मुख्य सामग्रीवर वगळा

कोरोना सदृश्य काळ आणि बेरोजगारी....



#कोरोनासदृश्य काळ आणि नोकरीसाठी,नोकरी टिकविण्यासाठी,नोकरी मिळविण्यासाठी तरुणांची होत असलेली तडजोड....


सध्य परिस्थितीचा एकूण आढावा जेव्हा बघितला,तेव्हा मृत्यूपेक्षा सर्वाधिक मोठे वाटणारे संकट जर कोणते असेल तर ते असणार वाढणारी बेरोजगारी.बरेचजण म्हणतील की,इथे जीवांची परवा यांना नाही अन् बेरोजगारीची चिंता करताय पण  मृत्यू अन् वास्तव परिस्थिती यांचा विचार केलातर आपण बेरोजगारी या विषयावर येऊनच थांबणार आहोत.

कारण पुढील काही काळ जरीही आपण कोरोनावर यशस्वीपणे मात करून जनजीवन सुरळीत करुत,परंतु बेरोजगारीमुळे पुढील काळात नैराश्यात जाणाऱ्या वर्गाची संख्या ही खूप मोठी अन् खबरदारी घेणारी असेल....

सद्या देशातील नव्हे तर जगातील सर्वच देशांची अवस्था ही आर्थिक बाबतीत खूप वाईट झालेली आहे.प्रायव्हेट सेक्टरमध्ये असलेल्या नामांकित कंपन्या ज्या लाखो लोकांना एकावेळी रोजगार उपलब्ध करून देत असत त्यांनी समोर घोंगावत असलेलं संकट बघून कंपनीतील जवळ जवळ बराच मजूरवर्ग घरी बसवला आहे. यात उच्चपदावर असलेले कंपनीतील अधिकारी वर्ग सुद्धा आहेत,हळूहळू काम पूर्वपदावर येतही आहे परंतु हे सावरण्यासाठी झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी लागणारा कालावधी हा खूप मोठा असणारा आहे...

प्रायव्हेट सेक्टरची जी अवस्था आहे एकुण तशीच सरकारी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या वर्गाची सुद्धा अवस्था खूप वाईट झालेली आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये एकूणच सर्व कार्यालय,संबंधित कार्यालय बंद पडलेली आहेत.ते कधी चालू होतील त्यांच्यावर असलेली मर्यादा,नियम,अटी सर्व पाळून कार्यालय चालुही झालेतरी नियोजित मोजके मनुष्यबळ हे सर्व लक्षात घेण्यासारखी बाब आहे...

वाढलेली बेरोजगारी अन् गेलेल्या नोकऱ्या यांमुळे देशातील आर्थिक परिस्थितीचा समतोल राखणे कुठे तरी अवघड असणार आहे.उच्च शिक्षणाच्या माध्यमातून दररोज उपलब्ध होणारा सुशिक्षित फ्रेशर विद्यार्थ्याचा वर्ग जो नुकताच शिक्षणावर लाखो रुपये खर्च करून शिक्षण घेऊन नोकरीसाठी फिरू लागलेला आहे. त्यांचे काय ? पुढे प्रत्येक क्षेत्रात वाढणारी रोजची स्पर्धा,नवोदित विद्यार्थी आणि त्या आदीची असलेली सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थी यांची अवस्था एकूण नैराश्यात जाणारी आहे.याच काळात आलेल्या संकटामुळे जॉब गमावून बसलेल्या नोकरदारांचाही एक वर्ग हे विचार करणारे असणार आहे सर्वच...

सध्या स्थितीत कुठल्याही व्यवसायाची व्यवसायिक अर्थव्यवस्था ही खूप बिकट परिस्थितीतून जात असतांना संबधित छोटे मोठे व्यवसायही डगमगाईला लागले आहेच.शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जाणारा आपला देश प्रगतीपथावर कायम आहे,परंतु समोर दिसणारे बेरोजगारीचे संकट हे या शतकातील सर्वाधिक मोठे संकट असल्याची जाणीवही ते करून देत आहे...

कारण देशाची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे तरुण खांद्यावर अवलंबून असते,जेव्हा एक पूर्ण तरुण पिढीच बेरोजगार होताना दिसत असते त्यावेळी समोर पुढील कालावधीत दिसणारे संकट किती मोठे असेल याची जाणीव ते वेळोवेळी करून देत आहे ...

Written by,

Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...