मुख्य सामग्रीवर वगळा

Canvas....



#Canvas....


माझे कॅनव्हास वर भिजणे होत नाही,कदाचित त्याचा पाऊस अन् त्याचं भिजणे वेगळे असेल.म्हणुनच माझंही भिजणं होत नसेल,ज्याचं त्याचं कॅनव्हासवर स्वताला उतरवने वेगळं अन् सोबतीला त्याचं त्या चित्रात रंग भरण वेगळं असते.कोणाला त्या पेंटिंगच्या खूप आत जाऊन खोलात जाऊन सुरवात करायला आवडते तर कुणाला वरवर रंगाचे मुलामे देत देत तिला आवरायला आवडते....
तसेच काही जगण्याच्या या रोजच्या कसोटीच्या स्पर्धेत काही क्षण मागे सुटून जातात. कधीतरी त्यांचे सोहळे करायला आवडते तर मग कधीतरी वेळेनुसार ज्याप्रमाणे त्या गोष्टी मागे सुटल्या त्या प्रमाणे त्या सोडवून द्याव्या लागतात किंवा वाटतात,मुळात काय की वेळेनुसार सोयीचं होऊन आयुष्य जगायला लागते...

जेव्हा आयुष्याचे फिरते चक्र एक वळणावर येऊन स्थिर होते,तिथेच कुठेतरी सावरायला जमावं कारण त्या वळणावर कधी आपण विसावा घेतला तर कदाचित ते आयुष्य हे कायमचे अस्थिर होऊन जाईल...
कुठेतरी शब्दाचे न होता हल्ली स्वत:लाच सावरायचे असते पण नेमके इथेच चुकते,आपण शब्दांचे होऊन जातो अन् चार शब्द कुठे मनाला हायसे वाटले की त्या ठिकाणी आपण स्थिरावतो.पण हे न होता याच्या उलट आयुष्यात एक टर्निंग पॉइंट समजून पुढे चालत जायला यावे...

कॅनव्हास वर सगळ्यांना व्यक्त होता येत नाही असे नाही,पण प्रत्येकाचं व्यक्त होणे वेगवेगळे आहे. कुणालातरी तो धूसर झालेला कलर फक्त ब्रशला नको म्हणून तो अस्वस्थ आकृतीत कॅनव्हासवर उधुळून मोकळे व्हायचे असते,यात तो चित्रकार असतो जो ज्याला याच्यात सुद्धा एक चित्र दिसते...
अन् एक तो असतो की,ज्याला ती फक्त एक वेडीवाकडी आकृती भासत असते....

हल्ली जेव्हा कॅनव्हासचा विषय निघतो ना आमच्यात तेव्हा तो फक्त चित्रापर्यंत मर्यादित न राहता,त्याला आयुष्याची जोड देऊन बघणे जास्तच होते.त्याचं आयुष्य म्हणजे कॅनव्हासला जोडून असणारे सर्व कलर्स सारखं भासणारं आहे पाण्यात जसे अन् ज्याच्यासोबत मिसळले की,त्याचे होऊन जायचे अन् पुन्हा त्या एकत्रित एका सुंदर चित्रात आपले दुसरे हरवलेले अस्तित्व शोधत त्याला एक ठराविक नाव देऊन ओळख निर्माण करायची हेच काय ते आयुष्य....

हा प्रवास इथवरचाच असतो पण पुढे त्याचं एक स्वतंत्र अस्तित्व अन् चित्रकाराने दिलेलं त्याला एक नाव,ओळख हे खरेच वाखण्यासारखे आहे...याला आयुष्याशी जोड देऊन बघणे किती योग्य माहीत नाही,पण अलीकडे काळाच्या एका टप्प्यावर येऊन जेव्हा बघतो तेव्हा कॅनव्हास वरचे चित्र असो की आयुष्यातले अनेक अडथळे अन् त्यांना स्वीकारून शेवटी मिळालेलं स्थिर आयुष्य...याचच हे आगळेवेगळे स्थित्यंतर आहे ही जाणीव होते किंवा ते विचार जुळवून येऊन जातात....

शेवटी काय कॅनव्हास वर भिजणे असो की,आयुष्यात असलेल्या प्रश्नांमध्ये एकच आहे...
फक्त ज्याचं त्याच ते वेगळे आहे ...

Written by,
Bharat Sonwane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...