मुख्य सामग्रीवर वगळा

it's shocking,कायम आठवणीत राहशील....



#तुझ्यासाठी_काय_लिहायचं ? 


म्हणजे कोणी मला बळजबरी करत नाहीये की लिहायलाच हवंय...


पण कितीतरी बॅकस्पेस घेऊन हे लेखन करतोय,काय असतं तू तुझ्या मार्गाला निघून गेलास...
तुझ्यामागे तुझे घरचे,तुझा चाहता वर्ग,मित्र परिवार हे दुःखात बुडालेले आहेच.कुठेतरी माणुसकी जिवंत आहे अन् इतक्या वाईट परिस्थितीत हळहळ वाटणार नाही तो माणूस नाहीच,तेव्हा तुझ्यासाठी एक तुझा चाहता म्हणून थोडक्यात लिहण्याचा प्रयत्न...
पुन्हा एकदा देव हा विषय इथेही येणारच आहे तेव्हा देवाने या दुःखातून सावरण्याची ताकद तुझ्या घरच्यांना,मित्रपरिवाराला,तुझ्या चाहत्या वर्गाला द्यावी हीच एक प्रार्थना....

तुला जे योग्य वाटले तू केलेस त्या मागे खूप काही कारणे असतील,उगाच काहीतरी शंका,अंदाज,मत,व्यक्त करून तुझ्याबद्दल बोलण्याचा अधिकार आम्हाला नाही,त्यापेक्षा मला नाही असेच म्हणेल....
यावेळी फक्त एकच म्हणेल तू घाई केलीस,हे वय नव्हते बस इतकंच....

आता हे वाक्य लिहायला पण नकोसे वाटते की मला चित्रपट,सिरियल बघायला आवडत नाही...
कारण ज्याप्रमाणे बॉलीवूड विश्वातील अनेक दिग्गज कलाकार आपल्याला सोडून कायमचे अलविदा करून जात आहे,त्यावेळी असे एकदाही झाले नाही की त्यांच्याबद्दल कुठेतरी काही बघितले नाही की काही ऐकले नाही.
इतके ते सर्वच मनावर राज्य करणारे होते,जगणे शिकवणारे होते...

तुझ्या बाबतीत सांगायचे तर तुझा आलेख हा कायम उंचीचा आहे,तुझं भविष्यासाठी असलेल struggle तुझा चाहता असल्याने खूप जवळून जाणून,बघून होतो...

माझ्या आयुष्यात जेव्हा मी कुठेतरी एका अश्या फेझला होतो की,जिथे कुणीतरी आपल्याला inspire करणारे हवे असते त्यावेळी तू होतास...
तुझं ते टायटनसाठी केलेले काम अन त्यातील तुझा तो बोलण्याचा अंदाज हे खूप काही देऊन गेलं,हे सर्व खूप भावणारे होते आजही कित्येकदा बघून झाले,पण आज कुठेतरी हे सर्व थांबलय....

तू प्रत्यक्षात नाहीस हे भास करून देते की,तुम्ही कलाकार लोकं फक्त रंगमंचावरच तुमची कलाकारी दाखवत नाहीतर आयुष्याच्या या खर्याखुर्या रंगमंच्यावर सुद्धा तुम्ही आपले खरे दुःख लपवत फक्त चाहत्यांच्या प्रेमासाठी खोटं हसू चेहऱ्यावर घेऊन जगत असतात....

यामुळेच,यामुळेच...
तुमचं जाणं जिव्हारी लागते यार,खरच कायम आठवणीत राहशील एक सच्चा कलाकार म्हणून तू बस इतकंच...

Written by,
Bharat Sonwane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...