मुख्य सामग्रीवर वगळा

धुक्यांच्या_सवे_Good_Morning...!


धुक्यांच्या_सवे_Good_Morning...!

आठ-सव्वा आठ वाजून गेले आहे,एरवी नेहमीच मॉर्निंगवॉक वरून परत येण्याची वेळ पण अलीकडे सर्वच बंद आहे मग काय गेले काही दिवस खिडकीतून बाहेरचं जग अनुभवायला मिळत तितकेच काय बाहेरच्या जगाशी माझा संबंध येतो... 
गेले काही दिवस सकाळी-सकाळी शहरात छान धुकं पडू लागली आहे,त्यामुळे वातावरणात एक वेगळीच हवीहवीशी शांतता पसरलेली असते.शहर पूर्ण शांत झालं आहे,रस्त्यावर म्हणजे तो फक्त रस्ता नाहीये महामार्ग आहे पण त्यावरही क्वचितच एखादी गाडी दिसते,दूरवरून येणारी ती गाडी पिवळ्या रंगाच्या तिच्या उजेडात धुक्यातून वाट काढत काढत तिचा मार्ग शोधत जातेय...

काही दिवसांपासून सकाळी पाच वाजता ऐन साखर झोपेच्यावेळी वातावरणात थंडी वाढल्यामुळे गारवा निर्माण होतो,नेहमीची जाग येण्याची माझी ती वेळ असल्यामुळे जाग येऊन जाते...कितीवेळ काय करावे हा विचार करून खिडकीपाशी येऊन बसतो,विंडोग्रिल पूर्णपणे दवाने ओली झालेली असते तिलाच गाल लावून कितीवेळ अंगावर ब्लँकेट घेऊन येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना बघत बसतो...

मूडमध्ये असलो तर कॉफी मग हातात घेऊन हा निसर्ग अन् ती शांतता अनुभवतो,कधीतरी नशीब जोरावर असले की रात्रीचा शिळा भात जो सकाळी गरम करून खायला मला खूप आवडतो तो ही गरम करून प्लेट,चमचा घेऊन त्या थंड वातावरणात या गरम भाताचा स्वाद घेत बसतो...असो नशीब आहे म्हणुन लॉकडाऊन इतके आरामात चालू आहे माझे,बाकी बाहेर अवस्था बघवत नाही आता अन् मी पण किती दिवस घरी बसू असे आता भविष्य खुणावते आहे...

आयुष्यातील एक वर्ष जे आयुष्यात सर्वाधिक महत्वाच्या टप्प्यावरचे आहे ते पूर्णपणे काहीही हाती न लागता गेले आहे,फक्त जगण्याची उमेद भेटली इतकेच...

धड नीट शिक्षण होत नाहीये,धड जॉब बघायचा तर तो ही बघितला जात नाहीये.असंख्य प्रश्न फक्त समोर आहे,रोज मन मारून त्यांना उत्तर द्यायचे आराम करायचा,इतकेच काय ते हातात आहे.ऑनलाईन काय-काय करणार अलरेडी इतके काही वाचून,सर्च करून झाले आहे की अलिकडे दिवस-दिवस मोबाईलकडे लक्ष नाही दिले तरी चालते...
दिवसांतून दोन-तीन वेळा ईमेल,व्हॉटसअप,LinkedIn notification चेक केले की धकून जाते...एरवी मलाही फारवेळ यासर्व गोष्टीशी जुळून घ्यायला नकोसे वाटते आहे.अजून काही दिवस आराम करायचा,मग जोमाने कामाला लागायचे मग मात्र मागे वळून बघायचे नाहीये इतकेच ठरवले आहे सध्यातरी...

गेले काही दिवस पहाटे-पहाटे शहर खूप सुंदर दृश्य अनुभवयास देत आहे,ते बर्फाळ प्रदेशात ज्याप्रमाणे पहाटे धुकं दिसतात तसेच जिथवर नजर जाईल तिथवर फक्त धुकं आणि धुकं बस कॉफी,भात हे समीकरण जुळवून आले की मग अजून चार चांद लागून जातात या रोजच्या प्रवासाला...हे सगळे अनुभवले की गरम-गरम ब्लँकेटमध्ये पुन्हा एक झोप हवीच ती साखरझोेप असते तीच....

एरवी सायकलवर पेपर वाटणारे भराभर पेपर फेकत चालले आहे,दूधवाला दुधाची क्यान गाडीला अटकवून दूध-दूध आरोळी देत चालला आहे.त्याच्या गाडीला अटकवलेल्या त्या छोट्या-छोट्या क्याटल्याच्या आवाज माझ्या खूप ओळखीचा आहे तो आत्ता ऐकू आला.पेपरवाल्या त्या मुलाने अॅडव्हाॅकेट आजोबांचा पेपर त्या लेटरबॉक्स मध्ये टाकला आहे,खूप दिवस झाले पेपर वाचला नाहीये,चला दुपारी वाचुच आज पेपर तोवर एक निवांत झोप घेतो....

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...