मुख्य सामग्रीवर वगळा

आयुष्याच्या या वळणावर....



कसं असते नाही का वयाची साठी ओलांडून गेली की,आयुष्यात कायमचा येऊन जाणारा हळुवारपणा हा आपल्याला भूतकाळातील आठवणींना सोबत करत जगायचा काळ असतो.
नेमकं हे तारुण्यात आपल्याला उलगडत असते,म्हातारपणाची जाणीव होत असते,थकलेले शरीर व आठवणीतले विचार घेऊन जगणारे म्हातारपण हे खूप सुंदर एका वलयात राहून हे सर्व अनुभवणे हे खूपच अलवार अशी असलेली ही प्रोसेस आहे.
याची प्रचिती काही दिवसांपूर्वी आली,तो क्षण....

पेपर बाबा पेपर...


पेपरवाल्याने दोन-तीन वेळा आवाज देऊन तो पेपर त्याने त्या गॅलरीमध्ये फेकून दिला,आणि तो पेपरवाला पुढे चालता झाला.हे सर्व दृश्य ते आजोबा किचनमध्ये जाळीचे तावदान असलेल्या खिडकीतून बघत होते...
गॅसवर तुळशीचे पान,आणि गवतीचहाची पाने घातलेला चहा ठेवलेला,सर्व किचनमध्ये त्याचा सुगंध पसरलेला होता.चहा उकळण्याचा आवाज कानावर पडतोय पण किचन ट्रॉलीमध्ये डब्ब्यात ठेवलेले बिस्कीट काही भेटत नव्हते,अखेर बरीच शोधाशोध आणि डब्बे उघडून बघितल्यावर एका डब्ब्यात बिस्कीट सापडले अन् जरासा उशीर झाला असता तर चहा उतू गेला असता हे ही कळाले.गॅस कमी करत चहा हलवून कपात ओतली आणि सुटकेचा श्वास त्यांनी सोडला,हो सोडलाच हल्ली अलीकडे काही दिवसांत खूप सहज दम लागून जातो त्यांना...

काहीवेळ तसेच बसून राहिल्यावर कपबशीमध्ये ओतलेला चहा थरथरत्या हाताने हॉलमध्ये घेऊन ते आले आणि चहाचा फक्कड स्वाद घेत बसले,चहामुळे आलेले हावभाव त्यांच्या चेहऱ्यावर तरळत होते.हॉलमध्ये असलेला मनीप्लॅन खूप वाढला आहे अन् रात्री त्यामुळे मच्छर चावतात त्यामुळे त्याची कटाई करून घ्यावी लागणार आहे,हा ही विचार त्यांच्या मनात येऊन गेला...
हे त्यांच्या हावभावावरून स्पष्ट झाले होते...

बिस्कीट आणि फक्कड चहा घेऊन शरीरात जरा तरतरी आल्यासारखे वाटले म्हणून,मग ते आजोबा गॅलरीत पडलेला पेपर आणायला गेले.रात्रीच पाऊस येऊन गेल्यामुळे वातावरणात मस्त उगवत्या सूर्याच्या सोबतीला गर्मी निर्माण झालेली आहे गॅलरीत बरेच पाने,सदाफुलीचे फुलं पडलेली आहेत आणि लाईटच्या उजेडामुळे रात्री माश्यांना आलेले पंख अन् त्यांचा बराच सडा पडलेला होता अलीकडे कंबर साथ देत नाही पण झाडून घेणे हे त्यांचे नित्याचेच होते...

आज जरा आजोबा खुशच होते कारण की,पेपरमध्ये त्यांनी लिहलेला लेख छापून आलेला होता अन् ही शुभवार्ता मला काल रात्रीच संपादक साहेबांनी दिलेली होती,त्यामुळे सकाळी मी पण वाटच बघत होतो पेपरची... आजोबा पेपर हॉलमध्ये घेऊन आले आणि पहिले त्याला नीटनेटके स्टेपलर करून घेतले ही त्यांची नित्याची सवय आहे,त्यांना पेपर वाचतानी अस्तव्यस्त झालेला कधीच आवडलेला नाही...

त्यामुळे तो स्टेपलर करणे,नीटनेटका घडी घालून ठेवणे हे ते नियमित करत आले जेव्हा पेपरची रद्दी विकायची असते तेव्हाही ती रद्दी ते व्यवस्थित बांधून देत असतात. कारण पेपर खूप काही शिकवत असतो त्यांच्यासारख्या म्हाताऱ्या माणसांना,हळुवार जगण्याचा तो एक आधारच असतो त्यांच्यासाठी...

पहिले पेपरमध्ये छापून आलेला त्यांचा लेख बघितला आणि आनंद झाला हे माझ्यासाठी नवे नव्हते पण फार जूनेही नव्हते,आजोबासारख्या म्हाताऱ्याचे लेखन आज कित्येक तरुण वाचून आनंदी होणार हे खूप काही देणारे होते माझ्यासाठी.कारण ते नवोदित लेखकांसाठी प्रेरणादायी असते...
प्रत्येक पेज वाचून झाले सोबत आलेली आवडती पुरवणी अन् त्यातील काही ठराविक लेख यांची कात्रणे काढून वहीत चीपकवून ठेवली,आणि पेपर घडी करून ठेऊन दिला आज मी खुश होतो....

Written by,

Bharat Sonwane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...