मुख्य सामग्रीवर वगळा

माझे हळवे मन तुझ्यासाठी....

कधी कधी अनेक विचारांचे काहूर मनात येऊन जाते...
मन जुळून येतं पण,बोलणं असह्य वाटू लागते.तुझ्याबद्दल मनात चांगले विचार आहे,पण त्या Positive Vibes दिसून येत नाही.मन कागदांवर चार गोष्टी व्यक्त करून मोकळं होतं,पण जेव्हा ते आत्मसात करायची वेळ येतेना ते करता येत नाही...

रडू येतं पण आसवांच डोळ्यांतून येणं होत नाही,कधीतरी विचारांचा बांध फुटला अन डोळे अश्रूंपासून वेगळेही झाले,तरी उशी ओली होत नाही.तुझ्यासाठी मनातले विचार ओठांवर येणं,पण तिथंच त्यांचं घुटमळत सांजेच्या प्रहरी अस्ताला जाणाऱ्या सूर्यासोबत अस्ताला जाणं...किती अस्वस्थपणाचे बोलके मुखवटे घेऊन जगत असतो नाही का आपण..?

कॉल आला आहे,रिसिव्ह करूनही फक्त बोलणं ऐकत राहणं.कधीतरी खूपच मनातील भावना हळव्या झाल्या तर,टेक्स्ट मॅसेज टाईप करणं,इथेही स्पॅस देतांनाची तडजोड बॅकस्पेसमध्ये बदलून जाणं.इतकी तडजोड सहन करून मॅसेज पाठवनं आणी तो, seen होऊनही प्रतिउत्तर न येणं...
हे सगळ मनाला हळवे करून आशेवर जगते ठेवण्याचे खेळ आहे....

अलीकडे जसे बोटे मोबाईल स्क्रीनला स्क्रोल करत राहतात,तसेच आॅफीसमधल्या विंडोग्रिलची काच,त्या बर्फी कलरच्या पडद्या पलीकडचं निलगिरीचं झाड मी बघत असतो...
त्याचं शेवटच्या घटका मोजणारं आयुष्य मला ते दाखवत आहे,दिसत आहे,पण बघणं होत नाही. त्याचं अस्तित्व फक्त मला त्याच्या सुगंधातून कळत आहे,कधीतरी ते सुखलेलं लाकूड झालेलं झाड उंन्मळून पडेल सांगता येत नाही.त्याच्या अस्तित्वाच्या खुणा शोधत मी पण आतून त्याचा होत आहे... माझं काय अस्तित्व आहे ? या प्रश्नाची मांनगुटीवर तलवार कायम लटकलेली असते तिचं मी काय करू..?

जगण्यात फरफट चालू आहे पण स्वीकारणं जमत नाही.रितेपणाच्या ओंजळीत असंख्य रातराणींच्या फुलांची बहार आहे,पण मला सुगंध घेता येत नाही,याही पुढे उभं आयुष्य वेठीस पडलं आहे अन् मला आठवणीत रमायला आवडतंय....

शेवट इतकंच की निर्णय घ्यायचे आहे,पण मला ती पण घेता येत नाहीये...
अन् घेऊन चुकलेच कधीतर मग त्यातून सावरणे मला सहजासहजी जमत नाहीये....

#जेव्हा_दोन_गोष्टी_एकत्र_येतात_तेव्हाचं_निर्णय_न_घेऊ_शकणारं_हळवं_मन....


Written by,

Bharat Sonwane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ