मुख्य सामग्रीवर वगळा

LABOR LAW...

#laborlaw.

परवा संसदेत मंजूर झालेल्या कामगार विधेयकाने कित्येकांची औद्योगिक क्षेत्रात रोवलेली पावलं थरथरली असतील,त्यांची स्वप्ने,भविष्यात स्वतःचा आयुष्यासाठी केलेलं नियोजन हे सर्व कंपन्यांवर अवलंबून होते.
कुठेतरी कोणी आत्ताच पर्मनंट झालेलं असेल,भविष्याचा विचार करून त्यांनी अनेक आर्थिक उलाढाली केलेल्या असतील,परंतु लाॅकडाऊनच्या काळात कंपन्यांवर आलेलं संकट यांमुळे आधीच बर्याच मजूर वर्गाला,कंत्राटी कामगारांना कंपन्यांतुन कमी करण्यात,बडतर्फ करण्यात आले होते.

आता जेव्हा हा असा विधेयक संसदेत मंजूर होत आहे,त्याचा पुर्ण परीणाम हा औद्योगिक वसाहतीत असलेल्या कंपन्यांतील पर्मनंट,कंत्राटी कामगार मजुरांवर होणार आहे.सरकारचे कंपन्यांवर कुठलेही कंट्रोल कायद्यानुसार असणार नाही त्यामुळे बर्याच पर्मनंट मजुरांची,कंत्राटी कामगारांची गोची यामुळे होणार आहे...

भविष्यात औद्योगिक क्षेत्र व त्याला जोडून असलेल्या विविध क्षेत्रांवर याचा खूप मोठा परिणाम होईल,बेरोजगारी वाढेल,भारतीय तरुणांची चालू पिढी यामुळे नैराश्याच्या गर्तेत गेलेली असेल...

संसदेत मंजूर झालेल्या कामगार विधेयकाने एमआयडीसी विश्वात याचे पडसाद खूप सहज दिसायला लागतील.
औरंगाबाद (माझे शहर असल्यामुळे तेथील एमआयडीसी विश्वाचा अभ्यास बघता ) सारख्या शहरात की जे शहर आशिया खंडात औद्योगिक क्षेत्रातील महत्त्वाचे शहर म्हणून ओळखले जाते...

ज्याठिकाणी पाच एमआयडीसींच्या अंतर्गत अनेक कंपन्या आज घडीला चालू आहे,हजारो युवकांना रोजगार याठिकाणी उपलब्ध आहे,यापूर्वीच्या दोन पिढ्या या औद्योगिक वसाहतींवर आपले जीवन आधारित ठेवून जगले आहे,तिथे आजची अवस्था कायद्यानुसार झालेला बदल यांमुळे कंत्राटी कामगार असो किंवा कंपन्यांतील पर्मनंट व्यक्ती असो हे सर्व संभ्रमात पडले आहे...

औद्योगिक वसाहतीतील कामगार,कंत्राटी कामगार यांच्या बाबतीत आखलेली नियमितची धोरणे बघता भविष्यात खूप काही बदल झाले असतील हे चित्र दिसते... कारण वरवर जरी एमआयडीसीमध्ये काम करणारा कामगार वर्ग सुखी आहे,हा समज समाजातील इतर क्षेत्रातील माध्यमांचा असेल.परंतु कुठल्याही कंपनीत काम करतांना केलेली मेहनत,त्यांचा संघर्ष हा प्रत्यक्षात जवळुन अनुभवल्या शिवाय समजणारा नाही इतकंच...
(पोस्टचा राजकारणाशी जोडून वक्तव्य करणाऱ्याचा याठिकाणी विचार होणार नाही,तेव्हा आपण न व्यक्त झालेले योग्य असेल.)

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...