मुख्य सामग्रीवर वगळा

सैर पर्यटनाची....


#सैर_पर्यटनाची....

औरंगाबाद ते चाळीसगाव महामार्गावरील कालिमठ फाट्यापासुन मध्ये 2 कि.मी.असलेलं कालीमातेचे मंदिर म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्याचं ग्रामदैवत कालिकामाता मंदिर आहे. कन्नड तालुक्यातील या निसर्गरम्य परिसरात प्रणवानंद सरस्वतींनी मंदिरची स्थापना केली आहे. निद्रीस्त शंकराच्या अंगावर उभी असलेल्या कालीकामातेची भारतात केवळ तीन मंदिर आहेत. त्यातीलच हे एक भव्य कलाकृती लाभलेलं कालीमातेचे मंदिर...

कन्नड शहरापासून अवघ्या 9 कि.मी.अंतरावर असलेल्या कालीमठ परिसरात असलेलं कालीमातेचे मंदिराची स्थापना 10 एप्रिल 1988 रोजी स्वामी प्रणवानंद सरस्वती महाराज यांनी केली. मुळचे कोलकात्याचे रहिवाशी असलेल्या स्वामी प्रणवानंद सरस्वती यांनी राजवैभवाचा त्याग करून 1968 रोजी चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवीला वास्तव्यास आले. तब्बल 19 वर्षे इथं वास्तव्य केल्यानंतर त्यांनी कालीकामातेचे एक भव्य मंदिर उभारण्याचा मनोदय केला. मंदिरासाठी कालिमठ येथे जागा विकत घेऊन तेथे हे मंदिर उभं केलं.

कालिकामातेचे मंदिर हे आधुनिक स्थापत्य कलेचा,शास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना आहे,जे डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. हे मंदिर बर्याच मोठ्या क्षेत्रात व्यापलेलं असून परिसरात आंब्याची अनेक झाडे आहेत. मंदिर बांधणीसाठी शास्त्राचा आधार घेऊन प्रामुख्याने 9 अंकाला महत्व दिले आहे. मंदिराचे बांधकाम नऊ महिन्यांत पूर्ण झाले. प्रत्येक बांधकामाची रचना,बांधणी ही नऊच्या पटीत आहे,9 अंकाला जोडुन केलेली आहे. ओटा, कॉलमचे अंतर,प्रदक्षिणेचा मार्ग,गाभारा,सभामंडप आणि मंदिरावरील कळसांची संख्यादेखील नऊ आहे. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कन्नड ते कालीमठ अंतरदेखील 9 कि.मी. आहे.

मंदिरात प्रवेश करताच आपल्या नजरेस पडते ती देवीची प्रसन्नमुर्ती. मुर्तीच्या एका हातात रक्तपीस नावाच्या राक्षसाचे शीर, तर दुसऱ्या हातात तलवार आहे. देवीच्या पायाखाली निद्रिस्त शंकर आहेत. कालिकामातेची 6 फूट उंचीची ही मूर्ती काळ्या संगमरवरी दगडाने साकारण्यात आली आहे.मंदिराच्या पाठीमागे स्वामी प्रणवानंद सरस्वती महाराजांची समाधी आहे.
(लेखन-कृष्णा केंडे-एबीपी माझा औरंगाबाद).

देशभरातून कालीकामातेच्या दर्शनासाठी भक्तांची वर्दळ सतत या ठिकाणी असते.मंदिरात रोज नित्यनेमानं सकाळी अभिषेक ,पुजा,आरती करण्यात येते,संध्याकाळी महाआरती होते. या मंदिरात गुरूपोर्णिमा, महाशिवरात्री,नवरात्रात,दसरा सणाला मोठा उत्सव असतो.

मंदिराची किर्ती दिवसेंदिवस वाढत असून, इथं भाविकांची गर्दीही वाढली आहे. देशभरातून इथं भाविक येतात आणि कालिकामाते चरणी लीन होतात...

या तीर्थ क्षेत्रावर येताना कन्नड तालुक्यातील अनेक बघण्यासारखे स्थळ आपल्याला बघायला भेटतात.यातील कन्नडपासुन चाळीसगाव रोडने पुढे आले की अंधानेर फाट्यापासुन आत अंधानेरकडे गेल्यावर,अती प्राचीन महादेवाचे संगमेश्वर मंदिर व भामासाद महाराच यांची समाधी,आश्रम आपण बघु शकतो.

यापुढे आपण कन्नड चाळीसगाव मार्गावर उभारलेला भव्य अंबाडी प्रकल्प आपण बघु शकतो.या ठिकाणी आपल्याला सरकारी नर्सरी बघायला मिळते,येथे अनेक वनस्पती,औषधी वनस्पती बघायला भेटतात वनस्पती शास्त्रा विषयीची बरीचशी माहिती,वनस्पती लागवड याबद्दलचे ज्ञान आपल्याला या ठिकाणी भेटु शकते...

कालीमठ फाट्यावरुन आपण पुढे येऊन कालिकामातेचे दर्शन घेऊन पुढे निघालो की,आपल्याला याच मार्गावर पुढे 8 कि.मी. अंतरावर जगप्रसिद्ध पितळखोरा लेणी बघायला भेटते...

वरील माहिती दिलेली स्थळं ही सर्व आपण एका दिवसात पाहु शकतो,यामुळे वेळेचे योग्य नियोजन केल्यास ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कन्नड वास्तवातील अनेक ठीकाणांना आपण बघु शकतो....

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...