मुख्य सामग्रीवर वगळा

Canvas....



#Canvas....


माझे कॅनव्हास वर भिजणे होत नाही,कदाचित त्याचा पाऊस अन् त्याचं भिजणे वेगळे असेल.म्हणुनच माझंही भिजणं होत नसेल,ज्याचं त्याचं कॅनव्हासवर स्वताला उतरवने वेगळं अन् सोबतीला त्याचं त्या चित्रात रंग भरण वेगळं असते.कोणाला त्या पेंटिंगच्या खूप आत जाऊन खोलात जाऊन सुरवात करायला आवडते तर कुणाला वरवर रंगाचे मुलामे देत देत तिला आवरायला आवडते....
तसेच काही जगण्याच्या या रोजच्या कसोटीच्या स्पर्धेत काही क्षण मागे सुटून जातात. कधीतरी त्यांचे सोहळे करायला आवडते तर मग कधीतरी वेळेनुसार ज्याप्रमाणे त्या गोष्टी मागे सुटल्या त्या प्रमाणे त्या सोडवून द्याव्या लागतात किंवा वाटतात,मुळात काय की वेळेनुसार सोयीचं होऊन आयुष्य जगायला लागते...

जेव्हा आयुष्याचे फिरते चक्र एक वळणावर येऊन स्थिर होते,तिथेच कुठेतरी सावरायला जमावं कारण त्या वळणावर कधी आपण विसावा घेतला तर कदाचित ते आयुष्य हे कायमचे अस्थिर होऊन जाईल...
कुठेतरी शब्दाचे न होता हल्ली स्वत:लाच सावरायचे असते पण नेमके इथेच चुकते,आपण शब्दांचे होऊन जातो अन् चार शब्द कुठे मनाला हायसे वाटले की त्या ठिकाणी आपण स्थिरावतो.पण हे न होता याच्या उलट आयुष्यात एक टर्निंग पॉइंट समजून पुढे चालत जायला यावे...

कॅनव्हास वर सगळ्यांना व्यक्त होता येत नाही असे नाही,पण प्रत्येकाचं व्यक्त होणे वेगवेगळे आहे. कुणालातरी तो धूसर झालेला कलर फक्त ब्रशला नको म्हणून तो अस्वस्थ आकृतीत कॅनव्हासवर उधुळून मोकळे व्हायचे असते,यात तो चित्रकार असतो जो ज्याला याच्यात सुद्धा एक चित्र दिसते...
अन् एक तो असतो की,ज्याला ती फक्त एक वेडीवाकडी आकृती भासत असते....

हल्ली जेव्हा कॅनव्हासचा विषय निघतो ना आमच्यात तेव्हा तो फक्त चित्रापर्यंत मर्यादित न राहता,त्याला आयुष्याची जोड देऊन बघणे जास्तच होते.त्याचं आयुष्य म्हणजे कॅनव्हासला जोडून असणारे सर्व कलर्स सारखं भासणारं आहे पाण्यात जसे अन् ज्याच्यासोबत मिसळले की,त्याचे होऊन जायचे अन् पुन्हा त्या एकत्रित एका सुंदर चित्रात आपले दुसरे हरवलेले अस्तित्व शोधत त्याला एक ठराविक नाव देऊन ओळख निर्माण करायची हेच काय ते आयुष्य....

हा प्रवास इथवरचाच असतो पण पुढे त्याचं एक स्वतंत्र अस्तित्व अन् चित्रकाराने दिलेलं त्याला एक नाव,ओळख हे खरेच वाखण्यासारखे आहे...याला आयुष्याशी जोड देऊन बघणे किती योग्य माहीत नाही,पण अलीकडे काळाच्या एका टप्प्यावर येऊन जेव्हा बघतो तेव्हा कॅनव्हास वरचे चित्र असो की आयुष्यातले अनेक अडथळे अन् त्यांना स्वीकारून शेवटी मिळालेलं स्थिर आयुष्य...याचच हे आगळेवेगळे स्थित्यंतर आहे ही जाणीव होते किंवा ते विचार जुळवून येऊन जातात....

शेवटी काय कॅनव्हास वर भिजणे असो की,आयुष्यात असलेल्या प्रश्नांमध्ये एकच आहे...
फक्त ज्याचं त्याच ते वेगळे आहे ...

Written by,
Bharat Sonwane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड