मुख्य सामग्रीवर वगळा

Aurangabad...

#Aurangabad...
एकीकडे औरंगाबादमध्ये उज्ज्वल भविष्याचा विचार करून,नव्याने डीएमआयसी अंतर्गत निर्माण होणारे नवीन प्रकल्प,अलिकडेच पूर्णत्वाच्या टप्प्यावर असलेली ऑरिक औद्योगिक वसाहत आणि शहराला जोडुन असलेल्या चिकलठाणा एमआयडीसी,शेंद्रा एमआयडीसी,वाळूज एमआयडीसी,रेल्वे स्टेशन परिसरात असलेली जुनी एमआयडीसी यांच्या माध्यमातून औरंगाबाद शहराला ऑटोमोबाईल इंडस्ट्रीयल सिटी मिळालेली नवी ओळख...
झालेला उपलब्ध रोजगार आणि एकीकडे कोरोनाच्या काळात उद्योग विश्वात झालेला बदल,नवीन रुजु झालेल्या संकल्पना हे सर्व औरंगाबाद शहर आशिया खंडात औद्योगिक क्षेत्रात किती उंचीवरील शहर आहे दाखवून देत आहे...

औरंगाबाद हे ऐतिहासिक आणि औद्योगिक शहर म्हणून जगाच्या नकाशावर आधीपासून ओळखले जातेच,त्यामध्ये दिल्ली-मुबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरमुळे ऑरिकची नव्याने भर पडली आहे.त्यामुळे येथे उद्योग वाढीला एक मोठे व्यासपीठ उपलब्ध झालेले आहे अन् सोबतच अनेक नवीन प्रकल्प या ठिकाणी उभारल्या जात आहे जाणार आहे.इंडस्ट्रीयल कॉरिडॉर आल्याने औरंगाबादचा औद्योगिक विकासाचा आलेख हा पुढील पंधरा वर्षात कायम वाढत राहणारा असेल.ऑरिकमध्ये येत्या काळात ३,३०,००० लोकांना रोजगार उपलब्ध होवू शकतो असा अंदाज प्राथमिक माहितीनुसार देता येतो,या सर्व बाबींचा एकत्रित परिणाम म्हणजे औद्योगिक उत्पादनाच्या बाबतीत शहर मोठी झेप घेऊ बघत आहे.

नवीन निर्माण होणारा रोजगार लक्षात घेता आगामी काळात येथे मोठ्या प्रमाणावर रहिवासी प्रकल्पाची गरज भासणार आहे,अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले रहिवासी प्रकल्प 'रिअल इस्टेट'च्या जगतात सुगीचे दिवस आणु बघत आहे,शहराची वाढती आर्थिक उलाढाल बघता शहराच्या विकासासाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जात आहे.एकुण शहराचा विकास औद्योगिक क्षेत्राच्या आधारावर भरभराटीस येऊ बघत आहे...
एकीकडे शहराचा वरील कारणांमुळे झालेला विकास अन् COVID-19 मुळे औद्योगिक विश्वात बदलु बघणाऱ्या संकल्पना कुठेतरी काळजीचे कारण ठरत आहे.परंतु सध्य परीस्थितीचा विचार केला असता बदललेले समीकरणे योग्य वाटत आहे.
COVID-19  च्या भयावह परिस्थितीमध्ये औद्योगिक वसाहतीत नियमांमध्ये केलेले बदल हे पूर्णपणे योग्य ठरले अन् त्याचे रिझल्ट म्हणुन काही अंशी का होईना पुन्हा एकदा सुरळीतपणे सुरू झालेली औद्योगिक वसाहतीतील कंपन्यामधील कामे असो किंवा शहरातील छोटे-छोटे व्यवसाय पुन्हा एकदा उभे राहण्याचा करू लागलेले प्रयत्न...

अजुनही पूर्णपणे धोका टळला नसल्यामुळे नियमांशी बांधील राहून शहरातील सर्व व्यवसाय,कंपन्या आपापली कामे करू बघत आहे.मागील तीन-चार महिन्यांचे औद्योगिक वसाहतीतील कामे अन् त्यांच्या कामे करण्याच्या पद्धती जर बघितल्या तर यात हळूहळू पुन्हा सर्व पूर्वपदावर येताना दिसत आहे,काही महिन्यांपूर्वी कंपन्यामध्ये बारा तासांच्या दोन शिफ्टमध्ये चालू असलेले कामे हळूहळू आठ तासांच्या तीन शिफ्टमध्ये बदलवण्याचे काम कंपन्या करत आहे... 

यामुळे शहरातील लॉकडाऊनच्या काळात निर्माण झालेल्या बेरोजगारीच्या समस्येवर कुठेतरी मात करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे,सोबतच काही अंशी का होईना काही नवीन प्रकल्प उभे राहण्यासाठी स्थानिक उद्योजक असो किंवा परदेशी उद्योग विश्वातून उद्योजक भारत देशात आपले प्रकल्प या ठिकाणी स्थायिक करण्याचा प्रयत्न करत आहे.दिवसेंदिवस आधुनिक टेक्नॉलॉजी मुळे होणारे बदल स्वीकारत शहरात एमआयडीसी मधील प्रकल्पा अंतर्गत औद्योगिकविश्वात होणाऱ्या घडामोडी बघण्यासारखे आहे...
एकीकडे शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात ऑटो मोबाईल इंडस्ट्रीयल क्षेत्रात,फार्मा क्षेत्रात चालू असलेल्या घडामोडी अन् एकीकडे शहरात नव्याने बाळस धरू बघणारे आय टी क्षेत्र नव्या नियमांना,संकल्पनांना लक्षात घेऊन आपले पाय रोवू बघत आहे...
यामुळे बऱ्यापैकी सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी हे क्षेत्र उपलब्ध करून देत आहे,अजून बराच कालावधी यासाठी आय टी क्षेत्रातील कंपन्यांना या शहरासाठी द्यावा लागेल तेव्हा कुठे या ठिकाणी हे क्षेत्र भरभराटीस येऊ शकेल...

COVID-19 च्या अतिशय कसोटीच्या काळात ज्याप्रमाणे औद्योगिक विश्वात काही बदल झाले,तसेच आय टी विश्वातही काही बदल झालेत.ज्याचे चांगले परिणाम दिसून येत आहे,त्यामुळेच 'Work from Home'  या पूर्वापार चालत असलेल्या संकल्पनेला स्वीकारत काम करण्याचे ठरवले गेल्या मुळे हे खरच सत्यात असू शकते हे दिसून आले आहे.ज्याचा की खुप मोठ्या प्रमाणावर फायदा आय टी क्षेत्रातील कंपन्यांना होताना दिसून येत आहे...
औरंगाबाद शहर आणि आय टी क्षेत्र लवकरच पुढील भागात...

Written by,
©®Bharat Sonwane.
MBA-(Production & Operation Management).

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ