहेत.

"गॉईंग ग्लोकल" "लोकल" उद्यमींच्या "ग्लोबल" गुणवत्तेची यशकथा सांगणारं हे पुस्तक "द कॅटलिस्ट" प्रकाशनाने प्रकाशित केले आहे.एकूण २७० पृष्ठ संख्या असलेलं हे पुस्तक आहे.

नोकऱ्या माग्ण्यापेक्षा नोकऱ्या देण्याची जिद्द बाळगून ज्यांनी यशस्वीपणे आपले उद्योग उभारले त्यांच्या जिद्दीचा एकूण सर्व प्रवास मांडणारे हे पुस्तक आहे. दत्ता जोशी सरांनी आजवर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील लहान मोठ्या ७५० उद्योगांना भेट दिली, त्या उद्योजकांचा सर्व प्रवास ते आज देश विदेशात त्या उद्योजकांच्या उद्योगाचे सुरू असलेले युनिट्स, देश विदेशातून त्यांच्या प्रॉडक्ट्सना असलेली मागणी हा सर्व प्रवास सरांनी "पोलादी माणसे" या पुस्तक मालिकेतून मांडला आहे.
त्यातीलच २७ नव उद्योजकांच्या यशकथा सांगणारे हे पुस्तक आहे.
पुस्तकाच्या माध्यमातून उत्पादन क्षेत्र (Manafacturing Industry ) व सेवा क्षेत्र (Service Industry) अश्या दोन प्रकारात उभारलेल्या उद्योजकांच्या उद्योगाच्या यशकथा या पुस्तकातून सांगितल्या आहेत.

उत्पादन क्षेत्र (Manafacturing Industry ) या क्षेत्रात आपला उद्योग उभारणारे सुनील रायठठ्ठा (विनोदराय इंजिनीअर्स प्रा. लि ), शंतनु देशपांडे (स्पेशालिटी पोलिफिल्म्स), डॉ. प्रमोद बजाज (स्पर्म प्रोसेसर्स), सुरेश तोडकर (एस.एस कंट्रोल), रवींद वतनी टेक्नोएड असोसिएट्स प्रा. लि व इतर उद्योजकांचा सर्व प्रवास मांडला आहे.

सेवा क्षेत्र (Service Industry) या क्षेत्रात मानसिंह पवार (रत्नप्रभा मोटर्स), प्रशांत देशपांडे (एक्स्पर्ट ग्लोबल), राजेंद्र मालशेटवार (मालशेटवार ऑप्टिकल्स), अजय कुलकर्णी (इंटरफेस डिझायनर्स), राहुल खिंवसरा, विकास बापट (झीकॉन सोल्युशन्स प्रा.लि.), शिरीष खंडारे, महेश शहा (हायटेक ग्रुप/सेलवेल प्रा.लि.) व इतर उद्योजकांच्या यशकथा या पुस्तकातून मांडल्या आहेत.

सरांनी प्रयोजन माध्यमातून जे काही लिहले आहे, त्यातून  पुस्तक खूप सहज उलगडून आपल्या समोर येते. त्यामुळं त्यातील काही ओळी देतो आणि थांबतो.

हे पुस्तक कशासाठी? कुणासाठी?
खरे उत्तर आहे, हे पुस्तक 'उद्योगविश्वात प्रवेश करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी' आहे. उत्पादन आणि सेवा असे उद्योग जगताचे दोन प्रमुख प्रकार म्हणता येईल. या दोन्ही विभागांसाठी स्वतंत्र व्यवसाय कौशल्य लागतात. दोन्हींसाठीच्या गुणवत्ता वेगवेगळी लागते. पण सर्वात महत्त्वाची असते ती अंत: स्फूर्ती. हृदयात चेतलेला अग्नी प्रदीप्त असेल तोवर कुणीही, अगदी कुणीही उद्योजक होऊ शकतो. हे ठामपणे सांगायचे, तर काही उदाहरणे मांडावी लागतील. ही २७ उदाहरणे म्हणजे हे पुस्तक.

ही माणसे कुठे काम करताहेत यापेक्षा ती कुठे पोहचली आहेत, ते अधिक महत्त्वाचे आहे. गुणवत्तेला फक्त 'मेगासिटीज' मध्येच चालना मिळते असे नाही... ग्रामीण भागातून पुढे येत विश्वाला गवसणी घालता येऊ शकते, हे अधिक महत्त्वाचे हे सांगू बघणारे हे पुस्तक आहे.
 
Bharat Sonawane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...