मुख्य सामग्रीवर वगळा

आयुष्याच्या या वळणावर....



कसं असते नाही का वयाची साठी ओलांडून गेली की,आयुष्यात कायमचा येऊन जाणारा हळुवारपणा हा आपल्याला भूतकाळातील आठवणींना सोबत करत जगायचा काळ असतो.
नेमकं हे तारुण्यात आपल्याला उलगडत असते,म्हातारपणाची जाणीव होत असते,थकलेले शरीर व आठवणीतले विचार घेऊन जगणारे म्हातारपण हे खूप सुंदर एका वलयात राहून हे सर्व अनुभवणे हे खूपच अलवार अशी असलेली ही प्रोसेस आहे.
याची प्रचिती काही दिवसांपूर्वी आली,तो क्षण....

पेपर बाबा पेपर...


पेपरवाल्याने दोन-तीन वेळा आवाज देऊन तो पेपर त्याने त्या गॅलरीमध्ये फेकून दिला,आणि तो पेपरवाला पुढे चालता झाला.हे सर्व दृश्य ते आजोबा किचनमध्ये जाळीचे तावदान असलेल्या खिडकीतून बघत होते...
गॅसवर तुळशीचे पान,आणि गवतीचहाची पाने घातलेला चहा ठेवलेला,सर्व किचनमध्ये त्याचा सुगंध पसरलेला होता.चहा उकळण्याचा आवाज कानावर पडतोय पण किचन ट्रॉलीमध्ये डब्ब्यात ठेवलेले बिस्कीट काही भेटत नव्हते,अखेर बरीच शोधाशोध आणि डब्बे उघडून बघितल्यावर एका डब्ब्यात बिस्कीट सापडले अन् जरासा उशीर झाला असता तर चहा उतू गेला असता हे ही कळाले.गॅस कमी करत चहा हलवून कपात ओतली आणि सुटकेचा श्वास त्यांनी सोडला,हो सोडलाच हल्ली अलीकडे काही दिवसांत खूप सहज दम लागून जातो त्यांना...

काहीवेळ तसेच बसून राहिल्यावर कपबशीमध्ये ओतलेला चहा थरथरत्या हाताने हॉलमध्ये घेऊन ते आले आणि चहाचा फक्कड स्वाद घेत बसले,चहामुळे आलेले हावभाव त्यांच्या चेहऱ्यावर तरळत होते.हॉलमध्ये असलेला मनीप्लॅन खूप वाढला आहे अन् रात्री त्यामुळे मच्छर चावतात त्यामुळे त्याची कटाई करून घ्यावी लागणार आहे,हा ही विचार त्यांच्या मनात येऊन गेला...
हे त्यांच्या हावभावावरून स्पष्ट झाले होते...

बिस्कीट आणि फक्कड चहा घेऊन शरीरात जरा तरतरी आल्यासारखे वाटले म्हणून,मग ते आजोबा गॅलरीत पडलेला पेपर आणायला गेले.रात्रीच पाऊस येऊन गेल्यामुळे वातावरणात मस्त उगवत्या सूर्याच्या सोबतीला गर्मी निर्माण झालेली आहे गॅलरीत बरेच पाने,सदाफुलीचे फुलं पडलेली आहेत आणि लाईटच्या उजेडामुळे रात्री माश्यांना आलेले पंख अन् त्यांचा बराच सडा पडलेला होता अलीकडे कंबर साथ देत नाही पण झाडून घेणे हे त्यांचे नित्याचेच होते...

आज जरा आजोबा खुशच होते कारण की,पेपरमध्ये त्यांनी लिहलेला लेख छापून आलेला होता अन् ही शुभवार्ता मला काल रात्रीच संपादक साहेबांनी दिलेली होती,त्यामुळे सकाळी मी पण वाटच बघत होतो पेपरची... आजोबा पेपर हॉलमध्ये घेऊन आले आणि पहिले त्याला नीटनेटके स्टेपलर करून घेतले ही त्यांची नित्याची सवय आहे,त्यांना पेपर वाचतानी अस्तव्यस्त झालेला कधीच आवडलेला नाही...

त्यामुळे तो स्टेपलर करणे,नीटनेटका घडी घालून ठेवणे हे ते नियमित करत आले जेव्हा पेपरची रद्दी विकायची असते तेव्हाही ती रद्दी ते व्यवस्थित बांधून देत असतात. कारण पेपर खूप काही शिकवत असतो त्यांच्यासारख्या म्हाताऱ्या माणसांना,हळुवार जगण्याचा तो एक आधारच असतो त्यांच्यासाठी...

पहिले पेपरमध्ये छापून आलेला त्यांचा लेख बघितला आणि आनंद झाला हे माझ्यासाठी नवे नव्हते पण फार जूनेही नव्हते,आजोबासारख्या म्हाताऱ्याचे लेखन आज कित्येक तरुण वाचून आनंदी होणार हे खूप काही देणारे होते माझ्यासाठी.कारण ते नवोदित लेखकांसाठी प्रेरणादायी असते...
प्रत्येक पेज वाचून झाले सोबत आलेली आवडती पुरवणी अन् त्यातील काही ठराविक लेख यांची कात्रणे काढून वहीत चीपकवून ठेवली,आणि पेपर घडी करून ठेऊन दिला आज मी खुश होतो....

Written by,

Bharat Sonwane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...