मुख्य सामग्रीवर वगळा

Wild Life

Wild Life...

भर दुपारच्या उन्हात तो धरण पाळेचा आधार घेऊन सभोवतालच्या परिसरात नजर लावून बसलेला असायचा,नजर शून्यात असायची की,काहीतरी विचार करत काही शोधात असायची हे फार सहज कळायचे नाही... पण बर्याचवेळ उन्हात उभे राहून जेव्हा दूरवर उन्हाची झळई डोळ्यांना तुटतांना दिसायची त्यावेळी आपसुकच त्याच्या डोळ्यांतून पाण्याचे ओघळ वाहुन यायचे अन् तो या वाळलेल्या,बोडक्या रानात नजर लावुन काहीतरी शोधत आहे हे ज्ञात होत असायचं...

उंचावर असलेल्या धरण पाळेवरून त्याला दूरवर पसरलेल्या रानाचा अंदाज घेता येत असायचा,चरायला म्हणुन सोडलेल्या बकऱ्यासुद्धा राखण करता यायच्या,न्याहाळता यायच्या. एखाद दुसरी बकरी वाट चुकली तर तोंडानं विशिष्ट शैलीने तो शिळ फुंकायचा अन् वाट चुकलेली ती बकरी पुन्हा आपल्या कळपात परतायची.

वेगळं काही नसायचं रोजचं हेच..!

पहाट झाली सुर्य किरणे अंगावर आली की,आवरुन महिन्यांनी बांधलेल्या बकऱ्या चरायला,वळायला म्हणुन रानात घेऊन यायच्या अन् सुर्य धरणपाळेच्या खाली कलला की बकऱ्या घेऊन परतीच्या वाटेवर मार्गानं लागायचं... रस्त्यावर असलेल्या झाडांच्या फांद्या उंच बांबूला बांधलेल्या विळ्याने तोडून डोईवर बांधुन बकऱ्या सावरत घराची वाट चुकती करायची इतकंच काय ते त्याचं आयुष्य...

माणसाच्या व्यवहारी जगाची ना त्याला ओळख होती ना पाळख,ओळख तरी कशी असावी नियमुन दिलेलं हे काम त्याच्या पाचवीला पुजलेले.माणसाच्या व्यवहारी जगाची जरी त्याला ओळख नसली तरी,निसर्गाचं मानवाला आपलं करणे अन् माणसाने निसर्गाची हानी करणे हे त्याला सहज कळायचं,निसर्गातल्या झाडांशी,पाने,फुले,पक्षी,प्राणी यांच्याशी त्याची चांगली गट्टी जमलेली...

निसर्गाचा मान राखून आजवर तो आपल्या बकऱ्या चारत राहायचा निसर्गही त्याला भरभरून देत असायचा,घेणाऱ्या सामान्य माणसाला या गोष्टीचं काही सोयर सुतक नसल्या कारणाने सामान्य व्यक्तीला हे निसर्गाचं देणं कधी कळले नाही,पण त्याला या सर्वच गोष्टींची पारख होती म्हणुन तो निसर्गाकडून मिळेल ते घेऊन त्याची परतफेडही करत असायचा...

अनवाणी कधीतरी रान वाटेनं भटकत असतांना त्याला झाडांशी हितगुज घालतांना बघितलं तर कधी,धरण पाळेच्या भिंतीला डोके टेकून स्वतःशी बोलताना बघितलं,कधीतरी लक्ष्मी आईच्या छोट्याश्या देवळात सावलीच्या आडोश्याला बघितलं पण कधीही नाही दिसला त्याच्यात तो सामान्य माणसात असलेल्या जगण्यातला व्यव्हारीपणा...
वेगळ्याच काही तंद्रीत असलेला तो जगा वेगळा भासायचा....

भर दुपारी उन्हात अशी नेमक्या वख्ताला त्याची आठवण येऊन जायची अन् आपसुक डोळे बोडक्या रानाच्या दिशेनं बघु लागायची...मग कधीतरी  रानात फुललेलं पळसाच झाड दिसायचं,गुलमोहराच्या झाडाला आलेलं फुल अन् पडत्या उन्हात भर रानात चहुकडे पसरलेला त्याचा तो मध्यम सुगंध.
हे सगळं कसं आठवणीत फिट्ट बसलेलं होतं त्याच्या यात कुठला बदलही नव्हता,कदाचित होणारही नाही...

Written by,
©®Bharat Sonwane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ