मुख्य सामग्रीवर वगळा

लेखक व्यक्त होतांना...



#लेखक_व्यक्त_होतांना...


कुठेतरी शब्दांना धारदार तलवारीच्या पात्यांचे स्वरूप देऊन संविधानाला लक्षात घेऊन लिहणारा तू नामदेव ढसाळ वाटतो.तर कधी सांजेच्या प्रहरी शब्दांना चांदण्यात मोजणारा,अन् कधीतरी स्मशानात जळत्या प्रेताच्या उजेडात उडत्या विस्तवावर कविता करणार तू ग्रेस वाटतो.कधीतरी रेल्वे स्थानकात तुझ्या कविता रेल्वेच्या आवजाशी हितगुज घालू बघता,अन् तू तिथेच तुझे तारुण्यातले जीवन कवितेला वाहून देतो.तेव्हा खरच तू कवितेला शोभणारा,तिच्यासाठी असणारा बालकवी शोभतोस...

हे आणी... इतर सर्वच कवी आहेना हे जगायला शिकवतात.तुम्ही म्हणाल मी पण आता काहीतरी कवितेशी जुळवून व्यक्त होणे,अव्यक्त राहणे याबद्दल लिहत असेल तर तसे काहीही नाही.पण काय असतं जेव्हा कुठेतरी त्या क्षणाची (जो क्षण आयुष्यात बदल घडवून आणण्यासाठी झुरवत ठेवत असतो) आपल्याला जाणीव होत असते,तो तेव्हाच कृतीत व्यक्त करून मोकळे होऊन जायचे असते...

कसे आहेना,
लिहत्या हाताला आपण खूप वेळा विचारून बसतो की,
तुम्ही हे कसे लिहतात...?
कसं सुचतं..?कोणासाठी..?
असे अनेक प्रश्न...

या प्रश्नाला खरंतर उत्तरं नाही,

फक्त कुणाला विचारांना लिखित स्वरूपात व्यक्त करता येतं केव्हा करायला आवडते मग ते ज्याच्या-त्याच्या सोयीनं असते.कुणाला लिखान करूनही मनातले व्यक्त करता नाही येत जे मनात चालू असते,जे त्याला सांगायचं असते...
त्याला आपण की म्हणू शकतो मृगजळाला भासवत लिहिणे (आता इथं मृगजळच का तर ते सोयीचं वाटतं माझ्यासाठी) तो इतर जगत असतो काहीतरी अन् लिखाणातुन व्यक्त होतो काही ते काही वेगळंच....

नेमका तोच कुठेतरी या जगण्यातल्या चढाओढीला साधतो अन् यशस्वी होऊन जगतो.पण हे सर्व थोडक्यात संपणारे असते कारण त्याचं सत्यात जगणे हे मर्यादित असते,याउलट तो एक असतो जो व्यक्त करत असतो आपल्याच कवितेतून,लेखातुन आपल्या जीवनपटाला....

हे दोन्ही व्यक्ती मला खूप भावतात,अलीकडे कधीतरी लेखन स्वरूपात दिर्घ व्यक्त होणारे लेखक त्यांच्या लिखाणात खूप काही सांगत असतात.ज्यामधुन खूप काही भेटत असते यासाठी वाचत राहणे महत्त्वाचे वाटते...

हो आता
यात कसं सुचलं..?
या प्रश्नाला उत्तर नाही कारण कधीतरी तो लिखाणात त्याचं 'स्व' लिहत असतो,तर कधी कल्पनेत फुललेलं जीवन...कधी काय तर कधी काय याला उत्तर नाही,हे कसं सुचतं तर जगण्यातुन आलेला अनुभव,सभोवतालची परिस्थिती,वगैरे वगैरे खूप कारणे असतात...

लेखकाची माझ्या नजरेतून केलेली व्याख्याच अशी आहे की,डोळ्यांना दिसणाय्रा समोरील दृश्यापेक्षा,ज्याला आपल्या लिखाणातून सभोवताल बर्यापैकी समजतो व्यक्त करता येतो तो लेखक... इथं डोळ्यांना दिसणंच महत्त्वाचं नाहीये तर ते मनाला भावनं व ते बोलण्यातुन व्यक्तं करणं महत्त्वाचं वाटते,असते...

क्रमशः

Written by,

Bharat Sonwane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड