मुख्य सामग्रीवर वगळा

Wild Life

Wild Life...

भर दुपारच्या उन्हात तो धरण पाळेचा आधार घेऊन सभोवतालच्या परिसरात नजर लावून बसलेला असायचा,नजर शून्यात असायची की,काहीतरी विचार करत काही शोधात असायची हे फार सहज कळायचे नाही... पण बर्याचवेळ उन्हात उभे राहून जेव्हा दूरवर उन्हाची झळई डोळ्यांना तुटतांना दिसायची त्यावेळी आपसुकच त्याच्या डोळ्यांतून पाण्याचे ओघळ वाहुन यायचे अन् तो या वाळलेल्या,बोडक्या रानात नजर लावुन काहीतरी शोधत आहे हे ज्ञात होत असायचं...

उंचावर असलेल्या धरण पाळेवरून त्याला दूरवर पसरलेल्या रानाचा अंदाज घेता येत असायचा,चरायला म्हणुन सोडलेल्या बकऱ्यासुद्धा राखण करता यायच्या,न्याहाळता यायच्या. एखाद दुसरी बकरी वाट चुकली तर तोंडानं विशिष्ट शैलीने तो शिळ फुंकायचा अन् वाट चुकलेली ती बकरी पुन्हा आपल्या कळपात परतायची.

वेगळं काही नसायचं रोजचं हेच..!

पहाट झाली सुर्य किरणे अंगावर आली की,आवरुन महिन्यांनी बांधलेल्या बकऱ्या चरायला,वळायला म्हणुन रानात घेऊन यायच्या अन् सुर्य धरणपाळेच्या खाली कलला की बकऱ्या घेऊन परतीच्या वाटेवर मार्गानं लागायचं... रस्त्यावर असलेल्या झाडांच्या फांद्या उंच बांबूला बांधलेल्या विळ्याने तोडून डोईवर बांधुन बकऱ्या सावरत घराची वाट चुकती करायची इतकंच काय ते त्याचं आयुष्य...

माणसाच्या व्यवहारी जगाची ना त्याला ओळख होती ना पाळख,ओळख तरी कशी असावी नियमुन दिलेलं हे काम त्याच्या पाचवीला पुजलेले.माणसाच्या व्यवहारी जगाची जरी त्याला ओळख नसली तरी,निसर्गाचं मानवाला आपलं करणे अन् माणसाने निसर्गाची हानी करणे हे त्याला सहज कळायचं,निसर्गातल्या झाडांशी,पाने,फुले,पक्षी,प्राणी यांच्याशी त्याची चांगली गट्टी जमलेली...

निसर्गाचा मान राखून आजवर तो आपल्या बकऱ्या चारत राहायचा निसर्गही त्याला भरभरून देत असायचा,घेणाऱ्या सामान्य माणसाला या गोष्टीचं काही सोयर सुतक नसल्या कारणाने सामान्य व्यक्तीला हे निसर्गाचं देणं कधी कळले नाही,पण त्याला या सर्वच गोष्टींची पारख होती म्हणुन तो निसर्गाकडून मिळेल ते घेऊन त्याची परतफेडही करत असायचा...

अनवाणी कधीतरी रान वाटेनं भटकत असतांना त्याला झाडांशी हितगुज घालतांना बघितलं तर कधी,धरण पाळेच्या भिंतीला डोके टेकून स्वतःशी बोलताना बघितलं,कधीतरी लक्ष्मी आईच्या छोट्याश्या देवळात सावलीच्या आडोश्याला बघितलं पण कधीही नाही दिसला त्याच्यात तो सामान्य माणसात असलेल्या जगण्यातला व्यव्हारीपणा...
वेगळ्याच काही तंद्रीत असलेला तो जगा वेगळा भासायचा....

भर दुपारी उन्हात अशी नेमक्या वख्ताला त्याची आठवण येऊन जायची अन् आपसुक डोळे बोडक्या रानाच्या दिशेनं बघु लागायची...मग कधीतरी  रानात फुललेलं पळसाच झाड दिसायचं,गुलमोहराच्या झाडाला आलेलं फुल अन् पडत्या उन्हात भर रानात चहुकडे पसरलेला त्याचा तो मध्यम सुगंध.
हे सगळं कसं आठवणीत फिट्ट बसलेलं होतं त्याच्या यात कुठला बदलही नव्हता,कदाचित होणारही नाही...

Written by,
©®Bharat Sonwane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...