मुख्य सामग्रीवर वगळा

अलगुज बोलायचं राहून गेलेलं..!

अलगुज बोलायचं राहून गेलेलं..!

माणसं जोडायला हवी या एका वाक्यापाशी येऊन हल्ली मनाचा संवाद काही सेकंदासाठी का होईना थांबत असतो. कारण आयुष्यात खरं माणसं जोडायला हवीच का ? ती खरच इतकी महत्त्वाची असतात का ? ही दोन प्रश्न हल्ली आयुष्याची गणितं सोडवत असताना रोजच पडत असतात.

मग कुणी अनामिक खूप दिवसांच्या अंतराने भेटून जातं, दोन क्षणाच सुख आपल्या पदरी टाकून जातं. अश्यावेळी वाटून जातं की, आपण माणसं जोडायला हवी. मग कधीतरी जोडलेल्या माणसांचा होणारा त्रास व त्यांची उपस्थिती आपल्या आयुष्यात असण्याने होणारा त्रास. हे सगळं कसं आलबेल आहे असं वाटतं. 
आयुष्याची गणितं जुळवत-जुळवत मन मग हिंदोळे देत का होईना या प्रश्नांना सोबत घेऊन रोज माझ्याशी जगण्यासाठी हव्या असणाऱ्या गोष्टींना घेऊन गुजगोष्टी करत असतं.
असंच काही त्याच्या कालच्या झालेल्या गुजगोष्टीतून हाती लागलं अन् वाटलं की लिहायला हवं.

कारण लिहल्याने काय होतं, माणसं जोडली जातात. त्यांची प्रॉब्लेम्स नकळत मग आपली होतात, मग उत्तरे शोधली जातात. कित्येक कधीही उत्तर न मिळणाऱ्या प्रश्नांची. पण; माणसांचा सहवास असाच असतो जो आशेला लावतो. मग ते प्रेम असो मैत्री असो किंवा जगण्यासाठी शिकत असलेली गणितं का होईना.

तर हल्लीना अनेकदा नोटीस करतो की, काही जवळचे मित्र- मैत्रिणी व्हॉट्सॲपवर स्टेटस टाकलं की दुसऱ्या क्षणाला ते डिलीट करतात. ते दोन-तीन मिनिटे राहिलेलं स्टेटस अनेकदा त्या मिञ-मैत्रिणीच्या आयुष्याची गणितं तिच्याकडून सांगणारे असतं. ती शोधत असते आपल्या पडलेल्या प्रश्नांना उत्तरे. अश्यावेळी या मिञ-मैत्रिणीला अनेकदा आपल्या जवळच्या व्यक्तीशी हे प्रॉब्लेम शेअर करायचे असतात.

हे जे मित्र असतातना ते फार बोलके नसतात अन् मग ते हे असा स्टेटसचा खेळ करत बसतात. त्यातून स्वतःला खोटी समजूत घालत बसतात. मग त्यांचं हे आयुष्याचे गणित घेऊन टाकलेलं अन् पुढच्या काही मिनिटांत डिलिट झालेलं स्टेटस माझ्यासारख्या एखाद्या संवेदनशील मनाच्या व्यक्तीने बघितलं की अनेकदा बोलण्याचा प्रयत्न होतो. 

अनेकदा त्यांचं हे असं स्टेटस टाकणं ते प्रॉब्लेम फेज करत आहेत हे सांगतही असतं. मग अश्यावेळी माझ्यासारख्या मित्राला ती वेळ साधता यायला हवी. नाहीतर ते स्टेटस बघून जर आपण आपल्या या मिञ-मैत्रिणीला बोललो नाही तर त्यांची प्रॉब्लेम ही अशीच वाढत जातात. मग एक दिवस कधीतरी आयुष्य जगणं त्यांना अवघड वाटायला लागतं.

मग नको ते प्रश्न मनात येतात अन् नको ती उत्तर बावरलेलं त्यांचं मन त्यांना देतं अन् मग सगळं काही मिनिटात संपून जातं.

तेव्हा असे मिञ-मैत्रिणी जोडायला हवी, त्यांची प्रॉब्लेम्स समजून घ्यायची, त्यांच्याशी टाईम स्पेंड करायचा. होत काही नसते, आपण त्यांचे प्रॉब्लेम सोडवू शकत नाही हे त्यांना अन् आपल्यालाही माहीत असते. पण; फक्त आपलं ऐकून घेणारं कुणी असलं की फरक पडतो.

तेव्हा आपण ऐकणारं होऊया, आजवर असे अनेक मित्र-मैत्रीणी भेटले, त्यांचे स्टेटस बघून त्यांच्याशी बोलता झालो. त्यांचे प्रॉब्लेम्स मी Solve करु शकलो की नाही माहित नाही पण; माझं त्यांच्या सोबत असणं आधार वाटतं त्यांना. 

खास करून अश्या मैत्रिणी फार वाट्याला आल्या. कारण हेच असेल की, लेखकाच्या मैत्रीणी खूप असतात म्हणून असेल. पण; अलाहिदा हसण्याचा भाग सोडला तर हे खूप खरं आहे.
मुलांच्या बाबतीत एक समजलं मुलं फार संवेदशील अश्या मनाची फार नसतात. अनेकदा त्यांचे हे असे प्रॉब्लेम्स ते चहा अन् सिगारेटच्या एका कशवर सोडवून मोकळे होऊन जातात.

त्यामुळं अनेकदा त्यांच्या बाबतीत आनंद वाटतो पण त्यांचं आयुष्याला घेऊन तुटणे कधी बघितलं तर ते ही खूप वाईट्ट असतं. अनेकदा मित्रमैत्रिणींनो आपण प्रत्येक प्रॉब्लेम आपल्या पालकांना किंवा Girlfriend, Boyfriend यांना सांगू शकत नसतो किंवा तितका/तितकी तो/ती पात्रही त्यावेळी नसतात. कारण एक हक्काची मैत्रीण किंवा मिञ जितक्या सहज आपले हे प्रोब्लेम समजू शकतात तितके ते नाही. 

कारण त्यांच्या इतकं समजून घेणारं अन् त्यांना जितकं शेअर आपण करतो तसे आयुष्यात कुणी नसतं. तेव्हा असं डिलीट होणारं स्टेटस बघून विचारपूस करणारी मैत्रीण अन् मित्र कायम आयुष्यात ठेवा. आयुष्य जगणं सुंदर होईल अन् सहज होईल.

Written by,
Bharat Sonawane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड