मुख्य सामग्रीवर वगळा

गॉईंग ग्लोकल..! लेखक: दत्ता जोशी.

गॉईंग ग्लोकल..!
लेखक: दत्ता जोशी.


"लोकल" उद्यमींच्या "ग्लोबल" गुणवत्तेच्या यशोकथा सांगणारं हे पुस्तक. साधारण दोन महिन्यांपूर्वी पुस्तकाचे लेखक व मुक्त पत्रकार श्री. दत्त जोशी सर यांच्याकडून छ.संभाजी नगर येथे त्यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीत भेट मिळाले.

या पुस्तकाबद्दल लिहण्यापूर्वी सरांशी झालेली ओळख कशी झाली हे सांगायला आवडेल. दोन-अडीच महिन्यांपूर्वी सर आमच्या कन्नड येथील व मराठवाड्यातील सर्वाधिक मोठ्या वाचनालयात म्हणजेच " विकास महर्षी बाळासाहेब पवार वाचनालय,कन्नड " येथे व्याख्यानास आले होते.

तरुण युवक, युवतींसाठी हे व्याख्यान खूप महत्वपूर्ण होते. नव्यानं उभारणारे उद्योग, त्या उद्योग उभारणीसाठी येणाऱ्या असंख्य अडचणी अन् या सगळ्या गोष्टींना तोंड देऊन शून्यातून आपलं विश्व निर्माण करत कित्येकांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या उद्योजकाचा हा सर्व प्रवास. आजची तरुण पिढी उद्योगधंदा, नोकरी या गोष्टींकडे कोणत्या नजरेतून बघते, त्यांचे मते काय.
अश्या अनेक विषयांवर हे व्याख्यान होतं.

व्याख्यानाचा हा सर्व विषय माझा आवडतीचा अन् जवळचा असल्यानं व औद्योगिक वसाहतीमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांवर मी नियमित लेखन करत असल्यानं हे सगळं मला ओळखीचं होतं. पण; मला या व्याख्यानातून ते अजून खोलात जाऊन जाणून घेता आलं, समजून घेता आलं. हे सगळं समजून घेण्यासाठी मी व्याख्यानाला गेलो अन् मलाही व्याख्यान आवडले.

सवयीप्रमाणे व्याख्यान आवडले म्हणून सरांना फेसबूकवर मॅसेज केला. पुढे सरांनी माझ्या ब्लॉगवर माझं काही लेखन वाचलं अन् भेटण्याची इच्छा दर्शविली. काही दिवसांनी माझ्या छ.संभाजी नगरच्या दौऱ्यात सरांची भेट झाली.

मग असंख्य विषय कंत्राटी कामगार, नव उद्योजक, नव्याने उभारणारे उद्योग, ऑरिक सिटी,शेंद्रा औद्योगिक वसाहत माध्यमातून शहरात येणारे नवीन प्रकल्प, माझ्या ओळखीत असलेले काही उद्योजक यांच्या यशकथा सरांना बोलण्यातून सांगण्यात आल्या. सरांचा पत्रकारितेचा अन् एकूण सर्व जीवन प्रवास सरांनी माझ्याशी शेअर केला अन् भरघोस गप्पा त्या भेटीत झाल्या. यावेळी सरांनी मला हे पुस्तक भेट दिलं.

थोडक्यात पुस्तकाबद्दल:
काही दिवसांच्या व्यस्थतेच्या दिनक्रमात पुस्तक वाचायचं राहून गेलं.बजे काल सायंकाळी हातात घेतलं अन् आज दुपारपर्यंत वाचून संपवलं. पुस्तकाबद्दल थोडक्यात सांगायचं तर नव उद्यमींच्या यशोकथा सांगणारं हे पुस्तक आहे. ज्या पुस्तकात लिखाणाच्या माध्यमातून सरांनी २७ नव उद्योजकांच्या यशकथा सांगितल्या आहेत.

"गॉईंग ग्लोकल" "लोकल" उद्यमींच्या "ग्लोबल" गुणवत्तेची यशकथा सांगणारं हे पुस्तक "द कॅटलिस्ट" प्रकाशनाने प्रकाशित केले आहे.एकूण २७० पृष्ठ संख्या असलेलं हे पुस्तक आहे.

नोकऱ्या माग्ण्यापेक्षा नोकऱ्या देण्याची जिद्द बाळगून ज्यांनी यशस्वीपणे आपले उद्योग उभारले त्यांच्या जिद्दीचा एकूण सर्व प्रवास मांडणारे हे पुस्तक आहे. दत्ता जोशी सरांनी आजवर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील लहान मोठ्या ७५० उद्योगांना भेट दिली, त्या उद्योजकांचा सर्व प्रवास ते आज देश विदेशात त्या उद्योजकांच्या उद्योगाचे सुरू असलेले युनिट्स, देश विदेशातून त्यांच्या प्रॉडक्ट्सना असलेली मागणी हा सर्व प्रवास सरांनी "पोलादी माणसे" या पुस्तक मालिकेतून मांडला आहे.
त्यातीलच २७ नव उद्योजकांच्या यशकथा सांगणारे हे पुस्तक आहे.
पुस्तकाच्या माध्यमातून उत्पादन क्षेत्र (Manafacturing Industry ) व सेवा क्षेत्र (Service Industry) अश्या दोन प्रकारात उभारलेल्या उद्योजकांच्या उद्योगाच्या यशकथा या पुस्तकातून सांगितल्या आहेत.

उत्पादन क्षेत्र (Manafacturing Industry ) या क्षेत्रात आपला उद्योग उभारणारे सुनील रायठठ्ठा (विनोदराय इंजिनीअर्स प्रा. लि ), शंतनु देशपांडे (स्पेशालिटी पोलिफिल्म्स), डॉ. प्रमोद बजाज (स्पर्म प्रोसेसर्स), सुरेश तोडकर (एस.एस कंट्रोल), रवींद वतनी टेक्नोएड असोसिएट्स प्रा. लि व इतर उद्योजकांचा सर्व प्रवास मांडला आहे.

सेवा क्षेत्र (Service Industry) या क्षेत्रात मानसिंह पवार (रत्नप्रभा मोटर्स), प्रशांत देशपांडे (एक्स्पर्ट ग्लोबल), राजेंद्र मालशेटवार (मालशेटवार ऑप्टिकल्स), अजय कुलकर्णी (इंटरफेस डिझायनर्स), राहुल खिंवसरा, विकास बापट (झीकॉन सोल्युशन्स प्रा.लि.), शिरीष खंडारे, महेश शहा (हायटेक ग्रुप/सेलवेल प्रा.लि.) व इतर उद्योजकांच्या यशकथा या पुस्तकातून मांडल्या आहेत.

सरांनी प्रयोजन माध्यमातून जे काही लिहले आहे, त्यातून  पुस्तक खूप सहज उलगडून आपल्या समोर येते. त्यामुळं त्यातील काही ओळी देतो आणि थांबतो.

हे पुस्तक कशासाठी? कुणासाठी?
खरे उत्तर आहे, हे पुस्तक 'उद्योगविश्वात प्रवेश करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी' आहे. उत्पादन आणि सेवा असे उद्योग जगताचे दोन प्रमुख प्रकार म्हणता येईल. या दोन्ही विभागांसाठी स्वतंत्र व्यवसाय कौशल्य लागतात. दोन्हींसाठीच्या गुणवत्ता वेगवेगळी लागते. पण सर्वात महत्त्वाची असते ती अंत: स्फूर्ती. हृदयात चेतलेला अग्नी प्रदीप्त असेल तोवर कुणीही, अगदी कुणीही उद्योजक होऊ शकतो. हे ठामपणे सांगायचे, तर काही उदाहरणे मांडावी लागतील. ही २७ उदाहरणे म्हणजे हे पुस्तक.

ही माणसे कुठे काम करताहेत यापेक्षा ती कुठे पोहचली आहेत, ते अधिक महत्त्वाचे आहे. गुणवत्तेला फक्त 'मेगासिटीज' मध्येच चालना मिळते असे नाही... ग्रामीण भागातून पुढे येत विश्वाला गवसणी घालता येऊ शकते, हे अधिक महत्त्वाचे हे सांगू बघणारे हे पुस्तक आहे.
 
Bharat Sonawane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड