मुख्य सामग्रीवर वगळा

पहिला पाऊस....



#पहिला_पाऊस_अन्_प्रत्येकाचे_वेगवेगळे_भिजणे...


पहिला पाऊस पडून बारा तास उलटून गेले अन् मी अजुनही खिडकीचा पडदा सावरत त्याला बघत बसलो आहे...
अधून-मधून एखादी पावसाची सर येऊन जातेय,ती मी आलो आहे म्हणून खुणावत मला अस्वस्थ करत पुन्हा पुन्हा तीच जाणीव करून देत आहे.माझ खिडकीचा पडदा सावरणं होतं,सोबतीला पहिला पाऊस अन् कॉफी समीकरणही रात्रीच जुळुन आले आहे...
अजुनही तो कॉफी कप खिडकीच्या ग्रील जवळ तसाच पडून आहे,पाऊस त्याला निमित्त मात्र की काय म्हणून त्याला भेटायला येणाऱ्या मुंग्या काही त्याला भेटायला आलेल्या नाहीये....

कसे असतं नाही का...
प्रत्येकाचं पहिल्या पावसात भिजणं त्याला अनुभवणं वेगवेगळं असते,जस माझं पावसात भिजणे नसून ते फक्त आठवणीत भिजणे असते..‌.
पण असो हा आठवणींचा विषय इथेच थांबवूया कारण मग दोघांचं पावसात भिजणं राहून जाईल.पहिला पाऊस आहे सो तो फार वेळ थांबणारा नाहीये,फक्त सरीवर सर तो अधून मधून बरसत राहणार आहे,आपणही वेळोवेळी एकमेकांवर बरसत राहूत....

तर पहिल्याच पावसात भर उन्हाळ्यात साथ देणारा प्राजक्त अंगणात उन्मळून पडलेला आहे.
शेवटचं त्याचं बरसणे देऊन आयुष्यभर फुलांची मुक्त उधळण करून त्याचा मोसम संपल्याची जाणीव करून देत तो उन्मळून मोडून गेला आहे...त्याचं भिजनं किती वाईट आहे हे तो दाखवून कायमचा सोडून गेला आहे...

इथे प्रत्येकाचं पाऊस अनुभवणे वेगळं आहे...माझा पाऊस आठवणी घेऊन,भविष्यातील स्वप्नांची मुक्त उधळण करणारा आहे...

तर...
त्या झोपडीत काल रात्री अंधारात त्यांना पाऊस अनुभवता आला की नाही हे समजलेच नाही,पण सकाळी सकाळी त्या झोपडीतून पावसावर शिव्यांच्या रुपात बरसणे चालू होते...
कारण तिचा पाऊस अनुभवणे वेगळा आहे,तिला बरसलेला पाऊस अन् अंधारलेलं समोर दिसणारं अस्तित्व धडकी भरवत राहतं,तिला माणसाने बरसने खूप आवडते...हे नाही कळणार तुम्हाला हे गणित जुळवणे थोडे वेगळे आहे...

रस्त्यावर चालणाऱ्या त्या वाटसरूचा पहिला पाऊस वेगळाच आहे,अख्खी रात्र येणाऱ्या पावसाच्या सरिवर सरी त्या प्लास्टिकच्या पान कापडाला सावरण्यातच त्याची निघून गेली आहे...उन्हाळ्यात काळे पडलेले त्याचे तळवे पांढरे शुभ्र चमकत आहे,त्यालाही बगळ्यासारखे पंख फुटले की काय असे वाटून गेले...
त्याचा मार्ग अन् त्याचं मार्गस्थ होणं हेच काय ते खर आहे,हाच त्याचा पहिला पाऊस हेच त्याचं बरसने पूर्ण पावसाळा इथून पुढे कारण त्याला त्याची शेवटची सीमा भेटली जगण्यासाठी जगत नाही तो तर मरण अनुभवण्यसाठी जगतो तो...

रात्री पाऊस बरसत होता अन् अंधारलेल्या खिडकीतून बाहेर असलेल्या खांबावरच्या लाईटच्या उजेडात मोत्याप्रमाणे दिसणारे पावसाचे थेंब तो बघत मनातच द्विधा मनस्थितीत तो गेला आहे...तो मनाशीच बोलू लागला आहे लागवडीचा,वखर-फाट्याचा होणारा खर्च याची वजबाकी,बेरीज तो करू लागला आहे,पण गणित काही जुळत नाहीये अन् त्याची चिडचिड होत आहे...
इतकेच कमी की काय म्हणून,एक प्रश्न त्याच्या उत्तराची वाट बघत आहे

लागवड करायची की नाही ?

कारण दुसऱ्यांदा पेरणी करायचा खर्च यावर्षी त्याला पेलवणारा नाहीये, लोकं म्हणतात शेतकरी राजा खुश झाला जेव्हा पहिला पाऊस आला...पण असं काही नसते,तो मात्र आतून खूप अस्वस्थ झालेला असतो,या काही दिवसात तो तोंडावर फक्त खोटं हसू घेऊन मिरवत असतो.
ज्याला हे उमगत नाही त्याला शेतकरी कळला नाही...
तो खूश तेव्हाच असतो जेव्हा पावसात त्याचं रुजवलेले सर्व बी-बियाणे बाळसं स्वीकारू लागतं...तर इथ त्याचं भिजनं सुद्धा खोटं अन् तोंडावर खुशीचा खोटा आव आणत जगण्याचं असते....

त्यांचा पाऊस अनुभवने वेगळाच,खडतर आहे.
समुद्र किनारी वादळ सुटलेलं,बोटी स्थिर झाल्या आहे,समुद्रात उंच उंच लाठा येत आहे,त्याचं दिसणारे भीषण रौद्र रूप काळीज धडकवणारे आहे...
अश्या या परिस्थती सुद्धा किनारी उभे राहून कर्तव्य बजावणाऱ्या माझा भावांचा पाऊस अनुभवणे सुद्धा वेगळाच आहे...
त्यांचं भिजणे हे वेगळच आहे,जिथे स्वार्थ नाही जगण्यासाठी असलेली मरणाची स्पर्धा नाही.फक्त एकच माझा देश सुरक्षित कसा राहील,तासंतास     सेफ्टी जॉकेट नावाला घालून दुरून दिसणारं संकटाला तोंड देत येणाऱ्या संकटावर बरसत राहणं हे वेगळ आहे अन् ते त्यांना आपल करणारं आहे....

Written by,

Bharat Sonwane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड