मुख्य सामग्रीवर वगळा

दरवळ..!

दरवळ..!
हल्ली रोजची सायंकाळ अन् कधी मनाला वाटलं तर भर दुपारही अश्या धावण्याने होत आहे. का धावतो ? कश्यासाठी ? धावून काय भेटते ? या प्रश्नांना उत्तरं नाहीये. पण; एकदा धावायला लागलो की आठ-दहा किमी फक्त धावतच राहतो. हल्ली धावण्यात एक अनामिक सूख वाटायला लागलं आहे, धावणे माझ्यासाठी एक व्यसन झालं आहे.

जेव्हा मनाचा आदेश येतो की आता धावायचं चल तेव्हा मी धावायला सुरुवात करतो. अन् ; जोवर मनाला वाटत नाही की, आता थांबायला हवं तोपर्यंत मी धावतच राहतो.
धावण्यासाठी काही ठराविक मार्ग करून घेतले आहे. मग वेळेनुसार तर कधी मनाला योग्य वाटेल त्या मार्गानं धावतो. 

काल असच पाच वाजता धावायला सुरुवात केली. गौताळा अभयारण्याचा परिसर मी राहतो त्या शहराला लागून असल्यानं नेहमी या अभयारण्याच्या हद्दीत मी धावत असतो. कधीतरी डोंगरदऱ्या असलेल्या रस्त्याला तर कधी अभयारण्याच्या आतून जाणाऱ्या डांबरी रस्त्याला.

काल पहिला साडेचार किमीचा टप्पा पार झाला अन्  अभयारण्याच्या गेटवर थांबलो. कितीही धावलो किंवा नाही धावलो तरी इथे मी नकळत थांबून घेतो. कारण इथे मला माझ्या भविष्यातील हालचाली खुणावतात, सगळं सोयीस्कर झालं तर मी ही असाच कुठे भविष्यात राहील असं वाटून जातं अन् मोजून पाच-दहा मिनिटं इथे थांबणं होतं.

काल एकाकी धावत असताना अभयारण्याच्या गेटवर आलो अन् एक ओळखीचा दरवळ मला येऊ लागला. हा दरवळ आला की मला उन्हाळ्याची चाहूल लागते. या वर्षी हा दरवळ काल पहिल्यांदा अनुभवला पण हा सुगंध हा दरवळ कसला आहे हे आजवर मला कळून येत नव्हते.
काल या प्रश्नाचे उत्तर शोधायचे म्हणून मी तिथं रिलॅक्स होऊन शांतपणे गौताळा अभयारण्य न्याहाळत बसलो.

सध्या निसर्गात पानगळ सुरू असल्याने अनेकांना निसर्गात उदास उदास वाटत असावं पण माझ्याबाबतीत उलट आहे. मला ही झाडांची होणारी पानगळ अन् शुष्क वाऱ्यात अवघ्या अभयारण्यात भरकटणारी हे पाने बघायला त्यांच्यात माझं अस्तित्त्व शोधायला आवडते. म्हणून मी कितीही वेळ हा सर्व निसर्गाचा सुखद सोहळा अनुभवू शकतो.

तर तो दरवळ माझ्यापर्यंत येत होता. आजवर माझाही गैरसमज होता की हा दरवळ रातराणीच्या फुलांचा असावा पण काल हा गैरसमज दूर झाला. तो दरवळ असतो उन्हाळ्याची चाहूल लागली की करवंदाच्या जाळीला येणाऱ्या नाजूक पांढऱ्या शुभ्र फुलांचा. जास्मिंनची फुलं भासावी इतकी सुंदर अन् नाजूक ही फुलं दिसतात. काटेरी करवंदाच्या जाळीला ही फुलं अजूनच सुंदर दिसतात.

मग काय कालचं धावणं जरासं थांबलं कितीवेळ झाडांची होणारी पानगळ,त्या फुलांचा दरवळ अनुभवत बसलो. अभयारण्याच्या गेटवर येणारी - जाणारी लोकं मला वनरक्षक समजत असावी हे त्यांच्या नजरेतून कळून येत होतं. मी ही निवांत बसून सगळा गौताळा अभयारण्य नजरेत भरून घेत होतो. असं इकडे रोजच येणं होतं पण निवांत बसणं क्वचित कारण,धावण्याचं वेडखूळ मला इथे फार वेळ थांबू देत नाही.

दूर डोंगरातून मोरांचा अनेक पक्षांचा आवाज येत होता. हळू हळू दिवसभर आग ओकणारा सूर्य डोंगराच्या माथ्यावर अस्ताला जातांना दिसत होता, त्याला बघणं एक मनाला क्षणिक शांतता मिळण्याचं कारण ठरत होतं.

अस्ताला जाणारा सूर्य अस्ताला गेला अन् पुन्हा घराच्या वाटा खूनायला लागल्या.मग धावत राहिलो रोजच्या थांब्यापर्यंत येऊस्तोवर. मोबाईलवर बघितलं तर कालचं धावणं पूर्ण ९ कि.मी झालं होतं. 
इतकं धावूनही कुठला थकवा जाणवत नव्हता की कुठलं काही. आता पुन्हा आज गौताळा अभयारण्यात धावत इथे येऊन हे कालचं आज टाईप करत बसलोय..!
Written by,
Bharat Sonawane 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड