मुख्य सामग्रीवर वगळा

LABOR LAW...

#laborlaw.

परवा संसदेत मंजूर झालेल्या कामगार विधेयकाने कित्येकांची औद्योगिक क्षेत्रात रोवलेली पावलं थरथरली असतील,त्यांची स्वप्ने,भविष्यात स्वतःचा आयुष्यासाठी केलेलं नियोजन हे सर्व कंपन्यांवर अवलंबून होते.
कुठेतरी कोणी आत्ताच पर्मनंट झालेलं असेल,भविष्याचा विचार करून त्यांनी अनेक आर्थिक उलाढाली केलेल्या असतील,परंतु लाॅकडाऊनच्या काळात कंपन्यांवर आलेलं संकट यांमुळे आधीच बर्याच मजूर वर्गाला,कंत्राटी कामगारांना कंपन्यांतुन कमी करण्यात,बडतर्फ करण्यात आले होते.

आता जेव्हा हा असा विधेयक संसदेत मंजूर होत आहे,त्याचा पुर्ण परीणाम हा औद्योगिक वसाहतीत असलेल्या कंपन्यांतील पर्मनंट,कंत्राटी कामगार मजुरांवर होणार आहे.सरकारचे कंपन्यांवर कुठलेही कंट्रोल कायद्यानुसार असणार नाही त्यामुळे बर्याच पर्मनंट मजुरांची,कंत्राटी कामगारांची गोची यामुळे होणार आहे...

भविष्यात औद्योगिक क्षेत्र व त्याला जोडून असलेल्या विविध क्षेत्रांवर याचा खूप मोठा परिणाम होईल,बेरोजगारी वाढेल,भारतीय तरुणांची चालू पिढी यामुळे नैराश्याच्या गर्तेत गेलेली असेल...

संसदेत मंजूर झालेल्या कामगार विधेयकाने एमआयडीसी विश्वात याचे पडसाद खूप सहज दिसायला लागतील.
औरंगाबाद (माझे शहर असल्यामुळे तेथील एमआयडीसी विश्वाचा अभ्यास बघता ) सारख्या शहरात की जे शहर आशिया खंडात औद्योगिक क्षेत्रातील महत्त्वाचे शहर म्हणून ओळखले जाते...

ज्याठिकाणी पाच एमआयडीसींच्या अंतर्गत अनेक कंपन्या आज घडीला चालू आहे,हजारो युवकांना रोजगार याठिकाणी उपलब्ध आहे,यापूर्वीच्या दोन पिढ्या या औद्योगिक वसाहतींवर आपले जीवन आधारित ठेवून जगले आहे,तिथे आजची अवस्था कायद्यानुसार झालेला बदल यांमुळे कंत्राटी कामगार असो किंवा कंपन्यांतील पर्मनंट व्यक्ती असो हे सर्व संभ्रमात पडले आहे...

औद्योगिक वसाहतीतील कामगार,कंत्राटी कामगार यांच्या बाबतीत आखलेली नियमितची धोरणे बघता भविष्यात खूप काही बदल झाले असतील हे चित्र दिसते... कारण वरवर जरी एमआयडीसीमध्ये काम करणारा कामगार वर्ग सुखी आहे,हा समज समाजातील इतर क्षेत्रातील माध्यमांचा असेल.परंतु कुठल्याही कंपनीत काम करतांना केलेली मेहनत,त्यांचा संघर्ष हा प्रत्यक्षात जवळुन अनुभवल्या शिवाय समजणारा नाही इतकंच...
(पोस्टचा राजकारणाशी जोडून वक्तव्य करणाऱ्याचा याठिकाणी विचार होणार नाही,तेव्हा आपण न व्यक्त झालेले योग्य असेल.)

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...