मुख्य सामग्रीवर वगळा

Aurangabad...

#Aurangabad...
एकीकडे औरंगाबादमध्ये उज्ज्वल भविष्याचा विचार करून,नव्याने डीएमआयसी अंतर्गत निर्माण होणारे नवीन प्रकल्प,अलिकडेच पूर्णत्वाच्या टप्प्यावर असलेली ऑरिक औद्योगिक वसाहत आणि शहराला जोडुन असलेल्या चिकलठाणा एमआयडीसी,शेंद्रा एमआयडीसी,वाळूज एमआयडीसी,रेल्वे स्टेशन परिसरात असलेली जुनी एमआयडीसी यांच्या माध्यमातून औरंगाबाद शहराला ऑटोमोबाईल इंडस्ट्रीयल सिटी मिळालेली नवी ओळख...
झालेला उपलब्ध रोजगार आणि एकीकडे कोरोनाच्या काळात उद्योग विश्वात झालेला बदल,नवीन रुजु झालेल्या संकल्पना हे सर्व औरंगाबाद शहर आशिया खंडात औद्योगिक क्षेत्रात किती उंचीवरील शहर आहे दाखवून देत आहे...

औरंगाबाद हे ऐतिहासिक आणि औद्योगिक शहर म्हणून जगाच्या नकाशावर आधीपासून ओळखले जातेच,त्यामध्ये दिल्ली-मुबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरमुळे ऑरिकची नव्याने भर पडली आहे.त्यामुळे येथे उद्योग वाढीला एक मोठे व्यासपीठ उपलब्ध झालेले आहे अन् सोबतच अनेक नवीन प्रकल्प या ठिकाणी उभारल्या जात आहे जाणार आहे.इंडस्ट्रीयल कॉरिडॉर आल्याने औरंगाबादचा औद्योगिक विकासाचा आलेख हा पुढील पंधरा वर्षात कायम वाढत राहणारा असेल.ऑरिकमध्ये येत्या काळात ३,३०,००० लोकांना रोजगार उपलब्ध होवू शकतो असा अंदाज प्राथमिक माहितीनुसार देता येतो,या सर्व बाबींचा एकत्रित परिणाम म्हणजे औद्योगिक उत्पादनाच्या बाबतीत शहर मोठी झेप घेऊ बघत आहे.

नवीन निर्माण होणारा रोजगार लक्षात घेता आगामी काळात येथे मोठ्या प्रमाणावर रहिवासी प्रकल्पाची गरज भासणार आहे,अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले रहिवासी प्रकल्प 'रिअल इस्टेट'च्या जगतात सुगीचे दिवस आणु बघत आहे,शहराची वाढती आर्थिक उलाढाल बघता शहराच्या विकासासाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जात आहे.एकुण शहराचा विकास औद्योगिक क्षेत्राच्या आधारावर भरभराटीस येऊ बघत आहे...
एकीकडे शहराचा वरील कारणांमुळे झालेला विकास अन् COVID-19 मुळे औद्योगिक विश्वात बदलु बघणाऱ्या संकल्पना कुठेतरी काळजीचे कारण ठरत आहे.परंतु सध्य परीस्थितीचा विचार केला असता बदललेले समीकरणे योग्य वाटत आहे.
COVID-19  च्या भयावह परिस्थितीमध्ये औद्योगिक वसाहतीत नियमांमध्ये केलेले बदल हे पूर्णपणे योग्य ठरले अन् त्याचे रिझल्ट म्हणुन काही अंशी का होईना पुन्हा एकदा सुरळीतपणे सुरू झालेली औद्योगिक वसाहतीतील कंपन्यामधील कामे असो किंवा शहरातील छोटे-छोटे व्यवसाय पुन्हा एकदा उभे राहण्याचा करू लागलेले प्रयत्न...

अजुनही पूर्णपणे धोका टळला नसल्यामुळे नियमांशी बांधील राहून शहरातील सर्व व्यवसाय,कंपन्या आपापली कामे करू बघत आहे.मागील तीन-चार महिन्यांचे औद्योगिक वसाहतीतील कामे अन् त्यांच्या कामे करण्याच्या पद्धती जर बघितल्या तर यात हळूहळू पुन्हा सर्व पूर्वपदावर येताना दिसत आहे,काही महिन्यांपूर्वी कंपन्यामध्ये बारा तासांच्या दोन शिफ्टमध्ये चालू असलेले कामे हळूहळू आठ तासांच्या तीन शिफ्टमध्ये बदलवण्याचे काम कंपन्या करत आहे... 

यामुळे शहरातील लॉकडाऊनच्या काळात निर्माण झालेल्या बेरोजगारीच्या समस्येवर कुठेतरी मात करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे,सोबतच काही अंशी का होईना काही नवीन प्रकल्प उभे राहण्यासाठी स्थानिक उद्योजक असो किंवा परदेशी उद्योग विश्वातून उद्योजक भारत देशात आपले प्रकल्प या ठिकाणी स्थायिक करण्याचा प्रयत्न करत आहे.दिवसेंदिवस आधुनिक टेक्नॉलॉजी मुळे होणारे बदल स्वीकारत शहरात एमआयडीसी मधील प्रकल्पा अंतर्गत औद्योगिकविश्वात होणाऱ्या घडामोडी बघण्यासारखे आहे...
एकीकडे शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात ऑटो मोबाईल इंडस्ट्रीयल क्षेत्रात,फार्मा क्षेत्रात चालू असलेल्या घडामोडी अन् एकीकडे शहरात नव्याने बाळस धरू बघणारे आय टी क्षेत्र नव्या नियमांना,संकल्पनांना लक्षात घेऊन आपले पाय रोवू बघत आहे...
यामुळे बऱ्यापैकी सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी हे क्षेत्र उपलब्ध करून देत आहे,अजून बराच कालावधी यासाठी आय टी क्षेत्रातील कंपन्यांना या शहरासाठी द्यावा लागेल तेव्हा कुठे या ठिकाणी हे क्षेत्र भरभराटीस येऊ शकेल...

COVID-19 च्या अतिशय कसोटीच्या काळात ज्याप्रमाणे औद्योगिक विश्वात काही बदल झाले,तसेच आय टी विश्वातही काही बदल झालेत.ज्याचे चांगले परिणाम दिसून येत आहे,त्यामुळेच 'Work from Home'  या पूर्वापार चालत असलेल्या संकल्पनेला स्वीकारत काम करण्याचे ठरवले गेल्या मुळे हे खरच सत्यात असू शकते हे दिसून आले आहे.ज्याचा की खुप मोठ्या प्रमाणावर फायदा आय टी क्षेत्रातील कंपन्यांना होताना दिसून येत आहे...
औरंगाबाद शहर आणि आय टी क्षेत्र लवकरच पुढील भागात...

Written by,
©®Bharat Sonwane.
MBA-(Production & Operation Management).

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...