मुख्य सामग्रीवर वगळा

Morning Vibes..!

Morning Vibes..!


Morning Time उठल्यावर बेडवरील ब्लँकेटची घडी घालतांना विस्कटलेल्या आयुष्याची रोज नव्याने ब्लँकेटच्या घडीप्रमाणे तीच आयुष्याची विस्कटलेली घडी बदलता येईल का..? 
                                                               हा रोजचा विचार,प्रश्न मनात येऊन जातो,अलिकडच्या काही दिवसांतील मनाची मिळणारी उत्तरे फक्त "नाही" या एकाच शब्दात थोडक्या स्वरूपात मला भेटत असतात...
घडी घातलेलं ब्लँकेट ठरलेल्या जागेवर ठेवून देणं होतं,नाहीतर मग पुन्हा आयुष्यात आलेल्या रिकामपणात एक प्रहर साखर झोप होते...

पुन्हा मग तोच क्रम तीच विस्कटलेली ब्लँकेटची घडी सावरायची,करायची,ठेवून द्यायची.
बेडवरील सांजेच्या प्रहरी व्यवस्थित अंथरूण ठेवलेलं बेडशीट कव्हर पूर्णपणे सकाळी उठल्यावर पुन्हा अस्तव्यस्त झालेलं बघून काहीवेळ आपल्याच झोपण्याचं हसु चेहऱ्यावर फुलून येणं अन् मग गालातल्या गालात आलेलं ते हसू ...

मग तेच बेडशीट कव्हर बेडवर टाकायची कसरत ज्याप्रमाणे Daily Routine मध्ये छोट्या छोट्या गोष्टींसाठी होणारी कसरत या गोष्टींचा दिवसभराचा आलेख डोळ्यासमोर येऊन जात असतो.कित्येक वेळा बेडवर बेडशीट कव्हर व्यवस्थित टाकायचं,चहुकडून त्याला व्यवस्थित फोल्ड करून पुन्हा ते दिवसभर बेडवर व्यवस्थित राहील याचीच मनाला खोटी शाश्वती देत राहायचं....

आयुष्यात आलेल्या रिकामपणात माणूस अती विचार करू लागतो हे मग दिवसभर वेळोवेळी कळून चुकत असते,मग बारीक सारीक गोष्टीत स्वताला गुंतवून घेणं होत राहतं तर कधी नको त्या गोष्टीत रमवून घेणंही होतं...

जसा सूर्योदय होतो तसाच नेहमीप्रमाणे सूर्यास्त होतो,या इतक्या वेळात आयुष्याची विस्कटलेली घडी कितीवेळा काट्याच्या घडीवर बरोबर येते अन् कितीवेळा बिघडते याला उत्तर नसते.त्या एका लिमिटपर्यंत मग स्वताला सावरणे येतं,स्वतःची मनाची खोटी समज काढणे येतं अन् माणूस कितीत सहनशील असतो हे ही कळायला लागतं...

सांज ढळली की मग पुन्हा पुस्तकाचा आधार घेऊन ब्लॅंकेटच्या घडीला सावरत त्यात रममाण होवुन जाणं येतं,मग सकाळपासून संध्याकाळपर्यंत येणाऱ्या अनेक प्रश्नांची सरबत्ती केली जाते...
                                                              मिळालेली मनाची उत्तर यांचं पुन्हा रिव्हिजन होत राहते,मग डळत्या सूर्याला बघुन तासागणिक सावरलेली घडी विस्कटत जाते पुन्हा एकदा मनाचीही अन् ब्लॅंकेटचीही...

पुन्हा मग एकदा मग मनाला,स्वताला सावरायला जमायला हवं नाहीतर काळोखात आसवांना टिपणार कुणी नसतं,मग क्षणा क्षणाला विचारांचे स्मरण आणि मनाशीच दाबलेले आजवर सावरलेले हुंदके फुटत जातात अन् सावरणे कठीण होवुन बसते...

Written by,
Bharat Sonwane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...