मुख्य सामग्रीवर वगळा

पाऊस छत्री आणि मी....



#पाऊस_छत्री_आणि_मी...


वादळ,वारा,पाऊस सगळं मनासारखे चालु आहे तरीही काहीतरी मागे राहून गेलं आहे.गवतावरचे पाण्याचे दव जसं आपले प्रतिबिंब त्याच्या आत दाखवू शकत नाही,तसेच मागे काय राहून गेले हे माहीत असूनही सांगता येत नाहीये इतकं अस्वस्थ झालंय सर्वच...

रस्त्याच्या बाजूला असलेली छोटी-छोटी झाडं जगण्यासाठी स्पर्धा करताय.एखादा नाकतोडा येतो अन् भर्रकन उडत जाऊन दोन-तीन झाडांची पानं त्याच्या उडण्याने तोडून टाकतो अन् स्वस्थ बसून राहतो त्या वाटसरू बसलेल्या पुलावर येऊन,त्याला दिसते का काय माहित नाही पण त्याला खूप काही समजते...

दुसरीकडे एक तो जो शेणाचे गोल,गोल गोळे करून त्यांना लोटत-लोटत घेऊन चालला आहे...
कुठे जातो माहित नाही पण त्याला बघायला खूप आवडते,जगातला सर्वाधिक प्रामाणिक जीव कोणता असेल तर तो हाच असे मला वाटते.कारण त्याच्या आसपास दूरदूर त्याच्या जातीतले कुणीच नसते तर एकटाच तो हे सर्व करत असतो...

बाजूला पावसाच्या पाण्याने ओढ्यातून एक चप्पल वाहून आली आहे आर्धी तुटलेली,पण वाहून आल्याने ती मस्त स्वच्छ झालीये.तिला घालून जरासा चौफेर फटकारा मारून आलो तिथेच आजूबाजूला,मऊ मऊ चप्पल एका पायाला भारी दिसत होती...

रुईच्या झाडाला छान निळसर पांढरे फूल आलेली आहे,त्यातील परागकण शोशून घेण्यासाठी निळसर काळा रंग असलेली गांधीली त्या फुलावर येऊन हेलिकॉप्टर सारखं बुंग-बूंग करत बसलीये...
हे सर्व कॅमेरात कैद करायला मला आवडत नाही,कारण त्यांचा तो आनंद मला फक्त एकट्याला अनुभवायचा असतो.त्या आनंदाला पार्टनर असला की मग विविध चर्चा निघत राहतात.परत नैसर्गिक ते नैसर्गिक न राहता डिजिटल होऊन जाईल मग बरेच त्या मोबाईलशिवाय मुक्त सैर करणे या मोकळ्या मैदानात....

चला सर्व छान चालू झाले आहे,सर्व ठिकाणी कामाची गरबड चालूय.पण मला नकोय हे सर्व थोड लेट पण थेट करायचं,म्हणून मी अजून तरी थोडा आनंद घेणार आहे...
हे किती छान आहेना निसर्ग त्याची मुक्त उधळण करतोय,अंगावर हिरवी शाल पांघरून असंख्य रूप तो दाखवतोय पण आपल्याला हे सर्व अनुभवायला वेळ नाहीये याची खंत वाटते...

शेवाळलेल्या काळ्या खडकावर पिवळसर बारीक-बारीक कसली छोटीशी ब्लँकेट वर असलेल्या मऊ सुतासारखी झालर पसरली आहे.
निळसर बारीक-बारीक फुले अगदी त्या खडकाला खेटून उगलेलिये,मला त्या खडकावर बसायचंय पण ती झालर अस्तव्यस्त होईल म्हणून उभ्यानेच मी ते बघणार आहे....

खूप दिवसांपूर्वी टेकडीवरच्या एका बोडक्या झाडाला दोरा बांधून आलो होतो,त्याची वाढ होते की नाही ते बघायचं होते.आज बघितले तर ते छानपैकी दोन ते तीन फुटपर्यंत वाढलेले आहे,तो दोर शेवटी तुटून तिथेच खाली पडून राहिला...आता या झाडावर मुंग्यांनी आक्रमण केलंय याचा फोटो मी तुम्हाला देईल पुढच्या वेळी गेलो की,कारण हा प्रयोग पाच सहा महिन्यांपासून चालू होता शेवटी वाढ होत आहे म्हणून आनंद आनंद आहे....

शेजारी असलेले डोंगर खुणावतेय पण सध्या काही दिवस नकोच.आजू बाजूचा परिसर,जवळची टेकडी यांच्यावर भ्रमंती होणार आहे काही दिवस...
खदानित हिरवट पाणी दिसतंय खदानीच्या उंच उंच काळ्या खडकांच्या भिंतीत असलेले लिंबाचे,पिंपळाचे झाडं छानपैकी वाढीस लागले आहे.लवकर हे सर्व पाणी काळेशार झाले की आत डोळे टाकून बघत बसायचं मस्त भारीच जग असते ते.. शेवाळ,खेकडे,पाणकोंबडी,मासे,बेडूक, विविध पाण्यातील वनस्पती यांचे होणारे दर्शन हे विलोभनीय असणार सर्वच.....
Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...