मुख्य सामग्रीवर वगळा

अलगुज बोलायचं राहून गेलेलं..!

अलगुज बोलायचं राहून गेलेलं..!

माणसं जोडायला हवी या एका वाक्यापाशी येऊन हल्ली मनाचा संवाद काही सेकंदासाठी का होईना थांबत असतो. कारण आयुष्यात खरं माणसं जोडायला हवीच का ? ती खरच इतकी महत्त्वाची असतात का ? ही दोन प्रश्न हल्ली आयुष्याची गणितं सोडवत असताना रोजच पडत असतात.

मग कुणी अनामिक खूप दिवसांच्या अंतराने भेटून जातं, दोन क्षणाच सुख आपल्या पदरी टाकून जातं. अश्यावेळी वाटून जातं की, आपण माणसं जोडायला हवी. मग कधीतरी जोडलेल्या माणसांचा होणारा त्रास व त्यांची उपस्थिती आपल्या आयुष्यात असण्याने होणारा त्रास. हे सगळं कसं आलबेल आहे असं वाटतं. 
आयुष्याची गणितं जुळवत-जुळवत मन मग हिंदोळे देत का होईना या प्रश्नांना सोबत घेऊन रोज माझ्याशी जगण्यासाठी हव्या असणाऱ्या गोष्टींना घेऊन गुजगोष्टी करत असतं.
असंच काही त्याच्या कालच्या झालेल्या गुजगोष्टीतून हाती लागलं अन् वाटलं की लिहायला हवं.

कारण लिहल्याने काय होतं, माणसं जोडली जातात. त्यांची प्रॉब्लेम्स नकळत मग आपली होतात, मग उत्तरे शोधली जातात. कित्येक कधीही उत्तर न मिळणाऱ्या प्रश्नांची. पण; माणसांचा सहवास असाच असतो जो आशेला लावतो. मग ते प्रेम असो मैत्री असो किंवा जगण्यासाठी शिकत असलेली गणितं का होईना.

तर हल्लीना अनेकदा नोटीस करतो की, काही जवळचे मित्र- मैत्रिणी व्हॉट्सॲपवर स्टेटस टाकलं की दुसऱ्या क्षणाला ते डिलीट करतात. ते दोन-तीन मिनिटे राहिलेलं स्टेटस अनेकदा त्या मिञ-मैत्रिणीच्या आयुष्याची गणितं तिच्याकडून सांगणारे असतं. ती शोधत असते आपल्या पडलेल्या प्रश्नांना उत्तरे. अश्यावेळी या मिञ-मैत्रिणीला अनेकदा आपल्या जवळच्या व्यक्तीशी हे प्रॉब्लेम शेअर करायचे असतात.

हे जे मित्र असतातना ते फार बोलके नसतात अन् मग ते हे असा स्टेटसचा खेळ करत बसतात. त्यातून स्वतःला खोटी समजूत घालत बसतात. मग त्यांचं हे आयुष्याचे गणित घेऊन टाकलेलं अन् पुढच्या काही मिनिटांत डिलिट झालेलं स्टेटस माझ्यासारख्या एखाद्या संवेदनशील मनाच्या व्यक्तीने बघितलं की अनेकदा बोलण्याचा प्रयत्न होतो. 

अनेकदा त्यांचं हे असं स्टेटस टाकणं ते प्रॉब्लेम फेज करत आहेत हे सांगतही असतं. मग अश्यावेळी माझ्यासारख्या मित्राला ती वेळ साधता यायला हवी. नाहीतर ते स्टेटस बघून जर आपण आपल्या या मिञ-मैत्रिणीला बोललो नाही तर त्यांची प्रॉब्लेम ही अशीच वाढत जातात. मग एक दिवस कधीतरी आयुष्य जगणं त्यांना अवघड वाटायला लागतं.

मग नको ते प्रश्न मनात येतात अन् नको ती उत्तर बावरलेलं त्यांचं मन त्यांना देतं अन् मग सगळं काही मिनिटात संपून जातं.

तेव्हा असे मिञ-मैत्रिणी जोडायला हवी, त्यांची प्रॉब्लेम्स समजून घ्यायची, त्यांच्याशी टाईम स्पेंड करायचा. होत काही नसते, आपण त्यांचे प्रॉब्लेम सोडवू शकत नाही हे त्यांना अन् आपल्यालाही माहीत असते. पण; फक्त आपलं ऐकून घेणारं कुणी असलं की फरक पडतो.

तेव्हा आपण ऐकणारं होऊया, आजवर असे अनेक मित्र-मैत्रीणी भेटले, त्यांचे स्टेटस बघून त्यांच्याशी बोलता झालो. त्यांचे प्रॉब्लेम्स मी Solve करु शकलो की नाही माहित नाही पण; माझं त्यांच्या सोबत असणं आधार वाटतं त्यांना. 

खास करून अश्या मैत्रिणी फार वाट्याला आल्या. कारण हेच असेल की, लेखकाच्या मैत्रीणी खूप असतात म्हणून असेल. पण; अलाहिदा हसण्याचा भाग सोडला तर हे खूप खरं आहे.
मुलांच्या बाबतीत एक समजलं मुलं फार संवेदशील अश्या मनाची फार नसतात. अनेकदा त्यांचे हे असे प्रॉब्लेम्स ते चहा अन् सिगारेटच्या एका कशवर सोडवून मोकळे होऊन जातात.

त्यामुळं अनेकदा त्यांच्या बाबतीत आनंद वाटतो पण त्यांचं आयुष्याला घेऊन तुटणे कधी बघितलं तर ते ही खूप वाईट्ट असतं. अनेकदा मित्रमैत्रिणींनो आपण प्रत्येक प्रॉब्लेम आपल्या पालकांना किंवा Girlfriend, Boyfriend यांना सांगू शकत नसतो किंवा तितका/तितकी तो/ती पात्रही त्यावेळी नसतात. कारण एक हक्काची मैत्रीण किंवा मिञ जितक्या सहज आपले हे प्रोब्लेम समजू शकतात तितके ते नाही. 

कारण त्यांच्या इतकं समजून घेणारं अन् त्यांना जितकं शेअर आपण करतो तसे आयुष्यात कुणी नसतं. तेव्हा असं डिलीट होणारं स्टेटस बघून विचारपूस करणारी मैत्रीण अन् मित्र कायम आयुष्यात ठेवा. आयुष्य जगणं सुंदर होईल अन् सहज होईल.

Written by,
Bharat Sonawane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...