मुख्य सामग्रीवर वगळा

दरवळ..!

दरवळ..!
हल्ली रोजची सायंकाळ अन् कधी मनाला वाटलं तर भर दुपारही अश्या धावण्याने होत आहे. का धावतो ? कश्यासाठी ? धावून काय भेटते ? या प्रश्नांना उत्तरं नाहीये. पण; एकदा धावायला लागलो की आठ-दहा किमी फक्त धावतच राहतो. हल्ली धावण्यात एक अनामिक सूख वाटायला लागलं आहे, धावणे माझ्यासाठी एक व्यसन झालं आहे.

जेव्हा मनाचा आदेश येतो की आता धावायचं चल तेव्हा मी धावायला सुरुवात करतो. अन् ; जोवर मनाला वाटत नाही की, आता थांबायला हवं तोपर्यंत मी धावतच राहतो.
धावण्यासाठी काही ठराविक मार्ग करून घेतले आहे. मग वेळेनुसार तर कधी मनाला योग्य वाटेल त्या मार्गानं धावतो. 

काल असच पाच वाजता धावायला सुरुवात केली. गौताळा अभयारण्याचा परिसर मी राहतो त्या शहराला लागून असल्यानं नेहमी या अभयारण्याच्या हद्दीत मी धावत असतो. कधीतरी डोंगरदऱ्या असलेल्या रस्त्याला तर कधी अभयारण्याच्या आतून जाणाऱ्या डांबरी रस्त्याला.

काल पहिला साडेचार किमीचा टप्पा पार झाला अन्  अभयारण्याच्या गेटवर थांबलो. कितीही धावलो किंवा नाही धावलो तरी इथे मी नकळत थांबून घेतो. कारण इथे मला माझ्या भविष्यातील हालचाली खुणावतात, सगळं सोयीस्कर झालं तर मी ही असाच कुठे भविष्यात राहील असं वाटून जातं अन् मोजून पाच-दहा मिनिटं इथे थांबणं होतं.

काल एकाकी धावत असताना अभयारण्याच्या गेटवर आलो अन् एक ओळखीचा दरवळ मला येऊ लागला. हा दरवळ आला की मला उन्हाळ्याची चाहूल लागते. या वर्षी हा दरवळ काल पहिल्यांदा अनुभवला पण हा सुगंध हा दरवळ कसला आहे हे आजवर मला कळून येत नव्हते.
काल या प्रश्नाचे उत्तर शोधायचे म्हणून मी तिथं रिलॅक्स होऊन शांतपणे गौताळा अभयारण्य न्याहाळत बसलो.

सध्या निसर्गात पानगळ सुरू असल्याने अनेकांना निसर्गात उदास उदास वाटत असावं पण माझ्याबाबतीत उलट आहे. मला ही झाडांची होणारी पानगळ अन् शुष्क वाऱ्यात अवघ्या अभयारण्यात भरकटणारी हे पाने बघायला त्यांच्यात माझं अस्तित्त्व शोधायला आवडते. म्हणून मी कितीही वेळ हा सर्व निसर्गाचा सुखद सोहळा अनुभवू शकतो.

तर तो दरवळ माझ्यापर्यंत येत होता. आजवर माझाही गैरसमज होता की हा दरवळ रातराणीच्या फुलांचा असावा पण काल हा गैरसमज दूर झाला. तो दरवळ असतो उन्हाळ्याची चाहूल लागली की करवंदाच्या जाळीला येणाऱ्या नाजूक पांढऱ्या शुभ्र फुलांचा. जास्मिंनची फुलं भासावी इतकी सुंदर अन् नाजूक ही फुलं दिसतात. काटेरी करवंदाच्या जाळीला ही फुलं अजूनच सुंदर दिसतात.

मग काय कालचं धावणं जरासं थांबलं कितीवेळ झाडांची होणारी पानगळ,त्या फुलांचा दरवळ अनुभवत बसलो. अभयारण्याच्या गेटवर येणारी - जाणारी लोकं मला वनरक्षक समजत असावी हे त्यांच्या नजरेतून कळून येत होतं. मी ही निवांत बसून सगळा गौताळा अभयारण्य नजरेत भरून घेत होतो. असं इकडे रोजच येणं होतं पण निवांत बसणं क्वचित कारण,धावण्याचं वेडखूळ मला इथे फार वेळ थांबू देत नाही.

दूर डोंगरातून मोरांचा अनेक पक्षांचा आवाज येत होता. हळू हळू दिवसभर आग ओकणारा सूर्य डोंगराच्या माथ्यावर अस्ताला जातांना दिसत होता, त्याला बघणं एक मनाला क्षणिक शांतता मिळण्याचं कारण ठरत होतं.

अस्ताला जाणारा सूर्य अस्ताला गेला अन् पुन्हा घराच्या वाटा खूनायला लागल्या.मग धावत राहिलो रोजच्या थांब्यापर्यंत येऊस्तोवर. मोबाईलवर बघितलं तर कालचं धावणं पूर्ण ९ कि.मी झालं होतं. 
इतकं धावूनही कुठला थकवा जाणवत नव्हता की कुठलं काही. आता पुन्हा आज गौताळा अभयारण्यात धावत इथे येऊन हे कालचं आज टाईप करत बसलोय..!
Written by,
Bharat Sonawane 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...