मुख्य सामग्रीवर वगळा

कंत्राटी कामगारांचं ओसाड वर्तमान ..!

कंत्राटी कामगारांचं ओसाड वर्तमान..!


भर दुपारची वेळ भर उन्हात दीड वाजता सेकंड शिफ्टसाठी जाण्याची तयारी करतोय. इतक्या कडक उन्हात पातळ, पतली भाजी खायला नको वाटते अन् कोरडी भाजी असली की जसं जोमाने दीड-दोन पोळ्या नरड्याच्या आत कोंबल्या जातात तसे काही करून जेवण आवरते घेऊन, मळकटलेल्या चादरीच्या कॉटवर पडून राहीलो आहे.

कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांच्या आयुष्याचं गणित खूप सोप्पं असतं. कारण त्यांच्या आयुष्यात फार काही बदल होत नसतात. घड्याळीच्या काट्यावर फर्स्ट, सेकंड, थर्ड करत त्यांचं आयुष्य चालू असतं.

सगळं व्यवस्थित चालू असलं की कसं बाईचं पाळी चक्र दर महिन्याला फिरत राहते अन् काही घडवून यायचं, आणायचं असलं की नऊ महिने नऊ दिवस एक जीव पोटात वाढवला जातो. तसंच काहीसं सगळं जुळून आलं की नऊ महिने कंत्राटी पद्धतीने ही कामगार माणसं एका कंपनीत काम करत राहतात.

मग जसं बाई मोकळी होते, तसं पुन्हा मोकळं व्हायचं. दोन महिने परत याच्या खाली त्याच्या खाली करत काम मिळवायचं. दोन महिने झाले की पुन्हा नऊ महिने, सहा महिने हे चक्र चालू असतं. जोवर हातपाय काम करत असतात किंवा तसं सुपरवायझरला वाटत असतं तोवर. एकदा हे वाटणं बंद झालं की वेश्यावस्तीत जशी एका उतरत्या वयात आलेल्या बाईची अवस्था होते तशी इथल्या कामगाराची अवस्था होते.

फरक इतकाच ती भटकत राहते गिऱ्हाईकांच्या सोयीनुसार अन् तो भटकत राहतो बंद पडलेल्या औद्योगिक वसाहतीत भोक पडलेलं गोणपाट घेऊन मळकटलेले कपडे घालून, वाढलेले दाढीचे खुंट, अन् मानेवर आलेल्या केसांना घेऊन भंगार जमा करत. बंद पडलेली औद्योगिक वसाहत तितकीच बेसूर भासत असते जितकं त्याचं जगणं असतं. 

एकीकडे यंत्रांची घरघर चालू असते, वेळेवर वसाहतीत भोंगे वाजत राहतात, स्फोट होत राहतात कित्येकजण जगण्यासाठी त्या आगीत पोळत राहतात अन् कित्येकजण हळूहळू रोज या भोंग्याच्या आवाजावर हळूहळू मरत राहतात. 

भकास,बकाल आयुष्य काय असावं तर हे असं. इतकं भयाण असावं का..? असं अनेकजण मला विचारून जातात. एखाददोन महिने हे यंत्रांच्या बटणावर चालणारं यंत्रवत आयुष्य जगून बघितलं की प्रचिती आपोआपच येते.

एकदा असं सहज इंटरवह्यूमध्ये बोलून गेलो होतो जे खरं होतं की शेतकऱ्यांच्या वाट्याला आलेल्या संघर्षापेक्षा कंत्राटी कामगारांच्या वाट्याला आलेला संघर्ष किंचित जास्तच असतो. समोरचा व्यक्ती हसून मोकळा झाला. भर दुपारच्या उन्हात एसीचा गारवा अनुभवणाऱ्या त्या साहेबांना शेतकऱ्याच्या नुकसानीची झळ अन् कंत्राटी कामगारांची आयुष्यभर चालणारी फर्स्ट, सेकंड, थर्ड शिफ्टची वारी त्याला कळली असती तर तो इतका कुत्सितपणे हसला नसता अन् आमची हकालपट्टी करून पैसे घेऊन पदावर माणसं भरून घेतली नसती.

असो पर्याय नाहीये आम्ही भटकत राहूत पायाने रांगोळी गिरवत राहूत औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या डांबरी वाटा ढवळ्या करत राहू..!

हे सगळं कसं मोकाट वाटणारं लिखाण भासत असावं पण; या जगण्याला सीमा नाहीये, तितकंच मोकाट हे आयुष्य आहे. फुकट नाही आयुष्याच्या शेवट हातावर मोजण्या इतपत लोकं सुस्थितीत जगतात कंत्राटी पद्धतीने काम करणारे कामगार.

असो आयुष्य आहे, मग काम आलं अन् काम आलं म्हणजे औद्योगिक वसाहत आली, दीड किलोचा सेफ्टी शूज आला. महिन्याच्या अखेरीस पगार झाला की दोन जोडी सॉक्स न घेऊ शकणारे कंत्राटी कामगार मी बघितले आहे. पर्याय नाहीये, जितकं दिसतं तितकं सर्व स्मार्ट नाहीये हे सगळं. चकपक दिसते, पंचतारांकित औद्योगिक वसाहत दिसते.

मर्सिडीज,फॉर्चूनर,होंडा सिटी,अमक्या धमक्या पॉश गाड्या कंपनीच्या आत दिसतात, कंपनीच्या गेट बाहेर गेटर आलेल्या टायराच्या सायकली, ऑईलसील फुटलेल्या, पन्नासचं पेट्रोल टाकीत असलेल्या टूव्हीलर बघितल्या की हे चकाचक औद्योगिक वसाहतीचं जग कितपत खरं खोटं हे कळून येतं.

बरच काही लिहायला आहे पण फर्स्ट, सेकंड, थर्ड करायचं म्हंटले की उसंत नाहीये अन् उसंत, वेळ असल तरीही आपलीच कैफीयत मांडायला हा काही डोंबाऱ्याचा खेळ नाही. 
लिहल कधीतरी तूर्तच थांबतो..

Written by
Bharat Sonawane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...