मुख्य सामग्रीवर वगळा

पत्रास कारण की,



प्रिय,

पत्रास कारण की,


काल-परवापासून शिवना नदीच्या पुला खालून पाणी वाहते झाले आहे अन् नेमकाच आषाढ लागलेला आहे...
अंगणातले झाडे आता बहरलीये आणि त्यामुळे मंदिरात फारसा पालापाचोळा होत नाहीये,मंदिराचा परिसर स्वच्छ राहत आहे.कधीतरी सोसाट्याचा वारा आला की,मग चिंता सतावते कारण काही झाडांची उंची फार वाढलेली आहे तसेच पाने,फुले,फळे पडून खराब होऊन जातात...
मी या मताचा आहे की झाडांची फुले,फळे हे पूर्णपणे तयार होण्यापर्यंत झाडावरच असावी हल्ली ते शक्य होत नाहीये...

मलाही दुःख होतेच पण काय करणार अग्नी,जल,आणि वारा यांच्याशी वैर करून आपले काहीही साध्य होत नाही याची मला जाणीव आहे.त्यामुळे मी त्यात फारसा पडत नाही...
हो मात्र नित्य नियमाने ठरवून दिलेल्या वेळीत सकाळ  मंदिर आवारातील सर्वच मी सेवाभावे झाडून,पुसून घेत असतो.आता तब्येत साथ देत नाही पण,माझा श्वास आहे तोवर हे मला चुकणार नाहीये....

काल राच्याला एकदमच सोसाट्याच्या वार्यासह पाऊस बरसू लागला,ओसरीत झोपलेलो मी खिडकीतून येणाऱ्या पावसाच्या थेंबांनी जागा झालो...
उठताच पोटात कळ येऊन गेली,माहीत नाही पण हल्ली पोटपाठ यांचे खोबऱ्याच्या खावटा प्रमाणे झाले आहे,पोटपाठ एकत्र झाले आहे.पोटाचे वरचे कातडे खालच्या कातड्याला चीपकुन जाते हल्ली तब्येत साथ देत नाही,पण सेवेत खंड नको म्हणून सर्व सहन करून घेत असतो...

सांगायचेच बघ कालच ओसरीच्या परिसरात मन रमावे म्हणून मी तीन तुळशीचे रोपे,नऊ मोगर्याचे अन् काही सुटे कलम लावले आहेत...
आनंदाची वार्ता म्हणू की काय पण कालच माझं दुपारी एक पुस्तक वाचून पूर्ण झाले,अन् आज श्लोकने मला दुसरे पुस्तक भेट दिले दुपारपासून त्याचे वाचन सुर्वात करणार आहे...

हल्ली पाऊस पडत असला की पुस्तक वाचन करताना खूप छान वाटते,जुन्या देवांच्या मुर्त्या ठेवलेल्या लाकडी घरात येऊन मी मोडकळीस आलेल्या पालखीत मऊ गादीवर बसून वाचत असतो...
हे स्वर्ग सुख मंदिरात अनुभवायला भेटत आहे,हे कमी नाहीच एक खंत मात्र भासते की आषाढी एकादशीच्या वारीला माझ्या विठ्ठल रखुमाईचे दर्शन यावेळी झाले नाही,पण असो जगलो तर जाऊत पुढच्या वेळेस....

माय माऊलीचे आशीर्वाद कायम आहेच सोबत....

नुकतच दगडांच्या चुलीवर भगर करायला टाकली आहे,शाबुदाना आता मला सहन होत नाही शेंगदाणे चावत नाही मग उपवासाला भगर करत असतो.मग माझं धोतर,पटका,अन् पाणी प्यायची शिशी धुवून घेतली सर्व आवरून मग हे पत्र तुला लिहायला घेतले आहे...

अजून एक सांगायचे राहिलेच बघ,यावर्षी नदीला पाणी फार असल्यामुळे आणि वाट सटकती झाल्यामुळे माझे शिवना मायच्या पुलावर येऊन तिला १०८ बेल वाहणे होणार नाही...यावर्षी शिवना मायला क्षमस्व माफी मागतो,शिवना माय तुझं वाहने असेच निरंतर असू दे,माझे उरे दिवस पुरे आहे आता...

बस माझे चित्त आता या ओसरीत आणि मंदिरात लागले आहे,पुस्तकांच्या सहवासात हा शेवट होतो हे नव्हे थोडके....

तुझाच लेकरू...
श्री:.....

Written by,

Bharat Sonwane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...