मुख्य सामग्रीवर वगळा

आयुष्याच्या या वळणावर....



कसं असते नाही का वयाची साठी ओलांडून गेली की,आयुष्यात कायमचा येऊन जाणारा हळुवारपणा हा आपल्याला भूतकाळातील आठवणींना सोबत करत जगायचा काळ असतो.
नेमकं हे तारुण्यात आपल्याला उलगडत असते,म्हातारपणाची जाणीव होत असते,थकलेले शरीर व आठवणीतले विचार घेऊन जगणारे म्हातारपण हे खूप सुंदर एका वलयात राहून हे सर्व अनुभवणे हे खूपच अलवार अशी असलेली ही प्रोसेस आहे.
याची प्रचिती काही दिवसांपूर्वी आली,तो क्षण....

पेपर बाबा पेपर...


पेपरवाल्याने दोन-तीन वेळा आवाज देऊन तो पेपर त्याने त्या गॅलरीमध्ये फेकून दिला,आणि तो पेपरवाला पुढे चालता झाला.हे सर्व दृश्य ते आजोबा किचनमध्ये जाळीचे तावदान असलेल्या खिडकीतून बघत होते...
गॅसवर तुळशीचे पान,आणि गवतीचहाची पाने घातलेला चहा ठेवलेला,सर्व किचनमध्ये त्याचा सुगंध पसरलेला होता.चहा उकळण्याचा आवाज कानावर पडतोय पण किचन ट्रॉलीमध्ये डब्ब्यात ठेवलेले बिस्कीट काही भेटत नव्हते,अखेर बरीच शोधाशोध आणि डब्बे उघडून बघितल्यावर एका डब्ब्यात बिस्कीट सापडले अन् जरासा उशीर झाला असता तर चहा उतू गेला असता हे ही कळाले.गॅस कमी करत चहा हलवून कपात ओतली आणि सुटकेचा श्वास त्यांनी सोडला,हो सोडलाच हल्ली अलीकडे काही दिवसांत खूप सहज दम लागून जातो त्यांना...

काहीवेळ तसेच बसून राहिल्यावर कपबशीमध्ये ओतलेला चहा थरथरत्या हाताने हॉलमध्ये घेऊन ते आले आणि चहाचा फक्कड स्वाद घेत बसले,चहामुळे आलेले हावभाव त्यांच्या चेहऱ्यावर तरळत होते.हॉलमध्ये असलेला मनीप्लॅन खूप वाढला आहे अन् रात्री त्यामुळे मच्छर चावतात त्यामुळे त्याची कटाई करून घ्यावी लागणार आहे,हा ही विचार त्यांच्या मनात येऊन गेला...
हे त्यांच्या हावभावावरून स्पष्ट झाले होते...

बिस्कीट आणि फक्कड चहा घेऊन शरीरात जरा तरतरी आल्यासारखे वाटले म्हणून,मग ते आजोबा गॅलरीत पडलेला पेपर आणायला गेले.रात्रीच पाऊस येऊन गेल्यामुळे वातावरणात मस्त उगवत्या सूर्याच्या सोबतीला गर्मी निर्माण झालेली आहे गॅलरीत बरेच पाने,सदाफुलीचे फुलं पडलेली आहेत आणि लाईटच्या उजेडामुळे रात्री माश्यांना आलेले पंख अन् त्यांचा बराच सडा पडलेला होता अलीकडे कंबर साथ देत नाही पण झाडून घेणे हे त्यांचे नित्याचेच होते...

आज जरा आजोबा खुशच होते कारण की,पेपरमध्ये त्यांनी लिहलेला लेख छापून आलेला होता अन् ही शुभवार्ता मला काल रात्रीच संपादक साहेबांनी दिलेली होती,त्यामुळे सकाळी मी पण वाटच बघत होतो पेपरची... आजोबा पेपर हॉलमध्ये घेऊन आले आणि पहिले त्याला नीटनेटके स्टेपलर करून घेतले ही त्यांची नित्याची सवय आहे,त्यांना पेपर वाचतानी अस्तव्यस्त झालेला कधीच आवडलेला नाही...

त्यामुळे तो स्टेपलर करणे,नीटनेटका घडी घालून ठेवणे हे ते नियमित करत आले जेव्हा पेपरची रद्दी विकायची असते तेव्हाही ती रद्दी ते व्यवस्थित बांधून देत असतात. कारण पेपर खूप काही शिकवत असतो त्यांच्यासारख्या म्हाताऱ्या माणसांना,हळुवार जगण्याचा तो एक आधारच असतो त्यांच्यासाठी...

पहिले पेपरमध्ये छापून आलेला त्यांचा लेख बघितला आणि आनंद झाला हे माझ्यासाठी नवे नव्हते पण फार जूनेही नव्हते,आजोबासारख्या म्हाताऱ्याचे लेखन आज कित्येक तरुण वाचून आनंदी होणार हे खूप काही देणारे होते माझ्यासाठी.कारण ते नवोदित लेखकांसाठी प्रेरणादायी असते...
प्रत्येक पेज वाचून झाले सोबत आलेली आवडती पुरवणी अन् त्यातील काही ठराविक लेख यांची कात्रणे काढून वहीत चीपकवून ठेवली,आणि पेपर घडी करून ठेऊन दिला आज मी खुश होतो....

Written by,

Bharat Sonwane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड