मुख्य सामग्रीवर वगळा

Morning Vibes..!

Morning Vibes..!


Morning Time उठल्यावर बेडवरील ब्लँकेटची घडी घालतांना विस्कटलेल्या आयुष्याची रोज नव्याने ब्लँकेटच्या घडीप्रमाणे तीच आयुष्याची विस्कटलेली घडी बदलता येईल का..? 
                                                               हा रोजचा विचार,प्रश्न मनात येऊन जातो,अलिकडच्या काही दिवसांतील मनाची मिळणारी उत्तरे फक्त "नाही" या एकाच शब्दात थोडक्या स्वरूपात मला भेटत असतात...
घडी घातलेलं ब्लँकेट ठरलेल्या जागेवर ठेवून देणं होतं,नाहीतर मग पुन्हा आयुष्यात आलेल्या रिकामपणात एक प्रहर साखर झोप होते...

पुन्हा मग तोच क्रम तीच विस्कटलेली ब्लँकेटची घडी सावरायची,करायची,ठेवून द्यायची.
बेडवरील सांजेच्या प्रहरी व्यवस्थित अंथरूण ठेवलेलं बेडशीट कव्हर पूर्णपणे सकाळी उठल्यावर पुन्हा अस्तव्यस्त झालेलं बघून काहीवेळ आपल्याच झोपण्याचं हसु चेहऱ्यावर फुलून येणं अन् मग गालातल्या गालात आलेलं ते हसू ...

मग तेच बेडशीट कव्हर बेडवर टाकायची कसरत ज्याप्रमाणे Daily Routine मध्ये छोट्या छोट्या गोष्टींसाठी होणारी कसरत या गोष्टींचा दिवसभराचा आलेख डोळ्यासमोर येऊन जात असतो.कित्येक वेळा बेडवर बेडशीट कव्हर व्यवस्थित टाकायचं,चहुकडून त्याला व्यवस्थित फोल्ड करून पुन्हा ते दिवसभर बेडवर व्यवस्थित राहील याचीच मनाला खोटी शाश्वती देत राहायचं....

आयुष्यात आलेल्या रिकामपणात माणूस अती विचार करू लागतो हे मग दिवसभर वेळोवेळी कळून चुकत असते,मग बारीक सारीक गोष्टीत स्वताला गुंतवून घेणं होत राहतं तर कधी नको त्या गोष्टीत रमवून घेणंही होतं...

जसा सूर्योदय होतो तसाच नेहमीप्रमाणे सूर्यास्त होतो,या इतक्या वेळात आयुष्याची विस्कटलेली घडी कितीवेळा काट्याच्या घडीवर बरोबर येते अन् कितीवेळा बिघडते याला उत्तर नसते.त्या एका लिमिटपर्यंत मग स्वताला सावरणे येतं,स्वतःची मनाची खोटी समज काढणे येतं अन् माणूस कितीत सहनशील असतो हे ही कळायला लागतं...

सांज ढळली की मग पुन्हा पुस्तकाचा आधार घेऊन ब्लॅंकेटच्या घडीला सावरत त्यात रममाण होवुन जाणं येतं,मग सकाळपासून संध्याकाळपर्यंत येणाऱ्या अनेक प्रश्नांची सरबत्ती केली जाते...
                                                              मिळालेली मनाची उत्तर यांचं पुन्हा रिव्हिजन होत राहते,मग डळत्या सूर्याला बघुन तासागणिक सावरलेली घडी विस्कटत जाते पुन्हा एकदा मनाचीही अन् ब्लॅंकेटचीही...

पुन्हा मग एकदा मग मनाला,स्वताला सावरायला जमायला हवं नाहीतर काळोखात आसवांना टिपणार कुणी नसतं,मग क्षणा क्षणाला विचारांचे स्मरण आणि मनाशीच दाबलेले आजवर सावरलेले हुंदके फुटत जातात अन् सावरणे कठीण होवुन बसते...

Written by,
Bharat Sonwane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ