मुख्य सामग्रीवर वगळा

it's shocking,कायम आठवणीत राहशील....



#तुझ्यासाठी_काय_लिहायचं ? 


म्हणजे कोणी मला बळजबरी करत नाहीये की लिहायलाच हवंय...


पण कितीतरी बॅकस्पेस घेऊन हे लेखन करतोय,काय असतं तू तुझ्या मार्गाला निघून गेलास...
तुझ्यामागे तुझे घरचे,तुझा चाहता वर्ग,मित्र परिवार हे दुःखात बुडालेले आहेच.कुठेतरी माणुसकी जिवंत आहे अन् इतक्या वाईट परिस्थितीत हळहळ वाटणार नाही तो माणूस नाहीच,तेव्हा तुझ्यासाठी एक तुझा चाहता म्हणून थोडक्यात लिहण्याचा प्रयत्न...
पुन्हा एकदा देव हा विषय इथेही येणारच आहे तेव्हा देवाने या दुःखातून सावरण्याची ताकद तुझ्या घरच्यांना,मित्रपरिवाराला,तुझ्या चाहत्या वर्गाला द्यावी हीच एक प्रार्थना....

तुला जे योग्य वाटले तू केलेस त्या मागे खूप काही कारणे असतील,उगाच काहीतरी शंका,अंदाज,मत,व्यक्त करून तुझ्याबद्दल बोलण्याचा अधिकार आम्हाला नाही,त्यापेक्षा मला नाही असेच म्हणेल....
यावेळी फक्त एकच म्हणेल तू घाई केलीस,हे वय नव्हते बस इतकंच....

आता हे वाक्य लिहायला पण नकोसे वाटते की मला चित्रपट,सिरियल बघायला आवडत नाही...
कारण ज्याप्रमाणे बॉलीवूड विश्वातील अनेक दिग्गज कलाकार आपल्याला सोडून कायमचे अलविदा करून जात आहे,त्यावेळी असे एकदाही झाले नाही की त्यांच्याबद्दल कुठेतरी काही बघितले नाही की काही ऐकले नाही.
इतके ते सर्वच मनावर राज्य करणारे होते,जगणे शिकवणारे होते...

तुझ्या बाबतीत सांगायचे तर तुझा आलेख हा कायम उंचीचा आहे,तुझं भविष्यासाठी असलेल struggle तुझा चाहता असल्याने खूप जवळून जाणून,बघून होतो...

माझ्या आयुष्यात जेव्हा मी कुठेतरी एका अश्या फेझला होतो की,जिथे कुणीतरी आपल्याला inspire करणारे हवे असते त्यावेळी तू होतास...
तुझं ते टायटनसाठी केलेले काम अन त्यातील तुझा तो बोलण्याचा अंदाज हे खूप काही देऊन गेलं,हे सर्व खूप भावणारे होते आजही कित्येकदा बघून झाले,पण आज कुठेतरी हे सर्व थांबलय....

तू प्रत्यक्षात नाहीस हे भास करून देते की,तुम्ही कलाकार लोकं फक्त रंगमंचावरच तुमची कलाकारी दाखवत नाहीतर आयुष्याच्या या खर्याखुर्या रंगमंच्यावर सुद्धा तुम्ही आपले खरे दुःख लपवत फक्त चाहत्यांच्या प्रेमासाठी खोटं हसू चेहऱ्यावर घेऊन जगत असतात....

यामुळेच,यामुळेच...
तुमचं जाणं जिव्हारी लागते यार,खरच कायम आठवणीत राहशील एक सच्चा कलाकार म्हणून तू बस इतकंच...

Written by,
Bharat Sonwane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...