मुख्य सामग्रीवर वगळा

अलगुज बोलायचं राहून गेलेलं..!

अलगुज बोलायचं राहून गेलेलं..!

माणसं जोडायला हवी या एका वाक्यापाशी येऊन हल्ली मनाचा संवाद काही सेकंदासाठी का होईना थांबत असतो. कारण आयुष्यात खरं माणसं जोडायला हवीच का ? ती खरच इतकी महत्त्वाची असतात का ? ही दोन प्रश्न हल्ली आयुष्याची गणितं सोडवत असताना रोजच पडत असतात.

मग कुणी अनामिक खूप दिवसांच्या अंतराने भेटून जातं, दोन क्षणाच सुख आपल्या पदरी टाकून जातं. अश्यावेळी वाटून जातं की, आपण माणसं जोडायला हवी. मग कधीतरी जोडलेल्या माणसांचा होणारा त्रास व त्यांची उपस्थिती आपल्या आयुष्यात असण्याने होणारा त्रास. हे सगळं कसं आलबेल आहे असं वाटतं. 
आयुष्याची गणितं जुळवत-जुळवत मन मग हिंदोळे देत का होईना या प्रश्नांना सोबत घेऊन रोज माझ्याशी जगण्यासाठी हव्या असणाऱ्या गोष्टींना घेऊन गुजगोष्टी करत असतं.
असंच काही त्याच्या कालच्या झालेल्या गुजगोष्टीतून हाती लागलं अन् वाटलं की लिहायला हवं.

कारण लिहल्याने काय होतं, माणसं जोडली जातात. त्यांची प्रॉब्लेम्स नकळत मग आपली होतात, मग उत्तरे शोधली जातात. कित्येक कधीही उत्तर न मिळणाऱ्या प्रश्नांची. पण; माणसांचा सहवास असाच असतो जो आशेला लावतो. मग ते प्रेम असो मैत्री असो किंवा जगण्यासाठी शिकत असलेली गणितं का होईना.

तर हल्लीना अनेकदा नोटीस करतो की, काही जवळचे मित्र- मैत्रिणी व्हॉट्सॲपवर स्टेटस टाकलं की दुसऱ्या क्षणाला ते डिलीट करतात. ते दोन-तीन मिनिटे राहिलेलं स्टेटस अनेकदा त्या मिञ-मैत्रिणीच्या आयुष्याची गणितं तिच्याकडून सांगणारे असतं. ती शोधत असते आपल्या पडलेल्या प्रश्नांना उत्तरे. अश्यावेळी या मिञ-मैत्रिणीला अनेकदा आपल्या जवळच्या व्यक्तीशी हे प्रॉब्लेम शेअर करायचे असतात.

हे जे मित्र असतातना ते फार बोलके नसतात अन् मग ते हे असा स्टेटसचा खेळ करत बसतात. त्यातून स्वतःला खोटी समजूत घालत बसतात. मग त्यांचं हे आयुष्याचे गणित घेऊन टाकलेलं अन् पुढच्या काही मिनिटांत डिलिट झालेलं स्टेटस माझ्यासारख्या एखाद्या संवेदनशील मनाच्या व्यक्तीने बघितलं की अनेकदा बोलण्याचा प्रयत्न होतो. 

अनेकदा त्यांचं हे असं स्टेटस टाकणं ते प्रॉब्लेम फेज करत आहेत हे सांगतही असतं. मग अश्यावेळी माझ्यासारख्या मित्राला ती वेळ साधता यायला हवी. नाहीतर ते स्टेटस बघून जर आपण आपल्या या मिञ-मैत्रिणीला बोललो नाही तर त्यांची प्रॉब्लेम ही अशीच वाढत जातात. मग एक दिवस कधीतरी आयुष्य जगणं त्यांना अवघड वाटायला लागतं.

मग नको ते प्रश्न मनात येतात अन् नको ती उत्तर बावरलेलं त्यांचं मन त्यांना देतं अन् मग सगळं काही मिनिटात संपून जातं.

तेव्हा असे मिञ-मैत्रिणी जोडायला हवी, त्यांची प्रॉब्लेम्स समजून घ्यायची, त्यांच्याशी टाईम स्पेंड करायचा. होत काही नसते, आपण त्यांचे प्रॉब्लेम सोडवू शकत नाही हे त्यांना अन् आपल्यालाही माहीत असते. पण; फक्त आपलं ऐकून घेणारं कुणी असलं की फरक पडतो.

तेव्हा आपण ऐकणारं होऊया, आजवर असे अनेक मित्र-मैत्रीणी भेटले, त्यांचे स्टेटस बघून त्यांच्याशी बोलता झालो. त्यांचे प्रॉब्लेम्स मी Solve करु शकलो की नाही माहित नाही पण; माझं त्यांच्या सोबत असणं आधार वाटतं त्यांना. 

खास करून अश्या मैत्रिणी फार वाट्याला आल्या. कारण हेच असेल की, लेखकाच्या मैत्रीणी खूप असतात म्हणून असेल. पण; अलाहिदा हसण्याचा भाग सोडला तर हे खूप खरं आहे.
मुलांच्या बाबतीत एक समजलं मुलं फार संवेदशील अश्या मनाची फार नसतात. अनेकदा त्यांचे हे असे प्रॉब्लेम्स ते चहा अन् सिगारेटच्या एका कशवर सोडवून मोकळे होऊन जातात.

त्यामुळं अनेकदा त्यांच्या बाबतीत आनंद वाटतो पण त्यांचं आयुष्याला घेऊन तुटणे कधी बघितलं तर ते ही खूप वाईट्ट असतं. अनेकदा मित्रमैत्रिणींनो आपण प्रत्येक प्रॉब्लेम आपल्या पालकांना किंवा Girlfriend, Boyfriend यांना सांगू शकत नसतो किंवा तितका/तितकी तो/ती पात्रही त्यावेळी नसतात. कारण एक हक्काची मैत्रीण किंवा मिञ जितक्या सहज आपले हे प्रोब्लेम समजू शकतात तितके ते नाही. 

कारण त्यांच्या इतकं समजून घेणारं अन् त्यांना जितकं शेअर आपण करतो तसे आयुष्यात कुणी नसतं. तेव्हा असं डिलीट होणारं स्टेटस बघून विचारपूस करणारी मैत्रीण अन् मित्र कायम आयुष्यात ठेवा. आयुष्य जगणं सुंदर होईल अन् सहज होईल.

Written by,
Bharat Sonawane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...