मुख्य सामग्रीवर वगळा

धुक्यांच्या_सवे_Good_Morning...!


धुक्यांच्या_सवे_Good_Morning...!

आठ-सव्वा आठ वाजून गेले आहे,एरवी नेहमीच मॉर्निंगवॉक वरून परत येण्याची वेळ पण अलीकडे सर्वच बंद आहे मग काय गेले काही दिवस खिडकीतून बाहेरचं जग अनुभवायला मिळत तितकेच काय बाहेरच्या जगाशी माझा संबंध येतो... 
गेले काही दिवस सकाळी-सकाळी शहरात छान धुकं पडू लागली आहे,त्यामुळे वातावरणात एक वेगळीच हवीहवीशी शांतता पसरलेली असते.शहर पूर्ण शांत झालं आहे,रस्त्यावर म्हणजे तो फक्त रस्ता नाहीये महामार्ग आहे पण त्यावरही क्वचितच एखादी गाडी दिसते,दूरवरून येणारी ती गाडी पिवळ्या रंगाच्या तिच्या उजेडात धुक्यातून वाट काढत काढत तिचा मार्ग शोधत जातेय...

काही दिवसांपासून सकाळी पाच वाजता ऐन साखर झोपेच्यावेळी वातावरणात थंडी वाढल्यामुळे गारवा निर्माण होतो,नेहमीची जाग येण्याची माझी ती वेळ असल्यामुळे जाग येऊन जाते...कितीवेळ काय करावे हा विचार करून खिडकीपाशी येऊन बसतो,विंडोग्रिल पूर्णपणे दवाने ओली झालेली असते तिलाच गाल लावून कितीवेळ अंगावर ब्लँकेट घेऊन येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना बघत बसतो...

मूडमध्ये असलो तर कॉफी मग हातात घेऊन हा निसर्ग अन् ती शांतता अनुभवतो,कधीतरी नशीब जोरावर असले की रात्रीचा शिळा भात जो सकाळी गरम करून खायला मला खूप आवडतो तो ही गरम करून प्लेट,चमचा घेऊन त्या थंड वातावरणात या गरम भाताचा स्वाद घेत बसतो...असो नशीब आहे म्हणुन लॉकडाऊन इतके आरामात चालू आहे माझे,बाकी बाहेर अवस्था बघवत नाही आता अन् मी पण किती दिवस घरी बसू असे आता भविष्य खुणावते आहे...

आयुष्यातील एक वर्ष जे आयुष्यात सर्वाधिक महत्वाच्या टप्प्यावरचे आहे ते पूर्णपणे काहीही हाती न लागता गेले आहे,फक्त जगण्याची उमेद भेटली इतकेच...

धड नीट शिक्षण होत नाहीये,धड जॉब बघायचा तर तो ही बघितला जात नाहीये.असंख्य प्रश्न फक्त समोर आहे,रोज मन मारून त्यांना उत्तर द्यायचे आराम करायचा,इतकेच काय ते हातात आहे.ऑनलाईन काय-काय करणार अलरेडी इतके काही वाचून,सर्च करून झाले आहे की अलिकडे दिवस-दिवस मोबाईलकडे लक्ष नाही दिले तरी चालते...
दिवसांतून दोन-तीन वेळा ईमेल,व्हॉटसअप,LinkedIn notification चेक केले की धकून जाते...एरवी मलाही फारवेळ यासर्व गोष्टीशी जुळून घ्यायला नकोसे वाटते आहे.अजून काही दिवस आराम करायचा,मग जोमाने कामाला लागायचे मग मात्र मागे वळून बघायचे नाहीये इतकेच ठरवले आहे सध्यातरी...

गेले काही दिवस पहाटे-पहाटे शहर खूप सुंदर दृश्य अनुभवयास देत आहे,ते बर्फाळ प्रदेशात ज्याप्रमाणे पहाटे धुकं दिसतात तसेच जिथवर नजर जाईल तिथवर फक्त धुकं आणि धुकं बस कॉफी,भात हे समीकरण जुळवून आले की मग अजून चार चांद लागून जातात या रोजच्या प्रवासाला...हे सगळे अनुभवले की गरम-गरम ब्लँकेटमध्ये पुन्हा एक झोप हवीच ती साखरझोेप असते तीच....

एरवी सायकलवर पेपर वाटणारे भराभर पेपर फेकत चालले आहे,दूधवाला दुधाची क्यान गाडीला अटकवून दूध-दूध आरोळी देत चालला आहे.त्याच्या गाडीला अटकवलेल्या त्या छोट्या-छोट्या क्याटल्याच्या आवाज माझ्या खूप ओळखीचा आहे तो आत्ता ऐकू आला.पेपरवाल्या त्या मुलाने अॅडव्हाॅकेट आजोबांचा पेपर त्या लेटरबॉक्स मध्ये टाकला आहे,खूप दिवस झाले पेपर वाचला नाहीये,चला दुपारी वाचुच आज पेपर तोवर एक निवांत झोप घेतो....

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...