मुख्य सामग्रीवर वगळा

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग - २

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग - २

संतूच्या बाईच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी नागू तिच्याकडे बघत बोलू लागला: राणू ठीक हायसा..! दगड फोडायचं काम झालं हायसा आता ती दोन दिवसा महुरं येईल तुझ्या संगतीनं डोईवर वऱ्हाटे, पाटे इकाया.
बोलणं ऐकून संतूची बायको बोलती झाली: ठीक हायसा अण्णा मला बी अक्काच्या संगतीने ई- जा करायला बराबरी होईल. चहा घेतलासा का अण्णा असं संतूच्या बायकोनं विचारलं..!

नागू नकारार्थी मान हलवत म्हंटला नगूया आता गोंडाजी यायला असल सडकी तो आला की जेवण-खावान होतीया मग..!
नागू धोतर सावरत संतूला म्हणतो: येतूया संतू लका, झगडा नग करुस भाडीच्या काम भी कर जरासा..!
संतूनं मुकाट्यानं मान हलवली अन् हु हु करू लागला अन् नागू तिथून झोपडीच्या वाटेनं निघाला.

नागू काही वेळात पाय आपटीत झोपडी लोंग आला अन् त्याच्या झोपडीसमोर असलेल्या बाजीवर बसून वाटेला नजर लाऊन बसला होता.
इतक्यात त्याला दूरवरून खेचरांना हाकरत येणारा गोंडाजी दिसला अन् पाठीशी त्याची बायको सुमन दिसली दिसताच त्यानं रानूबाईला हाक मारली.
राणे अय राणे..!
धाकली जोडी येऊन राहिलीया चुल्हांगणावर पाणी तापाया ठेव. दमली अस्तीला इळभर दगड फोडूनसनी..!
 
रानुबाई उठली भाकरीचं टोपलं महूरं घेऊन तिनं चुल्हांगणावर डेचकीत पाणी तापाया ठेवलं. तितक्यात गोंडाजी अन् सुमन खेचरांना हाकरत हाकरत झोपडी पहूर आली. सुमन डोईवरचा पदर सावरत न्हाणीघरात गेली राणूबाईनं तिला बादलीत पाणी काढून दिलं अन् ती हातपाय धुवू लागली.

नागू बाजीवरून उठून गोंडाजीच्या हातून खेचर घेऊन त्यांच्या अंगावर आणलेल्या वऱ्हाटे, पाट्यासाठी आणलेला दगड निरखून टाके द्यायचं राहिलेल्या दगडात ती दगड रचू लागला. सोबतच गोंडाजीसोबत गाव महूरच्या खदानीबद्दल बोलू लागला. हातपाय धुवून गोंडाजी अन् नागू बाजीवर बसले अन् राणूबाई, सुमन चहा कपात ओतत त्यांच्याकडे देत त्यांच्या मोहरे अंगणात बसले.

इकडच्या तिकडच्या गप्पा होऊ लागल्या राणूबाईनं चुल्हीवर कढईत टाकलेलं पिठलं रटारट आळत होतं काही अवधीनं नागू अन् गोंडाजी झोपडीत आले अन् सुमनबाईनं ताट वाढाया घेतले चौघ जमली अन् सुमनबाईने सर्वांना वाढून दिले. जेवणाबरोबर संसाराच्या अनेक गोष्टी चालू होत्या.

आयुष्यात इतके सर्व कष्ट सहूनसुद्धा ते सर्व सुखी समाधानी होते. पिठाच्या डब्ब्यावर ठेवलेली घासलेटाची चिमणी विझायला करत सर्वांची जेवण झाली राणूबाईनं भांड्याचा गराडा महूरच्या अंगणात घेतला अन् दोन्ही मिळून कुणी भांडे घासू लागले कुणी हिसळू लागले. भांडे आटोपून दोघीही काम आवरून झोपडीत आल्या सुमनबाई अन् धोंडाजी परसदारच्या अंगणाला आडोसा केलेल्या वळकटीत झोपी गेले अन् राणूबाई झोपली अन् नागू आपलं पांघरून घेऊन बाहेरच्या खाटेवर पडून राहिला.

काळ्याभोर आकाशात चांदनं लकलकत होती. नागू त्याच्या ह्या संसाराची चमक अन् उद्याची स्वप्ने त्या चांदण्यात विहार करत बघत बसला. जसजशी रात्र सरायला लागली तसे नागूचे डोळे जड पडायला लागली अन् नागू बाहेरच्या खाटेवर झोपी गेला.

पहाट झाली तांबडं फुटलं, कोंबड्यानं बांग दिली तसे राणूबाई उठल्या अंगण झाडून झुडून घेतलं अन् चूल शिलगवून राणूबाईनं पाणी तपाया ठेवलं. एका मागोमाग सर्वांच्या अंघोळी झाल्या सकाळची काम आवरली अन् सकाळची न्याहारी करून दुपारच्या भाकरीचं पेंडकं पोत्यात ठेऊन गोंडाजी अन् सुमन खदानीच्या वाटेनं दगड आणाया निघाली.

टाके द्यायच्या कामाचा उरक आवरता बघून वऱ्हाटे, पाटे घेऊन संतुच्या बायको संगतीने तालुक्याच्या गावाला वऱ्हाटे,पाटे घेऊन राणूबाई निघाली. नागू आपल्या बायकोला नजरेआड जास्तोवर बघत राहिला. इतके वर्ष काहीही तक्रार न करता राणूबाईचं चालू असलेलं काम हे सगळं नागू संतूला सांगू लागला. संतूलासुद्धा आता हे सर्व पटलं होतं, दोघेही एकमेकांच्या नजरा चुकवत आपापल्या झोपडीकडे निघून गेली अन् उरलेल्या दगडांना टाके देऊ लागले, घाव देऊ लागले.

सांज ढळली तसं राणूबाई अन् संतूची बायको माळावरून येताना नागूला दिसली जशीजशी सांज सरत होती तशी राणूबाई आपल्या आयुष्यात तिच्या संसारासाठी झुरत असताना नागुला दिसू लागली होती.

क्रमशः
Written by,
Bharat Sonawane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड