मुख्य सामग्रीवर वगळा

कोरोना सदृश्य काळ आणि बेरोजगारी....



#कोरोनासदृश्य काळ आणि नोकरीसाठी,नोकरी टिकविण्यासाठी,नोकरी मिळविण्यासाठी तरुणांची होत असलेली तडजोड....


सध्य परिस्थितीचा एकूण आढावा जेव्हा बघितला,तेव्हा मृत्यूपेक्षा सर्वाधिक मोठे वाटणारे संकट जर कोणते असेल तर ते असणार वाढणारी बेरोजगारी.बरेचजण म्हणतील की,इथे जीवांची परवा यांना नाही अन् बेरोजगारीची चिंता करताय पण  मृत्यू अन् वास्तव परिस्थिती यांचा विचार केलातर आपण बेरोजगारी या विषयावर येऊनच थांबणार आहोत.

कारण पुढील काही काळ जरीही आपण कोरोनावर यशस्वीपणे मात करून जनजीवन सुरळीत करुत,परंतु बेरोजगारीमुळे पुढील काळात नैराश्यात जाणाऱ्या वर्गाची संख्या ही खूप मोठी अन् खबरदारी घेणारी असेल....

सद्या देशातील नव्हे तर जगातील सर्वच देशांची अवस्था ही आर्थिक बाबतीत खूप वाईट झालेली आहे.प्रायव्हेट सेक्टरमध्ये असलेल्या नामांकित कंपन्या ज्या लाखो लोकांना एकावेळी रोजगार उपलब्ध करून देत असत त्यांनी समोर घोंगावत असलेलं संकट बघून कंपनीतील जवळ जवळ बराच मजूरवर्ग घरी बसवला आहे. यात उच्चपदावर असलेले कंपनीतील अधिकारी वर्ग सुद्धा आहेत,हळूहळू काम पूर्वपदावर येतही आहे परंतु हे सावरण्यासाठी झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी लागणारा कालावधी हा खूप मोठा असणारा आहे...

प्रायव्हेट सेक्टरची जी अवस्था आहे एकुण तशीच सरकारी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या वर्गाची सुद्धा अवस्था खूप वाईट झालेली आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये एकूणच सर्व कार्यालय,संबंधित कार्यालय बंद पडलेली आहेत.ते कधी चालू होतील त्यांच्यावर असलेली मर्यादा,नियम,अटी सर्व पाळून कार्यालय चालुही झालेतरी नियोजित मोजके मनुष्यबळ हे सर्व लक्षात घेण्यासारखी बाब आहे...

वाढलेली बेरोजगारी अन् गेलेल्या नोकऱ्या यांमुळे देशातील आर्थिक परिस्थितीचा समतोल राखणे कुठे तरी अवघड असणार आहे.उच्च शिक्षणाच्या माध्यमातून दररोज उपलब्ध होणारा सुशिक्षित फ्रेशर विद्यार्थ्याचा वर्ग जो नुकताच शिक्षणावर लाखो रुपये खर्च करून शिक्षण घेऊन नोकरीसाठी फिरू लागलेला आहे. त्यांचे काय ? पुढे प्रत्येक क्षेत्रात वाढणारी रोजची स्पर्धा,नवोदित विद्यार्थी आणि त्या आदीची असलेली सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थी यांची अवस्था एकूण नैराश्यात जाणारी आहे.याच काळात आलेल्या संकटामुळे जॉब गमावून बसलेल्या नोकरदारांचाही एक वर्ग हे विचार करणारे असणार आहे सर्वच...

सध्या स्थितीत कुठल्याही व्यवसायाची व्यवसायिक अर्थव्यवस्था ही खूप बिकट परिस्थितीतून जात असतांना संबधित छोटे मोठे व्यवसायही डगमगाईला लागले आहेच.शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जाणारा आपला देश प्रगतीपथावर कायम आहे,परंतु समोर दिसणारे बेरोजगारीचे संकट हे या शतकातील सर्वाधिक मोठे संकट असल्याची जाणीवही ते करून देत आहे...

कारण देशाची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे तरुण खांद्यावर अवलंबून असते,जेव्हा एक पूर्ण तरुण पिढीच बेरोजगार होताना दिसत असते त्यावेळी समोर पुढील कालावधीत दिसणारे संकट किती मोठे असेल याची जाणीव ते वेळोवेळी करून देत आहे ...

Written by,

Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड