मुख्य सामग्रीवर वगळा

पहिला पाऊस....



#पहिला_पाऊस_अन्_प्रत्येकाचे_वेगवेगळे_भिजणे...


पहिला पाऊस पडून बारा तास उलटून गेले अन् मी अजुनही खिडकीचा पडदा सावरत त्याला बघत बसलो आहे...
अधून-मधून एखादी पावसाची सर येऊन जातेय,ती मी आलो आहे म्हणून खुणावत मला अस्वस्थ करत पुन्हा पुन्हा तीच जाणीव करून देत आहे.माझ खिडकीचा पडदा सावरणं होतं,सोबतीला पहिला पाऊस अन् कॉफी समीकरणही रात्रीच जुळुन आले आहे...
अजुनही तो कॉफी कप खिडकीच्या ग्रील जवळ तसाच पडून आहे,पाऊस त्याला निमित्त मात्र की काय म्हणून त्याला भेटायला येणाऱ्या मुंग्या काही त्याला भेटायला आलेल्या नाहीये....

कसे असतं नाही का...
प्रत्येकाचं पहिल्या पावसात भिजणं त्याला अनुभवणं वेगवेगळं असते,जस माझं पावसात भिजणे नसून ते फक्त आठवणीत भिजणे असते..‌.
पण असो हा आठवणींचा विषय इथेच थांबवूया कारण मग दोघांचं पावसात भिजणं राहून जाईल.पहिला पाऊस आहे सो तो फार वेळ थांबणारा नाहीये,फक्त सरीवर सर तो अधून मधून बरसत राहणार आहे,आपणही वेळोवेळी एकमेकांवर बरसत राहूत....

तर पहिल्याच पावसात भर उन्हाळ्यात साथ देणारा प्राजक्त अंगणात उन्मळून पडलेला आहे.
शेवटचं त्याचं बरसणे देऊन आयुष्यभर फुलांची मुक्त उधळण करून त्याचा मोसम संपल्याची जाणीव करून देत तो उन्मळून मोडून गेला आहे...त्याचं भिजनं किती वाईट आहे हे तो दाखवून कायमचा सोडून गेला आहे...

इथे प्रत्येकाचं पाऊस अनुभवणे वेगळं आहे...माझा पाऊस आठवणी घेऊन,भविष्यातील स्वप्नांची मुक्त उधळण करणारा आहे...

तर...
त्या झोपडीत काल रात्री अंधारात त्यांना पाऊस अनुभवता आला की नाही हे समजलेच नाही,पण सकाळी सकाळी त्या झोपडीतून पावसावर शिव्यांच्या रुपात बरसणे चालू होते...
कारण तिचा पाऊस अनुभवणे वेगळा आहे,तिला बरसलेला पाऊस अन् अंधारलेलं समोर दिसणारं अस्तित्व धडकी भरवत राहतं,तिला माणसाने बरसने खूप आवडते...हे नाही कळणार तुम्हाला हे गणित जुळवणे थोडे वेगळे आहे...

रस्त्यावर चालणाऱ्या त्या वाटसरूचा पहिला पाऊस वेगळाच आहे,अख्खी रात्र येणाऱ्या पावसाच्या सरिवर सरी त्या प्लास्टिकच्या पान कापडाला सावरण्यातच त्याची निघून गेली आहे...उन्हाळ्यात काळे पडलेले त्याचे तळवे पांढरे शुभ्र चमकत आहे,त्यालाही बगळ्यासारखे पंख फुटले की काय असे वाटून गेले...
त्याचा मार्ग अन् त्याचं मार्गस्थ होणं हेच काय ते खर आहे,हाच त्याचा पहिला पाऊस हेच त्याचं बरसने पूर्ण पावसाळा इथून पुढे कारण त्याला त्याची शेवटची सीमा भेटली जगण्यासाठी जगत नाही तो तर मरण अनुभवण्यसाठी जगतो तो...

रात्री पाऊस बरसत होता अन् अंधारलेल्या खिडकीतून बाहेर असलेल्या खांबावरच्या लाईटच्या उजेडात मोत्याप्रमाणे दिसणारे पावसाचे थेंब तो बघत मनातच द्विधा मनस्थितीत तो गेला आहे...तो मनाशीच बोलू लागला आहे लागवडीचा,वखर-फाट्याचा होणारा खर्च याची वजबाकी,बेरीज तो करू लागला आहे,पण गणित काही जुळत नाहीये अन् त्याची चिडचिड होत आहे...
इतकेच कमी की काय म्हणून,एक प्रश्न त्याच्या उत्तराची वाट बघत आहे

लागवड करायची की नाही ?

कारण दुसऱ्यांदा पेरणी करायचा खर्च यावर्षी त्याला पेलवणारा नाहीये, लोकं म्हणतात शेतकरी राजा खुश झाला जेव्हा पहिला पाऊस आला...पण असं काही नसते,तो मात्र आतून खूप अस्वस्थ झालेला असतो,या काही दिवसात तो तोंडावर फक्त खोटं हसू घेऊन मिरवत असतो.
ज्याला हे उमगत नाही त्याला शेतकरी कळला नाही...
तो खूश तेव्हाच असतो जेव्हा पावसात त्याचं रुजवलेले सर्व बी-बियाणे बाळसं स्वीकारू लागतं...तर इथ त्याचं भिजनं सुद्धा खोटं अन् तोंडावर खुशीचा खोटा आव आणत जगण्याचं असते....

त्यांचा पाऊस अनुभवने वेगळाच,खडतर आहे.
समुद्र किनारी वादळ सुटलेलं,बोटी स्थिर झाल्या आहे,समुद्रात उंच उंच लाठा येत आहे,त्याचं दिसणारे भीषण रौद्र रूप काळीज धडकवणारे आहे...
अश्या या परिस्थती सुद्धा किनारी उभे राहून कर्तव्य बजावणाऱ्या माझा भावांचा पाऊस अनुभवणे सुद्धा वेगळाच आहे...
त्यांचं भिजणे हे वेगळच आहे,जिथे स्वार्थ नाही जगण्यासाठी असलेली मरणाची स्पर्धा नाही.फक्त एकच माझा देश सुरक्षित कसा राहील,तासंतास     सेफ्टी जॉकेट नावाला घालून दुरून दिसणारं संकटाला तोंड देत येणाऱ्या संकटावर बरसत राहणं हे वेगळ आहे अन् ते त्यांना आपल करणारं आहे....

Written by,

Bharat Sonwane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...