मुख्य सामग्रीवर वगळा

सैर पर्यटनाची....


#सैर_पर्यटनाची....

औरंगाबाद ते चाळीसगाव महामार्गावरील कालिमठ फाट्यापासुन मध्ये 2 कि.मी.असलेलं कालीमातेचे मंदिर म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्याचं ग्रामदैवत कालिकामाता मंदिर आहे. कन्नड तालुक्यातील या निसर्गरम्य परिसरात प्रणवानंद सरस्वतींनी मंदिरची स्थापना केली आहे. निद्रीस्त शंकराच्या अंगावर उभी असलेल्या कालीकामातेची भारतात केवळ तीन मंदिर आहेत. त्यातीलच हे एक भव्य कलाकृती लाभलेलं कालीमातेचे मंदिर...

कन्नड शहरापासून अवघ्या 9 कि.मी.अंतरावर असलेल्या कालीमठ परिसरात असलेलं कालीमातेचे मंदिराची स्थापना 10 एप्रिल 1988 रोजी स्वामी प्रणवानंद सरस्वती महाराज यांनी केली. मुळचे कोलकात्याचे रहिवाशी असलेल्या स्वामी प्रणवानंद सरस्वती यांनी राजवैभवाचा त्याग करून 1968 रोजी चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवीला वास्तव्यास आले. तब्बल 19 वर्षे इथं वास्तव्य केल्यानंतर त्यांनी कालीकामातेचे एक भव्य मंदिर उभारण्याचा मनोदय केला. मंदिरासाठी कालिमठ येथे जागा विकत घेऊन तेथे हे मंदिर उभं केलं.

कालिकामातेचे मंदिर हे आधुनिक स्थापत्य कलेचा,शास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना आहे,जे डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. हे मंदिर बर्याच मोठ्या क्षेत्रात व्यापलेलं असून परिसरात आंब्याची अनेक झाडे आहेत. मंदिर बांधणीसाठी शास्त्राचा आधार घेऊन प्रामुख्याने 9 अंकाला महत्व दिले आहे. मंदिराचे बांधकाम नऊ महिन्यांत पूर्ण झाले. प्रत्येक बांधकामाची रचना,बांधणी ही नऊच्या पटीत आहे,9 अंकाला जोडुन केलेली आहे. ओटा, कॉलमचे अंतर,प्रदक्षिणेचा मार्ग,गाभारा,सभामंडप आणि मंदिरावरील कळसांची संख्यादेखील नऊ आहे. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कन्नड ते कालीमठ अंतरदेखील 9 कि.मी. आहे.

मंदिरात प्रवेश करताच आपल्या नजरेस पडते ती देवीची प्रसन्नमुर्ती. मुर्तीच्या एका हातात रक्तपीस नावाच्या राक्षसाचे शीर, तर दुसऱ्या हातात तलवार आहे. देवीच्या पायाखाली निद्रिस्त शंकर आहेत. कालिकामातेची 6 फूट उंचीची ही मूर्ती काळ्या संगमरवरी दगडाने साकारण्यात आली आहे.मंदिराच्या पाठीमागे स्वामी प्रणवानंद सरस्वती महाराजांची समाधी आहे.
(लेखन-कृष्णा केंडे-एबीपी माझा औरंगाबाद).

देशभरातून कालीकामातेच्या दर्शनासाठी भक्तांची वर्दळ सतत या ठिकाणी असते.मंदिरात रोज नित्यनेमानं सकाळी अभिषेक ,पुजा,आरती करण्यात येते,संध्याकाळी महाआरती होते. या मंदिरात गुरूपोर्णिमा, महाशिवरात्री,नवरात्रात,दसरा सणाला मोठा उत्सव असतो.

मंदिराची किर्ती दिवसेंदिवस वाढत असून, इथं भाविकांची गर्दीही वाढली आहे. देशभरातून इथं भाविक येतात आणि कालिकामाते चरणी लीन होतात...

या तीर्थ क्षेत्रावर येताना कन्नड तालुक्यातील अनेक बघण्यासारखे स्थळ आपल्याला बघायला भेटतात.यातील कन्नडपासुन चाळीसगाव रोडने पुढे आले की अंधानेर फाट्यापासुन आत अंधानेरकडे गेल्यावर,अती प्राचीन महादेवाचे संगमेश्वर मंदिर व भामासाद महाराच यांची समाधी,आश्रम आपण बघु शकतो.

यापुढे आपण कन्नड चाळीसगाव मार्गावर उभारलेला भव्य अंबाडी प्रकल्प आपण बघु शकतो.या ठिकाणी आपल्याला सरकारी नर्सरी बघायला मिळते,येथे अनेक वनस्पती,औषधी वनस्पती बघायला भेटतात वनस्पती शास्त्रा विषयीची बरीचशी माहिती,वनस्पती लागवड याबद्दलचे ज्ञान आपल्याला या ठिकाणी भेटु शकते...

कालीमठ फाट्यावरुन आपण पुढे येऊन कालिकामातेचे दर्शन घेऊन पुढे निघालो की,आपल्याला याच मार्गावर पुढे 8 कि.मी. अंतरावर जगप्रसिद्ध पितळखोरा लेणी बघायला भेटते...

वरील माहिती दिलेली स्थळं ही सर्व आपण एका दिवसात पाहु शकतो,यामुळे वेळेचे योग्य नियोजन केल्यास ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कन्नड वास्तवातील अनेक ठीकाणांना आपण बघु शकतो....

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड