मुख्य सामग्रीवर वगळा

मालगुडी डेज..!

मालगुडी डेज..!

"मालगुडी डेज" आर.के.नारायण लिखित ही कथामालिका माझी बालपणापासून ते आजतागायत नेहमी आवडती मालिका आहे.अलिकडच्या काळात टीव्हीवर ती प्रसारित होत नसली तरीही फावल्या वेळात इतर प्रसार माध्यमातून मी नेहमीच ती बघत असतो...

मालगुडी डेज चे पूर्ण भाग मी बघितले,कित्येकदा ते पुन्हा पुन्हा बघूनही एक नावीन्य त्या मालिकेला बघण्यातून मिळत असते.मालगुडी नावाच्या गावाभोवती घडणाऱ्या या कथा खुप रंजक पद्धतीने,एका विशेष धाटनितून लेखकाने त्या लिखित केल्या आहेत.
याचा प्रत्यय प्रत्येक वेळा या मालिकेला बघतांना आपल्याला येत असतो,मालगुडी हे पूर्णपणे जरी काल्पनिक असले तरीही मालिकेमध्ये बघतांना या गावाचे केलेलं ते वर्णन,त्या ठराविक विशिष्ट जागा नेहमीच कुतूहल निर्माण करतात आणि कुठेतरी त्या गावात आपल्याला नेऊन सोडतात....

नक्कीच असे गाव बघायला आवडेल,लेखकाच्या लिखाणाचा बाज साध्या पद्धतीने,सहज समजेल अश्या भाष्या शैलीत केलेलं लेखन काळजात घर करून राहते.आणि मालिका बघताना आपण त्या गावात भटकंती करू लागतो,प्रत्येक कथा आपल्याला गावातील त्या विशिष्ट ठिकाणांवरून आठवायला लागते अन् आपसुकच मन त्या कथे भोवती रुंजी घालू बघते...

मालिका बघत असताना लेखक आपल्याला इतक्या वर्षांनंतरही त्या काळात घेऊन जातो.ज्या काळात हे लेखन केल्या गेले आजही वाटते की,काल्पनिक का असेना पण 'मालगुडी' नावाचं हे प्रत्येक्षात असायला हवं होतं.गावातील त्या प्रत्येक खाणाखुणा बघायला,सोबतीने मालगुडी डेजच्या कथांचा आस्वाद घ्यायला आवडले असते...

मालगुडी डेज या मालिकेतील माझी सर्वाधिक आवडती कथा कुठली असेल ती आहे "गरीब आदमी" 
गरीब आदमी या कथेतील लेखकाचं लेखन मनाला स्पर्शून जाणारं आणि खुप जवळचे,अनुभवलेले वाटते.कथेचा नायक मुनी हाच तो वृध्द गरीब आदमी असतो.त्याचा मुलगा दुसऱ्या एका मोठ्या शहरात नोकरीला गेलेला असतो अन् हा मुनी नेहमी त्याची तार येईल याची वाट बघत असतो...
त्याच्या घरात त्याची बायको अन् त्याच्या त्या प्रिय बकऱ्या असतात,घरात असलेली गरिबी याचे वर्णन मग गावात उधारीवर किराणा आणायला गेल्यावर गावातील दुकानदार त्याची मागची उधारी त्याला मागतो.पैसे नसल्याने तो सांगणारे कारणे गावातील धनी लोकं त्याच्या कारणावर हसतात,तो तसाच खाली हात वापस येतो हे कथेत प्रत्येक वाक्या गणिक खुप जवळचे बघितलेले,अनुभवलेले वाटते.
घरी आल्यावर त्याच्या बायकोचे त्याला ते रागावणे,गावात कुण्या किसानाचा झालेला खून तिच्यावर आरोप येईल म्हणून तिचं कामावर न जाणे,मग अंगणात असलेल्या एकमेव शेवग्याच्या शेंगांच्या झाडाच्या शेंगा तोडून त्याचं केलेलं ते कोड्यास त्या गरीब आदमीच घर हे खूप भावते....

मग त्याचं ते बकऱ्या चरायला रस्त्याच्या बाजूला असलेल्या रानात घाटात घेऊन जाणं,त्याच्या बायकोचं मागून ते मोठ्या आवाजात ओरडणे हे बघायला फार छान वाटते.मग आपसुकच आपण त्या कथेचा एक भाग होवुन जातो,पुढे पुढे खुप सुंदर ही कथा आहे....

या कथेत सर्वाधिक आवडणारा भाग कुठला असेल तर तो जो घाटात मुनी खुप वर्षांपूर्वी होवुन गेलेल्या राज्याच्या पुतळ्याखाली झोपलेला असतो,मग घाटातून इंग्रज अधिकाऱ्याची जाणारी गाडी तिचे डिझेल संपणे,मुनीचे ठराविक रोजच्या रस्त्यावरील गाड्यांना हात देणे जा जा असे हाताने करणे,मग त्या इंग्रज अधिकाऱ्याची अन् गरीब अनपड मुनीची झालेली भेट भाषेची दोघांमध्ये झालेली तफावत पण तरीही फुलत जाणारा संवाद...

इंग्रज अधिकाऱ्याला तो राज्याचा पुतळा आवडणे,मग मुनीला पैसे देत तो खरेदी करणे,तो गाडीवर इतर प्रवाशांच्या मदतीने टपावर बांधणे गाडीत त्या प्रवाशांच्या गाडीतील डिझेल टाकणे हे दृश्य खूप भावणारे आहे.कथा काळजाचा ठाव घेतेच,सोबतीला कथेला साजेसे निर्माण केलेले दृश्य हे मला खूप भावते ते मालगुडी नावाचं गाव असो किंवा तो पुतळा,तो घाट हे खुप सुंदर आणि माझ्याशी कनेक्ट मला वाटले,त्यामुळे ही कथा माझी खूप आवडती आहे,नक्कीच बघा आपल्यालाही आवडेल...

'मालगुडी डेज' बद्दल थोडक्यात....
मालगुडी डेज ही आर.के. नारायणलिखित कथामालिका आहे. १९३५ साली त्यांनी मालगुडी नावाच्या एका काल्पनिक गावाला केंद्रस्थानी कल्पून स्वामी ॲण्ड फ्रेण्ड्स नावाची आपली पहिली लघु कथा मालिका लिहिली. त्यावेळी त्यांचे लिखाण भारतात कोणाच्याही पसंतीस उतरले नाही.

या गोष्टी वाचून लेखक ग्रॅहॅम ग्रीन यांना मात्र या कथांमध्ये त्यांचे नवीन मित्र भेटल्यासारखे वाटले. त्यांनी पुढाकार घेऊन नारायण यांची ही कथा मालिका छापण्यात रस घेतला आणि हे पुस्तक अतिशय गाजले. त्यानंतर नारायण यांनी एका पाठोपाठ एक सरस गोष्टी लिहून काढल्या. त्यांच्या बऱ्याच कथा मालगुडी नावाच्या गावाभोवती घडतात.या गोष्टी वाचतांना वाचक त्यात हरवून जातात.हे गाव पूर्णपणे काल्पनिक आहे यावर अनेकांचा विश्वास बसत नाही इतके वास्तववादी चित्रण नारायण यांनी आपल्या कथांमधून उभे केले आहे.

या गावातीलच एक गोष्ट दी गाईड. यावर गाईड नावाचा हिन्दी चित्रपट निघाला. तर त्यांच्या मिस्टर संपत आणि दी फायनान्शियल एक्सपर्ट या पुस्ताकांच्या आधारेही चित्रपट निघाले आहेत. शिवाय त्यांच्या गोष्टींवर आधारीत दूरदर्शन मालिकाही तयार करण्यात आली होती.

साधी लिखाणशैली आणि हलक्या-फुलक्या विनोदामुळे नारायण यांची तुलना प्रसिद्ध रशियन लेखक आंतोन चेखव यांच्याशी केली जाते.त्यांचे लिखाण जगातल्या अनेक भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे.त्यांना अनेक राष्ट्रीय आणि अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत...

Visit the link below to read the rest of the article...
Written by,
©®Bharat Sonwane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ