मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आयुष्याच्या या वळणावर....

कसं असते नाही का वयाची साठी ओलांडून गेली की,आयुष्यात कायमचा येऊन जाणारा हळुवारपणा हा आपल्याला भूतकाळातील आठवणींना सोबत करत जगायचा काळ असतो. नेमकं हे तारुण्यात आपल्याला उलगडत असते,म्हातारपणाची जाणीव होत असते,थकलेले शरीर व आठवणीतले विचार घेऊन जगणारे म्हातारपण हे खूप सुंदर एका वलयात राहून हे सर्व अनुभवणे हे खूपच अलवार अशी असलेली ही प्रोसेस आहे. याची प्रचिती काही दिवसांपूर्वी आली,तो क्षण.... पेपर बाबा पेपर... पेपरवाल्याने दोन-तीन वेळा आवाज देऊन तो पेपर त्याने त्या गॅलरीमध्ये फेकून दिला,आणि तो पेपरवाला पुढे चालता झाला.हे सर्व दृश्य ते आजोबा किचनमध्ये जाळीचे तावदान असलेल्या खिडकीतून बघत होते... गॅसवर तुळशीचे पान,आणि गवतीचहाची पाने घातलेला चहा ठेवलेला,सर्व किचनमध्ये त्याचा सुगंध पसरलेला होता.चहा उकळण्याचा आवाज कानावर पडतोय पण किचन ट्रॉलीमध्ये डब्ब्यात ठेवलेले बिस्कीट काही भेटत नव्हते,अखेर बरीच शोधाशोध आणि डब्बे उघडून बघितल्यावर एका डब्ब्यात बिस्कीट सापडले अन् जरासा उशीर झाला असता तर चहा उतू गेला असता हे ही कळाले.गॅस कमी करत चहा हलवून कपात ओतली आणि सुटकेचा श्वास त्यांनी सोडला,हो स

कोरोना सदृश्य काळ आणि बेरोजगारी....

#कोरोनासदृश्य काळ आणि नोकरीसाठी,नोकरी टिकविण्यासाठी,नोकरी मिळविण्यासाठी तरुणांची होत असलेली तडजोड.... सध्य परिस्थितीचा एकूण आढावा जेव्हा बघितला,तेव्हा मृत्यूपेक्षा सर्वाधिक मोठे वाटणारे संकट जर कोणते असेल तर ते असणार वाढणारी बेरोजगारी.बरेचजण म्हणतील की,इथे जीवांची परवा यांना नाही अन् बेरोजगारीची चिंता करताय पण  मृत्यू अन् वास्तव परिस्थिती यांचा विचार केलातर आपण बेरोजगारी या विषयावर येऊनच थांबणार आहोत. कारण पुढील काही काळ जरीही आपण कोरोनावर यशस्वीपणे मात करून जनजीवन सुरळीत करुत,परंतु बेरोजगारीमुळे पुढील काळात नैराश्यात जाणाऱ्या वर्गाची संख्या ही खूप मोठी अन् खबरदारी घेणारी असेल.... सद्या देशातील नव्हे तर जगातील सर्वच देशांची अवस्था ही आर्थिक बाबतीत खूप वाईट झालेली आहे.प्रायव्हेट सेक्टरमध्ये असलेल्या नामांकित कंपन्या ज्या लाखो लोकांना एकावेळी रोजगार उपलब्ध करून देत असत त्यांनी समोर घोंगावत असलेलं संकट बघून कंपनीतील जवळ जवळ बराच मजूरवर्ग घरी बसवला आहे. यात उच्चपदावर असलेले कंपनीतील अधिकारी वर्ग सुद्धा आहेत,हळूहळू काम पूर्वपदावर येतही आहे परंतु हे सावरण्यासाठी झालेलं नुकसान भरू

पत्रास कारण की,

प्रिय, पत्रास कारण की, काल-परवापासून शिवना नदीच्या पुला खालून पाणी वाहते झाले आहे अन् नेमकाच आषाढ लागलेला आहे... अंगणातले झाडे आता बहरलीये आणि त्यामुळे मंदिरात फारसा पालापाचोळा होत नाहीये,मंदिराचा परिसर स्वच्छ राहत आहे.कधीतरी सोसाट्याचा वारा आला की,मग चिंता सतावते कारण काही झाडांची उंची फार वाढलेली आहे तसेच पाने,फुले,फळे पडून खराब होऊन जातात... मी या मताचा आहे की झाडांची फुले,फळे हे पूर्णपणे तयार होण्यापर्यंत झाडावरच असावी हल्ली ते शक्य होत नाहीये... मलाही दुःख होतेच पण काय करणार अग्नी,जल,आणि वारा यांच्याशी वैर करून आपले काहीही साध्य होत नाही याची मला जाणीव आहे.त्यामुळे मी त्यात फारसा पडत नाही... हो मात्र नित्य नियमाने ठरवून दिलेल्या वेळीत सकाळ  मंदिर आवारातील सर्वच मी सेवाभावे झाडून,पुसून घेत असतो.आता तब्येत साथ देत नाही पण,माझा श्वास आहे तोवर हे मला चुकणार नाहीये.... काल राच्याला एकदमच सोसाट्याच्या वार्यासह पाऊस बरसू लागला,ओसरीत झोपलेलो मी खिडकीतून येणाऱ्या पावसाच्या थेंबांनी जागा झालो... उठताच पोटात कळ येऊन गेली,माहीत नाही पण हल्ली पोटपाठ यांचे खोबऱ्याच्या खावटा प्

लेखक व्यक्त होतांना...

#लेखक_व्यक्त_होतांना... कुठेतरी शब्दांना धारदार तलवारीच्या पात्यांचे स्वरूप देऊन संविधानाला लक्षात घेऊन लिहणारा तू नामदेव ढसाळ वाटतो.तर कधी सांजेच्या प्रहरी शब्दांना चांदण्यात मोजणारा,अन् कधीतरी स्मशानात जळत्या प्रेताच्या उजेडात उडत्या विस्तवावर कविता करणार तू ग्रेस वाटतो.कधीतरी रेल्वे स्थानकात तुझ्या कविता रेल्वेच्या आवजाशी हितगुज घालू बघता,अन् तू तिथेच तुझे तारुण्यातले जीवन कवितेला वाहून देतो.तेव्हा खरच तू कवितेला शोभणारा,तिच्यासाठी असणारा बालकवी शोभतोस... हे आणी... इतर सर्वच कवी आहेना हे जगायला शिकवतात.तुम्ही म्हणाल मी पण आता काहीतरी कवितेशी जुळवून व्यक्त होणे,अव्यक्त राहणे याबद्दल लिहत असेल तर तसे काहीही नाही.पण काय असतं जेव्हा कुठेतरी त्या क्षणाची (जो क्षण आयुष्यात बदल घडवून आणण्यासाठी झुरवत ठेवत असतो) आपल्याला जाणीव होत असते,तो तेव्हाच कृतीत व्यक्त करून मोकळे होऊन जायचे असते... कसे आहेना, लिहत्या हाताला आपण खूप वेळा विचारून बसतो की, तुम्ही हे कसे लिहतात...? कसं सुचतं..?कोणासाठी..? असे अनेक प्रश्न... या प्रश्नाला खरंतर उत्तरं नाही, फक्त कुणाला विचारांना लिखित स

गोष्टीत कैफाच्या....

#गोष्टीत_कैफाच्या... गोष्टीत कैफाच्या जीवन सारेच माझे दुःखांना हल्ली सोबत करते, सुखाचे डोहाळे आम्हीच ते नयनांतुनी वाहणाऱ्या आसवांना लावून घेतले...! हरवलेला दरवळ आहे तो उगाच त्याला सुगंध म्हणून बसलो ठरवत, फार अपेक्षा नाही अनपेक्षित करारच ते मग जीवनाशी आम्ही करवुनी घेतले...! झाली तडजोड कित्येकदा व्यक्त होणाऱ्या ठरवुन जीवनाशी, कुठे व्यक्त होण्यास जमले मला खोटे सौदे जीवनाशी मग मी करवूनी घेतले...! मृगजळ सुखाशी जुळवू पाहत राहीलो निष्ठुर जीवनाला, कैदैत मृगजळाच्या खर्या जीवनाशी मग मी कैद माझे जीवन करवुनी घेतले.... द्विदा मनस्थितीत जगण्याच्या एक मार्गाला शोधले, कुठे सुटकाच ती झाली बाहुपाशात दुखाच्या मग सुखास मी माघारी घेतले... वाहणे जीवनाचे शब्दात उतरवत राहीलो, कवितेलाच मग दुःखात माझ्या मी सर्वस्वी सुख मानवुन घेतले... जोडल्या ओळीत कित्येक भावना अनामिक सुखाच्या, खर्याखुर्या भावनांशीच मग जगाने आमच्या सोबती खेळवुन घेतले.... Written by, Bharat Sonwane....

पाऊस छत्री आणि मी....

#पाऊस_छत्री_आणि_मी... वादळ,वारा,पाऊस सगळं मनासारखे चालु आहे तरीही काहीतरी मागे राहून गेलं आहे.गवतावरचे पाण्याचे दव जसं आपले प्रतिबिंब त्याच्या आत दाखवू शकत नाही,तसेच मागे काय राहून गेले हे माहीत असूनही सांगता येत नाहीये इतकं अस्वस्थ झालंय सर्वच... रस्त्याच्या बाजूला असलेली छोटी-छोटी झाडं जगण्यासाठी स्पर्धा करताय.एखादा नाकतोडा येतो अन् भर्रकन उडत जाऊन दोन-तीन झाडांची पानं त्याच्या उडण्याने तोडून टाकतो अन् स्वस्थ बसून राहतो त्या वाटसरू बसलेल्या पुलावर येऊन,त्याला दिसते का काय माहित नाही पण त्याला खूप काही समजते... दुसरीकडे एक तो जो शेणाचे गोल,गोल गोळे करून त्यांना लोटत-लोटत घेऊन चालला आहे... कुठे जातो माहित नाही पण त्याला बघायला खूप आवडते,जगातला सर्वाधिक प्रामाणिक जीव कोणता असेल तर तो हाच असे मला वाटते.कारण त्याच्या आसपास दूरदूर त्याच्या जातीतले कुणीच नसते तर एकटाच तो हे सर्व करत असतो... बाजूला पावसाच्या पाण्याने ओढ्यातून एक चप्पल वाहून आली आहे आर्धी तुटलेली,पण वाहून आल्याने ती मस्त स्वच्छ झालीये.तिला घालून जरासा चौफेर फटकारा मारून आलो तिथेच आजूबाजूला,मऊ मऊ चप्पल एका पाय

सैर पर्यटनाची....

#सैर_पर्यटनाची.... औरंगाबाद ते चाळीसगाव महामार्गावरील कालिमठ फाट्यापासुन मध्ये 2 कि.मी.असलेलं कालीमातेचे मंदिर म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्याचं ग्रामदैवत कालिकामाता मंदिर आहे. कन्नड तालुक्यातील या निसर्गरम्य परिसरात प्रणवानंद सरस्वतींनी मंदिरची स्थापना केली आहे. निद्रीस्त शंकराच्या अंगावर उभी असलेल्या कालीकामातेची भारतात केवळ तीन मंदिर आहेत. त्यातीलच हे एक भव्य कलाकृती लाभलेलं कालीमातेचे मंदिर... कन्नड शहरापासून अवघ्या 9 कि.मी.अंतरावर असलेल्या कालीमठ परिसरात असलेलं कालीमातेचे मंदिराची स्थापना 10 एप्रिल 1988 रोजी स्वामी प्रणवानंद सरस्वती महाराज यांनी केली. मुळचे कोलकात्याचे रहिवाशी असलेल्या स्वामी प्रणवानंद सरस्वती यांनी राजवैभवाचा त्याग करून 1968 रोजी चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवीला वास्तव्यास आले. तब्बल 19 वर्षे इथं वास्तव्य केल्यानंतर त्यांनी कालीकामातेचे एक भव्य मंदिर उभारण्याचा मनोदय केला. मंदिरासाठी कालिमठ येथे जागा विकत घेऊन तेथे हे मंदिर उभं केलं. कालिकामातेचे मंदिर हे आधुनिक स्थापत्य कलेचा,शास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना आहे,जे डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. ह

it's shocking,कायम आठवणीत राहशील....

#तुझ्यासाठी_काय_लिहायचं ?  म्हणजे कोणी मला बळजबरी करत नाहीये की लिहायलाच हवंय... पण कितीतरी बॅकस्पेस घेऊन हे लेखन करतोय,काय असतं तू तुझ्या मार्गाला निघून गेलास... तुझ्यामागे तुझे घरचे,तुझा चाहता वर्ग,मित्र परिवार हे दुःखात बुडालेले आहेच.कुठेतरी माणुसकी जिवंत आहे अन् इतक्या वाईट परिस्थितीत हळहळ वाटणार नाही तो माणूस नाहीच,तेव्हा तुझ्यासाठी एक तुझा चाहता म्हणून थोडक्यात लिहण्याचा प्रयत्न... पुन्हा एकदा देव हा विषय इथेही येणारच आहे तेव्हा देवाने या दुःखातून सावरण्याची ताकद तुझ्या घरच्यांना,मित्रपरिवाराला,तुझ्या चाहत्या वर्गाला द्यावी हीच एक प्रार्थना.... तुला जे योग्य वाटले तू केलेस त्या मागे खूप काही कारणे असतील,उगाच काहीतरी शंका,अंदाज,मत,व्यक्त करून तुझ्याबद्दल बोलण्याचा अधिकार आम्हाला नाही,त्यापेक्षा मला नाही असेच म्हणेल.... यावेळी फक्त एकच म्हणेल तू घाई केलीस,हे वय नव्हते बस इतकंच.... आता हे वाक्य लिहायला पण नकोसे वाटते की मला चित्रपट,सिरियल बघायला आवडत नाही... कारण ज्याप्रमाणे बॉलीवूड विश्वातील अनेक दिग्गज कलाकार आपल्याला सोडून कायमचे अलविदा करून जात आहे,त्यावेळी अस

कविता

#गरजेच्या_काय_गोष्टी_करू_आम्ही... थोडक्यात भागून जातं आमचं सर्वच, उगाच रिकामी आश्या,खोटे स्वप्न दाखवू नका... जन्म दिला ज्याने त्यानेच चोच बनवली, खर की खोटं माहीत नाही पण त्यालाच आमची काळजी मग भागतं आमचं... ढळून गेलेल्या सूर्याला उजेडाची काय किंमत विचारावी, इथे सर्वच अंधार आहे चंद्राच्या उजेडात सुद्धा मग भागतं आमचं... आमचे हात भाजले आहेत चुलीवर कष्टाची भाकर भाजतांना, नका दाखवू इथे दोन फोटोसाठी तांदूळ वाटप होतांना इतक्यात भागतं आमचं... अन्न,वस्त्र,निवारा सर्वच मूलभूत गरजा भेटल्याय आम्हाला,सरकारचा पाच किलो तांदूळ फक्त आला आहे मूलभूत  गरजांमध्ये आम्हाला इतक्यात भागतं आमचं... बाकी काय तुम्ही मोजून घ्या फासावर गेलेल्या माझ्या शेतकऱ्यांना,लिखित चेक हातात देऊन दिला की इतक्यात भागतं आमचं... उरलंय काय भागवून घेणेच आमच्या नशिबी आयुष्यभर आता, रेशकार्डवर नाव आहे बस इतक्यात भागवून घेतो महिन्याचं आम्ही आता..! Written by, Bharat Sonwane.

Canvas....

#Canvas.... माझे कॅनव्हास वर भिजणे होत नाही,कदाचित त्याचा पाऊस अन् त्याचं भिजणे वेगळे असेल.म्हणुनच माझंही भिजणं होत नसेल,ज्याचं त्याचं कॅनव्हासवर स्वताला उतरवने वेगळं अन् सोबतीला त्याचं त्या चित्रात रंग भरण वेगळं असते.कोणाला त्या पेंटिंगच्या खूप आत जाऊन खोलात जाऊन सुरवात करायला आवडते तर कुणाला वरवर रंगाचे मुलामे देत देत तिला आवरायला आवडते.... तसेच काही जगण्याच्या या रोजच्या कसोटीच्या स्पर्धेत काही क्षण मागे सुटून जातात. कधीतरी त्यांचे सोहळे करायला आवडते तर मग कधीतरी वेळेनुसार ज्याप्रमाणे त्या गोष्टी मागे सुटल्या त्या प्रमाणे त्या सोडवून द्याव्या लागतात किंवा वाटतात,मुळात काय की वेळेनुसार सोयीचं होऊन आयुष्य जगायला लागते... जेव्हा आयुष्याचे फिरते चक्र एक वळणावर येऊन स्थिर होते,तिथेच कुठेतरी सावरायला जमावं कारण त्या वळणावर कधी आपण विसावा घेतला तर कदाचित ते आयुष्य हे कायमचे अस्थिर होऊन जाईल... कुठेतरी शब्दाचे न होता हल्ली स्वत:लाच सावरायचे असते पण नेमके इथेच चुकते,आपण शब्दांचे होऊन जातो अन् चार शब्द कुठे मनाला हायसे वाटले की त्या ठिकाणी आपण स्थिरावतो.पण हे न होता याच्या उलट आयु

D फॉर D-मार्ट....

#D_For_Dमार्ट... आता माझ्यासारखे मुलं D-मार्ट मध्ये जाऊन काय करत असतील ते मला माहित नाही. पण अलीकडे मला D-मार्ट फिरायला खूप आवडते,म्हणजे काही काम नसले की मी काहीतरी तुरळक गोष्ट घेऊन यायची म्हणून सुद्धा D-मार्टमध्ये जाऊन येतो... तुम्ही म्हणाल औरंगाबादमध्ये एवढा मोठा प्रोझोन मॉल सोडून तू काय फिरतो D-मार्ट मध्ये,तर त्यांना नाही समजणार की जी शांतता तिथे आहे,कुठली गरबड नाही ती मॉलमध्ये नाही भेटत...  मॉलमध्ये खरेदी कमी अन् फोटो काढणारे हौशे नौशे जास्त असतात म्हणून मी तिकडे जाणे प्रकर्षाने टाळतोच,आता D-मार्टला शेवटची चक्कर दोन महिने पूर्वी झाली आहे.आता त्याची खूप आठवण येत आहे, तुम्ही म्हणाल इतके काय आहे तिथे ? तर... आमचं असच आहे जिथे फारशी गरबड नाही, गर्दी आहे थोडीशी पण it's okay सगळ मनासारखं भेटत नाही,नाहीतर जा मग किराणा दुकानात.... D-मार्टमध्ये आत एन्ट्री करत्या वेळी आपली बॅग बाहेर ठेवायची असते,ती सुविधा अन्  हे सर्व हॅण्डल करणारे मित्रवर्ग सगळे भारी आहे येथे.कामाशी प्रामाणिक असलेले मस्त बिनधास्त बॅग द्यायची सोबत दिलेले कूपन खिश्यात घालायचे, मग चेकिंग करून आत जायचे भाई स्व

पहिला पाऊस....

#पहिला_पाऊस_अन्_प्रत्येकाचे_वेगवेगळे_भिजणे... पहिला पाऊस पडून बारा तास उलटून गेले अन् मी अजुनही खिडकीचा पडदा सावरत त्याला बघत बसलो आहे... अधून-मधून एखादी पावसाची सर येऊन जातेय,ती मी आलो आहे म्हणून खुणावत मला अस्वस्थ करत पुन्हा पुन्हा तीच जाणीव करून देत आहे.माझ खिडकीचा पडदा सावरणं होतं,सोबतीला पहिला पाऊस अन् कॉफी समीकरणही रात्रीच जुळुन आले आहे... अजुनही तो कॉफी कप खिडकीच्या ग्रील जवळ तसाच पडून आहे,पाऊस त्याला निमित्त मात्र की काय म्हणून त्याला भेटायला येणाऱ्या मुंग्या काही त्याला भेटायला आलेल्या नाहीये.... कसे असतं नाही का... प्रत्येकाचं पहिल्या पावसात भिजणं त्याला अनुभवणं वेगवेगळं असते,जस माझं पावसात भिजणे नसून ते फक्त आठवणीत भिजणे असते..‌. पण असो हा आठवणींचा विषय इथेच थांबवूया कारण मग दोघांचं पावसात भिजणं राहून जाईल.पहिला पाऊस आहे सो तो फार वेळ थांबणारा नाहीये,फक्त सरीवर सर तो अधून मधून बरसत राहणार आहे,आपणही वेळोवेळी एकमेकांवर बरसत राहूत.... तर पहिल्याच पावसात भर उन्हाळ्यात साथ देणारा प्राजक्त अंगणात उन्मळून पडलेला आहे. शेवटचं त्याचं बरसणे देऊन आयुष्यभर फुलांची मुक्त