मुख्य सामग्रीवर वगळा

वाभळेवाडीचा तलाठी अण्णा..! भाग -४

वाभळेवाडीचा तलाठी अण्णा..! भाग -४

पहाटेच्या चारला रानातली लाईन येणार अन् रानात गव्हाला पाणी भरायला म्हणून गावातील लोकं उठून रानाच्या दिशेनं आपलं आवरून सावरून निघाली होती. गावाच्या जवळ असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणारे गावची तरुण पोरंही सहा वाजता गावच्या फाट्यावर येणारी बस अन् तिचा अंदाज घेत गावच्या सडकीनं निघाली होती.
गावातली काही शेतकरी पहाटेच वावरातला अख्खर साफ करायला, दूध काढायला म्हणून जातांना सडकीने दिसत होती.

कोंबड्याच्या बांगेसरशी सूर्योदय झाला अन् तांबडा पिवळसर सूर्याचा कोवळा प्रकाश साऱ्या पंचक्रोशीवर आला तसे गावाला सोनेरी लकेरीत मडवावे तसं गाव चमचम करू लागले होते. गावातली लगबग सुरू झाली तसं, गावातली म्हातारी माणसं आपलं सकाळचे अंघोळपाणी करून सावता माळ्याच्या देवळात दर्शन करायला म्हणून देवळाकडे निघाले होते.

रामा कुंडूरसुद्धा कोंबड्याच्या बांगेसरशी उठला शिवनामायच्या पात्रात जाऊन अंघोळ करून देवपूजा करून तो लक्षी आईच्या पिंपळ पारावर येऊन बसला संतू अण्णा तलाठी अजून झोपलेले पाहून त्यांना उठवत रामा कुंडूर लक्षी आईच्या पिंपळ पार झाडून घेऊ लागला. 

पस्तीशीत असलेला रामा कुंडूर पहाटे कुणी त्याला बघितलं की विठू माउली त्याच्यात वास करते की काय इतका प्रसन्न तो दिसायचा. पांढरे शुभ्र धोतर घातलेला, कपाळी टिळा लावलेला अन् डोक्यावर गांधी टोपी घातलेला तो दिसला की गावातली चालती लोकं थांबून त्याची विचारपूस करी तोही लोकांची विचारपूस करायचा सारं गाव त्याची बायको त्याला सोडून गेली तसे त्याच्यासाठी हळहळ करत होते. कारण अख्ख्या पंचक्रोशीत रामा कुंडूरसारखं इमानी अन् प्रामाणिक, मनमिळावू असं कुणी नव्हतं त्यामुळं सारं गाव त्याचं गुणगान गायचं.

रामा कुंडूरनं लक्षी आईचा पिंपळ पार झाडला तितक्यात संतू अण्णा तलाठी उठून जवळ असलेल्या तांब्याला नदीच्या अंगाला गेले तेही अंघोळपाणी करून पत्री सुटकेशीत आपला कोरा इस्त्री केलेला ड्रेस काढून त्यांनी घातला अन् ते पारावर बसून राहिले आता कुठे संतू अण्णा तलाठी रुबाबदार तलाठी वाटत होते.

एरवी आठ वाजून गेले होते आज रविवारचा दिवस असल्यानं संतू अण्णा तलाठी यांना शासकीय सुट्टी होती त्यामुळं त्यांना आजच्या दिवसात खोली बघून त्यांचं बस्तान बसवणे होतं.आठ वाजले तसं पारावर गावचे पोलीस पाटील, सरपंच, अन् इतर मान्यवर सदस्य आले अन् त्यांनी गावात नव्यानं शिकाऊ तलाठी म्हणून रुजू झालेल्या संतू अण्णा तलाठी यांचं गावच्या परंपरेनुसार पारावर शाल,श्रीफळ देऊन स्वागत केलं.

तलाठ्याची तात्पुरती राहण्याची व्यवस्था म्हणून गावचे पोलीस पाटील धोंडू अण्णा पाटील यांच्या वाड्यात असलेल्या परसदारच्या खोलीत केली. रामा कुंडूर आणि जगण्या संतू अण्णा तलाठी यांचं सगळं सामान डोईवर घेऊन पोलीस पाटील यांच्या वाड्यावर घेऊन तलाठी अण्णा यांचं तात्पुरते बस्तान त्यांनी थाटून दिले.

संतू अण्णा तलाठी यांचं गावच्या मान्यवर लोकांनी स्वागत केलं. त्यांना गावातली जूनी शाळा, ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, अश्या सगळ्या जून्या सरकारी इमारती दाखवल्या. भारत स्वतंत्र झाल्यानंतरच्या काही दशकाभराने या इमारती उभारल्या गेल्या होत्या, आजही त्या डौलात उभ्या होत्या. 

गावातल्या म्हाताऱ्या लोकांच्या आठवणी असो किंवा तरुण लोकांची सरकारी कामे, शेतीची कामे, गावात कुणी लहानगा जन्माला आला की त्याची नोंद हे सर्व आजही या जुन्या इमारतीमध्ये होत असल्यानं गावाची या इमारतीसोबत अन् इथे सरकारी काम करणाऱ्या सर्व नोकरदारांसोबत नाळ जोडलेली होती.

आजवर गावात संतू अण्णा सारखे कित्येक तलाठी, ग्रामसेवक, इतर अधिकारी अन् कित्येक इतर माणसे येऊन गेली, गावच्या लोकांनी त्यांना घरच्या माणसांसारखे सांभाळले. त्यामुळं अनेक सरकारी नोकरदारांना बदली झाली की गाव सोडताना गहीवरून यायचं.

याला अपवाद काही नोकरदार खोडीचे निघायचे पण गावकरी त्यांनाही आपल्यात सामावून घेत आपलेसे करून आपले काम करून घेत असत. परंतू त्यांच्या बदलीमुळे गावाला सुतुक पडावं किंवा दुःख व्हावं असं काही होत नसे.

हे सगळं गावचे पोलीस पाटील संतू अण्णा तलाठी यांना सांगत असताना गावच्या जून्या बारबाप्या तलाठीचे खुलासे देत सांगत की, तो किती खोडीचा होता. त्यानं कशी कामात दखलांधाजी केली मग गावाने त्याला नकळत वरच्या साहेबांना अर्ज देऊन कशी त्याची बदली करून घेतली.

क्रमशः
भारत लक्ष्मण सोनवणे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...