मुख्य सामग्रीवर वगळा

धुक्यांच्या_सवे_Good_Morning...!


धुक्यांच्या_सवे_Good_Morning...!

आठ-सव्वा आठ वाजून गेले आहे,एरवी नेहमीच मॉर्निंगवॉक वरून परत येण्याची वेळ पण अलीकडे सर्वच बंद आहे मग काय गेले काही दिवस खिडकीतून बाहेरचं जग अनुभवायला मिळत तितकेच काय बाहेरच्या जगाशी माझा संबंध येतो... 
गेले काही दिवस सकाळी-सकाळी शहरात छान धुकं पडू लागली आहे,त्यामुळे वातावरणात एक वेगळीच हवीहवीशी शांतता पसरलेली असते.शहर पूर्ण शांत झालं आहे,रस्त्यावर म्हणजे तो फक्त रस्ता नाहीये महामार्ग आहे पण त्यावरही क्वचितच एखादी गाडी दिसते,दूरवरून येणारी ती गाडी पिवळ्या रंगाच्या तिच्या उजेडात धुक्यातून वाट काढत काढत तिचा मार्ग शोधत जातेय...

काही दिवसांपासून सकाळी पाच वाजता ऐन साखर झोपेच्यावेळी वातावरणात थंडी वाढल्यामुळे गारवा निर्माण होतो,नेहमीची जाग येण्याची माझी ती वेळ असल्यामुळे जाग येऊन जाते...कितीवेळ काय करावे हा विचार करून खिडकीपाशी येऊन बसतो,विंडोग्रिल पूर्णपणे दवाने ओली झालेली असते तिलाच गाल लावून कितीवेळ अंगावर ब्लँकेट घेऊन येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना बघत बसतो...

मूडमध्ये असलो तर कॉफी मग हातात घेऊन हा निसर्ग अन् ती शांतता अनुभवतो,कधीतरी नशीब जोरावर असले की रात्रीचा शिळा भात जो सकाळी गरम करून खायला मला खूप आवडतो तो ही गरम करून प्लेट,चमचा घेऊन त्या थंड वातावरणात या गरम भाताचा स्वाद घेत बसतो...असो नशीब आहे म्हणुन लॉकडाऊन इतके आरामात चालू आहे माझे,बाकी बाहेर अवस्था बघवत नाही आता अन् मी पण किती दिवस घरी बसू असे आता भविष्य खुणावते आहे...

आयुष्यातील एक वर्ष जे आयुष्यात सर्वाधिक महत्वाच्या टप्प्यावरचे आहे ते पूर्णपणे काहीही हाती न लागता गेले आहे,फक्त जगण्याची उमेद भेटली इतकेच...

धड नीट शिक्षण होत नाहीये,धड जॉब बघायचा तर तो ही बघितला जात नाहीये.असंख्य प्रश्न फक्त समोर आहे,रोज मन मारून त्यांना उत्तर द्यायचे आराम करायचा,इतकेच काय ते हातात आहे.ऑनलाईन काय-काय करणार अलरेडी इतके काही वाचून,सर्च करून झाले आहे की अलिकडे दिवस-दिवस मोबाईलकडे लक्ष नाही दिले तरी चालते...
दिवसांतून दोन-तीन वेळा ईमेल,व्हॉटसअप,LinkedIn notification चेक केले की धकून जाते...एरवी मलाही फारवेळ यासर्व गोष्टीशी जुळून घ्यायला नकोसे वाटते आहे.अजून काही दिवस आराम करायचा,मग जोमाने कामाला लागायचे मग मात्र मागे वळून बघायचे नाहीये इतकेच ठरवले आहे सध्यातरी...

गेले काही दिवस पहाटे-पहाटे शहर खूप सुंदर दृश्य अनुभवयास देत आहे,ते बर्फाळ प्रदेशात ज्याप्रमाणे पहाटे धुकं दिसतात तसेच जिथवर नजर जाईल तिथवर फक्त धुकं आणि धुकं बस कॉफी,भात हे समीकरण जुळवून आले की मग अजून चार चांद लागून जातात या रोजच्या प्रवासाला...हे सगळे अनुभवले की गरम-गरम ब्लँकेटमध्ये पुन्हा एक झोप हवीच ती साखरझोेप असते तीच....

एरवी सायकलवर पेपर वाटणारे भराभर पेपर फेकत चालले आहे,दूधवाला दुधाची क्यान गाडीला अटकवून दूध-दूध आरोळी देत चालला आहे.त्याच्या गाडीला अटकवलेल्या त्या छोट्या-छोट्या क्याटल्याच्या आवाज माझ्या खूप ओळखीचा आहे तो आत्ता ऐकू आला.पेपरवाल्या त्या मुलाने अॅडव्हाॅकेट आजोबांचा पेपर त्या लेटरबॉक्स मध्ये टाकला आहे,खूप दिवस झाले पेपर वाचला नाहीये,चला दुपारी वाचुच आज पेपर तोवर एक निवांत झोप घेतो....

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ